सुन्न झालें मन, सुन्न भावना या,

भोवताली पसरली रात्र-छाया;

पावसाचा चुकविण्या मार घेती

पांघरूनी अंधार घरें रस्तीं.

“- व्यर्थ येतां का ? प्रेम कधी माझें

– शक्य नाही” – उतरिलें तिथे ओझें

बंद दाराशीं मग मुग्ध भावनांचे;

आणि धरिला मम मार्ग सिधा….

पावसाळी अंधार गारठ्यांत

काकडूनी हम-मार्ग-दिवे जात;

चिंब ओला जाहलों आणि थेट

दारूगुत्त्याला दिली प्रथम-भेट !

भेट शेवटली तशी प्रथम तीच,

झोपडीला परतावी माय-खेच.

माय असते, बाईल जरी नाही,

प्रेमवंतां तशि प्रेमवंचितांही.

दिवस झाले कित्येक त्या प्रसंगा;

आज आलों शोधीत गेह-रांगा;

बंद आहे तव दार; परि ओझें

आत नेलें उचलुनी कुणीं माझें !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा