पाणावलेल्या डोळ्यात…

पाणावलेल्या डोळ्यात…
अश्रूंनी काहूर माजलेला…
जिथे भावनांना नाही जागा…
तिथे स्वप्ने ती काय तरळनार.


डोळ्यांची काजवे करून…
रात रात जगलेली मने…
एकमेकांची आयुष्य गुंतवायला…
वेळ तरी काय उरणार. 


कवी - हर्षद कुंभार

सुखी जीवनाचे रहस्य !

रामभाऊ  आणि वत्सलाबाईंच्या लग्नाचा साठावा वाढदिवस साजरा करायला सर्व जमले होते. दोघेही आनंदात होते. सर्व भेटणारे त्यांच्या सुखी जीवनाच कौतुक करत होते.

रामभाऊचे जुने मित्र मनोहरपंत हा कौतुक सोहळा, कोर्‍यात बसुन बघत होते.
एका क्षणी मनोहरपंतांना वाटले सर्वांसमक्ष त्यांना या सुखी जीवनाचे रहस्य विचारावे आणि त्यांनी माईक हाती घेऊन रामभाऊंना विचारले,"रामभाऊ, मी तुम्हाला बरिच वर्षे ऒळखतोय पण तुमचे व वहिनींचे मी कधि भांडण बघितले नाही, याचे रहस्य सांगाल का ?"

रामभाऊ," आमच्या लग्नाच्या दिवशीच आम्ही ठरवले होते, सर्व लहान निर्णय हिने घ्यायचे व सर्व मोठ्ठे निर्णय मी घ्यायचे.
आणि
आम्हाला कधिही मोठा निर्णय घ्यायची वेळ नाही आली !"
एकदा एक चोर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात सापडतो.

त्याला पोलीस कोर्टात हजर करतात.

पण त्याचा गुन्हा काही सिद्ध होत नाही.

न्यायाधीश : हे बघ, पुराव्याअभावी तुझ्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तेव्हा तुझी निर्दोष मुक्तता केली जात आहे.

चोर : आभारी आहे न्यायाधीश महाराज. पण आता ती स्कूटर माझी झाली ना?
एका मोठ्या राजकीय नेत्याचे विमान अपघातात निधन होते.

काही दिवसांनी एका समाजसेवकाचे राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेने निधन होते.
हे दोघे स्वर्गात भेटतात.

राजकीय नेता : या या. आपल्यासारख्या समाजसेवकाची इथेही खूप गरज आहे. पण आपल्याला यायला एवढा उशीर का झाला?

समाजसेवक : त्याचं काय आहे...तुम्ही विमानाने आलात आणि आम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने