इतकेही प्रेम करू नये.....

इतकेही प्रेम करू नये कि ,
प्रेम हेच जीवन होईल ,
कारण प्रेम भंग झाल्यावर ,
जिवंतपनीच मरण येईल


सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी ,
अखेर साक्षीला उरते ,
केवळ , डोळ्यात पाणी

जीवनाच्या या वाटेवर ,
खूप वाटसरू भेटतात ,
भेटणारे भेटतात पण ,
फक्त काहीच जण साथ देतात


डोळ्यातून अश्रू ओघळला कि ,
तो हि आपला राहत नाही ,
वाईट याचंच वाटत कि ,
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा