जुन्या पाऊलखुणा

शब्दांचा वाटु लागतो आधार तेव्हा ,
मनात उठु लागतात भावनांचे काहूर जेव्हा,

नाही ऐकत जेव्हा हे सूर अंर्त् मनाचे ,
भावनांची छटा सहजच ऊधळते रंग इंद्रधनुष्याचे,

स्वच्छंद करावा विहार नात्यांच्या स्वैर आकाशात ,
खुशाल सांगावे गुपित मनातले पक्षांच्या कानात ,

क्षितीजापलिकडे झेप घ्यायची जर असेल जिद्द ,
उतरतील कागदावर गौरव इतिहासाचे शब्द ,

जगात सगळंच सहज,सरल आणि सुंदर असतं ,
आणि नसलं तर तसं घडवावं लागतं ,

जरी रोज बुद्धिशी भांडतोस तू मना ,
तरी परत शोधत फिरतोस त्याच जुन्या पाऊलखुणा....!!!!


कवयित्री - स्वाती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा