वायो, खुणव तीस

येतां तुझ्या दारिं मी वाट चालोनि
चालें पुढे, येथ थांबोनि थांबोनि. ।।ध्रु०।।

असशील तूं आंत घरकामधंद्यांत,
रेंगाळी कुणि दारिं, तुज भान कोठोनि ।।१।।

छुमछुम तुझे पाय स्रवतात नव राग,
कुणि भाग्यवंतास सुख आंत ऐकोनि ।।२।।

डोळे तुझे जेथ पडति घरामाजि
सौभाग्य अरुणास त्या ठायिं नाचोनि ।।३।।

मी मात्र या दारिं घोटाळिं आशाळ,
कीं ढुंकशिल काय येथोनि तेथोनि ।।४।।

चाले असें येथ हें रोजच्या रोज,
सांगेल तुज कोण दारीं उभे कोणि ।।५।।

मी टाकितों येथ काळीज हें फूल;
वायो ! खुणव तीस, ने वास वाहोनि ।।६।।


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - बागेसरी कानडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ८ जानेवारी १९३६

आबाद

अजून सगळे नाटक आहे
डोळ्यांपुढून डोळ्यांवरून
अजून नाही कुणां काही
आपादमस्तक टाकीत चिरून

कुठे काही सलते, तेव्हा
खाजवाखाजव वरच्यावरून
कोण करतो झगझग साली
मर्मापर्यंत आत शिरून

जखम झाली तरी आपले
पाणी फक्त गालावरून
फार फार तर ओठापाशी
कंठापाशी जाते जिरून

कोण उगाच मरते तेव्हा
आरडाओरड होते दुरून
झिंदाबाद मुर्दाबाद
सर्व आबाद होते फिरून


कवी - वसंत बापट

साने गुरूजी

पत्री

पत्री समर्पण
हृदय मदीय तव सिंहासन होवो
मजवर कृपा करावी
एक किरण
माझी बुडत आज होडी
अति आनंद हृदयी भरला
मम जीवन हरिमय होऊ दे!
मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी
तव अल्प हातून होई न सेवा
सदयहृदय तू प्रभु मम माता
दिसतात सुखी तात! सारेच लोक
देवा! धाव धाव धाव
दु:ख मला जे मला ठावे
नयनी मुळी नीरच नाही
वेल
जीवनतरू
मज माहेराला नेई
येतो का तो दुरून
पूजा मी करु रे कैशी?
कर्ममय पूजा
मजूर
श्रमाची महती
मन माझे सुंदर होवो
मी केवळ मरुनी जावे
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी
वेणु
मनमोहना
मनोमंदिर-राम
हृदयाकाशी मेघराशी
देवा! झुरतो तव हा दास
प्रभु! सतत मदंतर हासू दे
जागृत हो माझ्या रामा!
हे नाथ! येईन तव नित्य कामी
हे तात! दे हात करुणासमुद्रा
तुजवीण अधार मज कोणि नाही
काही कळेना, काही वळेना
आईचा मार
दिव्य आनंद
कैसे लावियले मी दार
हस रे माझ्या मुला!
झुरतो मी रात्रंदिवस
काय सांगू देवा, कोणा सांगू?
नमस्कार
गाडी धीरे धीरे हाक
आशानिराशा
ये रे मला तार
निराधार
दाखव मज अपुले चरण
येवो वसंतवारा
माझे ध्येय
तुझ्या हातातला
रडण्याचे ध्येय
द्विविध अनुभव
हे सुंदरा अनंता!
रडायाचा लागलासे देवा एक छंद
रामवेडा
आई, दार उघड
देवाजवळ
जीवननाथ
सुखामृताची मग नित्य धार
तुला देतो मी जमिन ही लिहून
आशा
सोन्याचा दिवस
प्रेम का करावे?
 प्रार्थना
 प्रसन्नता
 प्रकाश केव्हा भवनी भरेल?
 हृदयाचे बोल
 जीवनार्पण
 जीवनात माझ्या सदा राम गुंफिन
तुजसाठि जीव हा उरला
करुणाष्टक
जीवनबाग
भाग्याचे अश्रु
तळमळतो रे तुझा तान्हा
निर्वाणीचे सांगणे
कधि येशिल हृदयि रघुराया
का मजला देता प्रेम?
अश्रु
माझा देव
प्रभु मम हृदयि आज येणार!
फुलाची आत्मकथा
मयसभा राहिली भरुन
खरा धर्म
कशासाठी जगावे?
जीवनातील दिव्यता
मित्रांसाठी प्रार्थना 
संत
मेघासारखे जीवन
वंदन
मदीय त्या नमस्कृती
नवीन संन्यास
विपत्ति दे तीहि हवी विकासा
दु:ख आनंदरुप
प्रेमधर्म
परी बाळाला सकळ ती समान
ग्रंथमहिमा
गुढीपाडवा
नागपंचमी
दसरा
संक्रांत
लहान मित्राबद्दल!
लहानपणची आठवण
मृत्युमित्र
शांति कोण आणते?
गायीची करुण कहाणी
जीवनमित्रास!
कसे तरी मग जग दिसते?
प्रेमाचे गाणे
आत्मा ओत रे ओत
भारतमाता
मनमोहन मूर्ति तुझी माते
माझी एकच इच्छा
प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?
स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई!
देशभक्त किति ते मरती
भारतसेवा
जा रे पुढे व्हा रे पुढे!
बलसागर भारत होवो!
हा देश वैभवी न्यावा!
भूषण जगताला!
भारतजननी सुखखनि साजो
हृदय जणु तुम्हां ते नसे!
माझा महाराष्ट्र भाग्ये सजो
भारतमाता माझी लावण्याची खाण!
मरणही ये तरी वरिन मोदे
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
देशासाठी मरु!
तेव्हा घडे उन्नती!
तुफान झालो!
प्रिय भारता सुंदरा!
दुबळी मम भारतमाता!
देशभक्ताची विनवणी!
मातृभूमिगान
गाऊ मी कसले गाणे?
स्वातंत्र्य
स्वातंत्र्यदेवीचे शुभ आगमन
स्वातंत्र्यानंदाचे गाणे
भारतास!
भारता ऊठ!
वंदे मातरम्!
भारतजननी तव शरणम्!
सुसंस्कृत कोण?
खरा हुतात्मा!
ऊठ झुगारुन देई बेडी
प्रभु-प्रार्थना!
राष्ट्राचे उद्यान
राष्ट्रपताका
प्रतीध्यान
झेंडागीत
नवयुवक
बाल-वृद्ध संवाद
एकच वेड
स्वातंत्र दिव्यदर्शन!
भारतातील मुले
महाराष्ट्रास!
राणा प्रताप
महात्माजींस
खरे सनातनी
सत्याग्रही (खंडकाव्य)
माझी पत्री

देवाची देणगी.

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.

थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."

काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"

ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली.  त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."

ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."

देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

गाढव

एकदा एका शाळेतल्या व्रात्य मुलांनी शाळेत काहीतरी मस्ती करायची ठरवले.
बर्‍याच विचारांती त्यांनी तीन गाढव आणले व त्यांच्या पाठीवर १, २ व ४ हे क्रमांक घातले व त्यांना शाळेच्या मैदानात सोडून दिले.
मुख्याधापकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेतले सर्व कर्मचारी गाढव क्रमांक ३ शोधायला दिवसभर राबवले.

आरसे

चारी बाजूंना चार
वरती एक
आणि खालती एक
असे अभावाला कैद करू पाहणारे
आरसे.

"आम्ही आहोत, आम्ही आहोत"
असे ते आक्रोशले
पण अभाव त्यांच्या पुढून
अभाव त्यांच्या मागून
अभाव त्यांच्या भोवतालून
व अभाव त्यांच्यामधून
खदखदा हसला.

आरसे वेडे झाले.
आरसे भेदरले.
स्वतःच्या अस्तित्वाविषयी
त्यांना भ्रांत पडली.

आणि
आरशांनी आत्महत्या केली.


कवी - अरुण कोलटकर