तेरवी

चार वर्षापासून, शेती पार बुडाली
अवंदाबी चिमणी, अभायात उडाली
दरवर्षी कर्ज, फेडता झाली घान
मिरचीच्या रोपाची लुली पडली मान
कोहळ्याच्या येलाले, दिसत न्हाई कयी
अतिरेक्यावानी पडली, पह्याटीवर अयी
जवारी तं पह्यले, उकरीनंच पाडली
उरली सुरली मुरयीनं, जमिनीत गाडली
मुंगावर चिकटा पडला, तुरीले मूयकिडा
कडू लागते आता मिठ्या पानाचा ईडा
पानीबी मंधातच, देऊन राह्यला झाकोले,
निसर्गबी वरून मारून राह्यला टोले
धुर्र्यावर नाही गवत, दिसत नाही चार
बैलं कुठं चारावं, कुठचा कापावं भारा
कर्जाची होयी अशी, धीरे धीरे पेटते
पेराले मांगतलं,तं सोंगतांनी भेटते
सरकार गुतलं, सत्ता खुर्चीच्या तालात,
वावटयच पुरी घुसली, त्याहिच्या पालात
म्हून म्हणतो पंजाब,भविष्य बरं नाही
तेरवीची सोय कर, बुढीचं खरं नाही
...........डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

शहीद

कृषीप्रधान शब्दापासून, व्हा आता सावधान
शेतीसाठी लवकरच, होणार हाये प्रावधान
शेतकऱ्यां साठी खूप, सवलती येनार हाय
मरासाठी विष, सरकार आनून देणार हाय
विहिरीत जीव द्याचा, इचार करा पक्का
सरकारच मांगून देईन, तुमाले धक्का
जळून मरासाठी, रॉकेल डब्बी सकट
गयफास घ्यासाठी, दोरी घरपोच फुकट
हासू नका, तोंड करू नका हेकडं
सरकारच देईन पाहा, जायासाठी लाकडं
पोस्टमार्टम कराची, झंझट राह्यनार नाही
प्रेताले तुमच्या कापून कोणी पाह्यनार नाही
जीव देनं तुमचं, हराममौत ठरनार नाही
थो कायचा शेतकरी जो आत्महत्या करणार नाही
अन्तयात्रेचा खर्च, सरकार करन सोता
तेरवीसाठी कुटुंबाले, तांदूय एक पोता
प्रेताले सलामी, मंत्री वाह्यतीन पुष्पचक्र
भाषणात सांगतीन, हाना दाबून वखरं
सोनं नानं इका, घर ठेवा गहान
शेती पिकवा बनवा, मेरा भारत महान
लेकराईले शिकवू नका, शेतीतच दाबा
देशाच्या भविष्यासाठी,राब राब राबा
जवानासारखी, किसानाची जय करा
वावरातल्या धुर्र्याचा, हिमालय करा
शेती नाही पिकली तं, आत्महत्या कराची
सैनिकासारखी संधी, देशासाठी मराची
शहीद झाले म्हनून, गौरव तुमचा करू
पुढं चाला गानं म्हनत, जगू कींवा मारू
-डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

पोशिंदा

अवघ्या सृष्टीचा भार
घेऊनिया खांद्यावरी
सदा पोसण्या तयार
सार्‍या जगाचा कैवारी...

कधी ओला कधी सुका
हसे कोरडा दुष्काळ
तुझ्या पाचविला सदा
रिते फ़सवे आभाळ...

काळ्या मातीतले सोने
पीक डोलते शिवारी
भाव मातीमोल येता
घाव बसतो जिव्हारी...

रात दिसाला राबून
सोसुनिया उनवारा
रान पिकवुनी आता
हाती उरला कासरा...

सार्‍या जगाचा पोशिंदा
जग तुझ्याविन खूज
धन्य धन्य आहे राजा
तुझं शेतकरी राज..!

- शिवाजी विसपुते
एक २४ वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील train ने जात असतात. त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं
कपल बसलेल असतं.
तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण
आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...”
तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”
तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..
माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..)
जगात तिन प्रकारचे लोक असतात.
काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.
काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.
आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.

टेंपररी -पर्मनंट

एक शिपाई दुसऱ्याला : ‘काय रे, एवढा का चिडतोस?’

दुसरा शिपाई- ‘हा मंत्री फुकट दटावून गेला मला.’

पहिला शिपाई- ‘अरे, मग त्यात एवढा राग येण्याचे कारण काय?’

दुसरा शिपाई- ‘का नाही? एक टेंपररी माणूस एका सरकारी पर्मनंट माणसाला दटावतो म्हणजे काय?

आजचा जमाना

एका मुलाला १ चिराग मिळाला... खुश होऊन त्यानी तो घासला....
लगेचच धूर झाला... आणि थोड्याच वेळात..............
.
.
.
.
"धड्दम" असा स्फोट झाला.. ५ जागीस ठार !! आणि ७ जखमी....!!!!!
अल्लादिन चा जमाना गेला आता....

लावारिस वस्तूंना हात लाऊ नका.....