इंदिरा संत

संत ईंदिरा नारायण ( जन्म ४ जानेवारी १९१४ ते १३ जुलै २०००)कवियत्री, कथाकार, ललित लेखिका.
मुळच्या इंदोर च्या इंदिरा दिक्षीत..
फर्ग्युसन मधे महाविद्यालयिन शिक्षण.. तेथेच प्रा. ना. मा. संत यांच्याशी परिचय ऊन पुढे विवाह झाला.
पहिला काव्य संग्रह:- १९४० मधे “सहवास”
१९४६ मधे वैधव्य आले.
१९५२ मधे “शामली हा कथासंग्रह
१९५५ मधे “कदली”
१९५७ मधे “चैतु “
१९५१ मधे प्रकाशित झालेल्या शेला ह्या कविता संग्रहा पासुन स्वतः ची ऒळख निर्माण झाली.शेला मधिल कविता अतिशय उत्कट ,भावपुर्ण, आणि प्रतिभा संपन्न होत्या.”विशुद्ध भाव कविता” लिहिणारी कवियत्री म्हणुन स्वतःची ओळख निर्माण केली.

१९५५ मधे मेंदी आणि १९५७ मधे म्रुगजळ ह्या कविता संग्रहात त्यांच्या कवितांचे सामर्थ्य पुर्णत्वाला पोहोचलेले दिसते..प्रिती, एकाकी पणाचे दुःख, विरह आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातुन भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दात बांधण्याची त्यांची किमया या संग्रहातुन जाणवते..

१९६४ मधे रंगबावरी, १९७२ मधे बाहुल्या, १९८२ मधे गर्भ रेशमी१९८९ मधे चित्कळा, आणि १९८९ मधे वंशकुसुम आणि निराकार हे त्यांचे संग्रह प्रसिध्द झाले.

गर्भ रेशमी ला १९८३ साली साहित्य अकादमी चे पारितोशक मिळाले.

सन्मान:-

१) अध्यक्ष , कविसंमेलन ,मुंबई मराठी साहित्य सम्मेलन १९५२ साली.
२) अध्यक्ष , महाराष्ट्र कवियत्री सम्मेलन कऱ्हाड १९७५ साली.
३) अध्यक्ष , कवियत्री साहित्य सम्मेलन , गदग १९८४ साली
४) अध्यक्ष , बालकुमार साहित्य सम्मेलन ,सावंतवाडी
५) अध्यक्ष , साहित्य सम्मेलन कदिली, कर्णाटक

पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठान्चा पुरस्कार, १९९५
’गर्भरेशमी’ साठी साहित्य अकादमी पुरस्कार
’गर्भरेशमी’ साठी अनंत काणेकर पुरस्कार
’मेंदी ’,’मॄगजळ’ या संग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा