चालचलाऊ गीता

पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी

बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !

धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही

समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके

काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला

पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी

या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग

लेकांनो! होऊनिया रोग | मराना का!

लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी

कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'

कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?

पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया

मारे रथावरी बैसला | शंखध्वनि काय केला!

मग आताच कोठे गेला | जोर तुझा मघाचा?

तू बेट्या! मूळचाच ढिला | पूर्वीपासून जाणतो तुला;

परि आता तुझ्या बापाला | सोड्णार नाही बच्चमजी!

अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;

बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!

कशास जमविले आपुले बाप? नसता बिचा-यांसी दिला ताप;

घरी डाराडूर झोप | घेत पडले असते!

नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;

म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?

अरे तू क्षत्रिय की धेड? आहे की विकली कुळाची चाड?

लेका भीक मागावयाचे वेड | टाळक्यात शिरले कोठुनी?'

अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;

दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?

आपण काही लढत नाही | पाप कोण शिरी घेई!

ढिला म्हण की भागूबाई | दे नाव वाटेल ते.'

ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,

खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला |

इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः 


- जयकृष्ण केशव उपाध्ये

व्यर्थ हो सारेच टाहो

व्यर्थ हो सारेच टाहो एक हे ध्यानात राहो

मुठ पौलादी जयांची ही धरा दासी तयांची


पैज जे घेती नभाशी आणि धडका डोँगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे
श्वास येथे घ्यावयाचा आग पाण्या लावण्याचा
ऊरफाड्या छंद आहे मृत्यू ज्यांना वंद्य आहे
साजिर्या जखमा भुजांशी आणि आकांक्षा उराशी
घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे
माती हो विभुती जयांची ही धरा दासी तयांची

शब्द लोळांचे तयांचे नृत्य केवळ तांडवाचे
सुर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला
जे न केवऴ बरऴती गोड गाणी कोरडी
जे न केवळ खरडती चंद्र तारकांची स्तुती
झेप ज्यांनी घालूनी अंबराना सोलूनी
तारका चूरगाळल्या मनगटाला बांधल्या
ग्रह जयांची तोरणे सुर्य ज्यांचे खेळणे
अंतराळे माऴती सागरे धुंडाऴती
वंदीला जे पोऴती रोज लंका जाळती
ही अशी शेपुट जयांची ही धरा दासी तयांची

हस्तकी घेउन काठी केशरी घालूनी छाटी
राम ओल्या तप्त ओठी राख रिपूची अन् ललाटी
दास ऐसा मज दिसू दे रोम रोमातून वसू दे
सौख्य निप्पर्शा त्वचेशी वेदना ही ठसठसूदे
थेंब त्या तेजामृता मज अशक्ताला मिऴू दे
कांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिऴू दे
जे स्वत:साठीच वाहे रक्त ते सारे गळू दे
रक्त सारे लाल अंती पेशी पेशीला कऴू दे
अश्रू आणि घाम ज्यांनी मिसऴूनी रक्तामधूनी
लाख पेले फस्त केले आणि स्वत:ला मस्त केले
त्या बहकल्या माणसांची त्या कलंदर भंगणांची
ही नशा आकाश होते सर्जनांचा घोष होते
ही अशी व्यसने जयांची ही धरा दासी तयांची

- सांग सख्या रे, संदिप खरे
22/07/09:

 २००६ की २००७ ची एक पत्रकार परिषद, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबा लोकप्रियतेच्या शिखरावर होते व पत्रकार परिषदेत हिंदी मध्ये उत्तरे द्यायची त्यांची हौसही जोरात होती.

कुठल्या तरी अट्टल गुन्हेगारांना पकडल्या बद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. त्यावर कुणा हिंदी वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना विचारले की अब इस मामले में आपकी सरकार क्या करेगी?

यावर आबा चटकन म्हणाले की, उन्हे शिक्षा मिले इसका हम पूरा प्रयास करेंगे. जेव्हा कुणीतेरी ही चूक आबांच्या लक्षात आणून दिली व समजावले की मराठीमधली शिक्षा म्हणजे हिंदीतले शिक्षण, आबांनी सजा असे म्हणायला हवे होते.

त्यावर आबांनी पत्रकारांना विनंती करून नव्याने बाईट दिला व यावेळी शिक्षेऐवजी सजा देंगे असं ते म्हणाले.

 लोकसभा निवडणूक १९८४. बारामती मधून शरद पवारसाहेब (स. काँग्रेस) आणि शंकरराव पाटील (काँग्रेस) असा प्रमुख सामना होता.

पवारसाहेबांची आकुर्डीच्या सभेमधील भाषणातील काही वाक्ये -
".... आजच टाईम्समधे गेल्या पाच वर्षांत ज्यांनी लोकसभेत एकही प्रश्न विचारला नाही अशा खासदारांची लिस्ट आली आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ खासदारांची नावे आहेत. त्यात पहीले नाव आहे शंकरराव बाजीराव पाटील. या माणसानी लोकसभेत फक्त दोन वेळा तोंड उघडले. पहील्यांदा खासदारकीची शपथ घ्यायला. कारण त्याशिवाय खासदारकीचे बेनीफिट मिळत नाहीत. आणि दुस-यांदा जांभई दयायला..."

 लालबहादूर शास्त्रींनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान बनविण्यात कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष इत्यादी सिंडिकेटचा महत्वाचा वाटा होता. १९६७ च्या निवडणुकांपर्यंत इंदिरांना पंतप्रधानपदी ठेवायचे तोपर्यंत त्यांना कठपुतलीप्रमाणे कसेही फिरवता येईल असा त्यांचा कयास होता.पण तो कयास जोरदार फसला. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदी आल्यावर स्वतःचा इंगा दाखवून द्यायला सुरवात केली. १९६६ मध्ये रूपयाचे अवमूल्यन करायचा निर्णय इंदिरा गांधींच्या सरकारने घेतला.हा निर्णय सिंडिकेटला फारसा रूचला नव्हता.त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी "Great man's daughter--small man's mistake" असे म्हटले. म्हणजे Great man's (नेहरूंच्या) daughter (इंदिरांना) पंतप्रधान बनविणे ही small man's mistake होती. इथे small man हे कामराजांनी स्वतःला उद्देशून म्हटले.

 १९९६ साली अट्लबिहारी वाजपेयीं पंतप्रधान असताना विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणला व NDA सरकार १३ दिवसात पडलं.त्यानंतर तिस-या आघाडीला बाहेरुन पाठींबा देऊन काँग्रेसनी देवेगौडांना पंतप्रधान केलं. त्या वेळी संसदेच्या पहिल्याच सत्रात प्रमोद महाजन बोलत होते. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी तुफानी आतिषबाजी केली होती. त्या वेळच्या तडजोडीच्या राजकारणावर सडकुन टिका करताना त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली.एकदा भारतीय सर्व-पक्षीय संसदीय मंडळ चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळी एका चिनी राजकारणी माणसाने महाजनांना भारतीय लोकशाही बद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले," हम जब चीन मे गये तो बहुत सारे लोग हमारे साथ थे| तब मुझे किसीने पुछा आपकी democracy कैसे चलती है? मैने कहा की democracy समझाने से अच्छा मैं सिर्फ आपको अपने सहचारिंओंका परीचय करवां देता हूं आप खुद ही भारतीय democracy समझ जायेंगे. मैंने कहा..'I am Pramod mahajan, I am member of Loksabha, I belong to single largest party in the house.. and I am in opposition!' फिर मैंने श्रीवल्लभ पाणिग्रहींकी ओर हाथ करे बोला,'He belongs to second largest party (Congress). He is outside the Government..supporting the Government', फिर मैंने अहमद बेदी साहाब को उठाया और कहा,'He is in third largest party(Janata Dal).. he is inside the front but out side of government' और फिर मैंने कहा,'he is Mr. Ramakant Khalap,( Maharashtrawadi Gomantak Party) he is the only member of his party and he is in the government!!(Law Minister)'...

 लॉयड जॉर्ज/ लिंकन एकदा निवडणूक प्रचारासंबंधात एक "नुक्कड़ सभा" सारखी सभा घेत होते तेव्हा प्रेक्षकात बसलेला एक टारगट बाप्या ओरडला

"ह्याचा बाप एक जुना खटारा चालवत असे ज्याला घोड्या ऐवजी गाढ़वे जुंपलेली असत!"

ह्यावर अजिबात तोल न ढळू देता लॉयड जॉर्ज / लिंकन मिश्किलपणे म्हणाला की

"आज आमचे पिताजी जिवंत नाहीत किंवा त्यांचा तो खटारा ही अस्तित्वात नाहीत पण त्याला जुंपलेली गाढ़वे मात्र अजुन जिवंत आहेत"