चोखाळपण रत्नांचे । रत्नावरी किरणांचे ।

 तैसे पुढा मन जयाचें । करणें पाठी ।।

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रत्नाचे शुद्धपण जे असते तेच फार वेधक असते. त्यावर किरण पडल्यावर त्या शुद्धपणाला झळाळी प्राप्त होते. ती रत्नाची आभा अधिक चोखळ होते. अगदी तसेच काहींचे मन असते. शुद्ध, स्फटिकासारखे स्वच्छ आणि पारदर्शक, ते मन सतत प्रकाशत रहाते त्या रत्नासारखे. त्याची स्वयंप्रकाशी झळाळणारी कृती मग मागोमाग उमटतेच. पण प्रकाशाचा मार्ग ते रत्न पहिल्यांदा दाखवते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा