अजून झोपली सखी.. !

थांबल्या पहा कळ्या , उषाही थांबली
अजून झोपली सखी .. पहाट लांबली !

तिचीच वाट पाहते , गोठले धुके
रान रान , पान पान जाहले मुके
तिचे बघून हाय ! सुस्त जाहली घरे
थांबली उडायची अजून पाखरे ...
मनातली मिठी मीही मनात कोंबली !

अजूनही नभात थांबल्यात तारका
घुटमळे अजून चंद्र हाय ! सारखा
फुलात गंध थांबला, मनात प्रार्थना..
प्रभू तरी उठायचा कसा तिच्याविना ?
तिची भुते इथे तिथे अशीच झोंबली !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

ऋण

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥


कवी - श्री. दि. इनामदार

बाबांचा अचरटपणा

तीन मुले आपापल्या  वडीलांबद्दल बोलत असतात.

पहिला म्हणतो :- माझे बाबा इतके उंच आहेत, इतके उंच आहेत कि ते आरामात जीराफाला कीस करु शकतात'

दुसरा म्हणतो :- 'माझे बाबा उंच आहेइतके त, इतके उंच आहेत कि ते उडत्या हेलीकोपटरला कीस करु शकतात'

तीसरा म्हणतो :- माझे बाबा  खूप उंच आहेत पण ते असला अचरटपणा करत नाहीत.'

मी श्रीमंत कसा झालो !

एकदा एका श्रीमंत माणसाची मुलाकात झाली त्यांना विचारल,"तुम्ही श्रीमंत कसे झालात ?"

श्रीमंत माणूस : आम्ही फार गरीब होतो. मला नोकरी करायची नव्हती व व्यवसाय करायचा होता. मी एकदा माझ्याकडे असलेल्या वीस रुपयांतुन काही फळे घेतली. त्यांना दिवसभर घासुन पुसुन साफ केल व संध्याकाळी चाळीस रुपयांना विकले. दुसर्‍या दिवशी त्या चाळीस रुपयांची फळे घेतली व साफ करुन सत्तर रुपयांना विकली. असे मी महिनाभर करित होतो.

मी : असे तुम्ही किती कमावलेत ?

श्रीमंत माणूस : महिन्याभरात मी पन्नास रुपये कमावले.

मी : तर श्रीमंत कसे झालात ?

श्रीमंत माणूस : दिड महिन्यात माझे सासरे वारले त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने एक कोटी ठेवले होते !!!

प्रामाणिक माणूस

एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांची वार्षिक बैठक बोलावली.
अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील.
जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल.
सर्व अधिकार्‍यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली.
बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर फुलेही आली होती.
पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्‍याने दिलेली कुंडी व माती तशिच घेऊन एका कोपर्‍यात बसुन होता.
सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्‍याला बक्षिस जाहिर केलं.
सर्व थक्क झाले.
त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती.
सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे त्यातुन झाडे लागणे अशक्य होते !!!"

वकिली सल्ला.

शेतकरी : वकिलसाहेब, कोणाची म्हैस माझ्या शेतात शिरली व तिने शेतातले पिक खाल्ले तर मी काय करावं ?
वकिल : तुम्ही त्या म्हशीच्या मालकाला झालेली नुकसान भरपाई मागु शकता.
शेतकरी : द्या तर मला ४०० रुपये. काल राती तुमचीच म्हैस माझ्या शेतात शिरली होती.
वकिल : खर तर तुम्हीच मला १०० रुपये देणे लागता. ५०० रुपये माझा सल्ला घेतल्याचे. त्यातुन तुमचे नुकसान झाल्याचे ४०० रुपये वजा करा व माझे १०० रुपये आणा.

उत्सुकता

न्यायमूर्ती : तुझे वकिल आजारी आहे म्हणून सुनावणीची तारीख पुढे धकलावी असे तु म्हटलेय. पण तुला रंगेहात पकडलंय आणि चोरीचा आरोप ही तु मान्य केलाय. तर तुझे वकिल तुझी बाजू मांडणार तरी काय ?
आरोपी : साहेब, तुमच्या प्रमाणेच मलाही तीच उत्सुकता आहे !!!