स्वर्गांतील आत्मे !

कंटाळा आला बोवा आपल्याला इथचा ! - हो तर काय ? रोज तेंच, तेंच ! अग, काडीइतकासुद्धां फरक नसावा ? - उठल्या - बसल्या तें अमृत ढोसावें, आणि खुशाल टोळासारखें आपलें भटकावें ! कांहीं उद्योग दुसरा ? - छे छे छे !! ओकारी आली बोवा आपल्याला येथची ! असार ! असार आहे हा स्वर्ग निव्वळ ! - तेंच कीं ! सदा म्हणे आपला आनंद ! एक वृत्ति ! केव्हां संपते आहे कुणास ठाऊक ! - आतां थोडी कां वर्षे झाली असतील इथें येऊन ? - पण कांहीं आहे का फरक ? हें आपलें नंदनवन, होतें तस्सें आहे ! - नादीं लागलों ! आणि फुकट इथें तडफडायला आलों ! - चोर कुठले ! म्हणे ' स्वर्गात जा म्हणजे शांति मिळेल ! ' - वा ! काय छान शांति मिळते आहे इथें ! एकाला म्हणून करमत असेल तर शपथ ! नकोसें झालें आहे अगदीं ! - हें ग काय ? तूं तर रडायलाच लागलीस ! उगी ! - जाऊं ! लवकरच आपण मृत्युलोकांत जाऊं बरें ! तिथें मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील ! आणि मग काय महाराज ! - हंसली रे हंसली ! - अग तें कांहीं पुसूं नकोस ! देहलोकची मजा कांहीं और आहे ! घटकेंत आनंद आहे, तर घटकेंत दुःख आहे ! चाललें आहे ! शेंकडों वृत्तींत जिवाला बागडायला सांपडतें ! आणि हें कशामुळें ? - तर हें सगळें देहामुळें बरें का ! - आणि हो ! सगळेंच तिथें अस्थिर ! त्यामुळें अश्शी माणसाची परीक्षा होते कीं, ज्याचें नांव तें ! चांगला तावून सुलाखूनच निघतो ! उगीच नाहीं मृत्युलोक ! - बरें का ? - म्हटलें खरी मुक्ति तिथें आहे माझे बाई ! - नाहीं तर इथें ! पडा सदा आनंदांत कुजत ! - मृत्युलोकाशिवाय नाहींच तें ! सुख खरें तिथें ! अग आपलेंच काय, कंटाळा आला कीं देवसुद्धां जातो तिथें ! उगीच नाहीं अवतार घेत ! ....

कारण चरित्र लिहायचें आहे !

चरित्र काय पुढच्या अंकांत देणार आहांत का ? - छान बाळाभाऊ म्हणजे नामांकितच लेखक ! अहो वा ! त्याचा माझा स्नेह लहानपणापासूनचा ! - लंगोटीमित्रच आम्ही ! त्यामुळें हवी तितकी माहिती मला देतां येईल ! - हां, तेवढें मात्र विचारुं नका ! लेखनांत काय त्यानें तेज दाखविलें असेल तेंच ! बाकी मनुष्य आपला - तुमच्या आमच्यांतल्या गोष्टी या - मनुष्य आपला असा तसाच ! - अहो स्वभाव काय, अन् वर्तन काय ! गोंधळ ! काय सांगायचें तुम्हांला ? सरळपणा म्हणून यत्किंचित् नाहीं ! कधीं कोणाचे पैसे घेतले, आणि ते बोवा परत केले आहेत, नांव नाहीं ! याचे घे, त्याचें घे असें करुन सातआठ हजारांला तरी त्यानें बुडविलें असेल ! शिवाय लोकांची पुस्तकें दाबली ती वेगळीच ! हा जिथें साधा व्यवहार, तिथें काय बोलायचें आणखी ! हीच तर्‍हा व्यसनाची ! अहो, परवां मरायच्या आधीं महिना दोन महिन्यांतली गोष्ट ! दिवसाढवळ्या, अगदी भर चौकांत एक टांगेवाल्याशीं मारामारी केली ! बोला आतां ! - अहो, कसचें कारण अन् काय ! यथास्थित झोकली होती झालें ! - नीट नोकरी नाहीं, धंदा नाहीं, सदा चहा आणि विडया ! रोज उठून घरांत भांडणें ! - कां नाही व्हायची ! वेळ नाहीं, अवेळ नाहीं, येईल त्याच्या नरड्यांत चहा ओतायचा ! कांही त्याला सुमार ? - आपलें बोलायचें किंवा लिहायचें नाही इतकेंच ! बाकी अशा एक एक गोष्टी आहेत कीं, - चांगलें बाबांचें लग्न करुन दिलें, पण घटकाभर पटेल तर शपथ ! कारण बाहेर यांचा रोमान्स बोकाळलेला ! शेवटीं एक दिवस नवराबायकोची अशी जुंपली कीं काहीं पुसूं नका ! - झालें ! पुढें काय ? ती उठून बापाच्या घरी चालती झाली, आणि हें काय ? - यांची उप्पर मिशी ! कारण, गेली, तर गेली ! नाकावर टिच्चून दुसरें लग्न करीन मी ! - आणि ठणठणीत केलें लग्न ! तेव्हां अशा या भानगडी, पण लिहून थोडेंच चालतें आहे ? तिथें म्हणजे, ' यांना दोन बायका होत्या ही गोष्ट खरी. पण पहिलीला मूल होईना, तेव्हां ती सारखी झुरणीस लागली ! इतकी कीं, शेवटीं तिनें अंथरुण यांनीं दुसरें लग्न करावें ! शेवटीं अगदीं निरुपायानें - कारण लग्न केलें ! ' - म्हणजे अशा तर्‍हेनें सगळें फिरवून - कारण चरित्र लिहायचें आहे, तेव्हां तें -

फाटलेला पतंग

छे ! आतां कोठून मी धड व्हायला ! अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक ! - अहो ! नका ! त्या आकाशाकडे पाहूं नका ! हरहर ! हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्‍याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें ! अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ? ' - पण अरेरे ! तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली ! खालीं खेंचा ! नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ! ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ! मग काय ? खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्‍या जिवाची - हाय ! - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला ! - नको ! त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको ! अहो ! एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें ! अहाहा ! किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ! ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ! जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय ? जग कोठें मला विसरलें होतें ? माझी किंमत किती ? पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं ! शेवटीं ! जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो ! स्वर्ग जातो ! ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो ! आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो ! - नाहीं ! - नाहीं ! - नाही !! - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार ! - अहो ! माझ्या स्थितीबद्दल रडूं नका ! आधी ऐका ! एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च ! - काय सांगतें तें ऐका ! गर्वानें भरार्‍या मारुं नकोस ! भरार्‍या मारुं नकोस ! नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील !...

हें काय उगीचच ?

पन्नास - नाहीं शंभर वर्षाचें असतों म्हणून काय झालें असतें ? आहे काय त्यांत ? आणायचा अवकाश, तेव्हांच नीट करुन दिलें असतें ! - एकदा नीट पहाल तर खरें ! ऐसें झकास तुमचें घड्याळ झालें आहे, कीं नांव नको आतां पुनः बिघडण्याचे ! - अलवत् ! आमचें इस्पितळच असें आहे ! आला रोगी कीं बरा झालाच पाहिजे ! - ती पाहा ! ती बाजाची पेटी दुरुस्त करायला आणली, तेव्हां एक सूर धड असेल तर शपथ ! हाडेंन हाडें खिळखिळींत झाली होतीं ! पण तीच आतां ? अशी गोड गाते आहे कीं, ज्याचें नांव तें ! - सांगतो ना ! एकदां जिथल्या तिथं ठाकठीक होऊन जेव्हां तिचे सूर निघायला लागले, तेव्हां किती मनस्वी आनंद झाला म्हणून सांगूं तुम्हांला ! - मालक तर उड्या मारायला लागला ! - बरोबरच आहे ! करावयाचें कांहीं, तर असेंच केलें पाहिजे ! नाहीं तर सांगा, जन्माला घातलें कशाला ? - असें हें सगळें मोडलेलें चालू करावयाचें, याचकरितां कीं नाहीं ? अन् खरी मौज यांतच ! नाहीं का ? - तेव्हां एकंदर क्रमच असा आहे कीं, बिघडलेले म्हणून कांहीं राह्यचेंच नाहीं - हो मग ! शंका आहे काय ? - तें जें प्रेत चाललें आहे, तें सुद्धां पुन्हा धड व्हायलाच ! - मला सांगा, आपण केलेलें कांहीं नादुरुस्त झालें, तर काय हव्वें तें करुन, नीट करतोंच कीं नाहीं आपण ? - झालें तर ! हें जसें माणसाचें, तेंच आपल्या निर्माणकर्त्याचें ! तेव्हां इथं आपल्या हदयाचे ठोके बंद पडले, तर काय बिघडलें त्यांत ? पुनः कुठें तरी चालू होतातच ते ! - आणि असें आहे, म्हणूनच आपण सगळें हें - हव्या तशा हाल अपेष्टा सोसतों, जिवाची माणसें जातात - तेंही सोसतों, अन् सगळें हें नेटानें करीत राहातों ! - हें काय उगीचच ?...

तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !

हो, बरोबर, दोनदां आपल्याकडे येऊन गेलों मी. - नाहीं, काल नाहीं, संध्याकाळीं आलों होतों तें परवा. आणि सकाळचे जें म्हणतां, ती कालची गोष्ट. असो, गांठ पडली चला. - हो, तेंच विचारणार होतों, कीं शेजारी एवढी गडबड कसली ? सारख्या मोटारी अन् गाडया येताहेत ! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे ! - केव्हं ? आतां मघाशीं सहाच्या सुमारास ? - नाहीं बोवा, तुम्ही सांगेपर्यत वार्तासुद्धां नव्हती याची मला ! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जाता - येत नाहींत, येवढें ठाऊक होतें ! पण इतक्यांतच असें कांहीं होईलसें - बाकी बर्‍याच थकल्या होत्या म्हणा ! - साठ कां हो ! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या ! - असो. चला ! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली ! पेशवाईनंतर महाराष्ट्रांत इतक्या योग्यतेची मला नाहीं वाटत दुसरी कोणी असेलशी ! - खरें आहे. अगदी खरें आहे ! मनुष्य आपल्यामध्यें असतें, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते ! - स्वभावानें ना ? वा ! फारच छान ! अतिशय मनमिळाऊ आणि शांत ! कटकट म्हणून नाहीं ! - हळूहळू, थोडंथोडं, पण खरोखरच मोठं कार्य केलं ! अन् फारसा गाजावाजा न करतां ! - आधींच थोरामोठ्यांतली ती ! आणि रावसाहेबांचें वळण ! मग काय विचारतां ! - बोलणें काय, चालणें काय आणि - हो ! लिहिणेंसुद्धां - तेंच म्हणतों मी - कीं, ' आठवणी ' कशा नमुनेदार लिहिल्या आहेत ! मराठींत असें पुस्तक नाहीं आहे ! - तें काय विचारायला नको ! आज गर्दी म्हणजे - सगळा गांव लोटायचा आतां ! - मोटारी अन् गाडयांचा चालला आहे धडाका ! - काय ! खूपच लोटली आहे हो ! दर्शनाकरतां दिवाणखान्यांतच ठेवलेलें दिसतें आहे त्यांना ? - चला, येत असलांत तर .... जाऊं म्हणतों ! इतकीं माणसें जात आहेत तेव्हां - हो गर्दी तर आहेच ! - राह्यलं, तब्येत बरोबर नसली तर नाहीं गेले ! मला तरी कुठें येवढें जावेंसे वाटतें म्हणा ! कारण आतां गेले काय, अन् न गेलें काय सारखेंच ! पण बोवा ' अमूक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला ' ! तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !....

पण बॅट् नाहीं !

चक्क खोटा डिसिजन् ! कॅच असेल कोठून ? बॅटला बॉलच जर मुळीं लागला नाहीं तर - दुसरें काय ! वुइकिटकीपरनें विचारलें, अंपायरनें ' हो ' म्हटले. मामा लेकाचा ! - किती बेचाळीसच ना ? - उं: ! कांहीं फार झाल्या नाहींत ! - अरे चांगला सेट् झालों होतों, सहज सेंचरी निघाली असती ! - हुश्श ! बॉय ! सोडा लाव ! छे बोवा ! आज फारच थकलों ! छान म्हणजे ? राव बिजली आहे बिजली ! गन् अँड् मूरचा आटोग्राफ आहे ! बॅट् हलकीसलकी नाहीं ! पैसेच तसे मोजले आहेत ! - अरे तिचें आधीं केनच किती कॉस्टली आहे ! अन् खेळायला काय ! अगदीं फुलासारखी ! इतकें त्या - तो इकडचा बोलर नाहीं ? - इतकें त्याचें बोलिंग मारलें ना ! पण हाताला हूं की चूं नाहीं ! - कटिंगला तर बोलायलाच नको ! नुसती टाकायचा अवकाश, कीं ऐसा बॉल जातो आहे ! नुसते पहात रहावें ! बॅट म्हणजे दिलजान् आहे ! हजार पांचशेंतून निवडून काढली आहे ! उगीच नाहीं ! - पहा ! आहे ? अगदीं त्रिफळा उडाला ! लाख वेळां सांगितलें कीं, बॅकवर्ड खेळूं नको म्हणून ! आले आतां हाका मारीत ! नेक्सट कोण भिडे जातो आहे ना ? - जपूज खेळ रे बोवा - लेगब्रेक आहे ! जरा संभाळून ! नाहीं तर होशील बबड्याजीराव ? - काय ? बॅट् ? माझी बॅट् देऊं तुला ? हात जोडतों ! भाई माफ कर ! तेवढें नाहीं व्हायचें । दुसरें काय हव्वें तें - अगदी माझ्या जिवाचें माणूस - स्वतःचा जीव मागितलास तरी देईन ! पण बॅट् नाहीं हो !....

हें काय सांगायला हवें !

हां, आतां बरोबर ! घरचेच तुमच्या बातमीदार ! तेव्हां इतक्यांत तुम्हांला कळलें हें ठीकच ! - छे ! मला अजून वार्तासुद्धां नाहीं ! आपली कुणकुण लागली आहे इतकेंच ! - बाकि आहे काय त्यांत म्हणा ! कळेल, आज नाहीं उद्या ! - कां .... हीं खटपट नाहीं अन् कांही नाहीं ! पत्रंही कोणाला घातलीं नाहींत, किंवा कोणाकडे जोडेही फाडले नाहींत ! - अन् अर्ज तरी काय, खरडायचा म्हणून खरडला इतकेंच ! वांकडयांत असा शिरलोंच नाहीं ! म्हटलें काय होईल तें आपलें सरळ ! - नेहमीचेंच माझें आहे हें ! काम मनापासून करायचें, अन् चोखपणानें वागायचें ! हव्यात कशाला इतर खटपटी आणि लटपटी ! - आतां तुम्ही म्हणाल कीं, हें जमलें कसें ? अहो ! तेंच तर मोठें आश्चर्य आहे ! अर्ज जेव्हां म्हणतात माझा दृष्टीस पडला, तेव्हां .... आपले लोक बाजूलाच राहिले, पण एका युरोपियननें म्हणे हट्टच धरला कीं, ' अमुक एक गृहस्थ माझ्या जोडीला परीक्षक असतील, तरच मीही परीक्षक होईन ! नाहींतर साफ जरुर नाहीं मला युनव्हर्सिटीची ! ' - तेव्हां बोला आतां ! फादर लगबगमननेंच असें म्हटल्यावर ... अन् तें म्हणजे बडं प्रस्थ ! .... कोण पुढें काय बोलणार ! मुकाटयानें सगळे कबूल ! - छेः ! ओळख ना देख ! काळा कां गोरा त्यानें अजून पाहिलंसुद्धां नाहीं मला ! कुठं कांहीं लिहितों सवरतों, तें त्यानें मला वाटतें वाचलेलें ! तेवढयावरुन हें सगळें, बाकी खटपटीचें म्हणून नाव नाहीं ! - हॉ ! हॉ कसें बोललांत ! सरळ आपलें काम करीत असावें, पारख करणारा, आज ना उद्या, भेटतो कोणी तरी जगांत ! - ब .... रें ! कांही नवल विशेष ? - कुशाभाऊ जोशी; कोण बुवा हा ? - ओ ! आय् सी ! आपल्या तो .... नागुअण्णाच्या .... बयडीचा कुशा ? तो का बसणार आहे आमच्या परीक्षेला ? - काय ! इतका मोठा झाला आहे ! अहो परवां ना त्याला पाहिला आपण? धड नाकसुद्धां पुसतां येत नव्हतें ! आणि तो आतां कॉलेजांत का आला आहे ! - काय ! दिवस कसे हां हां म्हणतां जातात पहा ! - हो, तेंही खरेंच आहे ! प्रकृतीमुळें जे नागुअण्णा कोल्हापूरला गेले, ते तेही तिकडेच, आणि कुशाही तिकडेच ! तेव्हां काय मध्यंतरी दिसायचें कारण ? बरें कामाशिवाय आम्ही थोडेच कुठेंख हालतों आहों ! आपलं पुणें, नाहीं तर मुंबई ! बाकी म्हणून .... बरें आहे येऊं आतां ? - वा, वा ! भलतेंच ! त्याची नको काळजी ! कसें झालें तरी आपल्या बयडीचा कुशा ! तेव्हां हें काय सांगायला हवें ? हळूच केव्हांतरी बरं का ? - हळूच केव्हां तरी नंबर वगैरे ....

सायकॉलॉजिकली !

थांब, ये नारु ! - अरे, आधीं नीट ऐकून घेतलेंस का काय काय आणायचें तें ? - हां बरोबर, पानाच्या तीन पट्टया आणि एक सिगारेटसची पेटी ! - पण ती कोणती ठाऊक आहे का ? - सीझर्स ! कैची छाप ! भलतीसलती उगीच आणूं नकोस ! - चल आटप, ठोक धूम लवकर ! सगळे आम्ही इथें वाट पहात आहोंत ! - छे बोवा ! काय तुम्ही मघांपासून उगीच पिरपिर लावली आहेत हो ? - तुम्हांलाच तेवढी घाई अन् आम्ही काय इथें राह्यला आलों आहोंत ? अनायासें सुट्टी मिळाली आहे, बसूं थोडा वेळ आणखी ! समजलें हो ! काम .... काम .... काय कामाचें सांगतां येवढें ? येऊन जाऊन स्नान करुन जेवायचें, अन् खुशाल आढ्याला पाय लावून ताणू न द्यायची, हेंच कीं नाहीं ? सत्तेची येवढी बायको असल्यावर मग हो कां इतकी घाई ? - असें ! हें नव्हतें मला ठाऊक ! तुमची आमची विशेष ओळखही नुकतीच झालेली ! त्यामुळें .... कधींची बरें गोष्ट हीं ? - म्हणजे जवळजवळ चार वर्षे झालीं म्हणानात ! - ब.... रं ! फिरुन कांही मग ? - ना .... हीं !! अरे, म्हणजे सांगतां आहां काय तुम्ही ! खरेंच का ? - मग मोठें विलक्षण आहे बोवा ! बायको जाऊन चार वर्षे झाली आणि अजून लग्न नाही म्हणतां ? - हेः स्टुपिड् ! - रागावूं नका तुम्ही ! पण खरें सांगायचें म्हणजे .... साफ इथें चुकतां आहां तुम्ही ! यावरुन होतें काय ठाऊक आहे का ? - अहो, बायकोवर तुमचें प्रेम नाहीं हें उघड उघड दिसतें ! - भलतेंच एखादें ! - असें आहें त्याचें.... इतकें कशाला प्रत्यक्ष माझेंच घ्या ना ! पहिली बायको माझी मेली, तेव्हां लगेच दुसरी केली ! म्हणजे झालें काय ? - पहिलीवर झालें माझें दुप्पट प्रेम ! पुढें दुसरी गेल्यावर तिसरी ! त्यामुळें .... लक्षांत आलें का काय झालें तें ? .... पहिलीवर माझें झालें तिप्पट, दुसरीवर दुप्पट अन् तिसरीवर एकपट, म्हणजे सर्वात कमी प्रेम तिच्यावर ! असें मोठें हें .... ' सायकॉलॉजिकली ' - म्हणजे मानसशास्त्रदृष्ट्या .... बरें का ? - मानसशास्त्रदृष्टया हें मोठें विचित्र त्रांगडें आहे ! - भले महाराज ! टॉलस्टॉय आणि टागोर वाचून हेंच का शेवटीं सार काढलेंत ? ...

असें केल्याशिवाय जगांत भागत नाही !

माझें मोठें भाग्य, यांत कांहीं शंका नाहीं ! नाहींतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गांठ पडायला ! - अहो कशाचे, कशाचे ! आम्ही कसले कवि ! कोठें एका कोपर्‍यांत लोळत पडलों आहोंत झालें ! नाहीं खरेंच ! परवांची आपली कविता फारच बहारीची होती बोवा ! फारच छान ! एक्सलंट ! अहो आधीं नांव पाहूनच थक्क झालों ! ' माझें आंबट अजीर्ण ! ' वा ! किती सुंदर ! - नाहीं, तें आलें लक्षांत. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून ! पण त्यांतल्या त्यांत या दोन ओळी तर मला फारच आवडल्या ! काय पहा ! - हां बरोबर, - ' अजीर्णामुळें ! जीव कळवळे ! ॥' काय बहार आहे यांत ! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ ! - काय म्हणतां ! इतका खोल अर्थ आहे का ? शाबास ! ' प्रेमभंगामुळें हदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचें अजीर्ण ! ' क्च ! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो ! टेरिबल ! फारच प्रतिमा अफाट ! माझें समजा हो ! - कोणती ? - कोणती बरें माझी कविता आपल्याला अतिशय आवडली ? हां, हां ! ती होय ? गेल्या मस्तकमंजनांतील चहादाणीवरील ! अस्सें ! - हो, ती सुद्धां आहे आत्म्यालाच धरुन ! - बरें आतां रस्त्यांत नको - केव्हां ? उद्यां सकाळी येऊं आपल्या घरीं ? - ठीक आहे - हं : ' अहो रुपम् अहो ध्वनिः ' चाललें आहे जगांत ! म्हणे ' आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली ! ' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची ! इतकी भिकार कविता कीं, मला स्वतःलासुद्धां आवडत नाहीं ! माझी चहादाणी ! साखरपाणी ॥ अधण येई सळसळा ! अश्रू येती घळघळा ॥ हः हः यंवरे कविता ! पण चाललें आहे कीं नाहीं ! भेंडीरमणानें उठावें, बटाटेनंदनाची स्तुति करावी ! बटाटेनंदनानें पुढें यावें, भेंडीरमणाची वाहवा करावी ! मनांत परस्परांना त्यांची कविता मुळींच आवडत नसते ! पण जगांत यानें त्याला शेली म्हणावें, उलट त्यानें याला कीट्स म्हणावें ! चालला आहे सपाटा ! बरें असें केल्याशिवाय जगांत भागत नाहीं ! अहो नाहीं तर, आपली खरीं मतें सांगून जगांत तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे कीं नाही ? रिकामा जिवाला ताप ! जाऊं द्या !....

फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन !

ये ! जोजफीन ! जिवाचा भडका ! - भडका झाला आहेग ! प्रिये ! नको थांबूस ! एक पाऊल पुढें ये - कडकडून मिठी मार ! - कीं या तापलेल्या देहाचें थंड - गोड - अमृत होईल ! - अग ये ! लवकर ये ! - स्वर्गात तर भेटूंच - कायमचेच भेटूं ग ! पण आधीं - हाय ! जोजफीन ! फ्रान्स ! फ्रान्स !! दाबा ! डोक्यावर हातोड्याचे घाव घाला ! पण ध्यानांत ठेवा ! सूर्याचा गळा दाबीत आहां ! रक्तानें न्हालेल्या - संतापानें लाल झालेल्या सूर्याचें मस्तक फोडून - पहा ! एका सूर्याला फोडलें - पण वेडयांनो ! आकाशांत - जगांत - पहा कसे हे लक्षावधी सूर्य जळत आहेत ते ! - डॉक्टर ! माझ्या बाळाला संभाळा ! - हाय ! सेंट हेलेनांत - या जळजळीत निखार्‍यांत मला निजवूं नका ! उचला ! ती पहा ! माझी लाडकी फ्रान्स माझ्याकरितां ओरडत आहे ! निजवारे ! तिच्या मांडीवर मला - आटपा ! बसूं नका ! महत्त्वाकांक्षेची दारु ठासा ! - मनुष्याच्या हदयांत जोरानें दारु ठाशीत चला, कीं आज नाही उद्यां - लक्षावधी - कोट्यावधी वर्षानी ! - पण केव्हां तरी शेवटीं आपला - मनुष्याचा जय हा होणारच ! त्रिभुवनाला - प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धां आपण जिंकणार ! त्याला आपलें कौतुक करायला लावणार ! एवढ्याचकरितं तर - अहा ! किती सोसाट्याचें व मजेदार वादळ हें ! यः कश्चित् धुळीचे कण ! पण पहा कसें यांच्यांत महत्त्वाकांक्षेचें वारें संचारलें आहे ! - आल्पस ? सगळें जग थरारुन कोसळून पडलें पाहिजे ! चला ! पुढें व्हा ! अरे जिवाची कल्पना एका क्षणांत जर जगाला काडकन् फोडून टाकते ! तर प्रत्यक्ष जिवानें खरोखर त्रिभुवन फोडून त्याचा चुराडा केलाच पाहिजे ! नाहीं तर जन्माला यायचं कशाला ? - हं ! अशा तोफांच्या गोळ्यांचा पर्वत जरी या नेपोलिअनवर - पकडा ! चालूं द्या ! या चवताळलेल्या जगावर निकरानें हल्ला करा ! स्टिंगेल ! डिसेबस ! मेसिना ! शाबास ! अस्सें ! जोरानें ठोसे मारा ! पेटूं द्या ! सगळें आंग पेटलें तरी - ओरडा ! जयजयकार ! फ्रान्सचा जयजयकार ! फ्रान्स ! फ्रान्स ! - सैन्य ! - माझें सैन्य ! - जोजफीन ! ....

निवडणुकीनंतरचा प्रचार

बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे. .. कुठे कुठे फिरायला घेउन जायचा.

आणि आत्ता...कुठेच नाही नेत. 😔

नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पहिलय का.💕

मालवणी लव.,

पोरगी - तू माझो प्रियकर आसस ना..?

पोर्गो - होय आशय..

पोरगी - तर मग मका 1000 चो रिचार्ज मार,..

पोरगा - मी तुझा प्रियकर आशय Vodafone वाल्यान्चो जावीई नाय

लहान मासा.

दोघे मित्र संजय व विजय जेवायला हॉटेलमध्ये जेवायला जातात. जेवायला दोन मासे सांगतात. वेटर दोन मासे आणतो पण त्यातला एक लहान व एक मोठा असतो.
संजय : अरे घेना तु त्यातला एक.
विजय : नाही तुच अगोदर घे.
संजय त्यातला मोठा मासा घेतो.
विजय : तुझ्या जागी मी असतोना तर मी लहान मासा निवडला असता.
संजय : मला माहीत होत. म्हणुनच तर मी मोठा मासा घेतला.
सकाळ झाली.
गजरच्या आवाजाने रवीला जाग आली. पांघरुण बाजूला केलं. हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला. शेजारच्या टीपॉय वरील घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला.

टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या चुकल्यासरखे जाणवले. ते लक्षात आल्यावर तो ताड़दीशि उठला. त्याने टीपॉय च्या खालच्या कप्प्यातील पेपर मासिके काढली त्यांना झटकत त्याचा शोध चालु झाला.

तिथेही निराशा झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला त्या मागच्या फटित तर ती वस्तु नाही ना? मोबाइल ची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट,पलंगाच्या खाली  बघू लागला..

आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे ठोके वाढत चालले होते.
पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधु लागला. आता मात्र तो असहय झाला होता, त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटु लागले होते, तो कसविस झाला होता.
दरवाजाच्या मागे असणाऱ्या hanger ला असणारी पैंट अखेर त्याने हातात  घेतली आणि तिला तो
चापसु लागला. आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली.
त्याचा शोध आता संपला होता
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 रविला तंबाखू आणि चुना पुडी सापड़ली होती आणि आता तो समाधानाने संडासला जाणार होता

बायको : माझी एक अट आहे

नवरा : काय? 😳

बायको  : दिवाळीला तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाइल. 😍😆☺

नवरा : 😡 माझी पण एक अट आहे

बायको  : काय?  😏

नवरा : मी

घ्यायला आलो तेव्हाच परत यायच. 😜😝😊😂😛
मुलगा:- बोल तुला आज काय गिफ्ट देऊ???

मुलगी:- मला माझे 'बालपण' परत पाहिजे.....

मुलगा:- (बराच वेळ विचार करून)
            मी तुला 'बालपण'  नाही
           "बाळांतपण" देऊ शकतो..

पोरीनी पळु पळु हाणला....

"मला पावसात रडायला आवडतं, कारण माझे अश्रु कुणालाही दिसणार नाहीत"



आसं स्टेटस टाकणारी  भिकारचोट मूलं स्विमिंग पुल मधे मूततात

संस्कृत ते मराठी भाषांतर :-

मास्तर :
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
बंड्या याचा अर्थ सांग?

बंड्या:

करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते,
कदाचित तिला फळ घ्यायचे असतील  !

 मास्तर कोमात

 😛😂😂😂😆
 गुरूजी :

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय ?

बंड्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !

😜😝😎

गुरूजी : मुर्खा....बरं आता सांग...
"दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा" याचा अर्थ काय ?

बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला... जनका... तुझी मजा आहे !

मास्तर सैरा वैरा पळत आहेत
😂😝😜😆
 गुरूजी- बंड्या, याचा अर्थ सांग
" हे पार्थ त्वया चापि मम चापि...!"

बंड्या - हे अर्जुना, तू (शांतपणे) चहा पी, मी पण पितो.

गुरुजींनी चहा कायमचाच सोडला 
😀😀😛😛😂😂

"आता तुझा नंबर !"

एक सुदर मुलगी वयात आलेली असते पण तिचे लग्न जमत नसते . गावात कोणाचे लग्न झाले की शेजारची आजी तिचे गाल ओढायची आणि  म्हणायची , "आता तुझा नंबर ! ". मुलगी ते शब्द एेकुन

वैताकायची पण गप बसायची . एकदा ती आपल्या अॅडमिनला भेटली व आपली व्यथा सांगितली. अॅडमीन म्हणाला लग्न ठरत नाही याचे वाईट वाटते की म्हातारी चिडवतेया त्याचे ?

ती म्हणाली -  म्हातारी चिडवतेय याचे.
आपल्या अॅडमिनने तिला एक युक्ती सांगितली  आणि काय आश्चर्य म्हातारी मुलीला चिडवायची बंद झाली . काय उपाय असेल बरे ?
?
?
?
?
?
?
?
?
नका लय विचार करु . अॅडमिनने मुलीला सांगितले गावातिल कुणीही वारले की म्हातारीचे गाल पकडायचे आणि म्हणायचे , "आता तुझा नंबर !" 
मी स्मार्ट फोनला, त्याच दिवशी स्मार्ट म्हणेल
जेह्वा मी ओरडेल - माया फ़ोन कुठ गेला बे..

आणि फोन आवाज देईल -
अबे चादरी खाली हाय न मी भयताडा.
बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले
.
.
त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला!
.
.
.
.

.
आमच्या वेळेला जर असे असते तर आज..३-४ बंगले, ३-४ कार, १०-२० एकर जमिनीचा मालक असतो....
.
लय बेदम मारायचे राव मास्तर...

एकदा पाटील  मित्रासोबत गाडीने 🚘 पिकनीकला जात होते

गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते 😟 तरी सुध्दा आपला पाटील  अगदी सफाईदार पणे  गाडी खड्डे चुकवित  चालवत होता.

मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले: पाटील   गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय  चालवता? "

पाटील  : काय सांगू? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले 1760...☺

मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय?😣😠

पाटील   :तेच तर सांगतोय😜, चष्मे बनवून मी हैराण झालो

म्हणून........
.
.
गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची  बसवली..........

पाटलांचा नादचं खुळा होवू दे तोटा..पाटील हाए मोठा.
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😛😝😜😆😁😂😆😬😬😷😷

शिक्षक : मुलांनो सुई  टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
.
.

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.

मास्तरांनी 🏃कोरड्या विहिरीत उडी मारली....
😜😜😜😜😜😜😜😜😜

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....

गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
😆😆😆😆


पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....

.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......

.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .

..मास्तरांनी बदाबदा बडवला..
😛😛

गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

😳😳😳😛😛😛😛

आई :- "चिंटु लवकर आंघोळ करून घे,नाहीतर शाळा बुडेल..!"

चिंटु :- "आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?

आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

😂😂😂😂
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........

बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
बाईंनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
😂😂😂😂

भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर,

भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..


गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी-

एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
 😁😁 😝
मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का


मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. "." 👈 

घरगुती मानापमान

नवरा - हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस ना?

बायको - हो ना. सोळा सोमवार

करून तुमच्याशी लग्न झालं आणी माझा विश्वासच उडाला उपासांवरचा!
मास्तर-मुलांनो..'she was new Student an looking happy'
या वाक्याच मराठीत रुपांतर कारा..
.
.
.
.
.
.
 पोरगा-
कुन्या गावाच आल पाखरु..
बसलय डोलात आन
खुदू खुदू हसतय गालात!
.
.
मास्तर ढगात...

एकदा गण्याने मित्रांसाठी पार्टि करायचे ठरवले...🍖🍗
आणि पार्टि साठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐

त्यानी बकरा चोरला पण आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टि केली... 🍗🍖🐐
पण
सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय काय ?
बकरा जिवंत..🐐
आपल्या बायकोला त्याने विचारल :- हा बकरा इथे कसा..???

बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे सांगा रात्री

चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???
एका खेड्यात एका राजकीय पुढाऱ्याचं भाषण होतं.
पुढारी महाशय वीस-पंचवीस मैल जीपचा प्रवास करून सभेच्या जागी गेले . तर तिथे भाषण ऐकायला एकच शेतकरी होता.

त्याला पाहून पुढारी निराशेनं म्हणाला, "तू एकटाच तळमळीचा माणूस निघालास, पण आता मी भाषण करू की नको ?"
शेतकरी म्हणाला, "साहेब, माझ्या गोठ्यात वीस बैल आहेत.त्याना मी चारा दयायला गेलो आणि तिथं एकच बैल असला, तर बाकीचे एकोणीस बैल नाहीत म्हणून मी त्याला उपाशी ठेवायचं का ?"

त्याच्या या मार्मिक उत्तरावर पुढारी महाशय खुश झाले. त्यानी चांगले दीड तास भाषण ठोकून त्या एकुलत्या एक श्रोत्याला हैराण केलं. भाषण संपल्यावर पुढारी म्हणाले,

"तुझी बैलाची उपमा मला फार आवडली. माझं भाषण कसं झालं?"

शेतकरी म्हणाला,  "साहेब, एकोणीस बैल गैरहजर असले, म्हणून वीस बैलांचा चारा एका बैलाला घालु नये, एवढी अक्कल मला आहे, पण ती तुम्हाला नाही...!"

तात्पर्य :- शेतक-यांना मुर्ख समजू नये. शेवटी तो या जगाचा 'बाप' आहे.

स्त्री प्रवासी - कंडक्टर दिड टिकीट द्या

कंडक्टर - ते कसे?

स्त्री प्रवासी - माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे

कंडक्टर - तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील

स्त्री प्रवासी - ते कसे?

कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि तुम्ही दीड शहाण्या असे दोन फुल...

तात्पर्य - जगात कुठेही डोकं लावा पण S.T महामंडळ च्या कंडक्टर सोबत डोकं लावु नका.

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा


मकरसंक्रातीच्या शुभेच्छा


नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
बायको:- अहो ऐकले का ?
नवरा   :- काय ?
बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ?
नवरा    :-माझा नंबर दे.

काही घरगुती उपचार

👉 जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.

👉 जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.

👉 जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.

👉 घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.

👉 रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.

👉 हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल ...
बायकांची सरकारला विनंती

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे,

सहा  आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही .
पाटिल :- कटप्पा, येड्या  त्या बाहुबली ला का मारलंस..??



कटप्पा:- निम्मडा..गोजरास्स् थेल्लमी.. आरधा भाँस.. क्क् राकविकाना भुम्मले..म्चा...उणु कास्था बहाथ्हे..म्चा म्चा....



पाटिल:- मग बरोबर आहे तुझ..!!
चुकतो तो 'माणूस' ,
सुधारतो तो 'मोठा माणूस' ,
मान्य करतो तो 'देवमाणूस' ,

पण कलियुगात ......

पाणी पाजतो तो 'माणूस' ,
चहा पाजतो तो 'मोठा माणूस' ,
पाटीॅ देतो तो "देवमाणूस"...!!

पाहुणचार ..... नवीन पद्धत

हल्ली आमच्याकडे कुणी पाहुणे आले तर आम्ही चहापाण्याआधी  "मोबाईल चार्जींग ला लावायचा आहे का ?"असेच विचारतो.

पाहूण्यालाही भरुन आल्या सारखं होतं.

😜😜😜😜
आणि त्यावर  WI-FI 📡 चा पासवर्ड हवा आहे का??
असं विचारलं  तर मग पाहुणे आनंदाने रडायलाच लागतात 😂😂😂

खंडित आत्मा

वीराच्या लहानशा झोपडीत चिनी आपल्या खेळण्याशी खेळत होती. चिनीचे वय पाच वर्षांचे, केस विखुरलेले, फाटके कपडे अंगावर. तिचे तोंड मोहक होते. ते तिचे चिमणे वाटोळे लांब हात! लाकडी बाहुली, मातीची बोळकी ही तिची इस्टेट. खेळात रमली होती, बाहेर ऊन मी म्हणत होते. रस्त्यावर चिटपाखरूही नाही. एखादी स्त्री डोक्यावर मडके घेऊन पाण्याला जाताना मधून दिसे. चिनीची आई विहिरीवर गेली होती. तेथे अपार गर्दी. झोपडीपासून अर्धा मैल तरी ती विहीर लांब होती. दरवर्षी उन्हाळयात पाण्याचा दुष्काळ असे. यावर्षी तर आधीच अवर्षण! चिनीची आई विहिरीवर दोन तास बसली तेव्हा कोठे नंबर लागला. घरी मुलीला तहान लागली होती. या मडक्यात बघे, त्या मडक्यात बघे. पाणी नाही. पुन्हा खेळात ती रमली.

इतक्यात तीचा बाप वीरा घरी आला.
''बाबा, पाणी द्या.'' ती म्हणाली.
त्याने तिला जवळ घेतले.
''अजून विहिरीवरून नाही आई आली. कोठे गेली आई?''
तिने विचारले.
''बसली असेल गप्पा मारीत. पोर तहानेने मरत आहे. तिला काय चिंता?'' बाप म्हणाला.

वीरा मोठा शौकीन प्राणी. काळा सावळा सुंदर दिसे. चाळीस वर्षाची उमर तरी तरुण वाटे. त्याचे डोळे सर्वांना आकर्षून घेत. सफेद पेहरण आणि धोतर हा त्याचा पोषाख. पायात चप्पल. त्याचा धंदा चुना तयार करण्याचा. परंतु त्याची पत्नीच ते सारे काम करी. तो मजा मारी. सिध्दाप्पा म्हणून त्याचा एक व्यापारी मित्र होता. सिध्दाप्पा श्रीमंत होता, तरुण होता. तो व्यसनात बुडाला होता. दारू, जुगार इत्यादि विलासात तो मग्न. तरीहि सिध्दाप्पा अब्रूदार मानला जाई. कारण त्याच्याजवळ लक्ष्मी होती. त्याच्या अनेक फंदात वीरा त्याला मदत करी. त्यामुळे सिध्दाप्पा त्याला पैसे पण देई. गरीब लोकात वीराचा दरारा होता. काही बरे वाईट झाले तर सिध्दाप्पा वीराला वाचविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांना वाटे.

वीराचे कुटुंब तीन माणसांचे. तो, त्याची नीलम आणि मुलगी चिनी. चिनीप्रमाणे साखरेप्रमाणेच ती मुलगी गोड होती. नीलमचे वय चौतीस एक वर्षांचे असेल. तोंड सुकलेले, डोळे खोल गेलेले. तोंडावर चिंता नि काळजी. यंत्राप्रमाणे तिचे जीवन चालले होते. चुलीवर काय असेल ते शिजत ठेऊन ती टेकडीवर जाई. चुनखडीचे दगड गोळा करून आणी. दुपारी वीराला ती जेवण वाढी. मुलीला देई. उरेल ते स्वत: खाई. नंतर भट्टी पेटवून ती पाणी आणायला जाई. सायंकाळी जेवण गोळा करायला वणवण हिंडे. अंधार पडल्यावर काटक्या कुटक्या घेऊन घरी येई. रसोयी करी. नव-याला, मुलीला जेवण देई. मग स्वत: खाई. भांडी घाशी. निजायला बारा वाजत. पुन्हा पहाटे उठे. तिची आजी, तिची आई, सा-यांना असेच काम करताना तिने पाहिले होते. आजूबाजूच्या स्त्रियांचे हेच जीवन-काम करीत मरणे हेच स्त्रियांचे जीवन अशीच तिची समजूत झाली होती. पतीसाठी नि मुलींसाठी सतत कष्ट करणारी नीलम म्हणजे करुणामूर्ती होती. चुनखडीचे दगड आणणे, भट्टीत जाळणे, बाजारात विकणे, घरची रसोयी, पाणी उदक, सारे तिलाच करावे लागे. पतीला तीच धोतरे घेऊन देई, मुलीला परकर पोलके तीच करी. स्वत:ची साडी तीच आणी. एवढे सारे करूनही पतीची मर्जी गेली तर पाठीत काठी बसे.

वीरा उद्योगहीन माणूस. ताडीचा वेडा. कोठे नाटक, तमाशा असला म्हणजे जायचा. सरकस आली, रामलीला आली तर पहिल्या रांगेत जाऊन बसेल. लोकांना आश्चर्य वाटे की याची चैन चालते तरी कशी. पत्नीच्या श्रमांतून नि अश्रूंतून ती चैन फुलत होती.

नीलम मडके घेऊन आली. वीराने पाहिले. वादळ होणार नीलमने ओळखले.

''इतका वेळ होतीस कुठे? ही पोर पाण्यासाठी मरत आहे. आणि तू विहिरीवर गप्पा मारीत बसलीस? घरात पाण्याचा टाक नाही. आम्ही मेलो तरी तुला काय पर्वा?'' तो बोलतच होता.

नीलम शांत होती. तिने चिनीला पाणी दिले. ती पोर गेली पुन्हा खेळायला. वीराला तिने जेवण वाढले. आज शेजारच्या गावात यात्रा होती. त्याच्याजवळ पैसे नव्हते. चिनीच्या अंगावर फाटके कपडे होते.

वीरा म्हणाला,
''थोडे पैसे दे. चिनीच्या अंगावर नुसत्या चिंध्या. यात्रेतून नवीन कपडे आणीन.''

''चिनीचे कपडे मी शिवीन.'' ती म्हणाली.

वीरा रागावला. इतक्यांत चिनी रडत येऊन म्हणाली.

''बाबा, मला नवीन आणा परकर पोलकं. आणाल ना?''

''ही पोर रडते आहे. दे ना चार रुपये. तुला का पोरीच्या डोळयांतील पाणी दिसत नाही?''

नीलमने चार रुपये काढून त्याला दिले. चिनी पित्याबरोबर जायला निघाली. ती रडू लागली. नीलम पतीला म्हणाली,

''घरीच रहा ना. मी चुनखडीचे दगड आणायला जात आहे.''

टोपली घेऊन नीलम गेली. आणि वीरा कोठला घरी राहयला? तोही पसार झाला. चिनी रडत होती. शेवटी बाहुलीशी खेळत बसली. आणि तेथे झोपली.

आता संध्याकाळ झाली. चिनी उठली. पुन्हा खेळू लागली. आईही घरी आली. मुलीला एकटी खेळताना पाहून मातेचे हृदय भरून आले. मुलीजवळ खेळांतली जातुली होती. चिनी त्या जातुलीला फिरवीत होती. आणि ओव्या म्हणत होती,
''स्त्रियांचा हा जन्म
नको देऊ सख्या हरी
रात्रंदिवस जन्मभर
परक्याची ताबेदारी॥
स्त्रियांचा हा जन्म
देव घालून चूकला
रात्रंदिवस जन्मभर
बैल घाण्याला जुंपला॥''

चिनीनें कोठे ऐकल्या होत्या त्या ओव्या? त्या ओव्या नीलमच दळताना म्हणत असेल. शेजारच्या बायका म्हणत असतील. त्या ओव्या ऐकत नीलम खिडकीजवळ उभी होती. तिला आपले सारे आयुष्य त्या ओव्यांत दिसत होते. तिची हृदयवीणा वाजू लागली. नाना विचारांचे ध्वनी ऐकू येऊ लागले. फुकट, स्त्रियांचे जीवन फुकट, असे तिचे मन म्हणत होते. आणि माझी ही गोड चिनी! तिच्या जीवनाची हीच दशा व्हायची. याच वेदना, हेच कष्ट तिलाही पुढे भोगणे प्राप्त.

ती निरोशने म्हणाली, ''हरे राम! आपण कशाला जन्मलो? वीराच्या हातची रोज मारझोड!''

ती एकच प्रार्थना करी, ''प्रभो, मी ज्या यातना भोगीत आहे त्या चिनीला भोगाव्या न लागोत.''
नीलमने चुलीवर काही शिजत ठेवले. ती दारात उभी होती. आपण आणखी कोठेतरी थोडे पैसे ठेवल्याची तिला आठवण झाली. सापडली पुरचंडी. थोडे पैसे घेऊन ती बाजारात गेली. तिने स्वत:ला एक साडी आणली. ती घरी आली. चिनीचे फाटके कपडे शिवित बसली. चिनी बापाची वाट पहात होती. तो नवीन कपडे आणणार होता. परंतु वाट पाहून ती झोपली.

मध्यरात्र होत आली. नीलम वीराची वाट पहात होती. दारांतून दूरवर पाही. शेवटी अंधारात झुकांडया खात कोणी येताना तिला दिसले. वीराच तो. नीलमने जेवायला वाढले. वीराने डोक्यावरचा रुमाल फेकला. त्याचे लक्ष एकदम साडीकडे गेले. ती हातात घेऊन म्हणाला,

''केव्हा आणलीस?''
'आजच.''
''किती पैसे पडले?''
'चार रुपये.''
वीराच्या डोळयांत जंगली क्रूरपणा चढला.

''तो पलीकडचा हॉटेलवाला पैसे दिल्याशिवाय मला सोडीत नव्हता. आणि तू नवीन साडी आणतेस! तुझ्याजवळ पैसे आहेत. लपवून ठेवतेस,'' असे बोलून त्याने तिच्या फाडकन तोंडात मारली.

वीराच्या तोंडाला घाण येत होती. चार रुपये दारूत उडवून तो आला होता. त्याची तार आणखी चढत होती.

''मुसमुसु नकोस. ओरडू नकोस,'' असे म्हणून कोप-यातले लाकूड त्याने उचलले. नीलमच्या डोक्यावर त्याने हाणले, पाठीवर मारले. नीलम खाली पडली. त्याने तडाखे हाणले. इतक्यात चिनी उठली. तिने विचारले,

''बाबा, माझे परकर पोलके?''

तो काही बोलला नाही. चिनी बापाजवळ जाऊन रडू लागली. त्याने तिच्या एक थोबाडीत मारली. आणि घराबाहेर निघून गेला. दुर्गादेवीच्या देवळात झोपण्यासाठी एक चादर घेऊन गेला.

नीलम उठली. तिने चिनीला जवळ घेतले. तिच्या केसांवरून हात फिरवीत होती.

''रडू नको हं. तुझ्यासाठी परकर पोलके उद्या मी आणीन हं. उगी, उगी.''

आईच्या मांडीवर चिनी होती. ती आईच्या तोंडाकडे पहात होती. आईच्या डोळयांतील अश्रू तिला बघवत ना. इतक्यात चिनीच्या गालावर एक थेंब पडला! रक्ताचा थेंब. नीलमने तो पटकन पुसला. तिने आपल्या केसांत बोट फिरवले. डोक्यातून रक्त येत होते. नीलम मनात म्हणाली, ''हे भगवान, तू मला स्त्रीचा जन्म कशाला दिलास?''

नीलम दूरच्या भविष्याकडे बघत होती. आणि या चिनीचेही असेच होईल का? असे मनात येऊन तिचे डोळे भरून आले. चिनीच्या तोंडावर ते दयेचे, सहानुभूतीचे, वात्सल्याचे अश्रू पडले.
''आई, तू रडतेस, कां रडतेस?'' चिनीने विचारले.

त्या खोलीत मंद प्रकाश होता. एक माता मुलीच्या केसावरून हात फिरवीत होती. काय होते तिच्या मनात? त्या मुलीच्या केसातून ती आपली बोटे प्रेमाने का फिरवीत होती?

प्रा. सदाशिव वोडीयार यांच्या गोष्टीवरून

आत्म्याची हाक

प्रभाकरने आपल्यापुढे करियरीस्ट हाण्याचे ध्येय कधीच ठेवले नव्हते. त्याचे नाव यामुळे पहिल्या दहा किंवा पाचात कधी झळकले नव्हते. परंतु हायस्कूलपासून तो एक आनंदी परंतु तत्त्वनिष्ठ मुलगा म्हणून सर्वांना ठाऊक होता. देशप्रेम, समाजसुधारणेविषयी आस्था आणि समाजातील अन्याय, विषमता यामुळे त्याचे रक्त उसळे. यामुळेच तो विद्यार्थी जीवनातही अनेक चळवळींत भाग घेत असे. त्याच्या वक्तृत्वांत आणि लेखनात एकप्रकारची धार असे. कॉलेजात गेल्यावर त्याला थोडे व्यापक क्षेत्र मिळाले. त्याच्या बहुमुखी प्रतिभेला मोठे क्षेत्र मिळाले. कॉलेजच्या आवाराबाहेरही प्रभाकर दिसू लागला. वृत्तपत्रांतून त्योच लेख मधून मधून झळकू लागले. त्याला सर्वांत चीड कसली असेल तर सर्वत्र बोकाळलेल्या दांभिकतेची. धर्मात, राजकारणात, एवढेच नव्हे तर शिक्षणक्षेत्रांतही दांभिकता पाहून त्याला वाईट वाटे आणि त्याचा आत्मा बंड करून उठे. समाजाच्या दु:खाचे सर्वांत मूळ कारण म्हणजे दांभिकता असे तो म्हणे आणि समाजाला जर थोडे अधिक सुख मिळवून द्यावयाचे असेल तर ही दांभिकतेची प्रतिष्ठा समाजातून नाहीशी केली पाहिजे असे त्याचे म्हणणे. त्याच्या ह्या नवविचाराने तो कोठल्याच चौकटीत बसत नव्हता.

आपली कॉलेजची चार वर्षे त्याने पुरी केली. घरची गरिबी होती. प्रभारची चार वर्षे कधी पूर्ण होतात याकडे त्याचे वडील डोळे लावून होते. प्रभाकर परीक्षा देऊन घरी आला. वडिलांच्या त्याच्याबद्दल मोठमोठया अपेक्षा होत्या. तो मोठा पगारदार अधिकारी होईल असे त्यांना वाटे. तो परत आला आणि त्यांनी त्याच्यामागे नोकरीचे टुमणे लावले. निकाल लागेपर्यंत थांबायलाही ते तयार नव्हते. त्यांच्या आग्रहाला कंटाळून मग प्रभाकर एकाद दुसरा अर्ज रोज पाठवी. अर्ज पाठविताना त्याच्या मनाला वेदना होत. आपण कॉलेजात समजत होतो तितका जीवनसंग्राम सोपा नाही हे त्याला दिसले. अर्ज करता करता त्याचा रिझल्ट लागला. तो पास झाला. परंतु त्याच्या अर्जाला समाधानकारक उत्तर कोठेच नव्हते. त्याच्याबरोबर मॅट्रिकला बसलेली मुले कुठे कुठे चिकटली होती. वरच्या जागा काहींना मिळाल्या होत्या. काहींनी मायाही बरीच जमा केली होती. प्रभाकरच्या वडिलांच्या समोर ही दृश्ये दिसत.
प्रभाकरच्या निकालाच्याच दिवशी वर्तमानपत्रात एक जाहिरात होती. संपादकाच्या जागेसाठी अर्ज मागविले होते. 'नवसमाज' मासिक निघायचे होते. संपादकाला तीनशे रुपये पगार मिळावयाचा होता. प्रभाकरने अर्ज केला. त्याच्या डोळयांसमोर 'नवसमाज'चे आपण संपादक झाल्याची दृश्ये तरळू लागली. परंतु मनात वाटे, ''माझ्यापेक्षा कितीतरी अनुभवी लोकांचे अर्ज येतील. तीनशे रुपये पगार म्हणजे मामुली गोष्ट नव्हे. कसची आपल्याला ती जागा मिळते.'' आणि जेव्हा पंधरा दिवस वाट पाहून उत्तर आले नाही तेव्हा तर तो निराशच झाला. पुन्हा दुस-या जाहिरातील शोधू लागला.

पण इतक्यात एक तारवाला आला. 'नवसमाज'चे मालक दीनदयालजी यांची तार होती. आणि प्रभाकरला भेटीसाठी पाचारण केले होते. प्रभाकर लगेच निघाला. जाताना गाडीत त्याने 'नवसमाज' कसे सजवायचे, कोणती सदरे द्यायची, याचा आराखडा तयार केला. सहज एका कागदावर त्याने लिहिले प्रभाकर भारती, बी.ए. संपादक नवसमाज. तो कागद हातात खेळवीत होता. पण मग लाज वाटली. अजून कशाला पत्ता नाही. जर कोणी आपल्याला पाहिले तर काय म्हणेल! त्याने तो कागद लगेच खिशात कोंबला. त्याचे उतरायचे स्टेशन आले. दीनदयालजींचा मनुष्य स्टेशनवर आला होताच. प्रभाकरला त्याने लगेच हुडकून काढले. घरी जाताच दीनदयालजींची मुलाखत झाली. म्हणाले, ''तुमचा स्पष्टवक्तेपणा मला आवडला. इतरांनी अर्जात समाजसेवेची इच्छा आहे वगैरे हजार भानगडी लिहिल्या. पण तुम्ही स्पष्ट लिहिले की, मला नोकरीची गरज आहे. समाजसेवा नोकरी करताना करता आली तर हवी आहे. तुमची कात्रणे पाहिली. चांगले लिहिता तुम्ही. तुमच्या लेखणीत जोश आहे.''

''तसे काही नाही. आपली कृपा आहे.''

''मी उगाच स्तुति नाही करीत. तुम्हीच नवसमाज सांभाळा. पहिला अंक कधी काढायचा? आज आहे जुलैची पहिली तारीख.''

''१५ ऑगस्टला काढू. स्वातंत्र्य दिनापासून 'नवसमाज' सुरू होऊ दे.''

''ठीक. पण जमेल एवढयांत?''
प्रभाकरची निवड झाली. प्रभाकर कंबर बांधून कामाला लागला. १५ ऑगस्टला नवसमाजाचा पहिला अंक निघाला आणि वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या त्याच्यावर. लेख, गोष्टी, कविता उच्च प्रकारच्या आणि मुखपृष्ठ सुरेख आणि अंतरंगाची कल्पना देणारे होते. वृत्तपत्रांतून उत्कृष्ट अभिप्राय आले. एकजात सर्वांनी 'नवसमाज'ची पाठ थोपटली होती. दीनदयालजीही खूश होते. अंक एकापेक्षा एक सरस निघत होते.

सात आठ अंक निघाले असतील नसतील. गावात नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली. दीनदयालजी उभे राहिले. त्यांच्या विरूध्द एक पेन्शनर हेडमास्तर उभे होते. हे हेडमास्तर फार लोकप्रिय होते. समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रांत अग्रभागी असत. गावातले कुठलेही सेवाकार्य असो तेथे ते असायचेच.

आणि एक दिवस निवडणुकीनिमित्त सभा झाली. म्युनिसिपल निवडणूक हा विषय होता. प्रभाकर बोलणार होता. लोकांची अफाट गर्दी झाली. प्रभाकरचे प्रवाही आणि प्रभावी भाषण सुरू झाले. कॉलेजमधला दांभिकतेविरूध्दचा सारा जोश त्याच्या अंगात संचारला. म्हणाला, ''नगरपालिका सुधारल्यावाचून स्वराज्य झोपडयांपर्यंत पोचणार नाही. सर्व लोभ, भय सोडून त्यागी समाजसेवकांना निवडून देण्याची हिम्मत मतदारांनी बाळगल्यावाचून नगरपालिका कशा सुधारणार? उद्याच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी दाखविले पाहिजे की, खरे खोटे तुम्ही ओळखता. आपला हितकर्ता कोण ते तुम्हांला समजते. तुम्ही मते कोणाला देणार? तुमच्या सेवेसाठी अखंड तळमळणा-या ह्या हेडमास्तरांना - ज्यांनी लोकशिक्षणाचे कार्य सतत तीस वर्षे केले आहे त्यांना, की केवळ पैसा आहे म्हणून नगरपालिकेचे राजकारण करू पाहणा-या दीनदयालजींना?''

प्रभाकरच्या वक्तृत्वाचा परिणाम जनतेवर झाला आणि दीनदयालजींवरही. दुस-या दिवशी दीनदयालजींनी त्याला बोलाविले व सभेतील भाषणाविषयी विचारले.

ते म्हणाले, ''मी तुमचे काय घोडे मारले होते माझ्याविरूध्द प्रचार केलात!''

''मी नोकरी पत्करली म्हणजे माझी मते विकलीत असे नाही. मला जे खरे वाटेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.''
एवढे बोलून तो तडक घरी आला आणि त्याने राजीनामा पाठवून दिला. तसे न करण्याबद्दल त्याला अनेकांनी सल्ला दिला. हेडमास्तर तर म्हणाले, ''मी आपले नावच मागे घेतो.'' पण प्रभाकरने निश्चय पार पाडला. ज्या स्पष्टवक्तेपणामुळे तो संपादक झाला त्यामुळेच त्याला नोकरी सोडावी लागली.

निवडणुका झाल्या. शेटजींना विजयाची खात्री वाटत होती. आपल्या पैशाचा आणि पुढे पुढे करणा-यांचा त्यांना फार भरवसा होता. पण निवडणुकीत हेडमास्तर निवडून आले. इकडे प्रभाकर राजीनामा देऊन बाहर पडला. त्याला त्याच्याजोगती नोकरी मिळाली नाही. शेवटी तो आपल्या गावी आला. एक छोटेसे दुकान त्याने घातले पण व्यापारी कौशल्य त्याच्यात नव्हते. दुकानातून घरखर्च चालत नसे. शेतीवाडीतही प्रभाकर लक्ष घाली. त्याचे जीवन कसे तरी चालले होते. लोक त्याच्याबद्दल हळहळत होते.

आणि एकदिवस त्याच्या त्या खेडयांतल्या दुकानापुढे एक मोटर उभी राहिले. दीनदयालजींनी विचारले, ''कसे काय चालले आहे दुकान?''

प्रभाकरला वाटले जखमेवर मीठ चोळण्यासाठी हे आले आहेत. चांगले चालले आहे, द्यावे दडपून असा विचारही डोकावून गेला. पण त्याने स्वत:ला सावरले. म्हणाला, ''कसा तरी संसार रेटतो आहे.''

दीनदयालजींनी प्रभाकरला मिठी मारली. ते म्हणाले, ''जीवनाशी खरा प्रामाणिक आहेस. 'नवसमाज' तुझ्यावाचून पोरका आहे. आजही उत्तम साहित्य त्यात आहे. पण ते तेज आज तेथे नाही, आत्मा तेथे नाही. तूच 'नवसमाज' सांभाळ. आत्म्याची हाक ऐकणारा प्रामाणिक, निर्दंभ मनुष्य तू आहेस. 'नवसमाज' चालवायला तूच लायक. माझी चूक झाली. तुझी आत्म्याची हाक दडपून टाकायला मी चुकीने सांगत होतो. तू आपल्या आत्म्याच्या हाकेचा अपमान केला नाहीस. 'नवसमाजा'ला तू लायक आहेस. माझ्या विनंतीचा अव्हेर करू नकोस.''

दुस-या महिन्यापासून पुन्हा प्रभाकरच्या संपादकात्वाखाली 'नवसमाज' निघू लागला.

मेंग चियांग - एक चिनी लोककथा

चीनमध्ये लूपू राजा होता. त्याचे मोठे उद्योग, अचाट आणि विचित्र! मानवी हृदयावर न कोरलेल्या गोष्टी विसरल्या जातात! परंतु घोर पापांच्या कथा, त्या कोण विसरेल? त्या युगानुयुग चालत येतात. शापित अशा कथा.

लूपूने साम्राज्य वाढविले आणि संरक्षणासाठी उत्तरेकडे भिंत बांधायचे ठरविले. भिंतीजवळ हाडांच्या राशी पडत आहेत. दृश्य बघून लोकांच्या अंगावर काटा येत आहे. सर्वत्र जुलूम आणि भीति! आकाश रडू लागले, भूमाता रडू लागली. ग्रंथ जाण्यात येत आहेत, पंडितांना ठार करण्यात येत आहे, जिवंत पुरण्यात येत आहे. कायदा नाही, नीतिनियम नाही. धर्म सारा लोपला.

मेंग चियांग  निघाली. ती पतिव्रता सती. तिचा पती कामाला सक्तीने नेण्यात आला. ती रडत बसे. किती कृश झाली आहे बघा. गाल खोल गेले. डोळे निस्तेज. अरेरे. तिचे लक्ष उत्तरेकडे आहे. तेथे कडक हिवाळा आहे! माझा पति! पुस्तकांत रमणारा. नाजुक, सुकुमार! त्याच्याने दगडधोंडे विटा कशा उचलल्या जातील? कोण त्याची कींव करील? कठोर अधिकारी हुकुम सोडीत असतील, वादीचे चाबूक कडाड् उडवित असतील. हे का त्याच्या नशिबी असावे? हे घर स्मशान वाटते. कशी येथे राहू? किती वाट पाहू? हृदय दुभंगते. मी त्याला शोधायला जाणार, भेटायला जाणार! दहा हजार मैल का असेना अंतर! मी जाईन.

ती निघाली. ती कोमलांगी, कृशांगी निघाली. शरीराने दुबळी परंतु आत्मा वज्राचा होता. साधे सुती लुगडे ती नेसली होती. ना अलंकार ना काही. तिचे ते सौंदर्य हाच तिचा दागिना. सौंदर्याचा प्रकाश फेकीत वा-यांतून, वादळांतून, पावसांतून ती निघाली. जवळच्या गाठोडयात काय आहे? पतीसाठी हाताने तयार करून आणलेले गरम कपडे! उत्तरेकडे चावरी थंडी आहे. जात होती. वाटेत नद्या लागत आहेत. दिवस मावळत आहे. गायीगुरे घरी येत आहेत. चूल पेटत आहे, परंतु ती? तिला विसांवा नाही. अनन्त पृथ्वी, अनन्त आकाश! एकटी, हो एकटी. जा एकटीच रडत, अश्रूंचे सडे घालीत. पावले उचलत नाहीत. थकली बिचारी. पदर चिखलात पडत आहे; तिला भान नाही. ओचा सुटला; कळत नाही. ते उघडे हात थंडीने हिरवे निळे झाले.

जातांना तो म्हणाला होता, ''मी परत येईन काय भरवसा? राजाचा हुकुम! कोणी मोडायचा? आता एका उशीवर डोकी ठेवून आपण पाखरांच्या जोडप्यांप्रमाणे पुन्हा प्रेमाने पडणार नाही. प्रिय सखी, पतिव्रते, खोटे स्वप्न मनात नको खेळवू. मनात आशा नको. पुन्हा परत येणे कठिण आहे.''

नाथ, त्या शब्दांत करुणा होती. तुम्ही का माझा मार्ग मोकळा करून जात होता? आपले वैवाहिक जीवन का विसरलात? मासा आणि पाणी तसे आपले एकत्र जीवन. माझे हृदय शुध्द आहे. पातिव्रत्य हेच माझे बळ. मायबापांची शिकवण का विसरू? मी येणार तुझ्या पाठोपाठ, येणार भेटायला, तुला गरम कपडे द्यायला. तुला मदत करायला, दहा हजार मैल अंतर असले म्हणून काय झाले?

दु:खाने ती दग्ध झाली होती. जरा काही सळसळले तरी घाबरे. आज थंड चावरे वारे वहात आहेत. कावळे चालले घरटयांकडे. ही कोठे जाणार? घंटांचा आवाज येत आहे. मिण मिण दिवा दूरचा दिसत आहे. गाव आहे जवळ? गाव नव्हता. त्या जंगलात ते देऊळ होते. त्या लहानशा देवळात ती बसली. देवासमोर अश्रू ढाळित बसली, ''देवा, अश्रूंनी तुझे मंदिर मलिन करित आहे म्हणून रागावू नको. मुलीला क्षमा कर. मी दुर्दैवी आहे. थंडीवा-यात तुझ्या पायी निवारा; उबारा.''

तेथे जागा झाडून दात शिवशिवत ती झोपली. कोठली झोप? तिच्या फाटक्या वस्त्रांतून वारा घुसत ओता. ती गारठली. आकाशात अष्टमीचा चंद्र मावळत होता. ती देवाला म्हणाली, ''देवा, माझ्या पतीला स्वप्न पाड. मी गरम कपडे घेऊन येत आहे. सांग, त्याला धीर येईल. माझ्या दया कर. वीस वर्षेहि माझ्या वयाला नाहीत! लहान मी. परंतु जाईन त्याला शोधीत.''

गालांवरून अश्रु घळघळले. ती पुन्हा जुडी करून पडली. स्वप्नात अस्थिपंजर पतीला ती बघते.

''कशाला तू आलीस?'' तो म्हणतो.

''नाथ, या, या,'' असे म्हणत त्याला ती हृदयाशीं धरू बघते, तुम्हांला ऊब देतें म्हणते.

बाहेर सों, सों वारा करतो. तिला जाग येते. अनंत तारे चमचम करीत असतात. सभोवती पृथ्वी धुक्यांत वेढलेली. हे स्वप्न दुर्दैवाचे सूचक का? तो नाही भेटणार?

तो स्वप्नात म्हणाला, ''माझी मूठभर हाडे, माझी माती, हीच तुझ्या अनंत श्रमांची भरपाई, दुसरे काय  तुला मिळणार?''

माझे विचार भरकटत गेले असतील. ते स्वप्न प्रचंड नद्या नि उंच पर्वत यांवरून येत होते. त्यामुळे ते अस्ताव्यस्त झाले असावे. मी का त्याला मातीच्या खाली पाहीन? हे का माझ्या नशिबी असेल? निदान त्याच्याजवळ मीहि पडेन. हें का कमी?

उजाडले. धुके पडून सारे ओलसर आहे. कावळे हिंडू फिरू लागले. देवाला नमस्कारून ती निघाली. हृदयांत आशा-निराशा. म्हणाली, ''किती संकटे असोत, कष्ट असोत, पतिपत्नीचे ऐक्य - त्याची कसोटी आहे.''

दंवाने तिचे वक्ष:स्थळ ओले झाले आहे आणि अश्रुंनीही. कठोर वारा तिला मिठी मारीत आहे. ती थरथरत आहे. पतीला हांक मारून म्हणते, ''कोठल्या बाजूला वळू, कोठें तुला पाहूं? कधी पुन्हा माझ्या केसांत फुलें घालशील? माझ्या कानांत कर्णफुलें घालशील? आपण रात्री चांदण्यांत फुलबागेत सारंगी वाजवित होतों. उत्तरेच्या भिंतीकडे मी येत आहे. भेटशील का? पुन्हा घरी जाऊन आपण सायंकाळचे जेवण करू का? जिन्यांतून दोघे बरोबर जाऊं का? नाथ, पूर्वजन्मी आपले काय पाप घडले कीं हें भोगायला लागावें? तळवे फाटले रे. सुकलेल्या फुलागत माझी दशा.'' वाटेंत कधी प्रचंड जंगले, प्रचंड वाळवंटे, प्रचंड नद्या, प्रचंड दर्या. कधी रस्ता नसे. कधी चार पावलें उमटलेलीं दिसत. कधीं झोपडी आढळे. कुत्रा भुंके. कोंबडा आरवतांना कानावर येई. कधी रस्त्यांत खानावळ लागे. तेथे चार घांस खाई. तिच्याकडून बघून खानावळवाला म्हणे, ''थोरा मोठयांची दिसते. दृष्टीत दु:ख आहे. परंतु किती सुंदर आहे ही नाही?''
त्याची बायको तिला विचारी, ''बाई कोठून आल्यात, कोठे जायचे?''

तिचे अश्रू धावत येत. हुंदका आवरून म्हणे, ''भिंत, उत्तरेकडची प्रचंड भिंत! वेठीला धरून माझ्या पतीला त्यांनी ओढीत नेले. त्याला भेटायला जाते. हे गरम कपडे घेऊन थंडीवा-यांतून जात आहे. घरी रडत बसण्यापेक्षा हा दु:खदायक प्रवास बरा. त्याला शोधीत जात आहे. त्याला पाहीन नि शान्त होईन.''

''वेडी तर नाहीस तू मुली? शेकडो हजारो मैल कशी चालत जाशील? थंडीचा कडाका. वाटेत वाटमारे, डाकू, तू सुंदर आहेस. तेच तर भय. नको जाऊ. हे तुझे सुकुमार पाय.''

''सर्व नात्यांत पतिपत्नींचें नातें श्रेष्ठ. सर्व संकटांची मला जाणीव आहे. परंतु माझे वेडे हृदय. त्याला पाहिल्याशिवाय विसावणार नाही. परत नाही फिरायचे या निश्चयाने मी निघाले आहे. मग आमची भेट धरित्रीच्या पोटात व्हायची असेल तरी तेथे होवो.''

ती म्हातारी खानावळी बाई म्हणते, ''मुली; तूं एकटी मी येऊ का सोबतीला? एकीपेक्षां दोघी ब-या. हा थकलेला देह येऊ दे का तुझ्या संगे?''

''नको आजीबाई नको. तुम्ही प्रेम दिलेत, दया दाखवलीत. तुमच्या मरणाला का मी कारणीभूत होऊं? शिवशिव. नाही आजी, ते बरे नाही. तुम्ही मला आईचे प्रेम दिलेत. पति भेटल्यावर परतेन तेव्हा तुमचे ऋण फेडीन हो.''

आजीबाई आणि मेंग चियांग कितीतरी वेळ बोलत बसतात. मग डोळा लागतो. उजाडले आता. रात्रीचे पहा-याचे हांकारे थांबले. कोंबडा आरवला. ती उठली. कपडयांचे बासन घेऊन निघाली.

थंडी, थंडी, कडक थंडी. कशी ही जाणार, कशी चालणार? वारा, चावरा वारा. झोंबतो अंगाला. कशी ही जाणार? पायांची चाळण झाली. अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या झाल्या. कशी राहणार थंडी? धुके, बर्फ, सारे गार गार, तिची हाडे दुखत आहेत. रक्ताळ अश्रू गळत आहेत. सुस्कारे! ते पहा उंच पर्व दिसू लागले. भिंत जवळ आली का? उत्तरेची भिंत? ती पर्व चढू लागली. भिंत कोठे आहे ती विचारी. आणि एक शेतकरी म्हणाला, ''आता जवळच आहे. समुद्रापर्यंत भिंत आता भिडेल. अघोरी काम.''

तिचे हृदय आशेने फुलले. जवळ आली भिंत. समोरचाच रस्ता. त्याला बघेन नि सारे श्रम नाहींसे होतील. अश्रूंची फुले होतील.

भिंतीचे काम लौकर आटपा. अपार खर्च होत आहे. करांखाली प्रजा आहे. लौकर आटपा काम. डोंगरावर पाणी न्यायचे, दगड चढवायचे! पाठीवर कडाड् चाबूक वाजे. हजारो मरत. सभोती हाडांचे ढीग!

आणि फॅन चि लियांगला तर कष्टांची सवय नाही. हातात पुस्तक खेळवणारा, तो दगडधोंडे उरापोटी उचलीत होता. तो कसा वाचणार? त्याची वेठीची मुदत संपण्याआंतच तो मरणार! आणि खरेच काम करताना एक दिवस तो पडला, मेला! कामगार हळहळले. तेथे त्या विटांतच त्यांनी त्याचीहि समाधि बांधली! त्या भिंतीतच!

आज संक्रांत होती. सुटीचा दिवस आणि ती आली. कोणाला विचारणार पत्ता? ते पहा फाटक्या कपडयांतले बिगारी. ती लाज-या धीटपणाने पुढे होऊन म्हणाली,

''एक क्षणभर थांबा मित्रांनो.''
ती थकलेली होती तरी सुंदर दिसत होती. थोरामोठयांच्या घरातील वाटली. ते थांबले.

''येथे टेकडया आणि समुद्र मिळत आहेत. येथल्या कामांत माझा पति होता. फॅन चि लियांग त्याचें नाव. कोठे आहे तो?''

तो बांधकाम करणारे गवंडी होते. ते सद्गदित झाले व म्हणाले, ''त्याच्यासाठीच आज आलो आहोत. तो कोवळा तरुण होता, सुकुमार होता. श्रमाची सवय नाही. तो मेला. त्याचे प्रेत उघडे कसे टाकायचे? आम्ही त्याला पुरले. आज सणाचा दिवस. त्याच्या समाधीला फुले वाहायला, मैत्री दाखवायला आलो आहोत.''

ते बोलत होते, तिचे डोळे निराशेने जवळ जवळ मिटत आले. प्रियजनांचा चिरवियोग यासारखे दु:ख नाही. पतिपत्नींना जोडणारे नाते प्राणमय असते. पति मेला ऐकताच तिचा तडफडणारा, विव्हळणारा आत्मा शरीर फाडून जायला लागला.

शेवटची वेदनामय वाणी मुखातून बाहेर पडत आहे, ''नाथ, नाथ!''

ती पडली!

थोडया वेळाने पुन्हा सचेत होऊन म्हणाली, ''माझा पति किती सद्वर्तनी. तो प्रवचने करी, धर्मग्रंथ सांगे. तो परत येईल म्हणून कितीजण वाट पहात आहेत तिकडे. परंतु पाण्यांत दगड बुडावा तसा तो गेला. नाही, पुन्हा दिसणार नाही! शेवटचा निरोप घेताना तो जे बोलला त्याने पाषाणहि पाझरेल. म्हणाला, 'पतिपत्नींचे अभेद्य नाते असते. दोन पक्ष्यांचा जोडा. परंतु दुर्दैव ओढवले म्हणजे त्यांनाहि विमुक्त व्हावे लागते. पतीने पुरुषार्थ मिळवावा, कधी पत्नीला सोडू नये असे मला नाही का वाटत? परंतु येथे काय इलाज? पूर्वजन्मींच्या पापांची ही शिक्षा! दैवाला कोण जिंकणार? त्या लांब भिंतीपासून पुन्हा यायचा रस्ता नाही. आपण स्वप्नातच भेटू.' नाथ, तुमची वाणी खरी ठरली अखेर. मलाहि परत जायला रस्ता नाही! मला आता घर ना दार... मी मेल्यावर माझ्या देहाचे काय होईल चिंता नको. वारा माझ्या या भग्न हाडांची धूळ जगभर फेकील.'' ते बांधकाम्ये गहिंवरले व म्हणाले, ''नका रडू, पुसा डोळे, विसावा घ्या.''

तिने डोळे पुसले. ती शांत झाली व म्हणाली, ''तुम्ही माझ्या पतीला मूठमाती दिलीत. तुमचे उपकार कसे फेडू? हृदयावर ते कोरलेले राहतील. मला ती जागा दाखवता, जेथे त्याला पुरलेत?''

''तुमच्याबरोबर आम्हीहि अश्रूंची तिलांजली द्यायला येतो चला.''

घट्ट पदर बांधून जड गांठोडे उचलून ती निघाली. हृदय फोडून अश्रूंचे पाट वहात येत होते.

ते पहा. भिंतीचे शेवटचे टोक, समुद्राला ते मिळाले आहे. खाली लाटा उसळत आहेत. आकाशाला भेटू बघत आहेत! ती म्हणाली, ''कोठे पुरलेत? दाखवा थडगे.''

ते म्हणाले, ''ही सारी सम्राटाची जागा. त्याची मालकी. येथे कोणाला कसे पुरता येईल? म्हणून येथे भिंतीच्या पायाशी त्याला पुरले. खूण म्हणून तीन हाती दगड बसवला. त्यावर त्याचे नाव खोदले. ही अमर शिळा आहे. ती बघा, ती.?''

तिने तो दगड पाहिला. वारा, पाऊस, ऊन यांना पुसून टाकता न येणारे नाव तिने पाहिले. तिची प्रेमज्वाळा पेटली, भडकली. ''नाथ, वेडया आशेने तुम्ही जिवंत भेटाल म्हणून आले. आणि आता का एकटी राहू? शून्य आकाशाकडे बघत? नाही, कधीहि नाही!''

तिचे प्रेम, तिचे पातिव्रत्य आकाशाला भेदून गेली. पातिव्रत्याची शक्ति विश्वाला हलवील. ती आपल्या पतीची हाडे मिळतात का पहात होती. आणि भिंत फाटली! दगड माती जरा दूर झाली. पतीची त्रिभुवन मोलाची हाडे मिळाली. अंमलदाराने सम्राटाला चमत्कार कळविला. सम्राटाने मेंग चियांगला प्रासादराणी करतों कळवले!

सम्राटाची आज्ञा ती धिक्कारते. ती हाडे आपल्या विश्वासू हृदयाशी धरून लांब भिंतीच्या टोकावर ती उभी राहते. खाली समुद्र उसळत असतो.

घेतली तिने उडी! डुब्!
पूर्व समुद्रात ती विलीन झाली.

आणि सम्राटाला तिच्या पातिव्रत्याची खात्री पटली. तेथे त्या भिंतीजवळ तिचे समाधिमंदीर त्याने उभारले. तिचा दिवस चीनभर पाळण्यात येऊ लागला. तिची पूजा होऊ लागली. मेंग चियांग अमर झाली!