करंगळीला धरुन आम्हाला,
तु चालायला शिकवलंस,
बोट धरुन आमचं तु,
पाटीवरचं अक्षर गिरवलंस,
रडु आमचं आवरावं म्हणून,
...घोडा होऊन आम्हाला रिझवलंस,
आता पर्यंतचं आयुष्य तु,
आमच्या साठी झिजवलंस,
सासरी गेल्यावर आमची,
आठवण काढशील का रे...?
बाबा... आम्हाला माहीत आहे,
सासरी जाताना,
एका कोपर्‍यात जाऊन,
आमच्यासाठी लहान मुलासारखा,
रडशील ना रे.......??????


कवी - ऋषीकेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा