२०७०- एपीजे अब्दुल कलाम

२०७० मध्ये लिहिलेलं एक पत्र

मी नुकतच ५० पूर्ण केलय भासतो मात्र ८५ चा मला किडनीचा त्रास आहे पाणी कमी पिण्यामुळे वेळ नाही जास्त आता माझ्यापाशी जगण्याचा मी ५० पूर्ण केलय सर्वात वयस्क व्यक्ती मी या समाजाचा...

लहानपणी माझ्या परिस्थिती वेगळी होती हिरवळ होती पाऊस होता भिजण्यातली मजा होती आज सारं मी फक्त स्मरतो कृत्रीम तेलाच्या टोवेल नेअंग साफ करतो...

लहानपणी आयाबायांचे सुंदर लांब केस असत..कार धुण्यासाठी घरीपाण्याचे पाईप असतआता केसच नाही कुणाला पाणीच नाही कुठे वापरायला पोराच्या डोळ्यात ऐकून काळ जुनाजागा आहे फक्त मोठ्या आश्चर्याला..

आठवतं मला आज "पाणी वाचवा"चे फलक असायचेत लोक मात्र फलक म्हणून फक्त वाचायचेत आता नद्या तलाव सारं काही सुकलं आहे उरलं सुरलं असेल काही दुषित होऊन बसलं आहे..

उद्योग धंदे संपले आहेत वाढलीय बेरोजगारी खा-या पाण्याला पिण्याजोगं करण्याचीच सारी तयारी तोच एक उद्योग आहे कामगार आहेत "पाणी" पगारी

पाण्यासाठी सगळी कडेदंगे सतत सुरू आहेत आजचे दिवस खरच खूप वेगळे आहेत "दिवसाला ८ पेले" आधी पाणी आवश्यक असे आज फक्त अर्धा पेला माझ्यासाठी उरला आहे...

कसा दिसतोय माणूस आज? सुकलेला, सुरकुतलेला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांनीपुरता पोळलेला त्वचा क्षय, मुत्रपिंडाचे आजारमृत्युच्या कारणांने ग्रासलेला...

पाण्याच्या अभावी विशिचा तरुण चाळिसीचा दिसतो कळलय न कारण "पाण्याचा अभाव" पण उपाय काहीच आमच्याजवळ नसतो..पाण्याचं उत्पादन अशक्य झाडे नाही.. हवा दुषित पुढची पिढी अशीच असणार रापलेली, पोळलेली, त्रासित

आज श्वास घेण्यासाठी हवा विकत घेतो आम्ही "१३७ मी क्युब" हवा विकत घेतो आम्ही जे घेऊ शकत नाही कृत्रीम फुफ्फुसांबाहेर फेकल्या जातात दुषित हवा घेत बिचारे मरेस्तोवर जगत जातात

जिथे कुठे असेल पाणी कडेकोट जपल्या जाते पाउस पडलाच कधीतर आम्लवृष्टी होते विसाव्या शतकाचा निष्काळजीपणा भोगतोय बजावलं होतं वाचवा पाणी? फळ आता आम्ही साहतोय

माझ्या बालपण ऐकताना मुलगा माझा विचारतो "कुठेय हो पाणी आता"? मी फक्त आवंढा गिळतो...दुखी होण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाहीमी देखिल कारणीभूत या सगळ्याला मी ही त्याच पिढीचा अंश असतो

आता माझीच मुलं बाळं माझी चुक भोगताहेत फार फार मोठी किमंत माझ्या चुकिची देताहेत अशीच भोगत राहतील कारण मागे जाणं शक्य नाहीपुढे पृथ्वीवर जगणं ही शक्य नाही

कसं तरी करून मला मागे जायलाच हवं माझ्या पुर्वजांना मला मला कळकळीनं सांगायला हवं"वाचवा हो पाणी, अहो वाचवायला हवं" अजून वेळ गेली नाही त्यांनी समजायला हवं

मूळ पत्र... एपीजे अब्दुल कलाम
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात,
आई-भाऊसाठी परी मन खंतावत,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||१||

विसरली का ग? भादव्यात वरस झाल
माहेरीच्या सुखाला ग मन आसावल,
घाल घाल पिंगा वार्या मा़झ्या परसात्,
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||२||

थांब जरासा

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा ! ॥धृ.॥

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा ! ॥१॥

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा ! ॥२॥

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा ! ॥३॥

गीत : ना. घ. देशपांडे
संगीत : यशवंत देव
स्वर : कृष्णा कल्ले

चेहर्‍यावर चेहरे

चेहर्‍यावर अनेक चेहरे
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.

कॉपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.

मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?

एका वर्षात अनेक वॆळा
इथे वाढदिवस साजरे होतात.
शुभेच्छा लाटणारांच्यासमोर
इथे शुभेच्छुकच लाजरे होतात.

नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!

याल्गार

नशीबास ’कर हवे तेवढे वार’ म्हणालो
’मानणार ना तरी कधी मी हार’ म्हणालो

केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
’खुशाल यावे उघडे आहे दार’ म्हणालो

खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला ’तैयार’ म्हणालो

रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही ’आभार’ म्हणालो

कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते...
हसून त्याला ’केवळ खांदे चार’ म्हणालो

रडलो नाही... लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन्‌ ’याल्गार’ म्हणालो

-गुरु ठाकूर
ओलेता गंधीत वारा
आला घेऊन सांगावा
पाझरला आतुर मेघ
त्या दूर अनामिक गावा

मन चातक व्याकुळ वेडा
इतुकेच म्हणे हरखून
येईल मेघ माझाही
जाईल मला भिजवुन

व्याकुळ अशी नक्षत्रे
कोरडीच केवळ जाती
भिजण्याच्या आशेवरती
कोमेजुन गेल्या राती

मिटल्यावर डोळे अजुनी
ऐकते सरींचे साद
त्या तेव्हाच्या भिजण्याचे
अंतरी अजुन पडसाद

- गुरु ठाकूर

सात


वेडात मराठे वीर दौडले सात

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा