शिवाजीचा पाळणा

तुज जोजविते माय जिजाई बाळा । नीज रे नीज लडिवाळा ।

मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला ॥

झोके देते गीत गात अंगाई । तरी डोळा लागत नाही ।

बाळा असला थांबिव चाळा आता । थकले मी झोके देता ॥

तू महाराष्ट्राचा त्राता । मनी धरली कसली चिंता ।

पाठिशी भवानी माता । माउलिया जीवीचा जिव्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥१॥

चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी बाळा खुशाल ।

झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ॥

नि:शब्द कशी पसरली रे शांती । या मराठी भूमीवरती ॥

बागूलबुवा आला काळा काळा । झडकरी झोप रे बाळा ॥

कोकणच्या चौदा ताली । झोपल्या घाटाखाली ।

आणि रात्र बहुतचि झाली । किती सांगु तुला समजावू वेल्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥२॥
ते म्हणाले, 'प्रेम अमुचा विषय नाही!'
मी म्हणालो, 'का? तुम्हाला ह्रदय नाही??'

एकदा तूही भिडव डोळे जगाशी
रोज झुकणे पाप आहे, विनय नाही

ध्वस्तले कित्येक आडोसे मनाचे
थांबला पण आसवांचा प्रलय नाही

आजही आहे अबाधित व्यसन माझे
राहिली तुजलाच माझी सवय नाही

गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही

माणसांनी निवड केली श्वापदांची
लोकशाहीचा मुळी हा विजय नाही

स्वाभिमानाचेच केवळ तेज आहे
भोवती माझ्या निराळे वलय नाही

सोडली मैफ़िल अता मी काजव्यांची
यापुढे गावात त्यांच्या उदय नाही..



कवी - वैभव जोशी
लग्न समारंभा मध्ये
१ मुलगा-"यार , ती पिवळी वाली माझी ."
.
.
.
२ मुलगा - अच्छा ? ठिक आहे, लाल वाली माझी मग.
.
.
.
३ मुलगा - २ मुलला हरामखोरा , काहि तर लाज ठेव
लाल वालिच्याच लग्नाला आलो आहोत आपण.
Gf : मला विसरुन जा
माझा साखरपुडा झाला आहे
मुलगा लंडन मध्ये राहतो त्याची स्वत:ची कंपणी आहे ....
.
.
.
.
.
.
गोटया : चल जाऊ दे, झाल ते झाल ...
फक्त माझ्या साठी लंडनहून एक मोबाईल फोन पाठव ,
मी ऐकलय तिथ मोबाईल फोन स्वस्त मिळतात .......

जगणं आहे सुंदरशी कला!

एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!

तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
जगणं म्हणजे अधांतरी झूला!

धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
जगणं असावं रंगमंच खुला!

मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
स्वत:तच बघ मला!

एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!


कवी - प्रल्हाद दुधाळ

तुझ्यासाठी !

तुझ्यासाठी
कितीदा
तुझ्यासाठी रे !

मी दुहेरी
बांधल्या
खूणगाठी
–खूणगाठी रे !

मी दुपारी
सोसले
ऊन माथी
– ऊन माथी रे !

लाविल्या मी
मंदिरी
सांजवाती
–सांजवाती रे !

कैक आल्या,
संपल्या
चांदराती
–चांदराती रे !

मी जगाच्या
सोडल्या
रीतभाती
– रीतभाती रे !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कार बनवणारे वेडे !

सांतासिंग अमॄतसरहून जलंधरला आपल्या मारुती कारने जातो. आईला दोन तासातच पोहचल्याचा फोन करतो व आपल्या कामासाठी जातो.
काम झाल्यावर आईला परत फोन करुन सांगतो मी संध्याकाळ पर्यंत परत येतोय.
रात्र झाली तरी सांता घरी पोहचत नाही.
दुसर्‍या दिवशीही पोहचत नाही.
तिसर्‍या दिवशी दमलेला सांता घरी पोहचल्यावर त्याची आई विचारते," बेटा काय झाल ? तु तर दोन तासातच पोहचला होतास. परत यायला इतका वेळ का लागला ?"
सांता : अग आई हे कार बनवणारे वेडेच आहेत. समोर जायला कारला चार गिअर दिलेत तर मागे जायला फक्त एकच गिअर दिलाय त्यांनी.