अहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही !

काय करावें !
आज दारुलाबी खिशांत पैशे नाहींत !
- काय कोंडाबाई !
अहो कोंडाबाई !
काय तुमचें भांडण तरी काय आहे ?
अशा आमच्यावर रागावलांत कां ?
- काय म्हटलेंत ?
काल तुम्हांला ओझ्याला बोलावलें नाहीं, म्हणून तुम्ही माझ्यावर इतक्या रागावलां ?
जाऊं द्या कीं !
उद्यां लागतील तितकीं गिर्‍हाइकें येतील !
मग सगळ्या गवर्‍या तुम्हीच मसणांत नेऊन टाका !
मग तर झालें ?
अहो, गिर्‍हाइकें येऊं द्या कीं, मग तुम्हांला पैशेच - पैशे !
- काय त्रास आहे पहा !
अग ए !
कां उगीच गागत आहेस ?
गांवांत कोण प्लेग चालला आहे !
- अहो, कोणाचे जीव बी सुचित नाहींत, - आणि ही सटवी मधासधरुन उगीचच भांडत आहे !
- बरें झालें घरांत तेल नाहीं तर !
आणूं कोठून पैशे ?
- काय सांगूं कोंडाबाई !
हिच्या रोजच्या या काहारामुळें मला आपल्या जिवाचा अक्शी कंटाळा आला आहे !
- कोण आहे ?
दौलतशेट !
या शेटजी, जयगोपाळ, बसा.
खरोखर, तुम्हीं तर माझी अगदीं पाठ पुरवली आहे बुवा !
किती पंचवीसच रुपये बाकी राहिली आहे ना ?
देऊन टाकीन,
- उद्यां संध्याकाळच्या आंत, सगळे पैशे चुकते करतों !
- आतां काय सांगावें !
रामाशपथ, या वेळेला खिशांत एक पैसुद्धं नाहीं !
अहो, आतांपर्यंत मुळी गिर्‍हाइकच आलें नाहीं ! ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा