विरहांतील जीवन

केवि सरे रजनी ! मज नीज न,

सरे कसा तरि कामकाजिं दिन. ध्रु०

विरहिं विकल तळमळतां, साजणि पळपळ निघतें युगसें जाण. १

मिणमिण करि असुदीप अंतरीं जळे कसातरि सजणाकारण. २

विरहपवनिं जरि ज्योत थरथरे, तगे आसपट, आड येइ घन. ३

तिळभरि परि नच उरलें तैलहि, जळे अतां तर वातहि त्याविण. ४

किति दिन बघशिल अंत साजणी, झरझर सरतें चंचल यौवन. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग -बागेसरी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २५ ऑक्टोबर १९३५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा