शिशिराचा मनी मानू नका राग

नका व्यर्थ करू झाडांनो, ओरड

झाली पानझड सुरु आता

पिकल्या पानांचा धरू नका लोभ

फुटणार कोंब नवे पुन्हा

शिशिराचा मनी मानू नका राग

फुलवाया बाग येतसे तो

कृश-वुद्ध झाला, नका करू खंत

तारुण्य-वसंत आणील तो

नवीन पालवी, नवीन मोहर

कोकीळ सुस्वर गाईल तो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा