व पु काळे

 1. भावनाधीन होऊन चालत नाही. माणसानं विवेक धरावा, व्यवहारी बनावं. भावना फार काळ उपयोगी पडत नाहीत ह्या जगात.’


2. भावनेला विवेकाची पराणी हवीच. स्वप्नाला जाग हवी.

3. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दु:खी होत नाही आणि पुष्कळदा स्वत:ला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवयीनं सुखी झालेली असतात. काही ठराविक गोष्टींचा लाभ होणारी, जशी शेकडा नव्वद टक्के माणसे असतात, त्यांचे संसार चालतात, त्यांच्यात व आपल्यात फरक नाही, ही जाणीव असणं, ह्यानंच कैक लोक स्वत: सुखी आहोत असं मानतात.

4. मानसिक अस्वास्थ्य हे प्रत्यक्ष भोगत असताना जाणवत नाही; तर त्याचा लोप झाल्यावरच, त्या औदासीन्याचा आपल्यावर केवढा पगडा बसला होता हे जाणवतं!

5. मुलं मोठी झाली की दुरावली. जोपर्यंत ती परावलंबी असतात तोवर ती आईवडिलांची असतात.

6. जी जागा आपल्याला खूप सुरक्षित वाटते तीच गोत्यात आणते.

7. उत्तरं मिळवायची असली की पाठ फिरवल्यानं ती मिळत नाहीत, परिस्थितीला तोंड देऊन ती मिळवायची असतात

8. असामान्य समस्या, असामान्य उपायांनी सुटतात.

9. एखाद्या गोष्टीचा काही विशिष्ट अर्थ आपल्या मनात असला की इतर सगळीजणं त्याच अर्थानं त्या गोष्टीकडे पाहात आहेत की काय असली शंका यायला लागते.

10. उत्तम स्मरणशक्ती असणं हा केव्हा केव्हा शापच! सगळं कसं वैशाखातल्या उन्हासारखं लख्ख आठवतं.

11. तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणजे बिघडला

12. पुरुष ही परमेश्वराची शक्ती, तर स्त्री ही त्याची प्रत्यक्ष मूर्ती

13. स्वास्थ्यापेक्षा आपत्तीच माणसाला अंतर्मुख बनवते, क्रियाशील करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा