जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर,कट रचले गेले पाहिजेत.

ते दिवस खूप छान होते
जेव्हा घड्याळ एखाद्या जवळच असायचं आणि वेळ सर्वांकडे.


संसार ही अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनंही "गुण"लं" तरी "भागत" नाही  "गुणा"नं राहिलं तरच... "भागतं"


दोन विपरीत गोष्टी मुळे देशाची पायमल्ली होत आहे ..
1) शिक्षणात राजकारण जास्त
2) राजकारणात शिक्षण कमी !


"पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत,
 त्यांना वाचावं लागतं."


स्वतःवर विश्वास ठेवा,
कारण तुमच्या एवढं तुम्हाला
कोणीही ओळखत नाही.

प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा *स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही....




"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंद

रजनीकांत

रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.

’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’


 रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’

 रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात 

 ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? 
पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही. 

 रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो 

 एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’
पुरुषाचा जन्म कित्ती छान!! महिलांनो, विचार करा पुरुषाचा जन्म किती सुखाचा! तुम्ही पुरुष असलात तर... 
 १. तुमचं आडनाव बदलत नाही. 
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही. 
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता. 
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता. 
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात. 
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही. 
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो. 
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात. 
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात. 
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो. 
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही. 
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं. 
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता. 
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता. 
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात. 
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता. 
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता. 
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही. 
 मित्रानो, प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना आपण कमी लेखतो, प्रत्येक गोष्टीत त्यांचाशी पुढे असण्याच भ्रमिक सुख आपल्याला खूपच प्रिय असते, त्यांची टिंगल उडवायला मुळीच काही वाटत नाही! आपल्या मते दोष म्हंटला तर नेहमी त्यांचाच असतो, होना ??? पण खरतर चुकतो आपण.. स्त्री च्या रुपात आई असो, बहिण, बायको, पुत्री किवा प्रेयसी त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांचा भावनांची कदर समजून घ्यायला पाहिजेच... खरच हो, त्यांचा इतपत धैर्य, सहनशक्ती आणि त्याग करण्याची शक्ती आपल्यात नाहीये हे नेहमी लक्षात ठेवून हे विचार केल पाहिजे कि आपण खूप खूप खूपच नशीबवान आहोत, पुरुष म्हणून जन्माला आलोय!

 सारे डोंगरांचे उतार, पर्वत उदास झाले आहेत

 बहरणाऱ्या वसंतऋतूने जणू आत्महत्त्या केली आहे

 बारुद पेरलेल्या सीमेवरच पाऊल ठेवले होते त्याने...

आळसावलेले ऊन खाली उतरले नाही अजून

 थंडीने गारठलेले ते छपरावर झोपून राहिले आहे

 आणि उत्साहाच्या पांघरुणाच्या तर कधीच फाटून चिंध्या झाल्या आहेत!