लग्न झाल्यावर २ वर्षांनी
चिंगी:- मी मुर्ख होते, म्हणून तुज्याशी लग्न केले.




चम्या:- हो ना तेव्हा मी प्रेमात आंधळा झालो होतो, म्हणून माझ्या लक्षात नाही आली हि गोष्ट.
स्वत:च स्वत:शी लढण
आता रोजचच झालाय
छंद म्हणा, विरंगुळा म्हणा
पण आमच मात्र मस्त चाललंय

एकट्याच आयुष्य

एकट्याचाच असत आयुष्य,
एकट्यानेच ते सजवायचं
एकट्यानेच हसायचं, एकट्यानेच रडायचं,
माणसांच्या गर्दीत, एकट्यानेच ते फुलवायचं.
पुण्यात मुबलक प्रमाणात व काहीच कष्ट न करता काय मिळते ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अपमान !!!
नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,
गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,
“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!

आवाज हुंदक्यांचा

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!

- सुप्रिया

ती माझी जन्मसाथी

माझा जन्म झाल्यापासुन तीचे आणि माझे नाते आहे.मी निराश असलो की तिच्या डोळ्यातुन अश्रु येतात आणि मी जेव्हा हसतो तेव्हा तीच्या गालावरच्या खळ्या मला वेडावतात.दुखाःच्या उन्हात ती अधिकच गडद होत जाते आणि सुखाच्या वर्षावात ती माझ्याबरोबर चिंब भिजते.मी तीचा श्वास आहे आणि मीच तीचा आत्मा.मी तिला कधीच काही सांगत नाही तरिही ती सर्व जाणुन असते.रोज मी तिला पायदळी तुडवतो पण तीचे प्रेम आटत नाही.माझ्याशिवाय तीचे विश्व नाही ती पुर्णपणे मला समर्पित आहे.मी ज्यादिवशी अलविदा घेईल तेव्हा तीही या जगाचा माझ्याबरोबर निरोप घेईल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

ती माझी सावली आहे !