रंग

 थेंबउणें ऊन 

माळावर जळे, 

कांचेवर तडे 

श्रावणाच्या. 


स्तनांवर माझ्या 

जांभळाची झाक;

ओली आणभाक 

आठवते.


दि - 18/01/1958 

नागपुर

 भांजा – भतीजांना चिकटवून वशिलेबाजी करणे, लिंकनला अगदी नापसंत असे. तरी त्याचे नातेवाईक, गाववाले अनेकदा त्याला गराडा घालीत आणि आपली वर्णी लावण्यासाठी तगादे लावीत. त्या सर्वांना थोडा वेळ बसायला सांगून एकदा लिंकन म्हणाला, ‘मी तुम्हांला आधी एक गोष्ट सांगतो. कोणे एके काळी सगळे प्राणी आळीपाळीने एकेकाला आपला राजा करीत. होता होता गाढवाची पाळी आली. गाढवाचे भाईबंद आपल्याला अधिकार मिळावा म्हणून एकच हाकाटी करू लागले. तेव्हापासून जगात तीच पद्धत पडली. आजही त्याचेच भाईबंद हक्कानं वशिला लावायला येतात.’

 एकदा लिंकन आपल्या बुटांना पॉलिश करीत बसला असता, एक घमेंडखोर ब्रिटिश वकील तिथे आला आणि त्याने तुच्छतेने लिंकनला विचारलं – ‘काय प्रेसिडेंटसाहेब, तुम्ही तुमच्या बुटांना पॉलिश करता?’ त्याची टवाळखोरी आपल्या लक्षात न आल्याचा बहाणा करून लिंकन म्हणाला, ‘होय महाराज, मी माझ्या बुटांना पॉलिश करतो. आपण कुणाच्या बुटांना पॉलिश करता?’

अनर्थ - अच्युत गोडबोले

1. शेतीचा पाया भक्कम झाल्यावर उद्योगधंद्यांत वाढ होणं आणि उद्योगधंद्यांचा पाया भक्कम झाल्यानंतर सेवाक्षेत्र वाढीला लागणं ही नैसर्गिकरीत्या सुदृढ आणि टिकाऊ प्रक्रिया असते.


2. शेतीतल्या 1% वाढीमुळे जे दारिद्र्यनिर्मूलन होतं, तेवढं दारिद्र्यनिर्मूलन व्हायला इतर क्षेत्रांमध्ये 2-3% वाढ व्हावी लागते.

3. जेव्हा जीडीपी ओळीनं 6 महिने कमी होतो, तेव्हा त्याला ‘मंदी’ असं म्हणतात.

4. अमेरिकेत बीफला खूप मागणी आहे. तिथे हॅम्बर्गर सर्वात प्रिय आहे. त्यासाठी लाखो जनावरांना कमीतकमी 18 महिने खाऊ-पिऊ घालावं लागतं. त्यांना चरण्यासाठी आणि त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी जमीन मिळावी म्हणून अ‍ॅमेझोनमध्ये प्रचंड प्रमाणात जंगलतोड झाली; आणि त्याचा पर्यावरणावर खूपच वाईट परिणाम होतो. म्हणूनच अमेरिकेत बीफ तयार न करता ते ब्राझील आणि इतर देशांमधून आयात केलं जातं. पण या प्रकारामुळे अ‍ॅमेझोनमधली लाखो हेक्टर सदारहित जंगलं नष्ट झाली आहेत. म्हणूनच याला ‘हॅम्बर्गर इफेक्ट’ म्हणतात.

5. प्रत्येक गोष्ट देवाच्या कृपेनं होत नसून त्यासाठी वैज्ञानिक कारण असतं आणि आपण ते शोधून काढलं पाहिजे, ही संशोधक वृत्ती आणि आपलं कुतूहलच तरुणपणापासूनच मारलं जात असेल तर काय करणार?

6. आर्थिक सल्लागार अरविंद पानिग्रहिया यांनी लिहिलेल्या लेखाप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. (22 लाख डॉलर्स) गुंतवले तर त्यामुळे फक्त 1 रोजगार निर्माण होतो. याउलट बंगलोरमधल्या श्लोक इंडस्ट्रीजमध्ये 16 कोटी रु. गुंतवले तर 266 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे चक्क 266 पट!! थोडक्यात आपण यांत्रिकीकरण किती वापरतो, त्यावर रोजगार कसा अवलंबून असतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

7. प्रत्यक्ष किंवा थेट (डायरेक्ट) करांचे दर वाढवणं, वेल्थ आणि वारसाहक्काची संपत्ती यावर कर लावणं, कॉर्पोरेटस्ना करमाफी/करसवलती न देणं, टॅक्स हेवन्सवर नियंत्रण ठेवणं आणि काळा पैसा बाहेर काढणं या पाचही गोष्टींचा विचार केला, तर सरकारला जीडीपीच्या साधारणपणे कमीतकमी 20% जास्तीचं उत्पन्न दरवर्षी मिळू शकेल. तसं झालं; तर पुढची अनेक वर्षं शिक्षण, आरोग्य, पेन्शन, स्वस्त घरं, रोजगार, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज, टॉयलेटस् अशा अनेक कल्याणकारी गोष्टींवर डेफिसिट न वाढवता भरपूर खर्च करता येईल.

8. जीडीपीच्या मोजमापात कित्येक गोष्टी झाकल्या जातात. उदाहरणार्थ, समाजातली विषमता जीडीपीच्या आकड्यात दिसून येत नाही. प्रचंड विषमता असली, तरी गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या उत्पन्नांची जीडीपीमध्ये बेरीज केलेली असल्यामुळे राष्ट्रातली बहुतांशी जनता गरीब असली, तरी राष्ट्राचा जीडीपी मोठा असू शकतो. तसंच जीडीपीवरून राष्ट्रातलं शिक्षण, आरोग्य आणि एकूणच लोकांसाठीच्या सोयी, सुविधा, त्यांचं संगोपन, त्यांचं समाधान आणि त्यांचा आनंद यांच्याविषयी काहीच कल्पना येत नाही.

व पु काळे

 1. भावनाधीन होऊन चालत नाही. माणसानं विवेक धरावा, व्यवहारी बनावं. भावना फार काळ उपयोगी पडत नाहीत ह्या जगात.’


2. भावनेला विवेकाची पराणी हवीच. स्वप्नाला जाग हवी.

3. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दु:खी होत नाही आणि पुष्कळदा स्वत:ला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवयीनं सुखी झालेली असतात. काही ठराविक गोष्टींचा लाभ होणारी, जशी शेकडा नव्वद टक्के माणसे असतात, त्यांचे संसार चालतात, त्यांच्यात व आपल्यात फरक नाही, ही जाणीव असणं, ह्यानंच कैक लोक स्वत: सुखी आहोत असं मानतात.

4. मानसिक अस्वास्थ्य हे प्रत्यक्ष भोगत असताना जाणवत नाही; तर त्याचा लोप झाल्यावरच, त्या औदासीन्याचा आपल्यावर केवढा पगडा बसला होता हे जाणवतं!

5. मुलं मोठी झाली की दुरावली. जोपर्यंत ती परावलंबी असतात तोवर ती आईवडिलांची असतात.

6. जी जागा आपल्याला खूप सुरक्षित वाटते तीच गोत्यात आणते.

7. उत्तरं मिळवायची असली की पाठ फिरवल्यानं ती मिळत नाहीत, परिस्थितीला तोंड देऊन ती मिळवायची असतात

8. असामान्य समस्या, असामान्य उपायांनी सुटतात.

9. एखाद्या गोष्टीचा काही विशिष्ट अर्थ आपल्या मनात असला की इतर सगळीजणं त्याच अर्थानं त्या गोष्टीकडे पाहात आहेत की काय असली शंका यायला लागते.

10. उत्तम स्मरणशक्ती असणं हा केव्हा केव्हा शापच! सगळं कसं वैशाखातल्या उन्हासारखं लख्ख आठवतं.

11. तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणजे बिघडला

12. पुरुष ही परमेश्वराची शक्ती, तर स्त्री ही त्याची प्रत्यक्ष मूर्ती

13. स्वास्थ्यापेक्षा आपत्तीच माणसाला अंतर्मुख बनवते, क्रियाशील करते.

तू भ्रमत आहासी वाया - वपू काळे

1. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.


2. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही

3. एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.

4. सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.

5. प्रियकर परिपूर्ण असतो. नवऱ्याला मार्यादा असतात. कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. ‘मी’ उरत नाही म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही.’ ‘मी’ हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.

6. प्रचिती आली की ती तुमची तत्त्वं होतात आणि तुमची तत्त्वं इतरांची थेअरी होतात.

7. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित् लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.

8. रडताना कुणी फोटो काढत नाहीत. रडणं भोगायचं असतं. हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं.

9. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानाचं जितकं शल्य नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कुणी बोट ठेवलं तर होतं. हे बोट जर अधिकारी व्यक्तीनं ठेवलं तर जळजळ जरा कमी. निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी.

10. ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही. त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्‌भवत नाही

11. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो

12. ज्ञानी माणूस हयात असतो, तोपर्यंत तो धोकादायकच असतो. तो ढोंगांवर प्रहार करत राहतो. तो गेल्यावर त्याच्यापासून कसलाच वैचारिक उपद्रव नाही. मग त्याच्या आरत्या गायच्या, अभंग म्हणायचे, शेवटी पुतळे उभे करायचे. ज्ञानी माणसांना त्यांच्या हयातीत आणि मेल्यावरही कावळ्यांच्याच सहवासात राहावं लागतं. जिवंतपणी चोचा मारणारी माणसं आणि पुतळ्यांच्या नशिबी...

13. अगदी क्षुल्लक कारणासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी माणसं इतकं खोटं बोलतात की तो त्यांचा स्वभावधर्म बनतो. अशी माणसं सतत मग तणावाखाली वावरतात.

14. पागल झाल्याशिवाय प्रेम संभवतच नाही. जिथं हिशोब नसतो, विचार नसतो, संयम नसतो, तिथंच प्रेमाचा उगम होतो. प्रेम महापुरासारखं असतं. तिथं किनारे हरवतात. जिथं तर्क आहे, तिथं स्वतःचा बचाव आला.

15. वस्तुत्त्वानं असणं आणि अस्तित्त्वानं असणं ह्यात फरक आहे.

16. ऑफिस म्हणा, घर म्हणा, तिथं वास्तुपेक्षा आपण मोठे असतो. मालकीचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं. निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते.

17. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो. कुणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो, तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाह्यजे.

18. वस्तू वापरण्यापेक्षा, ती आपल्यापाशी आहे, ह्याचाच आनंद.

19. सर्वात मोठा धर्म कोणता ? -तर ‘प्राण आहे तोपर्यंत जगणं’ हाच धर्म मोठा.

20. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचीच एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो, ह्याचं कारण काय ? -तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर अलोट प्रेम. पार केलेलं दु:खही आठवत बसायचं

21. जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.

 नातरीं येथिचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।

 तो तेथें तरी पाडवा । दीपचि कीं ।।

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसऱ्या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म आहे. चहुकडे केवळ प्रकाशच देणारा जसा दिवा असतो