कोणी कोणतेही धर्मशास्त्र वाचले नाहि तरी चालेल पण एकदा "शरिरशास्त्र" चा अभ्यास करावा.

( वैज्ञानिक मानवी शरिराचं अभ्यास करुन थक्क झाले आहेत )

*मानव शरिर अदभुत आहे.*


*मजबुत फुफ्फुस*

आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाहि येत. जर फुफ्फुसाला खेचुन लांब केल तर तो टेनिस कोर्टचा एक हिस्सा पुर्ण व्यापुन टाकेल.


*अशी कोणतीही फॅक्टरी नाही*

आपले शरिर दर सेकंदाला २५ करोड नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जा पेक्षा जास्त रक्त कोषीकांचे उत्पादन होते. सतत शरिरात २५०० अब्ज रक्त कोषीका असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषीका असतात.


*लाखो किलोमीटर चा प्रवास*

मानवाचे रक्त शरिरात दररोज १९२००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरिरात साधारण पणे ५.६ लीटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा संपुर्ण शरिराचे भ्रमण करतो.


*धडधड*

तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १००००० वेळा घडकतं. वर्ष भरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयंच पंम्पिग चा दाब एवढा जास्त असतो कीरक्ताची चिळकांडी ३० फुट वर उडु शकतो.


*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ*


मानवाचे डोळे एक करोड रंगाना ओळखुन लहानातला लहान फरक ओळखु शकतात. अजुन पर्यत जगात अशी कोणतीही मशीन नाही जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 


*नाकात एअर कंडीशनर*

आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.


*ताशी ४०० कि.मी. ची गती*

चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी. गतीने तडक उपयुक्त सुचनाचं प्रसारण करतं. मानवाच्या मेंदुत १०० अब्ज पेक्षा जास्त नर्व सेल्स आहेत.


*जबरदस्त मिश्रण*

शरिरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकल आणि सिलिकोन आहे.


*अजब शिंक*

शिंकताना बाहेर येणारी हवेची गती प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी. पर्यंत असु शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.


*बेक्टेरियाचे गोदाम*

मानवाच्या शरिराच्या १० %  वजन हे त्याच्या शरिरात असलेल्या बेक्टेरियाचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरीया असतात.


*विचित्र विश्व*

डोळ्याचा विकास लहान पणीच पुर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपुर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणु शकतो. कान १००० ते ५०००० हर्टज आवाजाना ओळखु शकतो.


*दातांची काळजी घ्या*

मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात, पण शरिराचे अन्य भाग स्वःताची काळजी स्वःताच घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वःताची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.


*तोंडांतली लाळ*

मानवाच्या तोंडात दररोज १.७ लिटर लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेली १०००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथीना ओली ठेवते.


*पापण्या झपकणे*

वैज्ञानिक सुद्धा मानतात की पापण्या झपकल्यास कचरा निघतो यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच  फरक जाणवतो.


*नखांची कमाल*


अंगठ्याचे नख सर्वात हळु वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.


*दाढीचे केस*

पुरुर्षाच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपुर्ण जीवन दाढी नाही करत तर ती ३० फुट लांब होवु शकते.


*जेवणाचे गणित*

व्यक्ती सामान्य रीत्या जेवणासाठी ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७००० पट जेवण खालेलं असते.


*केस गळण्याचा त्रास*

एका तंदुरस्त माणसाच्या डोक्यातले 80 केस दररोज गळतात.


*स्वप्नाची दुनिया*

बाळ जगात येण्या आधी पासुनच आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करतो. वसंत रुतुमध्ये बाळाचा विकास वेगाने होतो.


*झोपेचे महत्व*

झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपुर्ण माहिती गोळा करतो. शरिराला आराम मिळतो आणी डागडुजीचे ( रिपेरिंग) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे गरजु होर्मोन्स मुक्त होतात.


*तेव्हा तुमच्या किमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका.*

 बंड्या हॉस्पिटलमध्ये जातो


नर्स: आता एक दीर्घ श्वास घ्या


बंड्या: ....(श्वास घेतो)


नर्स: आता कसं वाटते?


बंड्या: मस्त वाटतंय एकदम 😍

कोणता परफ्युम आहे ? 🥰

*मास्कवर कविता लिहून आणा*


एका ढिगात होती, वस्त्रे बहु सुरेख

होती पडून छोटी, चिंधी तयांत एक


शिंपी तिला न घेई, शिवण्यास पाटलोणी

चिंधीस का कधीही, समजेल वस्त्र कोणी?

कधी चोर त्या दुकानी, चोरून माल नेती

तेही न त्रास देती, चिंधीस काही एक


चिंधीस खंत वाटे, का मी निरूपयोगी?

हेटाळणी एवढी का, माझ्याच फक्त भोगी?

फडके म्हणून का, माझी नसे महत्ता?

मज गोधडीत घ्या ना, तुकडा म्हणून एक!


एके दिनी परंतु, चिंधीस त्या कळाले

साथीमधे तियेचे, उजळून भाग्य आले

भारी विशेष वस्त्रे, असुयेत होती खाक

मिरवे बनून चिंधी, कोविड मास्क एक


😄 

 संध्याकाळी मामा फिरायला बाहेर गेले असता दुकानावरील सर्व फलक पाहिले.


 त्यामध्ये लिहिलेल्या सर्व फलकामध्ये


 अर्धा शब्द निश्चितपणे *इंग्रजी*" होता


 जसे: -


 संजय *सर्व्हिस* स्टेशन


 अजय *मेडिकल* स्टोअर


 विजय *फोटो कॉपी सेंटर*


 बबलू *हेअर कटिंग*


 शिवा *बार एन्ड हॉटेल*


 गणेश *लॉज*


 ज्योती *हॉस्पिटल* ... इ.


मामाचे मन खूप अस्वस्थ झाले,

 मातृभाषेची ही अवस्था पाहून !!


 पण मग एक बोर्ड आला आणि फक्त एकच बोर्ड जो नेहमीच मातृभाषेत लिहिलेला असतो ..


 ज्यामुळे आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो -


 *देशी दारूचे दुकान*


 मामाचे हृदय प्रसन्न झाले


 देशभक्ती शरीरात जागृत झाली आणि मामाने त्या दुकानातूनच वस्तू विकत घेतल्या .....😁😁🤪🤪


 *महाभारताचे "नऊ सार सूत्र".*


 *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  - कौरव.*


*२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील." - कर्ण.*


 *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल." - अश्वत्थामा.*


 *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.*


 *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.*


 *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते." - धृतराष्ट्र.*


 *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी* *घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."*  - *अर्जुन......¦*


 *८) ...."प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही"...- शकुनी......*


 *९) "नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही"....- युधिष्ठिर....*


 *....या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे.....*


*....जो इतरांना संपविण्याची तयारी करतो..... तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो....आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.....तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.....*


*.....दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा....अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही......*


*..."माणसाचा दर्जा हा जात... धर्म व मिळकती वरून ठरत नसतो... तर तो विचारांवरून ठरत असतो . .....धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो....धर्माचा नाही".......*

 आज तुम्हाला ‘नाईलाजापोटी’ लागलेल्या एका रंजक  शोधाची गोष्ट सांगतो..


‘अर्ल डिक्सन’ नावाचा एक सामान्य चाकरमानी तरुण ‘जॉन्सन ॲंड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीत इमानेइतबारे काम करत होता..


अगदी आपल्याकडं जसं ‘चाणाक्ष-कार्यतत्पर-गृहकर्तव्यदक्ष’ वगैरे निकष लावून वधुपरिक्षा घेतात तशी परिक्षा घेत याच दरम्यान त्याचं ‘जोसेफिन’नामक तरुणीशी लग्नही झालं..


पहिले काही गोड गुलाबी प्रेमळ दिवस पार पडले..

दोघांच्या छानपैकी ताराही जुळल्या..

सगळं काही स्वप्नवत चाललं होतं पण एक समस्या मात्र होती..


समस्या फार मोठी होती असं नव्हे पण ती रोजचीच झाल्यानं ‘डोकेदुखी’ बनली होती..

जोसेफिन स्वयंपाकघरात गेली रे गेली तिला जखम झालीच समजा..


टोमॅटो कापला लागला चाकू-दार बंद करायला गेली लागला खिळा-दुध गरम करायला गेली बसला चटका..

जोसेफिन प्रेमळ असली तरी अंमळ वेंधळी होती..


नोकरीसोबतच डिक्सनला घरात जोसेफिनच्या जखमा धुणं-कापसानं पुसणं-कापडी पट्टी बांधून ड्रेसिंग करणं हे बिनपगारी काम रोजचंच लागलं होतं..


प्रेमापोटी सगळं निभावलं जात असलं तरी ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ आपण घरी असलो तर ठिके पण नसलो तर??काय करावं बुवा???

डिक्सन मोठ्या बुचकळ्यात पडला..


“वेंधळेपणा कमी होईल न होईल पण किमान जोसेफिनला तिला झालेल्या जखमेची काळजी घेणं यायला हवं”

डिक्सनला प्रकर्षानं जाणवलं..


‘एवढं काय त्यात?छोट्यामोठ्या जखमा तर असतात एवढं काय सिरियस त्यात?’असे विचार आपल्या किंचित निगरगट्ट भारतीय मानसिकतेमुळं येऊ शकतात पण इथं दोन मुद्दे येतात..


पहिला मु्द्दा म्हणजे पाश्चात्य देशात ढोबळ प्रेम-हक्क या पलिकडे वैयक्तिक पातळीवर एकमेकांची ‘परस्पर जबाबदारी’ म्हणून काळजी घेतात..

नाहीच जमलं तर एकवेळ नात्याला तिलांजली देतात पण नुसतीच चौकट पाळण्याच्या अट्टाहासात मेलेली नाती ओढत नाहीत..


आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा औषधांची उपलब्धता मर्यादित होती-प्रतिजैविकांचा फारसा विकास झालेला नव्हता त्यामुळं जखमा लांबायच्या-सेप्टिक व्हायच्या-अनेकदा मृत्यूही व्हायचे..


शेवटी डिक्सननं चौकोनी कापडाचे तुकडे,त्यांच्यावर एक चिकटपट्टी अन् वरनं क्रिनोलिन लावत जोसेफिनसाठी थोडी रेडिमेड तयारी करून दिली..

जुगाड यशस्वी झाला..

आता डिक्सन घरी नसला तरी जोसेफिन एकटी लिलया जखमेची देखभाल करू लागली..  


डिक्सन काम करत असलेल्या कंपनीत त्याच्या या घरगुती उद्योगाची चर्चा झाली..

अश्या प्रकारचं काॅम्बिनेशन असलेली कापडी पट्टी जखम विक्रमी वेळेत बरी करते हे ऐकून खुद्द कंपनीचा मालक नुसता चकित झाला नाही तर येडा व्हायचा बाकी राहिला..


या भन्नाट जुगाडची कल्पना सगळ्यांनाच जाम आवडली..

कंपनीनं याच पट्टीच्या धर्तीवर ‘बॅंड एड’ या नावानं बल्क प्राॅडक्शन करण्याचा निर्णय घेतला..

कल्पना नवी असल्यानं पहिली बॅच थोडी सावकाश पण विकली गेली..


हातानं बनवण्यात वाया जाणारा वेळ आणि घरोघरी असणारी मागणी यांचं व्यस्त समीकरण बघता कंपनीनं यासाठी मास प्राॅडक्शन व्हावं म्हणून यथोचित यंत्रसामग्री बसवली आणि बस्सऽऽ


‘बॅंड एड’ म्हणून तयार झालेल्या डिक्सनच्या या ब्रॅंडनं नंतर बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला..

कंपनीनं डिक्सनला थेट व्हाॅईस प्रेसिंडेटपदी नेऊन बसवलं..


जोसेफिनच्या स्वयंपाकघरात सुरू झालेला हा ‘बॅंड एड’ चा प्रवास आज आख्ख्या जगभर पसरलाय..

क्वचित अशी व्यक्ती असेल ज्यानं कधी आयुष्यात बॅंड एड बघितलं किंवा वापरलेलं नाही..

दोनेक रुपयाला मिळणाऱ्या बॅंड एडची आज मिलियन डाॅलर्संची उलाढाल होते..


अनेक ब्रॅंड्स आले-गेले पण आजही लोकं दुसऱ्या ब्रॅंडचं बॅंडेज मागतांनाही ‘अमुकतमुक बॅंड एड’ द्या असं म्हणतात हेच या प्राॅडक्टचं यश.


🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

 📒 *शरीरात रक्ताचे काम काय असते ?* 📒 

*************************************


शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते.  रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था.


 रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते.


 सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते.


 मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही.


 जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते.


 रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.


रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.