दादाराजे खर्डेकर सातार्‍यात एक निवडणूक सभा घेत होते.

भाषण संपल्या नंतर लोकानी घोषणा दिल्या

शरद पवार झिंदाबाद.

त्यानंतर कोणीतरी जोरात ओरडले "दादा राजे......"

लोकाना जय म्हणावे /झिंदाबाद म्हणावे हे कळाले नाही एकदम शांतता पसरली.

कोणीतरी त्या घोषणेला उत्तर दिले ".खर्डेकर........"

सभेत एकदम हशा पिकला

 आचार्य कृपलानी हे प्रजा समाजवादी पक्षाचे तर त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी Congress पक्षाच्या खासदार होत्या. आचार्य कृपलानींनी त्यांच्या भाषणात Congress पक्षावर टिका करायला सुरवात केली. अर्थात त्यांच्या पत्नी त्याच पक्षाच्या खासदार म्हणून त्याच सभागृहात उपस्थित होत्या. आचार्य कृपलानी पुढे म्हणाले: "I knew that congressmen are crooks. Still I never expected them to run away with the wives of members of opposition parties". यावर सभागृहात हशा पिकला हे वेगळे सांगायला नको.

 एकदा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पार्वतीबाई परीहार ह्या त्या वर्षातील साहीत्यसंमेलनाध्यक्ष शंकरराव खरात यांच्या समवेत एकाच स्टेजवर कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्या बोलायला उठल्या पण एकदम शंकररावांचे नाव डोक्यातून गेल्याने (आपले हे, असे काहीसे म्हणत) अडखळल्या. म्हणून कोणी तरी पटकन सांगितले. कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण दुसर्‍या दिवशी एका वृत्तपत्रात मथळा होता: "पार्वतीबाई, शंकररावांना विसरल्या!" 

 एका बिल ला त्यांचा पक्ष समर्थन करणार का असे विचारले असता तो नेता म्हणाला...


आय विल... (समर्थक खूश)


नॉट... (विरोधक खूश)


टेल यु... (हशा नि टाळ्या)

 बाळासाहेब भारद्यांनी केलेली भारतीय राजकारणाची व्याख्या: "काँग्रेसवाल्यांच्या खुर्च्या, जनसंघाच्या पुजाअर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा आणि कम्युनिस्टांचा मोर्चा"

रंग

 थेंबउणें ऊन 

माळावर जळे, 

कांचेवर तडे 

श्रावणाच्या. 


स्तनांवर माझ्या 

जांभळाची झाक;

ओली आणभाक 

आठवते.


दि - 18/01/1958 

नागपुर

 भांजा – भतीजांना चिकटवून वशिलेबाजी करणे, लिंकनला अगदी नापसंत असे. तरी त्याचे नातेवाईक, गाववाले अनेकदा त्याला गराडा घालीत आणि आपली वर्णी लावण्यासाठी तगादे लावीत. त्या सर्वांना थोडा वेळ बसायला सांगून एकदा लिंकन म्हणाला, ‘मी तुम्हांला आधी एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी सगळे प्राणी आळीपाळीने एकेकाला आपला राजा करीत. होता होता गाढवाची पाळी आली. गाढवाचे भाईबंद आपल्याला अधिकार मिळावा म्हणून एकच हाकाटी करू लागले. तेव्हापासून जगात तीच पद्धत पडली. आजही त्याचेच भाईबंद हक्कानं वशिला लावायला येतात.’