एका रेल्वे स्टेशन वर एक रेल्वे येऊन थांबते, जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता, तेवढ्यात एका शेठ ने त्याला आवाज दिला ये मुला, शेठ ने विचारल कितीला पाणी? मुलगा म्हटला २५ पैसे तर शेठ म्हंटला १५ पैशात दे, मुलगा गालात हसला व पाणी त्याने ज्या ग्लास मध्ये काढले होते ते जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले, हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिल, ते रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले तू #हसला का? 


मुलगा म्हंटला शेठला #तहान नव्हती लागली फक्त #किम्मत विचारायची होती, त्यावर त्या महाराजाने विचारल तुला कस माहीत शेठला तहान नव्हती लागली? त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले,

"जेंव्हा माणसाला खरच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे?"


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा