जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर,कट रचले गेले पाहिजेत.

ते दिवस खूप छान होते
जेव्हा घड्याळ एखाद्या जवळच असायचं आणि वेळ सर्वांकडे.


संसार ही अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनंही "गुण"लं" तरी "भागत" नाही  "गुणा"नं राहिलं तरच... "भागतं"


दोन विपरीत गोष्टी मुळे देशाची पायमल्ली होत आहे ..
1) शिक्षणात राजकारण जास्त
2) राजकारणात शिक्षण कमी !


"पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत,
 त्यांना वाचावं लागतं."


स्वतःवर विश्वास ठेवा,
कारण तुमच्या एवढं तुम्हाला
कोणीही ओळखत नाही.

प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा *स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही....




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा