हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?

बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.

हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???
...
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.
एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,'' आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का???????

मुलगा थोडा वेळ विचार करतो.......तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो,




" हे बघ,बोअर करु नकोस."!!!!!!!!
संता : अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer : ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता : काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात.
शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?

बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"जमिनीवर!!"
चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....

पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
पलीकडचा आवाज - मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे.
पलीकडचा आवाज - आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे.
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
पलीकडचा आवाज - जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे.
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग.
पलीकडचा आवाज - जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग...

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?

पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे????

प्रश्न की आमंत्रण?

वरपिता : तर... तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय.

बंडू: होय.

वरपिता : बरं... मला सांगा तुम्ही ड्रींक्स वगैरे घेता का?

बंडू : अम्मं... एक विचारू?

वरपिता : बेशक!

बंडू : हा प्रश्न आहे की आमंत्रण?

कॉफी

बंड्या : एक कॉफी केवढ्याला???
वेटर: ५० रुपये, साहेब.
बंड्या : गप ये............ समोरच्या दुकानात ५० पैशाला आहे!!!
.
.
.
.
.
.
वेटर: ते xerox च दुकान आहे!!!
डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.
.
.
.
.
.
.
पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.... !!

माणूस व रेल्वे

एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून आजुबाजूच्या शेतातून धावायला लागते
आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.

रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबते. रेल्वे चालक संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात आणि त्याला प्रश्न विचारतात.

अधिकारी- संता, तू असे का केलेस..??

संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता.
मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून बाजूला जात
नव्हता.

अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..?? एका माणसासाठी तू हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात
घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..??

संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण तो माणूस
पटरी सोडून इकडे तिकडे
धावायला लागल्यावर मी तरी काय करणार..??














आई" हा फक्त शब्द पुरेसा आहे ......
आई म्हणजे .........
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे
सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार
पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा
आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर
घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच
लढायची
एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस
जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही
आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील...

ब्रम्हगुप्त



ब्रम्हगुप्त हा एक प्रतिभाशाली भारतीय खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचा जन्म शके ५२० (इस. ५९८) मध्ये झाला.

ब्रम्हगुप्त व्याघ्रमुख राजाच्या राज्यसभेत खगोलशास्त्रज्ञ होता. व्याघ्रमुख राजा उत्तर गुजरातचा प्रमुख होता. त्याची राजधानी भिनमाळ येथे होती. भारतात सातव्या शतकात ह्युएनत्संग ह्या परदेशी प्रवाशाचे आगमन झाले. त्याचेही आपल्या प्रवास वर्णनात भिनमाळसंबंधी मोठ्या गौरवाने लिहिले आहे. अल्बेरुणी हा व्यासंगी इतिहासकारही भिनमाळसंबंधी आवर्जून लिहितो. ब्रम्हगुप्तच्या वडिलांचे नाव जिष्णुगुप्त असून आजोबांचे नाव विष्णुगुप्त असे होते. ब्रम्हगुप्त जातीने वैश्य होता. ब्रम्हगुप्त हा वराहमिहीराचा शिष्य असावा. वराहमिहीराचे वास्तव स्थान उजनी होते. ते भिनमाळच्या जवळपास आहे. त्यावरून ह्या गुरू-शिष्यसंबंधास एक प्रकारे दुजोराच मिळतो. ब्रम्हगुप्तास 'आर्यभटीय', 'पंचसिद्धांतिका', 'बृहतजातक', 'लघुजातक' ह्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कल्याणवर्मा ह्याचा 'सारावली' ग्रंथ त्याने अभ्यासला. ग्रीकांच्या खगोलशास्त्र विषयक ग्रंथाचे ब्रम्हगुप्ताने अवलोकन केले असावे असा अल्बेरुणी चातर्क आहे. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक संपन्न झाले.

ग्रंथसंपदा

ब्रम्हगुप्ताने विविध ग्रंथांचे परिशीलन करून ब्रम्हसिद्धान्त व खंडखाद्य ह्या ग्रंथांची रचना केली. ब्रम्हसिद्धान्त हा ग्रंथ ब्रम्हस्फुटसिद्धान्त म्हणून विख्यात आहे. ह्या ग्रंथात खगोलीय गणित व गणित विषयाचा समावेश आहे. खंडखाद्य ग्रंथात प्रामुख्याने खगोलगणिताचा विचार केलेला आहे. ग्रहांचे मंदोच्चे, चंद्र-सूर्य ग्रहणे, दिनमान, ग्रह-नक्षत्रस्थिती ह्याचे सांगोपांग विवेचन त्यात केलेले आहे. ब्रम्हगुप्ताच्या ग्रंथावर सोमेश्वर, वरुणाचार्य, भटोत्पल, पृथूदकस्वामी, आमराज व त्रीविक्रमाचार्य ह्यांनी टीका लिहिल्या आहेत. कोलब्रुकने ब्रम्हसिद्धान्तामधिल अंकगणित व बीजगणिताच्या भागाचे इंग्रजीत भाषांतर केले. ब्रम्हसिद्धान्त लिहिल्यानंतरही लोकांनी आर्यसिद्धान्तच प्रमाण मानला. त्यामुळे लोकांना आकर्षण वाटेल असा खंडखाद्य हा ग्रंथ ब्रम्हगुप्ताने लिहिला. खंडखाद्याचे पूर्व व उत्तर असे दोन विभाग असून त्यात खगोलशास्त्रीय विवेचन आहे. खंडखाद्य म्हणजे गोड मावा हा खगोलशास्त्रज्ञ अभासकांमध्ये फार प्रिय आहे.

ब्रम्हसिद्धान्त का लिहिला याचे विवेचन करताना ब्रम्हगुप्त म्हणतो. :-

ब्रम्होक्तं ग्रहगणितं महताकालेन यत्खिलीभूतं ।
अभिधीयाते स्फुटं तञ्ञिष्णुसुतब्रम्हगुप्तेन ॥
ससाध्य स्पष्टतरं बीज नलिकादियंत्रेण ।
तत्ससंस्कृतग्रहेभ्यः कर्तव्यौ निर्णयादेशौ ॥

ह्या ब्रम्हगुप्ताच्या उद्गारात अगदी स्पष्ट दिसते की, पूर्वीचे ग्रहगणित हे अर्थहीन झाले होते म्हणून नलिका दियंत्राने वेध घेऊन ब्रम्हगुप्ताने पूर्वीच्या सर्व चुका सुधारून आपला सिद्धांत प्रस्थापित केला.

बलख येथील खगोलशास्त्रज्ञ अबू मशार ह्याच्या पुस्तकात ब्रम्हगुप्तच्या सिद्धान्तावरील ग्रहगणित समाविष्ट आहे. खलिफा अलमन्सूर याच्या आज्ञेवरून महंमद-बीन-इब्राहिम-अलफजारी ह्याने ब्रम्हसिद्धान्ताचे अरेबीत भाषांतर केले व त्यास सिंदहिंद असे नाव दिले ब्रम्हगुप्तच्या सिद्धान्ताची त्याच्या आयुष्यात वाखाणणी झाली नाही. परंतु भास्कराचार्यांनी ब्रम्हगुप्तचाच मार्ग स्वीकारला. हे त्याचे सुयश नव्हे काय?

भारतीय खगोलशास्त्राचा सर्वांगीण प्रगतीकार

भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने घातला हे खरे असले तरी त्याची सर्वांगीण प्रगती ब्रम्हगुप्तानेच केली. ग्रहांचे आकाशातील भ्रमण, मंदोच्चे, पात ह्याचे त्याने संशोधन केले आहे. ह्या संशोधनात त्याची स्वतंत्र बुद्धी दिसून येते. आकाशस्थ ज्योतींचे वेध घेण्यासाठी ब्रम्हगुप्तने स्वतःची यंत्रे तयार केली होती. ब्रम्हगुप्तास अयनगतीचे ज्ञान नव्हते. अयनचलनाची कल्पना त्यास आली असती तर आज भारतीय पंचांगात जो गोंधळ दिसतो त्याचे प्रमाण खात्रीने कमी झाले असते.

ब्रम्हगुप्तने भुव्यास १५८१ योजने आहे म्हणून सांगितले आहे.

वराहमिहीर



पहिल्या आर्यभटानंतर एक थोर खगोल शास्त्रज्ञ भारतात होऊन गेला. वराहमिहीरचा जन्म शके ४१२ ( इ. स. ४९० ) मध्ये झाला असावा. वराहमिहीर अवंती येथे वास्तव्य करीत असे. त्याने यवन देशात भ्रमंती करून खगोलशास्त्रविषयक ज्ञान संपादन केले असा एक प्रवाद आहे. परंतु त्यात तथ्य नाही. वराहमिहीराने ज्या विषयांवर लेखन केले आहे ते विषय भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पूर्वीही हाताळले आहेत. त्यामुळे वराहमिहीरावरील आरोप टिकण्यासारखा नाही.

'पंचसिद्धांताचा ग्रंथ. '

वराहमिहीराने खगोलशास्त्रीय गणितावर 'पंचसिद्धांतिका' हा ग्रंथ लिहिला. त्यात पौलिश, रोमक, वसिष्ठ, सौर पितामह अशा पाच सिद्धान्तांचा अंतर्भाव आहे. हे पाचही सिद्धांत आजच्या सूर्यादी पाच सिद्धान्तांहून भिन्न होते. डॉ. वुलहर यांना काश्मीरमध्ये पंचसिद्धांतिकेच्या दोन प्रती मिळाल्या. त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. ह्या प्राचीन सिद्धान्तांपैकी वराहमिहीराच्या काळी पितामहसिद्धांत व वसिष्ठसिद्धांत विचारात घेतले गेले नाहीत. कारण त्यात संदिग्धता फार मोठी होती. रोमक व पौलिश सिद्धांत त्या मानाने बरेच स्पष्ट होते व सूर्यसिद्धांत सर्वात अधिक सुस्पष्ट होता. हे सिद्धांत इ. स. ४०० मध्ये प्रस्थापित झाले असावेत असे डॉ. थिबोंचे मत आहे, परंतु कै. शं. बा. दीक्षित ह्यांना ते शककाल पूर्वीचे वाटतात.

वराहमिहीराने पितामहसिद्धान्तानुसार अहर्गण नक्षत्र व दिनमान काढण्याच्या रीती सांगितल्या आहेत. पितामहसिद्धान्तातील ग्रहगणिताविषयी वराहमिहीराने काहीच सांगितले नाही. त्यात ग्रहगणित असावे असे ब्रम्हगुप्त म्हणतो. परंतु ते दृक्प्रत्ययी नसल्याने वराहमिहीराने ते दिले नसावे असा एक तर्क आहे. पंचसिद्धान्तीकेतील वसिष्ठसिद्धान्तात रवी व चंद्र ह्यांचाच केवळ विचार केला आहे. तिथी व नक्षत्रे काढण्याची रीती सांगितली आहे. रांश्यशकला ही माने त्यात आहेत आणि छायेचा बराच विचार केला आहे. दिनमानासंबंधीही विचार केलेला आहे. रोमक सिद्धान्तातही केवळ रवी व चंद्र ह्यांचेच गणित आहे. ह्या सिद्धान्ताची मूलतत्त्वे बाहेरून आली असावेत असा तज्ज्ञांना वाटते. इतर सिद्धान्तांप्रमाणे रोमक सिद्धान्तात ४३, २०, ००० वर्षाचे महायुग ही पद्धत नाही. रोमक युग २८५० वर्षाचे आहे. पंचसिद्धान्तीकेतील पॉलिश सिद्धान्तात मंगळादी ग्रहस्थिती सांगितल्या नाहीत, परंतु ग्रहाच्या वक्र, मार्गित्व, उदय व अस्त ह्यांचे विवेचन आहे. पौलिशसिद्धांताचे ३६५ दिवस २५ घटी ३० पळे आहे व त्याच प्रमाणे महायुगातील सायन दिवस १, ५७, ७९, १६, ००० असून राहू-भगण २, ३२, २२८ हून किंचित कमी होतात. दिनमान व रात्रीमान ह्यांच्यातील सारखेपणा, तिथी नक्षत्रांची निश्चिती, ग्रहणे वक्रमार्गित्व ह्यांचाही विचार त्यात केलेला आहे.

वराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत सूर्यसिद्धान्ताला सर्वात अधिक महत्त्व दिले आहे. मूल सूर्यसिद्धान्तात युगपद्धती असून कलियुगाचा प्रारंभ गुरुवारी मध्यरात्री मानला आहे. म्हणजे त्यावेळी रवी-चंद्राचे भोग पूर्ण होते. आपल्या सर्वसामान्य युगपद्धती नुसार कलियुगाचे मान ४, ३२, ००० वर्ष समजतात. द्वापार, त्रेता, कृत, कलियुग ही युगे ह्यांच्या अनुक्रमे दोन, तीन, चारपट आहेत. ह्या चारी युगांना मिळून एक महायुग होते व अशी १००० महायुगे मिळून एक कल्प किंवा ब्रम्हदेवाचा दिवस होतो. कल्पात चौदा मनू होतात. कल्पारंभापासून वर्तमान महायुगारंभापर्यंत सहा मनू व सत्तावीस महायुगे गेली व अठ्ठावीसाव्यातील कृत, त्रेता, द्वापार ही तीन युगे संपून आता कलियुग चालू आहे. प्रत्येक मनू एकाहत्तर महायुगांचा असतो. पंचसिद्धान्तीकेतील भगण आदी संख्या व आजचे वर्षमान एकमेकांशी जुळत नाहीत. सूर्यसिद्धान्ताचा संबंध टोलेमीशी असावा. असे वेबर ह्याला वाटते. परंतु त्याच्या आक्षेपात मुळीच तथ्य नाही ही गोष्ट कै. शं. बा. दीक्षित यांनी साधार सिद्ध केली आहे.

वराहमिहीराचे 'बृहतजातक' व 'लघुजातक' हे ग्रंथ आजही प्रचारात आहेत. त्यातील फलज्योतिषाचे आकर्षण कायम असल्याने त्याची उपयुक्तता वाढत गेली. वराहमिहीराच्या बृहत्संहिता ग्रंथाचे भाषांतर डॉ. केर्न ह्यांनी इंग्रजीत केले आहे.

वराहमिहीराच्या संहिताग्रंथावरून त्याच्या वैज्ञानिक प्रतिभेची आणि कल्पकतेची साक्ष पटते. त्याने पदार्थाच्या गुणधर्मांचा विचार केला. सृष्टिचमत्कारांचा अर्थ वास्तव दृष्टिकोनातून लावण्याचा प्रयत्न त्याने केला. पदार्थाचे गुणधर्म व्यावहारिक पद्धतीने कसे उपयोगात आणावेत त्याचे विवेचन त्याने केले.

वराहमिहीराने म्हटले आहे :

पञ्च्महाभूतमयस्तारागणपञ्जरे महीगोलः ।
खेऽय स्कांतांतःस्थो लोह इवावस्थितो वॄत्तः ॥

पुष्कळशा लोहचुंबकांनी खेचलेला लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे ( अधांतरी ) त्याच्या मध्यभागी स्थिर राहतो. त्याचप्रमाणे हा पृथ्वीगोल ( पंचमहाभूतांनी वेढलेला ) तारांगणाच्या पिंजर्‍यात म्हणजे भूगोलात स्थिर आहे.

वराहमिहीराने बृहदसंहितेत 'केतूचार' नामक अध्यायात वारंवार दिसणार्‍या धूमकेतूंचे आश्चर्यकारक वर्णन केले आहे. त्यात त्यांचे स्वरूप, संख्या, शुभाशुभ फले ह्यांचे विवेचन आहे. आज ज्याप्रमाणे शोधकाच्या नावावरून धूमकेतूस नाव दिले जाते त्याच प्रमाणे उद्यालक, कश्यप, पद्मकेतू अशी ऋषींची नावे वराहमिहीराने या धूमकेतूंना दिलेली आहेत. त्या त्या ऋषींची नावे संबंधीत धूमकेतूंचा शोध लावला म्हणून दिली असावीत व वराहमिहीराने केलेली धूमकेतूची वर्णने अगदी अद्ययावत वाटतात. एका धूमकेतूचे वर्णन करताना तो म्हणतो : चलकेतू प्रथम पश्चिमेस दिसतो. त्याची शिखा दक्षिणेस असते व ती तिकडे एक अंगुल उंच असते. तो जसजसा उत्तरेस जातो तसतसा मोठा दिसतो. सप्तर्षी, ध्रृव आणि अभिजित ह्यांस स्पर्श करून तो मागे फिरतो व आकाशाच्या अर्धाचे आक्रमण करून दिसेनासा होतो. बृहत्संहितेचा टीकाकार भटोत्पल ह्याने केतूचार अध्यायाच्या टीकेत पराशर ऋषींची धूमकेतूंच्या संदर्भातील वर्णने दिली आहेत. काही धूमकेतूंचा कालावधीही स्थूलामानाने दिला आहे. वराहमिहीराने उघड्या डोळ्यांनी सौरडागांचे निरीक्षण केल्याचा उल्लेख बृहत्संहितेत केला आहे.

वराहमिहीराने पंचसिद्धान्तीकेत काही स्वयंवह यंत्राचे प्रकारही सांगितले आहे. वराहमिहीराच्या वैज्ञानिक प्रतिभेचे दर्शन ह्या उदाहरणात घडते. वराहमिहीराने खगोलशास्त्राची विविध अंगे विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वैज्ञानिक विचारांच्या दिशेने भारतीयांनी वाटचाल केली असती तर भारत विज्ञानाच्या क्षेत्रात पूर्वीच निश्चित आघाडीवर दिसला असता.

'mango' फ्लेवर

जर 'mango' फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आमटी....!!

मराठी लोकांची हिंदी

1. पहलि बार पोहने गया तो क्या हुआ मालुम ?

पहिले पानी मे शिरा, फिर पोहा और बाद मे बुडा!!

2. घाई करो भैया नही तो बस जायेगी , और हमारी पंचाईत होयेगी!!

3. सरबत मे लिंबु पिळा क्या !!

4. इतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है !!

5. कंदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर सेथोडा कोथिंबिर भुरभुरानेका!!

6. अरे बाबा गाडी सावली मे लगा!!

7. ए भाय, मेदुवडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना!!

8. केस एकदम बारीक कापो भैया !!

9. खाओ पोटभर खाओ लाजो मत !!

चोराहून चोर

राष्ट्रकुल घोटाळा झाल्यावर सुरेश कलमाडी पुण्यातून रात्री फेरफटका मारत होते.

त्यांना एका अतिशय कुप्रसिद्ध चोर, लुटारूने अडवले.
त्याने मात्र कलमाडींना ओळखलंच नाही.

चोर : चल ए, काय असेल नसेल सगळे पैसे काढून दे गपचूप. चल चल...

कलमाडी : अहो महाशय, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते?

चोर : मला नाही माहीत. पण त्याच्याशी काय करायचंय मला? गपचूप पैसे काढ.

कलमाडी : मी सुरेश कलमाडी आहे.

चोर : ठीक आहे, ठीक आहे. मला फक्त माझे तरी पैसे द्या

नेते तितकी मते

कोंबडी कोणी पळवली…

नेत्यांच्या स्टाईलने…

महात्मा गांधी – कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला
आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून
दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

लोकमान्य टिळक – कोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय?

बाळासाहेब ठाकरे – जर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला [चोराला] पहाटे
आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.

राष्ट्रपती ताई – कोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचा ‘
तीव्र’ शब्दात निषेध नोंदवते.

मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे
आवाहन करतो.

पी. चितंबरम - यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.

दिग्विजयसिंह – कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.

अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी
पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.

रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी
कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?

अटलबिहारी वाजपेयी – कोंबडी पळवणे……… ही........ चांगली गोष्ट नाही...... मी
सरकारला……. अनुरोध...... करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा
छडा....... लावावा.

अजित पवार – मी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.

लालू प्रसाद यादव – अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल जायेगी| भेस थोडी है जो नीतीस के घर
जायेगी||

राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला
लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत.
इतरांनी नाक खुपसू नये.

आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा
हातात घेऊ नये.

राहुल गांधी – कोंबडी चोर कोण है? महाराष्ट्रीयन है|

बराक ओबामा – ओह नो! आय कांन्ट..

नारायण राणे – हिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.

मायावती – कोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.

नितीन गडकरी – कोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?

कठीण ह्रदय

प्रेयसी प्रियकराच्या छातीवर डोके ठेवून,

"जानू, किती कठीण आहे रे तुझे ह्रदय.."

प्रियकर- प्रिये,

ते माझे ह्रदय नसून,

खिशात

ठेवलेली चुन्याची डबी आहे...

वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेछ्या



गौरव मराठीचा च्या वाचकांना वसंत पंचमीच्या मनपूर्वक शुभेछ्या

गणतंत्र दिन चिरायु होवो



सर्व भारतियांना प्रजासंत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेछ्या

वन्दे मातरम

वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।

कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,
कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।

त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।

श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥
वन्दे मातरम् ।
-बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय/चत्तेर्जी

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

२६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.

-दर्शाना मंचेकर
manchekardarshana@gmail.com

सुनेचा विरोधिपक्ष

सासूबाई (नव्या सुनेला): या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते.
तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते.
तुला कोणतं खातं हवं?

सूनबाई : मी विरोधीपक्षात बसते.
गंपू - हुस्स्श...फार फार दमलो बुवा..
गुंडोपंत - काय झाल दमायला ? त्या चिंगी चा भाऊ पाठीमागे काठी घेऊन आला का परत ?
गंपू - हाट....तस काही नाही..मी आज दिवसभर क्रिकेट खेळत होतो..
गुंडोपंत - अरे वा...मग थांबलास का ?? अजून खेळ..भरपूर धावा काढ..एक दिवस भारतीय संघात निवड होईल...!
गंपू - दिवसभर खेळणार होतो..पण...
....
.
.
.
.
.
.
.
पण मोबाइल ची battery डाऊन झाली..!

कुत्रे मोकळे पण दगड बांधून

झंप्या दारू पिऊन झिंगून रस्त्याने जात असतो, समोरून एक कुत्रे येऊन खूप जोरात भुंकायला लागते, झंप्या रस्त्याच्या कडेच मोठा दगड कुत्र्याला मारण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न करतो,
पण दगड जागचा हलत नाही....
शेवटी वैतागून म्हणतो....
"काय पण जमाना आलाय.....लोक कुत्र्याला मोकळे सोडतात..... आणि दगड बांधून ठेवतात...."
पुण्यातील एक किस्सा
एक मुलगी ट्राफिक तोडून चालली होती.
हवालदारनी अडवल आणि विचारल - 'काय हो...तुम्हाला शिट्टी ऐकू आली नाही का??!'
पुणेरी मुलगी - 'मी फ्लर्ट लोकांना भाव देत नाही'

आई, असं का ग केलंस?

का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता
झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त
तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि
रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात
असूनही मी त्याला
हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने
ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच
असते!

कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी
ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली
आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ"
आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा,
तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास
सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या
आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर
पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग
तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती
काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर
काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट
फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो
पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे
जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या
मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....

नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत
जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या
कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.....
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे. 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

फेसबुक वापरणाऱ्यांसाठी काही सूचना

१) भूकंप झाल्यास त्वरित घराबाहेर पळा, फेसबुक वर status update ... करायलाउभे आयुष्य आहे (जर वाचलात तर ).

२) मुलगी पाहायला गेल्यास तिला "तुझे फेसबुक account आहे का ?" असा मागास प्रश्न विचारू नका. यातून ती फेसबुक वर आहे कि नाही हे समजण्यापेक्षा, तुम्ही किती उतावळे आहात हे दिसते.

३) इकडून तिकडून post ढापून टाकण्यापेक्षा, स्वतः लिहा. फुकटात तुमचे लेखन प्रसिध्द करणारे असे लोकप्रिय ठिकाण दुसरे नाही , तसेच कितीही भंगार लिहिले, तरी ते संपूर्णपणे वाचणारे इथे पुष्कळ महारथी आहेत.

४) एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा - तुम्हाला दारूची सवय असेल तर ती एकवेळ सुटणे सोपे आहे , पण फेसबुकचे व्यसन सुटणे अवघड.

५) दारू सोडण्यासाठी 'बुलढाण्याला' एका मांत्रिकबाबाकडे नेतात , परंतु पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व मांत्रिक मात्र मागास असल्याने , फेसबुकचे व्यसन सोडविणारा एकही मांत्रिक या महाराष्ट्रात नाही..

तंदूर भट्टी व अणुभट्टी

बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?


बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहीलं नव्हतं तरी
नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला

शेवटचा क्षण

हिला मित्र : एक प्रश्न विचारू?

दुसरा मित्र : हा विचार ना?

पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?

दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणातकोणालाच भेटणार नाही....

पहिला मित्र : असे का?सांगशील?

दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुलाअसे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......
मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही".........

चांदोबा चांदोबा भागलास का

चांदोबा चांदोबा भागलास का

निंबोणीच्या झाडामागे लपलास का

निम्बोणीचे झाड करवंदी

मामाचा वाडा चिरेबंदी

मामाच्या वाड्यात येऊन जा

तूप रोटी खावून जा

तुपात पडली माशी

चांदोबा राहिला उपाशी

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा

तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा

पाऊस आला मोठ्ठा

येग येग सारी

येग येग सारी

माझे मडके भरी

सर आली धावून

मडके गेले वाहून

एक होतं झुरळ

एक होतं झुरळ

चालत नव्हतं सरळ..!

तिकडून आली बस...

बसमध्ये बसलं,

तिकीट नाही काढलं....

तिकीटचेकरने पाहीलं,

चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!

भोपळा

एवढा मोठ्ठा भोपळा

आकाराने वाटोळा

त्यात बसली म्हातारी

म्हातारी गेली लेकीकडे

लेकीने केले लाडू

लाडू झाले घट्ट

म्हातारी झाली लठ्ठ

तान्ह्या बाळा

अडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल
रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू

आई

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते..

उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण
घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने
बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी
मजुरीचे पैसे आणले..

तितक्यात मुलगा शाळेतून
आला आई ला म्हणाला मला जेवायला दे
मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे
सकाळी लवकर उठेन..

मुलगा सकाळी लवकर
उठला त्या माऊलीला पण उठवले,
मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई
लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून
घेतो
माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते..

मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई
ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे
मला उशीर होतोय
आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच
सापडत नव्हते..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई
लवकर कर माउलीने विचार न करता तसाच
दुधाचा टोप हाताने उतरवला गरम
दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ
लागल्या हाताची लाही लाही झाली..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न
उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून
दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले..

त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून
त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली..

आईने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले,
मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने
विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले..

मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या मग आईने
विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस
काही खाल्लेस कि नाही..

त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर
मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने
डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून
आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात
त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले
आई धन्य झाली..

आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर
इजा करून गेली..........

देवाची साथ



करावी एकदा मैत्री

भूताचे भविष्य अन् भविष्याचे भूत

एकदा एक भूत
आलं पहायला भविष्य
ज्योतीष्याच्या दारात
भेटले त्याचे शिष्य

त्यांनी त्याला हटकलं
त्याला ते खटकल
थांब म्हणता म्हणता
ते दारातून सटकल

घरात थोडं भटकल
एवढ्यात उंदराच पिटुकल
होत मोठ धिटुकल
त्याच्या पायाला चिटुकल

म्हणत,
भूता तुझी स्वारी
ज्योतीष्याच्या घरी
आली कशी बरी
सांगशील का खरी?

भूत म्हणाल,
जगण्याशी तुटल नातं
जीवनाच बंद खातं
मग भविष्य पहायला
आपलं काय जातं

हसत हसत फिदीफिदी
उंदीर म्हणाला त्याच्या आधी
गोष्ट सांगतो साधीसुधी
नको लागू उद्याच्या नादी

मी होतो जंगलचा वाघ
जंगलात एकदा लागली आग
प्राण्यांची झाली भागंभाग
मला आला भलताच राग

ज्योतीषाला दाखवून पंजा
म्हटलं, विचारतो जंगलचा राजा
सांग भविष्यात काय माझ्या
सांग नाहीतर करीन फज्जा

सांगितलं त्यान सारं खरं
कानात शिरलं भयाण वारं
कितीही झाडली जरी खुरं
तरीही झालं त्याचच खरं

दिसतो मी उंदीर जरी
आरशात पहा मला खरी
बिंबात दिसते वाघोबाची स्वारी
पाहून वाटते भीती उरी

भीती उराताली जाईना
मला पाहवेना आईना
उंदीरपण काही जाईना
वाघपण पुन्हा येईना

तर सांगतो दोस्ता भूता
तुझी तर विझली चिता
मग कशाला अहो करता
उगा उद्याची भलती चिंता

भविष्य म्हणजे उद्याचं भूत
कशाला त्याशी जमवायच सूत
अन् आजच व्ह्यायचं उद्याचं दूत
वर्तमानाच्या मानगुटी भविष्याचं भूत
एक बाई दुसर्‍या बाईला विचारले
प.बा.:तुम्ही गहू कसा आणला?
दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दु.बा: चुलत भावाने आणला
गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल?
दुकानदारः ७ रुपये..
गावकरी: ठीक आहे राहिलेल्या ३ रुपयाची चॉकलेटं द्या...
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
भुगोलाचे शिक्षक: सांगा पाहू, महाराष्ट्रात सर्वात जास्तं पाउस कुठे पडतो?
बंड्या: जमिनीवर..
बंड्या: आई ..आई, बाहेर एक मिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत.
मुलगा: चल, कुठेतरी एकांतात जाउया..
मुलगी: तू काहीतरी चावटपणा करशील..
मुलगा: अजिबात नाही..
मुलगी: मग काय उपयोग .. जाउ दे
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार?
ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!
विकिपीडिया : मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!

गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!

फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!

इंटरनेट: माझ्याशिवा य तुम्हीशून्य आहात!!!
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!

देवाचे घर कितीसे दूर होते?




फुलाफुलांचा झगा घालून छानसा
सगळ्यांच्या बाबांना भेटणार होती,
बाबांचाच संमेलन शाळेत होता
लगबगीनं ती निघाली होती

शाळेत आज नको जाउस
आईनं किती समजावलं होतं,
बाबा नसताना तिनं जाण
आईला प्रशस्त वाटत नव्हतं.

कुणी नावं ठेवेल, कुणी हसेलही
पण तिला बिलकुल परवा नव्हती;
बाबांच्या नं येण्याच्या कारणासहित
सगळ्या उत्तरांना ती सज्जच होती.

बाबा कधीच येत नाहीत
त्यांचा फोनही कधी येत नाही;
त्यांच्याविषयी सांगायला उत्सुक होऊन
शाळेत कधी आली कळलंच नाही.

एकेक करून बाई सगळ्यांना
समोर यायला सांगत होत्या,
बाबांची ओळख मैत्रिणी सगळ्या
शाळेला करून देत होत्या.

बाईंनी जेव्हा तिचा नाव घेतला,
सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या
जे नव्हते कुठंच तिथं
'त्या' बाबांना शोधात होत्या.

"अरे! हिचे बाबा कुठायत?" एक मुलगा जोरात म्हणाला,
"बहुतेक नाहीतच तिला वडिल", दुसरयानही तोच सूर धरला
"मुलीसाठी वेळ नाही हिच्या बाबांना!", कुणाच्यातरी बाबांनी मागून म्हटलं
"फारच कामंचं दिसतोय हिचा बाप", दुसरयांदा तिला ऐकू आलं...

हाताची घडी व्यवस्थित घालून
तिनं बोलायला सुरुवात केली,
अद्वितीयच होतं ते सगळं
चिमुरडी आपली जे जे बोलली.

"माझे बाबा राहतात खूप दूर
म्हणून ते आज इथ नाहीत.
पण त्यांना यायची खूप इच्छा होती,
मला आहे पक्कं माहीत.

खूपच छान होते बाबा माझे
त्यांना जगात तोडच नाही,
तुम्हाला ते दिसत नसले तरी
मी इथं एकटी नाही.

बाबा नेहमीच माझ्याबरोबर आहेत
अहो, बाबांनीच हे सांगितलंय मला"
म्हणाली हृदयावर हात ठेवून
"इथंच आहेत खात्रीय मला."

मग दोन्ही हातांनी जणू तिनं
बाबांना आपल्या मिठीत घेतलं,
कीतीतरी वेळ जणू त्यांच्याच
हृदयाचं ठकठक संगीत ऐकला.

ओघळणारे अश्रू पुसत रूमलानं
आई गर्दीत उभी होती
अकालीच खूप विचार करणाऱ्या
आपल्या चिमणीकडं पाहत होती.

मग हातांची मिठी सोडून
तिनं गर्दीच्या डोळ्यात पाहिलं,
गोड, मृदू पण स्पष्ट आवाजात
गर्दीन तिच्याकडून पुढं ऐकलं!

"शक्य असतं तर बाबा आलेच असते,
त्यांचं माझ्यावर खूपच प्रेम आहे.
पण तुम्हा सगळ्यांना माहीत आहे नं,
देवाचं घर इथून खूप लांब आहे.

अग्निशामक दलात जवान होते बाबा
गेल्याच वर्षी देवाघरी गेले,
काही अतिरेक्यांचा बॉम्ब्धरी हल्ल्यात
ज्या दिवशी आपले स्वातंत्र्याच मेले.

ते माझ्या जवळ आहेतसं वाटतं
जेव्हा कधी मी डोळे मिटते."
आणि लगेच तिनं डोळे मिटून पाहिलं,
अरे! बाबा तर समोरच उभे होते.

मुलांच्या आणि वडलांच्या गर्दीकडे
आश्चर्यानं आई पाहत होती,
हळूहळू डोळे मिटून घ्यायला
सगळ्यांनी सुरुवात केली होती.

"मला माहितीय बाबा तुम्ही माझ्याबरोबर आहेत"
निव्वळ शांततेत चिमुरडीनं म्हटलं.
तिचे बाबा आलेच आहेत,
हे शहारलेल्या गर्दीला कळून चुकला.


तिच्या बाजूला सुंदर गुलाबी
गुलाबाचं फुल ठेवल्याचं दिसलं
कधी घडला असं, कसं घडला हे
कुणालाच आजिबात नाही कळलं.

'ज्यांना जगात तोडच नाही',
असे तिचे बाबा जणू आलेच होते,
कुठेही असेनाका आता
देवाचे घर कितीसे दूर होते?
एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता

तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले ...

तर म्हातारा म्हणाला....

आज तुम्ही टाइम विचारला....
उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल

युवक : कदाचित हो

म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू

युवक : कदाचित हो...

म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी
आहे, तिच्या प्रेमात पडाल

युवक : लाजून, कदाचित हो...

म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल
मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही...

युवक : हसून हो...

म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी
घालाल..... तेव्हा
मी तुम्हाला सांगेन

हराम खोर, नालायक मानसा....
ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत् नाही
अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही.........