*🔥!!भेटी लागे जिवा!!🔥*

    *आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...*

     *या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,*

     *"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."*

     *मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...*

*त्यावर मुक्तानं विचारलं,*

     *"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?"*
*तुम्ही म्हणता,*

     *"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.." तसं इतर लोकांना का वाटत नाही...?*

*त्यावर ज्ञानोबा म्हणाले,*

     *"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."*

      *अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..." म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...*

     *तुला सांगतो, "सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."*

      *हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,* 
 *"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."*

     *हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते...*
     *तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, "आनंदाचे डोही आनंद तरंग.."*

      *नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,"*

*"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’"*

       *संत अमृतराय म्हणतात, "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."*

*संत सेना महाराज म्हणतात,*

     *"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."*

     *आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो...*

     *असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,*

     *"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."*
    *संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...*

    *म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती...."*

      *🌸रामकृष्णहरी🌸*

*रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला*

 ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही, वाचनात आली म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला


त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे.

रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा http://ift.tt/2xchNIX


सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले.


झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.


रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही. रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.


मात्र रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, "हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही."


आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम ह्यावर काय उत्तर देतात ह्याकडे लागले - राम काय उत्तर देणार ह्यावर?

अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, "पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.


ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे, पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस."


ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्रचर्चा न्याहाळीत होते. आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सारे उत्कंठेने पाहू लागले. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला "विजयी भव" असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.


रामाने रावणालाच विचारले," रावणा, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी." आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही अगदी रामाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्वकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला,"हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एव्हढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य कांहीही नको."


आणि म्हणूनच रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!


विद्यमाने : The Awakening Times

स्त्रोत: Veda Vyasa Ramayana 

 *भारताचे संविधान कुणी लिहिले ???* 


या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वमान्यच आहे ते म्हणजे... *भारताचे संविधान आंबेडकरांनी लिहिले*

परंतु सहज माझ्या मनात आलं "एकाच व्यक्तिनी" इतकं मोठं, तर्कसंगत, सुटसुटित, कायदेशीर लिखाण केले आहे काय?... ते पण केवळ ३ वर्षाच्या कालावधीत ..... म्हणजेच संवैधानिक सभेच्या स्थापने पासून (९ डिसेम्बर १९४६) ते संविधान अंगीकृत करेपर्यंत (२६नोहेम्बर १९४९).

मला हे पूर्णपणे पटत नव्हतं की केवळ आंबेडकरांनीच संविधान लिहिलं. त्यामुळे इतिहास शोधण्यास सुरुवात केली व खालील माहिती माझ्या हाती लागली ती तुमच्यासोबत share करतोय...

*१९४७ ची फाळणी योग्य रितीने व अहिंसेने व्हावी* यासाठी ब्रिटिशांनी *द इंडिपेंडेंस एक्ट 1947* भारत व पाकिस्तानला दिली, ज्यानुसार दोन्ही देशांना आप-आपली संविधान बनवन्यासाठी स्वतंत्र संवैधानिक सभा (constituent assembly) बनवण्याचे अधिकार दिले.

यानुसार भारताने आपली संवैधानिक सभा ९ डिसेम्बर १९४६ ला बनवून पहिली बैठक घेतली.

या संवैधानिक सभेत असं ठरवण्यात आलं की संविधान *"लिहण्याच काम" एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरचं आहे, त्यामुळे खालील प्रमाणे 5 वेग-वेगळ्या समित्या स्थापित केल्या...* 

१) *संघ शक्ति समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू* ... मेंबर संख्या-९


२) *मूळ अधिकार व अल्पसंख्यक समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल.* .. मेंबर संख्या-५४

३) *कार्य संचालन समिती-* चेअरमन- *डॉ के. एम. मुंशी...* मेंबर संख्या-३

४) *प्रांतीय संविधान समिती-* चेअरमन- *वल्लभभाई पटेल ...* मेंबर संख्या-२५

५) *संघ संविधान समिती-* चेअरमन- *जवाहरलाल नेहरू...* मेंबर संख्या-१५

".... म्हणजे पाच समित्या मिळून १०६ मेम्बर्सनि अथक मेहनत करुन आपल्या संविधानातील प्रत्येक कलमं लिहिली..."

पुन्हा माझ्या मनात प्रश्न, की फ़क्त *आंबेडकरांना 'संविधानाचे शिल्पकार' का म्हणावे...??* 

पुढे अभ्यास केला तर कळाले की...

या पाच समित्यांनी संविधान लिहून पूर्ण केल्यावर *२९ ऑगस्ट १९४७* ला *७ सदस्यीय* *"ड्राफ्टिंग समिती"* बनवली, या समितीचे कार्य होते... लिहिलेल्या संविधानाचे अभ्यास करणे व गरज असल्यास नवीन कलम 'सूचवणे'. व शेवटी ड्राफ्ट तैयार करुन प्रस्तुत करने.

या ड्राफ्टिंग समितीचे चेअरमन *सर अल्लादि कृष्णास्वामी* होते, ड्राफ्ट तैयार केला होता तो *सर बी. एन. राव* यांनी.... आणि हा सम्पूर्ण तैयार झालेला ड्राफ्ट सभेसमोर (अर्थात देशसमोर) " *प्रस्तुत* " करण्याच् काम *डॉ आंबेडकरांना* सोपवण्यात आले, कारण १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत ते कायदेमंत्री होते, व कुठलाही कायद्या सम्बन्धिचा ड्राफ्ट प्रस्तुत करण्याच् काम *कायदेमंत्र्यांचे* होते.

भारताचे संविधान  लिहिण्यासाठी २ वर्ष,११ महिने,१८ दिवस लागले आणि ते " संविधान " २६ नोव्हेंबर १९४९ ला *संविधान मसुदा समितीला* बाबासाहेबांनी दिले.

 🙏🌹🙏🌹🙏


*काट्याच्या अणीवर वसले तीन गाव*


🕉🕉🕉🕉🕉🕉


काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥


वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥२॥


घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥


भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥


शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥


जेवेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या।

दोन हुकल्या एक लागेचिना ॥६॥


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्‌गुरूवाचुनि कळेचिना ॥७॥


ज्ञानदेवांचे हे भारुढ [बहुरुढ] आध्यात्मिक छटा असलेले आहे.


काळ नावाच्या काट्यावर स्थूल , सूक्ष्म व लिंगदेह ही तीन गावे वसवली. 

स्थूल व सूक्ष्म हे देह नाशवंत म्हणून ओसाड.

लिंगदेह हा अदृष्य 

अनाकलनीय म्हणून वसेचिना..


तीन कुंभार म्हणजे 

*ब्रह्मा विष्णू महेश्वर*

पण... विष्णू आणि महेश्वर हे निर्मिती बाबत तटस्थ. 


एक कुंभार ब्रह्मा याचे कडे निर्मिती,  पण तो वसवतो ते आत्मतत्व.  याच आधारावर जो त्याचाच आधार आहे .


त्याने घडवलेली तीन मडकी. म्हणजे स्थूल सूक्ष्म देह नाश पावणारी कच्ची मडकी.


या लिंगदेहात अविनाशी आत्मतत्व.  यावर अग्नीचा परिणाम नाही म्हणून भाजण्याचा प्रश्नच नाही.

 

त्यात सत्व रज तम हे तीन मूग रांधण्याचा प्रयत्न.  


रज तम हे हिरवे कधीच पक्व न होणारे. पण सत्व मात्र रांधण्याचा प्रश्नच नव्हता.


तीन काळ हे तेथील पाहुणे. 


भूतकाळ रुसून बाजूला झाला. वर्तमान प्रत्येक क्षणाला रुसून मागे जात आहे. भविष्य अजून नंबर न लागल्यामूळे जेवत नाही म्हणून कर्म अद्याप उदित व्हायचे आहे.


न जेवणारा भविष्य काळ याला क्रियमाण , संचित, व प्रारब्ध या तीन म्हशी.  या पैकी संचित व प्रारब्ध यांचा नवनिर्मितीचा काळ संपलेला व क्रियमाणाचा  कर्म झाल्या शिवाय कसा फळणार.


गुरुकृपा झाली व भक्ती पक्व झाली तर काय घडते ?


संत म्हणतात : 

प्रारब्ध, संचित क्रियमाण l

भक्तालागी नाहीत जाण I


या संचित क्रियमाणाला गुरु हे  'प्रत्येकी एक' म्हणजे 'तीन बुक्या' मारतात. पण ते आधीच नष्ट झाल्यामुळे हुकणे न लागणे हे घडणारच. 


हा अनुभव गुरु वाचून येणार नाही याचा अर्थ गुरुकृपेशिवाय देहभावनेतून देवभावनेत जाता येणार नाही व त्या शिवाय त्रिगुणातीत होता येणार नाही. 

नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - 

मी कसा दिसतो ते सांग 


बायको म्हणाली — 


मेघनादरिपु तात वधी ज्या नराला । 

ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। 

त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। 

तैसे तुम्ही दिसता मजला मनी। 


🤔🤔🤔


नवर्‍याला याचा अर्थ काही कळेना म्हणून त्यांने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यानी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.


मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ? 

तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ.

दशरथाच्या हातून अजाणता कोण मारल्या गेला ? 

तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ? 

तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .( त्या दिवशी बैलाला सजवतात ) 

त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.


😂😂😂

*(नवरा मानसिक धक्क्यातून अद्यापही सावरलेला नाही)* 

 ________कायदा  माझ्या  भारतीय घटनेचा_____  


कलम १- कायद्याचे नाव.

कलम २- भारतात केTलेल्या अपराधास शिक्षा.

कलम ३- भारताच्या हद्दी बाहेर केलल्या अपराधाची चौकशी / शिक्षा.

कलम ४- परमुलकी अपराधास हा कायदा लागू.

कलम ५- अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही.

कलम ६- ह्या कायद्यातील लक्षणांस अपवाद.

कलम ७- अर्थपूर्ण शब्द.

कलम ८- लिंग.

कलम ९-वचन.

कलम १०- पुरूष - स्त्री हया शब्दाचा अर्थ.

कलम ११- मनुष्य.

कलम १२- साधारण सर्व लोक.

कलम १३- हुकुमशाही / राजेशाही  रद्द .

कलम १४- शासकीय सेवक.

कलम १५/१६- रद्द.

कलम १७- सरकार.

कलम १८- भारत.

कलम १९- जज्ज.

कलम २०- न्यायाचे कोर्ट.

कलम २१- लोकसेवक.

कलम २२- जंगल मालमत्ता.

कलम २३- गैरलाभ / गैरहानी.

कलम २४- लबाडीने.

कलम २५- कपटाने.

कलम २६- समजण्यास कारण.

कलम २७- बायको.

कलम २८-नकली पदार्थ.

कलम २९- दस्तावेज.

कलम २९(अ)- विदूत नोंदी.

कलम ३०- मुल्यवान रोखा.

कलम ३१- मृत्यूलेख.

कलम ३२- कृत्याच्या करण्यास / वर्जनास लागू शब्द.

कलम ३३- कृती, अकृती.

कलम ३४- सामायिक इरादा.

कलम ३५- गुन्ह्याच्या इराद्यानं कृत्य.

कलम ३६- अंशतः समजून कृत्य.

कलम ३७- अपराधांना सामील होणे.

कलम ३८- अपराधांचा दोष येणे.

कलम ३९- आपरकशीने / इजापुर्वक.

कलम ४०- अपराध.

कलम ४१- विशेष कायदा.

कलम ४२- स्थलविशेषाचा कायदा.

कलम ४३- गैरफायदा, कायद्याने करणे पात्र.

कलम ४४- क्षती / हानी.

कलम ४५- जीव.

कलम ४६- मरण.

कलम ४७- प्राणी.

कलम ४८- नाव.

कलम ४९- वर्ष.

कलम ५०- कलम.

कलम ५१- शपथ.

कलम ५२- इनामाने / शुद्ध हेतूने.

कलम ५२(अ)- आसरा देणे / आश्रय अपवाद.

कलम ७६- कायदेशीर बांधील असलेल्या व्यक्तीने

                 तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेली कृती

                 अपवाद होत नाही.

कलम ८२- सात वर्षे वयाखालिल बालकाने केलेली

                 कृती.

कलम ८३- सात वर्षावरील व बारा वर्षा खालील.

                अपरिपक्व समजशक्ती असलेल्या

                 बालकाने केलेली कृती.

कलम ८४- वेड्या मनुष्याने केलेले कृत्य.

कलम ९०- भीतीमूळे दिलेली संमती.

कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याचा अोघात

                 केलेली गोष्ट.

कलम ९७- शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या 

                 बचाव करण्याचा हक्क.

कलम १००- शरीराचा खासगीरीत्या बचाव 

                   करण्याचा हक्क हा मृत्यू घडून

                   आणण्याईतपत केव्हा व्यापक

                    असतो.

कलम १०१- असा हक्क मृत्यूहून अन्य अपाय

                   करण्याइतपत केंव्हा व्यापक

                    असतो.

कलम १०२- शरीराचा खासगीरीत्या बचाव

                   करण्याचा हक्क सुरू होणे व

                   चालू राहाणे.


******साह्य करण्या विषयी. *******     


कलम १०७- एखादे कृत्य करण्या विषयी साह्य.

कलम १०८- अप्रेरक.

कलम १०९- अपप्रेरकामूळे परिणामत: .

कलम ११४- अपराधाचे वेळी साह्य करणारा

                   जवळ असणे. 

कलम १४१- बेकायदेशीर जमाव.

कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक असणे.

कलम १४३- शिक्षा.

कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासह बेकायदेशीर

                   जमावात सामील होणे.

कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा

                   आदेश झाल्याने माहीत असूनही 

                    सामील होणे.                          

कलम १४६- दंगा भरणे.

कलम १४७- दंगा करण्याबद्दल शिक्षा.

कलम १४९- विधिनीयूक्त जबाबदारी.

कलम १५१- ५ किवा अधिक व्यक्तींना पांगण्याचा

                   आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक

                    थांबून राहणे.

कलम १५३(अ)- धर्म, वंश,जन्म, निवास, भाषा ई.

                      कारणावरून निरनिराळ्या गटांमध्ये

                      शत्रुत्व वाढविणे.

कलम १५९- दंगल.

कलम १६०- दंगली बद्दल शिक्षा.

कलम १७०- लोकसेवकाची बतावणी करून

                   तोतयागीरी करणे.

कलम १७१- लोकसेवक वापरतो तशी गर्दी किवा

                   अोळख चिन्ह कपट करण्याच्या 

                    उद्देशाने वापरणे परिधान करणे.


*****लोकसेवकांच्या कायदेशीर अधिकाराच्या

           अपमाना विषयी *******


कलम १७२- समन्सची बजावणी किवा इतर

                  कारवाई टाळण्यासाठी फरारी होणे.

कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर शपथेवर

                  खोटे कथन करणे.

कलम १८८- लोकसेवकाने जारी केलेला आदेश न

                   माणने.


***** खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या

             विरोधी अपराध *****


कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी

                    अपराध्याचा पुरावा नाहीसा करणे

                    किवा कोटी माहिती देणे.

कलम २२३- लोकसेवकाने हयगयीने कोणास

                  कैदेतून पळून जाऊ देणे.

कलम २७९- सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर

                  वाहन चालविणे.

कलम २९२- अश्र्लिल पुस्तके ई. विक्री करणे.

कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान

                   करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे

                   नुकसान करणे किवा ते अपवित्र करणे.

कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किवा

                    धार्मिक श्रद्धांचा अपमान करून 

                    धार्मिक भावनांवर अत्याचार 

                    करण्याचा उद्देशाने कृती करणे.

कलम २९८- धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने

                   जाणीव पुर्वक शब्द उच्चारणे.

कलम २९९- सदोष मनुष्यवध.

कलम ३००- खून.

कलम ३०२- खुना बद्दल शिक्षा.

कलम ३०४- सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा.

कलम ३०४(अ)- हयगयीने मृत्यूस कारण.

कलम ३०४(ब)- हुंडाबळी.

कलम ३०६- आत्महत्येला अपप्रेरणा देणे.

कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे.

कलम ३२३- इच्छापुर्ण दुखापत पोहोचण्या बद्दल

                   शिक्षा.

कलम ३२४- घातक हत्त्याराने किवा साधनांनी 

                   इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे.

कलम ३२५- इच्छापुर्वक जबर दुखापत

                  पोहचवण्याबद्दल शिक्षा.

कलम ३२६- घातक हत्त्याराने किवा साधनांनी

                   इच्छापुर्वक जबर दुखापत

                   पोहचवीणे.

कलम ३२६(अ)- अॅसिड ई. वापर करून इच्छापुर्वक

                     जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक अॅसिड फेकणे अथवा

                    फेकण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने विष ई.

                  सहाय्याने दुखापत करणे.

कलम ३३०- कबुलीजबाब जबरीने घेण्यासाठी,

                   गेलेला माल परत घेण्यासाठी 

                  इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३२- लोकसेवकाला धारकाने त्याच्या

                  कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी

                  इच्छापुर्वक दुखापत करणे.

कलम ३३६- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत

                  सुरक्षितता धोक्यात आणणारी

                  कृती.

कलम ३३७- इतराचे जीवित किवा व्यक्तीगत

                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या

                    कृतीने दुखापत पोहचवीणे.

कलम ३३८- इतरांचे जीवित किवा व्यक्तिगत

                   सुरक्षितता धोक्यात आणणार्या

                    कृतीने जबर दुखापत पोहचवीणे.

कलम ३३९- गैरनिरोध / अन्यायाने प्रतिबंध 

                    करणे.

कलम ३४०- अन्यायाने कैदेत ठेवणे.

कलम ३४१- गैरनिरोधाबद्दल शिक्षा.

कलम ३४२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.

कलम ३४९- बलप्रयोग.

कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग.

कलम ३५१- हल्ला / अंगावर जाणे.

कलम ३५२- फौजदारी पात्र बलप्रयोगाबद्दल शिक्षा.

कलम ३५३- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून

                  धाकाने प्रारूप्त करण्यासाठी फौजदारी

                   पात्र बलप्रयोग करणे.

कलम ३५४- स्त्रिची विनयभंगकरण्याच्या उद्देशाने

                   तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र

                   बलप्रयोग.

कलम ३५४(अ)- लैगिक छळाबद्दल शिक्षा.

कलम ३५४(ब)- निर्वस्त्र करण्याच्या उद्देशाने

                     तिच्यावर हमला किवा फौजदारी

                     बलप्रयोग करणे.

कलम ३५४(क)- चोरून अश्लील चित्रण करणे.

कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे.

कलम ३४९- अपहरण / मनुष्य चोरून नेणे.

कलम ३६२- अपहरण / पळवून नेणे.

कलम ३६३- अपहरणाबद्दल शिक्षा.

कलम ३७०- व्यक्तीचा गुलाम व्यापार करणे.

कलम ३७५- बलात्कार.

कलम ३७६- बलात्काराबद्दल शिक्षा.

कलम ३७७- अनैसर्गिक संभोग शिक्षा.

कलम ३७८- चोरी.

कलम ३७९- चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३८०- राहते घर वैगेरे ठिकाणी चोरी.

कलम ३८३- जुलमाने घेणे.

कलम ३८४- शिक्षा.

कलम ३९०- जबरी चोरी.

कलम ३९१- दरोडा.

कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शिक्षा.

कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे.

कलम ३९५- दरोड्याबद्दल शिक्षा.

कलम ४०५- फौजदारी विश्र्वासघात.

कलम ४०६- शिक्षा.

कलम ४०९- लोकसेवकाने, सावकार,एजेंट यांनी

                   अन्यायाने विश्र्वासघात करणे.

कलम ४१०- चोरीची मालमत्ता.

कलम ४११- अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता

                   स्वीकारणे.

कलम ४१५- ठगवणूक.

कलम ४१७- ठगवणूक करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४२०- ठगवणूक करणे आणि मालमत्ता

                   देण्यास नकार देणे.

कलम ४२५- अपक्रीया.

कलम ४२६- अपक्रीया बद्दल शिक्षा.

कलम ४३५- १००रू. पर्यंतच्या किवा शेतमालाच्या

                    १०रू.किमतीच्या नुकसान करण्याच्या

                    उद्देशाने स्फोटक पदार्थ अथवा विस्तव

                   याद्वारे आगळीक करणे.

कलम ४४१- फौजदारी पात्र अतिक्रमण किवा

                    घराविषयी आगळीक.

कलम ४४२- गृह अतिक्रमण किवा घराविषयी 

                   आगळीक.

कलम ४४३- चोरटेगृह अतिक्रमण.

कलम ४४४- रात्रीच्यावेळी चोरटेगृह अतिक्रमण

                    करणे.

कलम ४४५- घरफोडी.

कलम ४४७- फौजदारी पात्र अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४४८- घर अतिक्रमणाबद्दल शिक्षा.

कलम ४५२- दुखापत, हमला,करण्याची पूर्वतयारी

                   करून नंतर गृह अतिक्रमण करणे.

कलम ४५४- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या

                   अपराध करण्यासाठी चोरटेगृह

                    अतिक्रमण किवा घरफोडी करणे.

कलम ४५७- कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या

                    अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी

                     चोरटे गृह अतिक्रमण किवा घरफोडी

                      करणे.

कलम ४६३- बनावटी लेख करणे.

कलम ४६५- बनावटी करण्याबद्दल शिक्षा.

कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी बनावटी करणे. कलम ४९८(अ)- एखाद्या स्त्रीच्या पतीने किवा

                      नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे. कलम ५०४- शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान

                    करणे.

कलम ५०६- फौजदारी पात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा.

कलम ५०९- विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव

                   किवा शब्दचोर करणे.

कलम ५११- अाजिवन कारावासाच्या किवा अन्य

                   कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले

                    अपराध करण्याचा प्रयत्न करण्या

                    बद्दल शिक्षा.

          

                   अशी घटने मध्ये कायदयाची तरतुद केली .डॉ. भिमराव आंबेडकरानी श्रिमंतांपासून गरीबांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना समान कायदा देऊन, कायद्यापुढे सर्व समानता,ह्या भारताला जगातील सर्वात मोठे, धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र बनवून संविधान बहाल कले.        

                    म्हणूनच तर भारताच्या संविधानाचा जगात जय-जय कार होतो.हे अलीकडच्या काळात नेपाळ या देशाने भारताचा आदर्श ठेवून लोकशाही राष्ट्र घोषित केले हे उत्तम उदाहरण आहे. जगातील सर्वात बुद्धीमान , दुर दुष्टी .असलेले महामानवाची भारताला लाभलेली देणगी म्हणजे भारतीय घटना होय


..........जय भारत ....

 कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे.  तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे. इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

___________________________

क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.


च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते. 

एकदा करून बघा 


ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा. 


त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.

एकदा म्हणून बघा.


प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .

_____________________________


आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.


जय मराठी !

क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ....

•••••••••••••••••••••••••••••••••••

क - क्लेश करू नका 

ख- खरं बोला

ग- गर्व नको 

घ- घमेण्ड करू नका  

च- चिँता करत राहू नका

छ- छल-कपट नको 

ज- जवाबदारी निभावून न्या

झ- झुरत राहू नका  

ट- टिप्पणी करत  राहू नका

ठ- ठकवू नका  

ड- डरपोक राहू नका

ढ- ढोंग  करू नका

त- तंदुरुस्त रहा 

थ- थकू नका 

द- दिलदार बना 

ध- धोका देऊ नका  

न- नम्र बना 

प- पाप करू नका  

फ- फालतू कामे करू नका  

ब- बडबड कमी करा

भ- भावनाशील बना 

म- मधुर बना 

य- यशस्वी बना 

र- रडू नका 

ल- लालची बनू  नका

व- वैर करू नका

श- शत्रुत्व करू नका

ष- षटकोणा सारखे स्थिर रहा 

स- सत्य बोला 

ह- हसतमुख रहा 

क्ष- क्षमा करा 

त्र- त्रास देऊ नका 

ज्ञ- ज्ञानी बना  !!