पाणपोईवाली

झाली ती ओणवी, तों पदर उरिं सरे सैल झाला, झुले तो

पाणी दे पाणपोईजवळ उभि, पितां ऊर्ध्वदृष्टी फुले तो !

बोटें तीं ओंजळीचीं विरळ, मग तिची धार बारीक झाली;

मद्येच्छू काय पीतो अविचल ? मदिराक्षी तरी काय घाली !


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - स्रग्धरा
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा