भष्टाचाराचे घड्याळ

एकदा राबडीदेवी ( लालू यादवची पत्नी ) स्वर्गात गेली. तिथे तिला अनेक घड्याळे दिसली. तिने कुतूहलाने यमाला विचारलं, "ही एवढी घड्याळं इथे का लावली आहेत?"

यम म्हणाला, "त्याचं काय आहे, हे प्रत्येक घड्याळ पृथ्वीवरील एकेका माणसासाठी आहे. जेव्हा पृथ्वीवर एखादा माणूस भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्याचं घड्याळ एका मिनिटाने पुढे जातं"

राबडीने विचारलं, "मग यातलं लालूंचं घड्याळ कोणतं?"

यम म्हणाला, "ते घड्याळ इथे नाही. ते वर आमच्या ऑफिसमध्ये आहे." राबडीचा ऊर अभिमानाने भरून आला. तिने विचारलं, "का?"

यम म्हणाला, "त्याचा आम्ही पंखा म्हणून वापर करतो !!!!!"

प्रेमपत्र !!

प्रिय झंप्या,
          जेव्हा पासून तुझ्याशी नाते तोडले आहे....
तेव्हापासून एक दिवसही सुखाने गेला नाही,
रात्रभर तळमळत असते, 
माझ्या चुकीची जाणीव मला झाली आहे, 
तू खरच चांगला मित्र आहे,
मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे,
अणि हो जाता जाता,
तुला १ कोटीची लॉटरी लागल्याबद्दल अभिनन्दन.

पालक सभा

झंप्या : बाबा उद्या शाळेत छोटीशी पालक सभा आहे.
बाबा : छोटीशी म्हणजे कशी ?
.
.
....
.
.
.
.
.
.
.
झंप्या : म्हणजे फक्त "मी, प्रिन्सिपल आणि तुम्ही....!

मराठी मुली


*मुलीच्या गालावर गुलाबाचे फुल मारल्यावर ,,,,,,*
*इंग्लिश मुलगी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, डार्लिंग u r so noughty *
**
**
*उर्दू मुलगी ................................नही करो जानू*
... **
**
*सिख मुलगी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,तुस्सी बडे रोम्यांटिक हो *
**
**
*मराठी मुलगी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,डोळ्यात गेला असता ना *
**
**
**
*किती प्रेम करतात मराठी मुली,,,,,,,,,

संताची लॉटरी

एकदा सन्ता देवकडे जातो आणि बोलतो......
देवा मला लॉटरी लागून दे तुज़े खूप उपकार होतील.
पण त्याला लॉटरी लागत नाही.

परत देवकडे जातो आणि म्हणतो देवा ह्यवेळी तरी लागू दे ......नाहीतर माझा बिझनेस बुडेल......
पण त्याला लॉटरी लागत नाही...........

परत तिस~या वेळी पण तेच होत...........
मग तो देवकडे जाऊन रागाने विचारतो की मी येवढ सांगून सुधा तू मझ का ऐकल नाहीस?

तर देव म्हणतो........... अरे बाबा आधी तिकीट तर काढ.........

मरणाची जागा

चिंटू: बंटू, किती छान हॊईल ना जर आपल्याला कळले आपण कुठे मरणार आहे ते.

बंटू : तुला असे का वाटते ?

चिंटू: मला जर असे कळले तर मी त्या जागी कधिच जाणार नाही.   

माँडर्न धमकी :-

माँडर्न धमकी :-
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शिक्षिका : बंडया, उदया तुझ्या आई-बाबांना शाळेत घेऊनये नाही तर,

तुझा रिझल्ट फेसबुक शेअर करुन तुला आणि तुझ्या आई- बाबांना पण Tag करेल....!

फक्त पाच मिनिटे अजून...!!!

जगातील सर्व शास्त्रज्ञांनी खूप वर्षांच्या गहन संशोधनानंतर एक महत्वपूर्ण शोध लावला आहे...!!
सर्वसामान्य माणसाला किती तास झोप आवश्यक आहे....???
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अलार्म वाजल्यावर तो बंद करून फक्त पाच मिनिटे अजून...!!!

तपासणी

एकदा एक शेतकरी आपले शेत नांगरत होता.
त्याच्या शेताजवळ एक मोटार थांबली व त्यातुन एक माणूस उतरला. तो माणूस शेतकर्‍याच्या दिशेने चालत आला व म्हणाला मला तुमच्या शेताची व झोपडीची तपासणी करायची आहे.

शेतकर्‍याने त्याला परवानगी दिली व म्हणाला साहेब शेताच्या त्या दिशेला जाऊ नका.

मला सांगू नका, माझ्याकडे तुमचे शेत तपासायचे पत्र आहे.


शेतकर्‍याचे सांगणे न ऎकता तो माणूस शेतकर्‍याने सांगीतले त्याच दिशेला जाऊ लागला.

थोड्यावेळाने त्या दिशेकडून किंचाळ्या ऎकू येऊ लागल्या व तो माणूस बाहेर जायचा रस्ता शोधत होता.

त्याच्या कडे बघत शेतकरी ओरडला," माझ्या बैलाला दाखवा ते पत्र."
पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात

दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात

तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..

 

आश्चर्यच आहे एकही अक्षर
नाही माझ्या वहीवर
कुठे गेले ते शब्द सगळे
जे मी लिहिले होते वहीवर
 हे कुठले काळे ढग
आले माझ्या समोर
छोटी छोटी निरपराध मुले
झोपळी आहेत रस्त्यावर
चुक नसूनही अपघातात
एक निशप्राणझालेआहे कलेवर
असह्य आजाराने त्रस्त असे
कितीतरी आहेत सभोवार
एक वेळच्या अन्नासाठी
विकण्याची पाळी आली एका युवतीवर
सांगा ना हे लिहिताना
यातना होत नसतील; माझ्या शब्दाना
का राहतील मग ते  माझ्या  वहीवर
बघून सगळे येई त्यानाही  अन्धारुन

कविता बोडस
दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...

Taken From मनोगत

उगाचच...

शतानंद.
एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

आम्हाला साला वेळ कुठे आहे???

अण्णाना काय काम आहे 
धंध्याने तर ते समाज सेवक 
आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

पगार वाढ डोक्यावर टांगली आहे 
टार्गेट्स पूर्ण करायला आमची डोकी बांधली आहेत 
 आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

 घरचे हफ्ते ३ वर्षात उडवायचे आहेत 
चार चाकी घेऊन दारात मिरवायाचे आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सोन्याचे भाव गगनाला पोचले आहेत 
सध्या रेशनाचे भाव बघून डोके उठले आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सगळेच गांधी झालेत तर मग गांधीना महत्व कसे येणार 
 अण्णान सोबत धावलो तर आमची पुढची पिढी श्रीमंत कशी होणार???
 माफ करा अण्णा, तुम्ही चुकताय माझ्यासारख्या नॅतद्रष्टा साठी भिकारड आयुष्य जगताय

दुःख घराला आले

अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे


कवी - ग्रेस

लाव मंदिरी दिवा

या हाताने स्तन गोंदून घे
लाव मंदिरी दिवा
फूल होऊनी अंधाराचे
गळून पडे काजवा

तू मरणावर मग रेखावे
प्राक्तनगंधी मोती
की डोहावर किणकिणते गे
शतजन्मांची भीती

असुनी तुझा मी तुझी दूरता
तुला झाकितो काल
संग उर्मिले कुणी बांधले
नयनी चंद्रमहाल

रंग उगा की उभा उदासिन
महामेघ क्षितिजात
पायाखाली वाळवंट मग
उगवत ये निमिषात
लाव मंदिरी दिवा..

लाव मंदिरी दिवा परंतु
सोड स्तनांची माया
मरणावाचून आज सजविली
मीच आपुली काया!


कवी - ग्रेस

माझे मन, तुझे मन !

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तुझे होती भास !

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी !

तुझी माझी पटे खुण
तुझी  माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन, तुझे मन !
स्वप्नी गाढ निमग्न भोज असता, ये जागृती त्याजला
पाहे सुंदर मंदिरात भरली चंद्रप्रभा सोज्ज्वळा

जैशी कुंदलता फुलुन खुलते, ते स्थान शोभे तसे
योगी तेथ कुणी लिहीत बसला, भोजास तेव्हा दिसे

सोन्याच्या नवपुस्तकात लिहिता, योगींद्र हे कायसे?
राजा धीर धरून नम्रवचने त्याला विचारी असे

ज्यांचा भाव अखंड ईशचरणी नावे तयांची मुला
प्रेमे सद्वचने प्रसन्नवदने, योगी अशी बोलला

आहे ना मम नाव संतपुरुषा, मालेत त्या गोविले
प्रश्ना उत्त्तर त्या प्रशांत मुनीने राया नकारी दिले

माझे नाव नसो तयांत नसले, जे प्राणिमात्रांवरी
सुप्रेमा करिती तयांतची मला, द्या स्थान कोठेतरी

भोजाचे पुरवून ईप्सित मुनी तो होय अंतर्हित
रात्री तो दुसऱ्या दिनी प्रकटला, भोजा करी जागृत

यादी त्याजवळी कृपा प्रभुवरे केली तयांची असे
तीमध्ये पहिले स्वनाम नवले त्या रेखिलेले दिसे


वृत्त :- शार्दूलविक्रीडित

त्रिधा राधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा


कवी :- पु. शि. रेगे

श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन

स्वच्छ निळे, रिकामे अंबर,
नारद तुंबर, अभ्र विरे

कधी केले होते, गंधर्वांनी खळे,
स्वत:शीच खेळे, चंद्रबिंब

पांगले अवघे, वैष्णवांचे भार,
ओसरला ज्वर, मृदुंगाचा

मंदावली वीणा, विसावले टाळ,
परतुनि गोपाळ, घरी गेले


कवी - अरूण कोलटकर

तू ये

मी निशेने ग्रस्त होता
तू उषा होऊन ये
कोरशी प्राजक्त वेणी
कुंतली खोवून ये

संशयाच्या वायसांनी
टोचता माझी धृती
क्षेम द्याया शाश्वताच्या
चंदनी नाहून ये


कवी :- बा. भ. बोरकर

दोन कर्मकठीण गोष्टी

दोन कर्मकठीण गोष्टी आहेत ….
१. दुस-याच्या डोक्यात आपले विचार भरणे
२. दुस-याच्या पैशाने आपला खिसा भरणे
ज्याला पहिली गोष्ट जमते तो उत्तम शिक्षक ठरतो
आणि दुसरे काम करू शकणारा व्यवसायात प्रगती करतो.
.
जिला दोन्ही गोष्टी चांगल्या येतात ती असते …..
बायको
.
आणि ज्याला यातले काहीच जमत नाही तो ….
बिच्चारा नवरा. 

कविता

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"


कवी - कुसुमाग्रज

वामांगी

देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट

मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण


कवी - अरुण कोलटकर

जीवनाचा प्रवास

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलं कोमेजतात....

पायंजणा

त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुजी गो पांयजणा

मौन पडले सगल्या रानां
शिरशिरून थांबलिं पानां
कंवळी जाग आयली तणा झेमता झेमतना

पैसुल्यान वाजलि घांट
दाटलो न्हयेचो कंठकांठ
सांवळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा

फुललो वैर चंद्र ज्योती
रंध्रांनी लागल्यो वाती
नवलांची जावंक लागलीं शकून लक्षणा

गळ्यान सुखां, दोळ्यान दुकां
लकलकली जावन थिकां
नकळटना एक जालीं आमी दोगाय जाणा

वडफळांच्या अक्षतांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुपले कितले चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगले जिणेक आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजली पांयजणा

कानसुलांनी भोंवता भोंवर
आन्गार दाट फुलंति चंवर
पडटी केन्ना सपनां तींच घडटी जागरणा


गीत : बाकिबाब बोरकार (बा. भ. बोरकर)
संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी
स्वर : अजीत कडकडे

जाता जाता गाईन मी

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे


कवी - कुसुमाग्रज

ऋणमुक्त

 सहज सहज टाकुन गेलास
ओंजळीमधे
एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी.

दहा बोटांची उधळली फुलपाखरे
आणि,
पांच प्राणाचे झाले संपुष्ट….

कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

झुंजु मुंजु धुक्यातुन
कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरचा दवाचा थेंब
कधिच का पाहिला नाहीस ?

कधिही
न ढळणारा तो दवाचा थेंब
तुझ्यासाठी.
तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.
कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
फुल चिमणिने सांगितले असेल..


कवियत्री – इंदिरा संत

उखाणे

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
गरूडाच्या पंखामध्ये
डोंगरांची रांग

निळे निर्झरिणी
अगे सारणीचे राणी
खडकाच्या डोळ्यालाही
येते कसे पाणी?

जाईबाई सांगा
तुम्ही मनातले पाप
कळ्यांचीही फुले
कशी आपोआप?

दावणीस गाय
धूळ काळजाला आली
सूर्य फेकून नदीत
कुठे सांज गेली?

खांद्यावर बसे
त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच
वारियाने डोले

झाड मधे आले
होई वाट नागमोडी
उडे पोपटाचे रान
पिंजर्‍याला कडी

दगडाचा घोडा
त्याला अंधाराचे शिंग
शुभ्र हाडांनाही फुटे
कसे काळे अंग?

संध्याकाळी आई
देवघरात रडते
तिच्या पदराच्या मागे
केवड्याचे पाते

आम्ही भावंडेही
भय डोळी वागवितो
चांदण्यात आईसाठी
वारा दारी येतो

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?


कवी - ग्रेस

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


कवी -  ग्रेस 

लेझिम चाले जोरात

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!


कवी  - श्रीधर बाळकृष्ण रानडे
बॉयफ्रेंन्ड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन....

ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक
त्याच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवते.
आणि त्यात लिहिते,
मी तुझ्या आनंदासाठी 
काहीही करायला तयार आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगैरे काही नाही, बस डोकं नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका..

झूलाघर

सायंकाळ झाली पक्षी जाती घरा माजी
गाय वासरे हंबरती
सांगती झाली वेळ आईची
आले हसु मजला, हे पण माझे सखी सोबती
मी पण पाहते वाट आईची
लागली ओढ तिच्या भेटीची

इतुक्यात एक चिमणी छोटीशी
येऊनी बसली माझ्या पाशी
होती ओठात एक काडी चार्‍याची
आपल्या चिमुकल्यां साठी
सांगत होती जणु घालीन
घास माझ्या पोरांच्या ओठी
ही मिलनाची आस बघुनी
मी व्याकुळ झाले मनी
केव्हा येईल आई माझी

नको वाटते तिची नौकरी
दिवस भराची दुसर्‍याची चाकरी
नको राहणे झूलाघरात
वाटते राहावे आई पाशी
डब्यातले थंड अन्न न मला रूचते
शेव, मिक्चर न मला आवडे
एकटेपणात न दिवस सरे
सारखी आईची आठवण येते
कसे हे जीवन आमचे
न आईची कुशी मिळते
न प्रेमानी अन्न भरवते
बालपण आमचे हे असेच संपते
एकटेपणाची आठवण मनात सलते

कसे हे जीवन चक्र बदलले
आई-वडिल दोघेही घरा बाहेर पडले
वाट पाहता-पाह ता थकले डोळे
सारखी आईची आठवण येते
कधी येईल सांगा माझी आई

पक्ष्यांनो तुम्ही तरी सांगाल का?
निरोप माझ्या आईला
वाट पाहते लेक आईची
सायंकाळ ही आता सरू लागली
सायंकाळ ही आता सरू लागली.


कवियत्री - सौ. स्वाती दांडेकर

दोन याचक


 मलीन खाकी गणवेषातिल, सैनिक तरणाताठा कोणी
नाव? कशाचे नाममात्र ते बाहुवरची बघा निशाणी

शरीर विकुनी पोटासाठी एक थेंब हा सरितेसंगे
प्रवाह नेई तिकडे जाई धावत वाहत मरणामागे

मैदानावर पुढे छावणी फुगीर डेरे अवतीभवती
कबुतरांचा जणू थवा हा थकून बैसे जमिनीवरती

त्या गर्दीच्या सीमेवर हा तरूतळी बसला एकाकी
गर्द सावली, गाढ शांतता, वाराही पद हळुच टाकी

दुर्लभ वेळा असते असली ऐकत होता संथ पडोनी
खाकीखाली धडधडणाऱ्या व्यक्तित्वाची करूण कहाणी

कुणी भिकारीण आली तेथे, नाव? कशाचे नाममात्र ते
होते नवथर त्या नवतीला झाकाया नच वस्त्रही पुरते

कळकट चोळीच्या चिंधीतून स्तन डोकावत उंच सावळे
तलम अनावृत दिसे कातडी लाचारीचे विशाल डोळे

उभी राहिली समोर त्याच्या उपसत कंठामधुनि ताना
बोलपटातील परिचित गीते, म्हणे अखेरीस काही द्या ना

काही द्या ना जीभ न केवळ शरीर अवघे होते मागत
ते डोळे, ते स्तन, ती मांडी, सारे उदरास्तव आक्रोशत

शूर शिपाई किंचित बुजला संकोचाची छटा मुखावर
खिशात गेले हात परंतु, नजरेतुन ओसंडे काहुर

त्यासही होते हवे काहीसे, कसे तरी ते कळवे; कळले
दुनियेपासून तुटलेले ते, दोन अनामिक जवळी आले

दूर जरा दरडीच्या खाली मच्छरदाणी करिती पर्णे
नीरवतेवर मुद्रित झाले विविध भुकांचे एकच गाणे, एकच नाणे!


कवी :- कुसुमाग्रज 
आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो.

आपली चूक आहे की नाही , याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती


१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते किरोज सकाळी ,”गुड मोर्निंग”ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.

२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्णवापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अँड्ड करत सुटतात.

३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .

 ४.फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून, पटकन आपल्या नावावर टाकतात.

५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू, ह्या न्‍युज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्‍युज सांगत सुटतात.

७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुस-यांच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.

८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.

९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंटकरायला कधी येत नाही.

१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.

११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्यापोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडली तर दुसरे काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.

१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकांचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.

१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,

१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.

१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोकवेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.

१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.

१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा हि हि करत असतात.

२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात
 

आई

सकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ
चिऊचे काऊचे प्रेमाने सुखाचे घास दे खाऊ

उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा
उद्या आणू म्हणे आई, नको माझ्या रडू राजा

कुठे खेळावया जाता, कशी ही घाबरी होते
जगाची सोडूनी कामे, मला शोधावया येते

अशी ही आमुची आई, तिची माया असे फार
तुलाही देव राया रे अशी आई न मिळणार. 

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर

जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार

चराचरापार न्या हो जाहला उशीर
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर.


- पं. जितेंद्र अभिषेकी

शाब्बास रावणानो !

तुमचाच काळ आहे हा खास रावणानो..
शाब्बास रावणानो..शाब्बास रावणानो !

खाऊन देश झाला.. खाणार काय आता..
सोसेल काय तुम्हा..उपवास रावणानो



कवी :- ज्ञानेश वाकुडकर

मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये....

१. जर तिची ओळख तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करून दिली तर ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर तुम्ही तिला मिठी मारली तर ती "जन गण मन" गायला सुरु करते.
३. तिच्या आईला आपण "मावशी" किंवा "काकू" म्हणतो.
४. समजा जर भयंकर जोराचं वादळ सुटलं आणि विजा कडाडल्या, तर हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे ती तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर तिला कोणी विचारले तर लाजेने ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र गॄहीत धरून चालते की तिचं करिअर तुमच्या करिअरइतकंच महत्त्त्वाचं आहे.
७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी "अमके अमके" सरांबद्दल बोलते.... आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणता...." काय पकवते आहे".
९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ केलेला असेल तर ती आठवणीने डब्यात घेउन येते.
१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवा सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ असते ...
राजू : अरे विजू, तुला कधि कोणी मुर्ख भेटलाय ?

विजू : मी खुप प्रयत्न केला पण आज तुला टाळू शकलो नाही.
स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल.

गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
.
व्यवस्थापक-पैसे पडतील.
.
गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी..

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.

ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात, “मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण हुशार आहे तुमच्यापैकी.”

बंड्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग बंड्या, गाढवा, जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब दिसला तर तू काय करशील?”

बंड्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन. कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.

तांबे-सोन्याची नांदी

निळसर डोंगर घळीघळीतुन धूर धुक्याचा निघत असे
खेड्यामध्ये गांव पुरातन तसा वसविला मला दिसे

खडकसांधणी परी नदीचे वळण पुलातुन निघे पुढे
पारदर्शनी पाण्याखालून माशांचाही जीव रडे

हातामध्ये रिक्त कमंडलु, तहान गळ्यावर घे जोगी
गावापासुन दूर अरण्ये वणवा वणव्याच्या जागी

अग्नीशी संगनमत सोडूनिया वाराही ईकडेच फिरे
पंथ सोडुनी जशी प्रणाली एकट कवितेतून झरे

मनगट उसवी लख्ख तांबडे कडे चमकते की जळते
जळते तांबे कनकदिप्तीवर खरेच का सोने होते?

वाळुवरुनी पाय उचलिता गुडघे कोपर झांझरती
मेंदुमधुनी शिळा अहिल्या झर्रकन ये चरणावरती

इथे मेघ झरण्याच्या पुर्वी वाकुन बघतो रे खाली
पात्र नदीचे किती भयंकर किती तळाची रे खोली?

उडे कावळा चिमण्यांनीही भुर्रकन अंगण सावरले
खेड्यामधले गावामधले लोक भाबडे बावरले


कवी - ग्रेस
संता कॉलेजमधे प्रोफेस्रर म्हणुन लागला आणि सामान्य ज्ञानाचा पेपर काही अशा पध्द्तीने तयार केला. सगळे प्रश्न सोडवणे गरजेचे आहेत, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकच असावे.
१. चीन कुठल्या देशात आहे?
२. 15 ऑगस्ट कुठल्या तारखेला येतो.
३. टमाटरला हिंदीत काय म्हणतात
४. मुमताजच्या कबरीमध्ये कोण दफन आहे
५.हिरवा रंग कुठल्या रंगाचा असतो 

रमेशचा मुलगा गण्या एकदा परीक्षेत नापास होतो

रमेश - इतके कमी गुण ?दोन
कानाखाली मारायला पाहिजेत .

गण्या - चला पप्पा मी त्या मास्तरड्याचं
घरपण बघून ठेवलयं .

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे


कवी - साने गुरुजी

डॉक्टर डॉक्टर ….

माझे डॉक्टर फारच चांगले आहेत
तुम्हाला वेगळा सल्ला (सेकंड ओपीनियन) हवा असला तर …
ते बाहेर जाऊन परत येतील (आणि तो सांगतील)

त्यांनी एका स्त्रीला पिवळ्या आजारासाठी तीन वर्षे उपचार केल्यानंतर त्यांना समजले ….
की ती बाई चिनी आहे

आणखी एकाला त्यांनी फक्त सहा महिने आय़ुष्य उरले असल्याचे सांगितले होते. सहा महिने झाले तेंव्हा त्याची फी मिळाली नाही ….
डॉक्टरांनी त्याला आणखी सहा महिने बहाल केले

नर्सने येऊन त्यांना सांगितले,”बाहेरचा रोगी म्हणतो आहे की त्याला गायब झाल्यासारखे वाटते आहे.” डॉक्टर म्हणाले, “त्याला सांग की मी त्याला पाहू शकत नाही.”

आणखी एका माणसाने ओरडत सांगितले,”माझ्या मुलाने फिल्म गिळून टाकली आहे” डॉक्टर म्हणाले,”ठीक आहे, तिला डेव्हलप झाल्यावर पाहू”

एका रोग्याने सांगितले,”मला काही आठवत नाही”. डॉक्टरांनी विचारले,”केंव्हापासून?”
रोग्याने विचारले,”केंव्हापासून काय?”

मी डॉक्टरांना सांगितले,”माझ्या कानात (फोनच्या) घंटेचा आवाज येतो. डॉक्टर म्हणाले,”मग तू उचलू नकोस”"

एकाने त्यांना सांगितले, “मला घंटी असल्यासारखे वाटते” त्याला डॉक्टरांनी सांगितले,”या गोळ्या खा, त्या लागू पडल्या नाहीत तर मला रिंग कर

आणखी एकाने सांगतले,”मी पत्त्याचा गठ्ठा झालो आहे” डॉक्टर म्हणाले,”तिथे बस, मी तुला नंतर डील करेन”

मी डॉक्टरांना सांगितले, “माझे तंगडे २ ठिकाणी मोडले आहे”. ते म्हणाले,”पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नकोस”