गुरुजी : मुलांनो, सांगा पाहू महाभारतात पांडुला ५ आणि ध्रुतराष्ट्राला
१०० मुले. असे का?
१ टार्गट मुलगा : गुरुजी, डोळस माणसाला इतरही बरीच काम असतात.
आजचा पेपर इतका भिजलेला कसा?
उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका

'या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!'

अंतर्यामी ज्योतिषी

ज्योतिषी : तुझे नाव झंप्या आहे ?
झंप्या : हो…
ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे ?
झंप्या : हो… ज्योतिषी महाराज.
ज्योतिषी : तू आताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या : तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.
ज्योतिषी :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुर्खा,पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये.रेशन कार्ड नको !

देव पावला

एका पिंजर्यामध्ये काही पोपट एका पोपटीन ला छेडत असतात.
आणि त्याच्याच शेजारी दुसर्या पिंजरया मध्ये शांतपणे एक पोपट पूजा करत असतो
आणि दुसरा पोपट नमाज पढत असतो, दुकानाचा मालक विचार करतो किती शांत आणि सुशील
पोपट आहेत मी जर या पोपटिन ला यांच्याच पिंजरयात टाकतो म्हणजे ती इथे खुश राहील
तो तिला यांच्या पिंजर्यात टाकतो.

तेवढ्यात पूजा करत असणारा पोपट नमाज वाल्या पोपटाला बोलतो भावड्या उठ
देवाने आपली इच्छा पूर्ण केली


एका कंपनीत सकाळीच खुप धावपळ सुरु झाली. सर्वच लोकं
इकडून तिकडे धावपळ करित होते.
.
.
.
काही नविनच रुजु झालेले कर्मचारी धावपळ बघून फारच
धास्तावले.
.
.
.
त्यातल्या एकाने मोठ्या हिंमतीने
एका जून्या कर्मचार्याला विचारले,"काय झाले ?"

आपल्या बॉसला अतिरेक्यांनी पळवले.
अतिरेकी बॉसला सोडायला दहा कोटी खंडणी मागताहेत.
नाहीतर ते आपल्या बॉसला पेट्रोल टाकून जाळुन
टाकणार.
.
.
.
.
काही लोक त्यासाठीच प्रत्येकाला काही मदत
देता येईल का ते विचारायला धावताहेत.
"लोक किती मदत देताहेत ?", नविन
कर्मचार्याचा प्रश्न.
.
.
.
.
"एक लिटर पेट्रोल.", जून कर्मचारी उत्तरला.

खुप शिकणार

काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,"बाळा तु खुप शिकणार आहेस."

मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,"बाळा,ह सतोस काय काय झालं काय?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,"काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."
मुलगा : तू उपाशीपोटी किती सफरचंदखाउ शकतेस..??
मुलगी : सहा..
मुलगा : चुक...फक्त १
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते.. :P
मुलगी : मस्त सूपर जोक आहे हा...
.
.
.
मग ती मुलगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते..
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस..??
मयुरी : नउ..
.
.
मुलगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते...

स-माजवादी सत्कार

मुंबईत बेतालपणा,
लखनौ मध्ये गरळ आहे.
खाजवून खरूज काढल्याचा
अर्थ तर सरळ आहे.

भाषॆच्या नावावरती
विषारी फुत्कार केला गेला.
केवळ एका शपथेसाठी
जाहिर सत्कार केला गेला.

हा केवळ सत्कार नाही,
हे तर आगीत तेल आहे !
जे विकले जाते,
त्याचाच जहिर सेल आहे !!


कवी - सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मी माझा चे विडंबन

अशी एक रात्र हवी ज्याला पहाट जोडलेली नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण मीही आशा सोडलेली नाही

अशी एक बायको हवी जीला तोंड हे अंग नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण देवानेही आशा सोडलेली नाही

तुला मी कधी शपथ घ्यायला लावत नाही
कारण तुझ्या वरचा विश्वास शब्दात मावत नाही

तुला मी कधीही वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास इवल्याशा मशीनवर मावत नाही

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हट्ल्या तर चांदण्याही फ़ार नव्हत्या

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
हीच्या घोरण्याच्या सीमा पार करायला तयार नव्ह्त्या

पाखरु आणि गरुड

एकेकाळी मी अंड्यात होतो, मझ्यासारखीच अंडी आजूबाजूला होती
त्या अंड्यांना चीकटून रहाताना, जवळजवळ रहायची सवय जडली होती

रहायला छान घरट होतं, उबेला आईचे पंख होते
वडीलांचा आदर्श घेउन, माझ्या पंखात बळ येत होते

एक दीवस सुर्याची आस धरुन मी आकाशात झेपावलो
उडता उडता लक्षात आले की आता मी एकटाच रहीलो

राजासारखं उडता उडता मला खाली जग दिसलं
फाजील गर्व जागा झाला आणी इथेच मनं फसलं

इतर पाखरही जवळ आली , आम्हालाही शिकव म्हणाली
बळकट पाखर जवळ रहीली, अशक्त मत्र हीरमुसुन गेली

असेच कही दीवस उडत थव्याबरोबर उंच गेलो
अचानक एक गरुड आला व मी पुरता गोंधळलो

गरुडाला यापुर्वी मी कधी पाहीलच नव्हतं
आकाशात मझ्यावर कोणी राहीलच नव्हतं

गरुडाची उंची पाहुन मी बीचकलो तोराच बीथरला
मन सैरभैर झालं आणि सगळा माज उतरला

तो म्हणाला बरोबर चल तुला उंच आकाश दाखवतो
अथांग आकाशात तरंगायच कस ते मी तुला शिकवतो

पुढे कधीतरी चालुन तु ही एक गरुड होशील
पण एक वचन दे, इतर पाखरांनाही वर नेशील

आज राणी पूर्विची ती

आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन्‌ सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का ?
नीत्‌ नवी मरणे मराया जन्म तू मागू नको



गीतकार     -    वा. रा. कांत
संगीत        -    यशवंत देव
स्वर          -    सुधीर फडके

हृदयाची मशाल

हृदयाची मशाल केली...घनदाट किती तम आहे!
डोक्यावर मुळात माझ्या जगण्याची जोखम आहे!!

बेरीज, वजाबाक्यांची आकडेमोड ना केली.....
उरल्यासुरल्या श्वासांची मजपाशी रक्कम आहे!

टोळधाड पडते मजवर त्या अंबट शौकीनांची!
त्यांची न चूक काहीही....मी जात्या कोकम आहे!!

काळीज काढुनी माझे ठेवतो समोरी त्यांच्या....
बोलणे- वागणे ज्यांचे माझ्याशी मोघम आहे!

प्रत्येक मैफिलीमध्ये भरतोच रंग हा माझा!
मी आसपासही नाही, पण, माझा घमघम आहे!!

मज श्वास तरी घेवू दे....मग विचार तू काहीही!
वय उतार झालेला अन् थकलेला मी दम आहे!!

हातांची उशी,नभाचे पांघरूण करतो आम्ही!
अंथरण्यासाठी अवघ्या धरणीचे जाजम आहे!!


गझलकार - प्रा.सतीश देवपूरकर

गोऱ्या देहावरती कांति

गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एक दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल

काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हळ
ज्याला सामोरं येतया आभाळ

याला काय लेवू लणं, मोतीपवळ्याचं रान ?
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात


- ना. धों. महानोर
मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..
त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्री केली आहेस म्हणुन.......

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कितीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तिची स्तुती करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कोणाच्या मागे शिट्या मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कोणी जर आवडलीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कधी हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुष्टीने कधी बघितलेच नाही
याव्यतिरीक्त दुसरे काही
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम ...

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाला कधी समजलेच नाही ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..

फुलपाखरा प्रमाणे आम्हीही
बरयाच सुदर फुलांमध्ये वावरत होतो
पण जाऊन बसण्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही....

मिता तुझ्या रे मीठीत

मिता तुझ्या रे मीठीत
जीव चोळामोळा होतो
तुझ्यावीण माझ्या मीता
दिस सरेनासा होतो

दीस सरतो कसासा
रात संपता संपेना
तुझ्या कुशीविण मीता
झोप लागता लागेना

डोळा लागता लागता
मिता स्वप्नामध्ये
येशी हळुवारशा बोटांनी
फ़ुल कळीचे करशी

फ़ुललेल्या देहानिशी
तुला घट्ट बिलगते
तुझ्या मीठीत रे मीता
अंग चोळामोळा होते…

गीत : स्वरांगी देव

म्हणालो नाही. . .

तू गेलीस तेव्हा ' थांब ' म्हणालो नाही
'का जाशी ? ' ते ही ' सांग ' म्हणालो नाही
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
' हे अंतर आहे लांब ' म्हणालो नाही. . .

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पानी
' जा ! फिटले सारे पांग ! ' म्हणालो नाही. . .

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे !
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही. . .

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग – म्हणालो नाही. . .

हे श्रेय न माझे ! तुझेच देणे आहे !
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग – म्हणालो नाही. . .


कवी - संदिप खरे
कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे

बदला

चिंगी : आज्जीच्या वाढदिवसाला तू तिला काय गिफ्ट देणार?

चंप्या : फुटबॉल.

चिंगी : फुटबॉल? आजी कधी फुटबॉल खेळते का?

चंप्या : मग, माझ्या वाढदिवसाला तिने मला भगवतगीता दिली होती....
चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं..

त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..
“हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं..

म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल..

तेव्हा म्हणाल..

‘तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..;

ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..’…”

चम्प्या मध्येच बोलला,

“त्या बघा टीचर.. आता देवाघरी गेल्या..”

वेडा बाळू

"शाळेत नाही जाणार,
येतं मला रडू
आई मला शाळेत
नको ना धाडू!"

कोण बरं बोललं,
रडत हळूहळू
दुसरं कोण असणार?
हा आमचा बाळू.

आई मग म्हणाली:
शहाणा माझा राजा
शाळेत गेलास तर,
देईन तुला मजा.

घरी बसलास तर,
हुशार कसा होशील?
बाबांसारखा कसा,
इंग्लंडला जाशील?

आपला रामा गडी,
शाळेत नाही गेला
म्हणून भांडी घासावी,
लागतात ना त्याला?

तू कोण होणार?
डॉक्टर का गडी?
बाबांसारखी ऐटबाज
नको तुला गाडी?

मुसमुसत बोलला,
बाळू आमचा खुळा

"होईन मी गडी,
नको मला शाळा."

ताई

ताई म्हणे मोठी
आणि मी म्हणे लहान
जिथे तिथे जेव्हा तेव्हा
ताईचाच मान

नवीन पुस्तकं ताईला
पेन्सिल पण तिलाच
किती मोठी झाले तरी
मी लहान सदाच!

ताई सारखी मोठी होणार
नवे फ्रॉक तिला
"बरोब्बर" होतात म्हणे
जुने फ्रॉक मला

अस्सा अगदी राग येतो
पण उपयोग काय होणार?
अगदी म्हातारी झाले तरी
मी लहानच राहणार.

परी

परी असते गोरी
परी असते खरी
परीच्या गळयात असते
सोन्याची सरी

परी हासते गालात
परी नाचते तालात
परी अशी चालते
आपल्याच तोर्‍यात

परी असते इवली
चिमणीशी भावली
अंग तिचे मऊ जणू
साय असे लावली

काल मला दिसली
खिडकीमध्ये बसली
खरं सांगते परी
मला बघून हसली

मोठी झाली म्हणजे

मोठी झाले म्हणजे
होणार मी आई
मंडळात जायची
सारखी माझी घाई

मोठी झाले म्हणजे
मी बाई होणार
चष्म्यावरून अश्शी
रागानं पाहणार

मोठी झाले म्हणजे
होईन भाजीवाली

म्हणेन "घ्या हो घ्या हो.
ताजी भाजी आली."

मोठी झाली म्हणजे
बोहारीण मी होईन
नव्या छान भांडयांनी
पाटी माझी भरीन

नकोच पण मोठी व्हायला
लहानच मी राहणार
मोठेपणी सारखा सारखा
खाऊ कसा मिळणार?

ग्रहांचे युद्ध

एकदा चम्या चंद्राच्या नेवी मध्ये एक कॅप्टन असताना आपल्या जहाजावर फेरी मारत असतो
एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो " गुरु ग्रहाचे म्हणजेच आपल्या शत्रूचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे "

चम्या : ओह , मग एक काम कर , आत जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये
सैनिक: ठीकेय
दोन जहाजांमध्ये तुफान लढाई होते आणि शेवटी चंद्र नेवी जिंकतात
सैनिक : अभिनंदन सर , पण हा लाल शर्ट का घातला तुम्ही ?
चम्या : जर मला गोळी लागली असती तर माझे रक्त बघून माझ्या सैनिकांचा आत्मविश्वास नाहीसा झाला असता ,ते होऊ नये म्हणून.

तेवढ्या एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो " मंगळ ग्रहावरून शत्रूची ५० जहाजे आपल्या दिशेने येत आहेत"
चम्या : मग आता एक काम कर आत जा आणि माझी पिवळी प्यांट घेऊन ये !!
लग्न झाल्यावर २ वर्षांनी
चिंगी:- मी मुर्ख होते, म्हणून तुज्याशी लग्न केले.




चम्या:- हो ना तेव्हा मी प्रेमात आंधळा झालो होतो, म्हणून माझ्या लक्षात नाही आली हि गोष्ट.
स्वत:च स्वत:शी लढण
आता रोजचच झालाय
छंद म्हणा, विरंगुळा म्हणा
पण आमच मात्र मस्त चाललंय

एकट्याच आयुष्य

एकट्याचाच असत आयुष्य,
एकट्यानेच ते सजवायचं
एकट्यानेच हसायचं, एकट्यानेच रडायचं,
माणसांच्या गर्दीत, एकट्यानेच ते फुलवायचं.
पुण्यात मुबलक प्रमाणात व काहीच कष्ट न करता काय मिळते ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अपमान !!!
नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,
गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,
“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!

आवाज हुंदक्यांचा

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!

- सुप्रिया

ती माझी जन्मसाथी

माझा जन्म झाल्यापासुन तीचे आणि माझे नाते आहे.मी निराश असलो की तिच्या डोळ्यातुन अश्रु येतात आणि मी जेव्हा हसतो तेव्हा तीच्या गालावरच्या खळ्या मला वेडावतात.दुखाःच्या उन्हात ती अधिकच गडद होत जाते आणि सुखाच्या वर्षावात ती माझ्याबरोबर चिंब भिजते.मी तीचा श्वास आहे आणि मीच तीचा आत्मा.मी तिला कधीच काही सांगत नाही तरिही ती सर्व जाणुन असते.रोज मी तिला पायदळी तुडवतो पण तीचे प्रेम आटत नाही.माझ्याशिवाय तीचे विश्व नाही ती पुर्णपणे मला समर्पित आहे.मी ज्यादिवशी अलविदा घेईल तेव्हा तीही या जगाचा माझ्याबरोबर निरोप घेईल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

ती माझी सावली आहे !

पोरगी पटली

कॉलेजला जाताना समोरचं
तिला बघितली,
मी दिसताचं चालता चालता जरा थांबली..
माझ्याकडे बघुन गोड हसली,
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली,
पण
हत्तीच्या मारी
मागे वळुन बघितलं..
तर तिची मैत्रीण दिसली.. !!
भूत १- " तू कसा मेलास?"
.
भूत २- " थंडी ने कुडकुडून मेलो. आणि तू?
.
भूत १- " काय सांगू यार........ बायकोवर संशय होता, सगळा घर शोधलं, कोणी नव्हतं.......... लाजेने मेलो.
.
भूत २- " अरे साल्या फ्रीज तरी उघडायचा ........ दोघ वाचलो असतो!
दैवाची साथ तर मिळेलच
सोबत हवीये आता मैत्रीची
हसणे रडवणे होतच राहील
गरज आहे आता सोज्वळ मैत्रीच्या खांद्याची !

मेघ

डोळ्यांच्या कक्षात मावेना
आकाशीचा हा मेघ सावळा
मिठी मारुनी चढवुनी गेला
निळ्या आभाळा रंग काळा !

पिउनी निळाई आकाशाची
भरून घेई गाठोडी थेंबांची
क्षितिजावरती करून जाई
क्षणात उधळण सप्तरंगांची !

एका गावाहून दुसऱ्या गावा
सैरसपाटा करी मंद गतीने
पाहता सरस कुणा त्याहुनी
धुवूनी टाकतसे रूप तयाचे !

व्यापून उरला नभास साऱ्या
परि म्हणवितसे प्रत्येकाचा
उरी मेघाच्या असे दडलेला
पाऊस कैकांना सुखावणारा !

घडली क्षणाची भेट तयाची
ओघळला बनुनी पुसट रेघ
इवल्याश्या थेंबांत समेटला
विशालकाय तो काळा मेघ !

प्रेमाचा अर्थ ...............

सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटतेते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ते प्रेम आहे
हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला जिची आठवण आली ते प्रेम आहे

जीवन असे जगावे

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर


करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

-गुरु ठाकूर.



अशक्य तों तुम्हां नाही नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥

मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥

थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥३॥

तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥४॥

शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥५॥

ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावालों सखया ॥६॥

दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥७॥

तुका देखोनि एकला । वैकुंठीहूनि हिर आला ॥८॥

- संत तुकाराम

दारूचे दुष्परिणाम

एक बेवडा रस्त्याने दारू पिवून झिंगत
झिंगत जात असतो…

पोलीस :- काय रे बेवड्या,
इतक्या रात्रीच कुठे फिरतोयस…?

बेवडा :- कुठे नाही, जरा “दारू प्यायचे
दुष्परिणाम” या विषयावर व्याख्यान
ऐकायला जातोय.

पोलीस :- इतक्या रात्री कोण देणार आहे
रे व्याख्यान?

बेवडा :- कोण नाय, माझी बायको..

बहुला गाय

भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते. नंदराजाच्या घरी गाईंचे मोठे खिल्लार होते. स्वत: कृष्ण गाईंना रानात चरावयास घेऊन जाई. त्या गाईंमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती. तिचा रंग काळासावळा होता. ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणत. तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती. एक क्षणभरसुद्धा कृष्णदेवाला ती विसंबत नसे. नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असावयाची मधून मधून त्याच्याकडे बघावयाची.

कृष्णाची मुरली वाजूलागली तर खाणेपिणे सारे ती विसरत असे व तिच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळ गळत. एके दिवशी ह्या बहुला गाईचे सत्व बघावे अशी कृष्णदेवास इच्छा झाली. भक्तांचा अंकित होण्यापुर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो. गाई घेउन राजेच्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा वनात गेला. यमुनेच्या तीरावर गाई चरू लागल्या. गोपाळ खेळू लागले. त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने भूल पाडली. बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली. कृष्णापासून दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली. तिला स्थळाचे व वेळेचे भान राहिले नाही.

सायंकाळ होत आली. सूर्य मावळण्याची वेळ झाली. कृष्णदेवाने घरी परत जाण्याची खूण म्हणून मुरली वाजवली. सार्‍या गाई गोळा झाल्या. गुराखी कृष्णासह गाई घेऊन घरी निघाले. गोठयातून वासरे हंबरत होती. हंबरून गाई उत्तर पाठवीत होत्या. गाई गोठयात घूसल्या. वासरे कासेला लागली व ढुशा देऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागली. परन्तु बहुला कोठे आहे बहुलेचा बाळ घरी होता. तिच्या वासराचे नाव डुबा होते .

गोजिरवाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
काळे त्याचे आंग सुंदर
कपळावरी चांद मनोहर
जसा चन्द्रमा निळया नभावर
तैसा जाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
खुंट रुप्याचा बांधायाला
सोन-साखळी घालायाला
डुबा आवडे अति सकळांला
मोहन साना || बहुलेचा बालक तान्हा ||

असा तो डुबा. परंतु आज त्याची आई कोठे आहे? आज त्याला पान्हा कोण पाजणार? त्याचे अंग प्रेमाने कोण चाटणार? डुबा एकसारखा हंबरत होता परंतु बहुलेचे प्रेमळ उत्तर त्याला मिळाले नाही. डुबा कावराबावरा झाला. केविलवाणा दिसू लागला.

सायंकाळी बहुला भानावर आली. आपण घोर रानात आहोत हे तिला कळले. तिला यमुना दिसेना; कृष्ण दिसेना; गाई-गोप दिसेनात. कृष्णाची गोड मुरली ऐकू येईना. बहुला घाबरली. तिला रस्ता दिसेना. सर्वत्र घोर रान माजलेले होते. रानकिडयांचा किर्र आवाज होत होता. अरण्यातील श्रापदांचे भयंकर गदारोळ तिच्या कानी पडत होते. बहुला भगवंताचा धावा करू लागली. देवा तुला सोडून मी आज कशी रे गेल्ये? तू मला का धरून ठेवल नाहीस? तुझी मुरली मला का ऐकू आली नाही? हिरव्या हिरव्या गवताला भुलून मी तुला सोडून गेल्ये. मीच पापी आहे;लोभी आहे देवा. कृष्णा ये. मला भेट. मला थोपट. पुन्हा मी तुझे पाय सोडणार नाही.'

इतक्यात काय चमत्कार झाला झाडीत सळसळ आवाज झाला. बहुलेला वाटले कृष्णाच्या पीतांबराचाच आवाज. ती आशेने पाहू लागली. ते पाहा दोन हिरे का तारे ? कृष्णाच्या मुगुटावरचे का ते हिरे? छे! ते हिरे नव्हते ते तारे नव्हते. ते वाघाचे डोळे होते. अरे बाप रे! केवढा प्रचंड वाघ. तो वाघ गुरगुरत बाहेर आला. तो वाघ जिभल्या चाटीत होता. गाईला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते.

वाघ पाहून बहुला घाबरली. वाघ बहुलेवर आता उडी मारणार;तिच्या मानेचा घोट घेणार;तोच बहुला करुणवाणीने त्याला म्हणाली;वाघोबा मी तुझ्या तावडीत सापडल्ये खरी. तू मला खा. मी जीवदान मागत नाही;कारण मरणाचं भय मला वाटत नाही. कृष्णाच्या भक्ताला मरणाची डर वाटत नसते, परंतु एक मागणं तुला मागते. माझा बाळ डुबा घरी वाट पाहात असेल. तो हंबरत असले. त्याला शेवटचा पान्हा पाजून; त्याला निरोप देऊन मी येते. मी खचित येईन.

वाघ म्हणाला; 'एकदा निसटून गेल्यानंतर तू पुन्हा कशाला येशील? मरणाच्या तोंडात आपण होऊन पडण्याइतकी मुर्ख तू खचित नसशील. हातातील शिकार भोळेपणाने सोडून देण्याइतका मूर्ख मीही नाही. चल; मी तुला मारणार व खाणार. तुझं काही मांस माझ्या आजारी वाघिणीला व तिच्या पिलांना नेऊन देणार. माझी वाघीण वाट पाहात असेल.'

बहुला म्हणाली; 'वाघोबा तुलाही मुलंबाळं आहेत. मुलांची माया तू जाणतोस. माझ्या मुलांची तुला दया येऊ दे. मी खरंच परत येईन; मी कृष्णदेवाची सखी आहे. मी दिला शब्द पाळीन. सूर्य वरून पडेल पृथ्वी उडेल; सागर कोरडे होतील अग्नी थंड होईल; परंतु बहुला सत्यापासून दूर जाणार नाही. माझी परीक्षा तर घेऊन पाहा. वाघोबा दाखव; जवळचा रस्ता दाखव. मी आत्ता जाऊन येंते.'

व्याघ्ररूपी भगवंत म्हणाला;'बरं आज परीक्षाच घेतो. जा लौकर जाऊन ये. मी इथं या दगडावर बासून राहातो. तुझा बाळ भुकेला आहे;तशी माझी बाळेही भुकेली आहेत हे लक्षात ठेव.'

बहुलेला एकदम जवळ रस्ता दिसला. इतका वेळ तिला कसा दिसला नाही; कोणास ठाऊक ! सन्मार्ग जवळच असतो; परंतु पुष्कळ वेळा तो माणसाला दिसत नाही. बहुला धावपळ करीत निघाली. पुत्रप्रेमाने तिच्या कासेला गळती लागली होती. तिचे ते चार सड म्हणजे जणू दुधाने थरलेले चार समुद्रच होते. पृथ्वीला; वाटेतील दगडधोंडयांना दुधाचा अभीषेक करीत ती चालली. पळताना तिला ठेचा लागत होत्या; काटे बोचत होते; परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्ह्ते.

घरी डुब्याचा ओरडून ओरडून घसा बसला होता. आज कृष्णदेव आपल्याला आंजारागोंजारायला आला नाही; ह्याचेही त्याला वाईट वाटले. गरीब बिचारा सारखा आईची वाट पाहात होता. ती पाहा हंबरत बहुला आली. डुबा हंबरला. बहुला डुव्याजवळ उभी राहिली. डुबा आईच्या कासेला झोंबला. तो तान्हा अपार पान्हा पिऊ लागला. आज बहुलेचा पान्हा संपता संपेना. डुब्याचे पोट भरता भरेना.

डुबा बहुलेचे दूध पीत होता. बहुला त्याचे अंग चाटत होती; परंतु एकाएकी डुबा चमकला. त्याचे दूध पिणे थांबले. आईच्या डोळयांतील कढत अश्रू त्याच्या अंगावर पडले. डुबा आईच्या तोंडाजवळ आला. आईच्या तोंडाला तोंड लावून डुबा रडत रडत म्हणाला; आई का ग रडतेस ? तुला काय झालं ? तू कुणाच्या शेतात चुकून गेलीस होय ? त्यानं तुला मारलं होय ? हे तुझ्या अंगावर खरचटे उठले आहेत. काटेरी काठीनं तुला कोणी झोडपलं वाटतं ?' बहुला म्हणाली; बाळ मला कुणी मारलं नाही. तुझ्यासाठी पळत येत होत्ये. वाटेतील काटेझुडपे लागली व अंग खरचटलं.'

डुबा : मग तू का रडतेस ? कृष्णदेव तुझ्यावर रागावला ? आज मला खाजवायला तो आला नाही. तुला त्यानं इतर गाईंबरोबर का आणलं नाही ? त्यानं तुला हाकलून दिलं होय ? तुला यायला इतका उशीर का झाला ?

बहुला : कृष्णदेव माझ्यावर रागावला नाही. मीच त्याला सोडून दूर निघून गेल्ये.

डुबा : तू का निघून गेलीस ? तू माझ्यावर रागावलीस वाटतं ? दूध पिताना मी तुला ढुश्या देतो; म्हणून रागावलीस ? मी तुझ्याबरोबर वनात येण्याचा हट्ट धरतो म्हणून रागावलीस ? आई मी हट्ट करणार नाही. तू वनात नेशील तेव्हाच येईन. आता मी गवत खाऊ लागलो आहे. पिताना तुला त्रास होत असेल तर मी दूध पिणार नाही. आई माझ्यावर रागावू नको. मी का वाईट आहे ?

बहुला गहिवरून म्हणाली; ' बाळ; तुला कोण वाईट म्हणेल ? तू गुणांचा आहेस. सारं जग तुझ्यावरून ओवाळून टाकावं असा तू आहेस. तुझ्यावर का मी कधी रागावेन ? अरे; पिताना मला ढुश्या देतोस; त्यात तर माझं खरं सुख. तुझी एकेक ढुशी लागते व मला अपार पान्हा फुटतो. तुझ्यावर नाही हो मी रागावल्ये.'

डुबा : मग तू का रडतेस ? तुझं दु:ख मला का सांगत नाहीस ? मी का फक्त तुझं दूधच पिऊ ? तुझं दु:ख नको ऐकू ? आई जगात तुला मी व मला तू. तू मला तुझं दु:ख सांगणार नसशील तर मी कशाला जगू ?

बहुला : बाळ; सारं सांगत्ये; ऐक. आज हिरवं हिरवं गवत पाहून मी लांब चरत गेल्ये. कृष्णाला अंतरल्ये. मला मोह पडला. रात्र पडली तेव्हा मी भानावर आल्ये; तो जवळ ना यमुना; ना गाई; ना गोपाळ; ना कृष्ण; सभोवती भयंकर जंगल. मला रस्ता दिसेना. एकाएकी एक वाघ आला व तो मला खाणार; तोच मी त्याला म्हटलं; ' वाघोबा; माझ्या बाळाला मी शेवटचा पान्हा पाजून येते. त्याला निरोप देऊन येते; मग मला खा. मी खरोखर परत येईन.' डुब्या ! वाघाला मी वचन दिलं आहे. आता मला जाऊ दे. मी सत्वापासून च्युत कशी होऊ ? तू एकटा जगात राहाणार; अजून अंगावर पिणारा म्हणून थोडं वाईट वाटलं; परंतु कृष्णदेव तुला आहे. त्याची कृपा सर्वांना पुरून उरेल. बाळ; आता नीट वाग. फार उडया मारू नकोस. फार झोंब्या घेऊ नकोस. रानात कृष्णाला सोडून दूर जात नकोस; चांगला मोठा हो. देवाचा लाडका हो.' असे म्हणून बहुलेने डुब्याचे अंग चाटले. डुबा म्हणाला; 'आई; मीच त्या वाघाकडे जातो. तू जगात राहा. तुला माझ्यासारखी आणखी बाळं होतील. मी तुझ्याच पोटी पुन्हा येईन; तुझं बाळ होईन. मला जाऊ दे. तुझ्या दुधावर व तुझ्या कृपेवर पोसलेला हा देह तुझ्याच कामी येऊ दे. माझं सोनं होईल. मी कृतार्थ होईन'

बहुला सदगदित होऊन बोलली; 'बाळ; तू अजून लहान आहेस. वाघाचे कठोर पंजे तुझ्या कोवळया शरीराला कसे सहन होतील ? तू मोठा हो. एक दिवस सत्वासाठी मरण्याचं भाग्य तुलाही लाभेल; परंतु आज हट्ट नको करू. आईचं ऐकावं हो बाळ.'

डुबा म्हणाला; 'आई; तुझं दुसरं सारं ऐकेन; परंतु या बाबतीत नाही. मी एक तोड सुचवतो. आपण वाघोबाकडे दोघेजण जाऊ व त्याला मी सांगेन; 'मला खा.' तू सांग; 'मला खा.' बाघाला ज्याचं शरीर आवडेल त्याला तो खाईल.'

बहुला व डुबा रानात जाण्यासाठी निघाली. अजून प्रहरभर रात्र उरली होती. आकाशात तारे स्वच्छ चमकत होते . हजारो डोळयांनी आकाश त्या मायलेकरांकडे पाहात होते. डुबा पुढे चालला होता. वनातून येताना आईचे दूध वाटेवर सांडले होते; त्या खुणेने तो चालला होता. बहुलेचे वाटेवर सांडत गेलेले ते गोड दूध साप पीत होते; परंतु त्या सांपाकडे त्या गायवासरांचे लक्ष नव्हते. रानातील तरुवेलीवर असंख्य फुले फुलली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता. मंद वार्‍याबरोबर सर्वत्र पसरत होता. जणू तो बहुलेच्या सत्यनिष्ठेचा सुगंध होता ! वृक्षांच्या पानांवर टपटप बिंदू पडत होते. जणू निसर्गदेवता त्या मायलेकरांसाठी अनंत अश्रू ढाळीत होती.

बहुला व डूबा कोणी बोलत नव्हते; बोलणे त्यांना शक्यच नव्हते. भरलेल्या अंत:करणाने; भरलेल्या डोळयांनी दोघे मुकाटयाने चालली होती. दोघे वाघाच्या जवळ आली. वाघ करकर दाढा खात होता. वाघाला पाहून डुबा जरा घाबरला. तो बहुलेच्या अंगाला बिलगला. बहुला त्याला म्हणाली; 'बाळ माघारी जा.' डुबा म्हणाला; 'मी भ्यायलो नाही काही; हा बघ पुढं होतो.' असे म्हणून उडया मारीत डुबा वाघासमोर जाऊन उभा राहिला. तो वाघाजवळ बोलू लागला.

डुबा : तू का रे तो वाघोबा ? माझ्या आईला खाणारा तूच ना ? वाघोबा; माझ्या आईला खाऊ नकोस. तू मला खा. माझी प्रार्थना ऐक.

बहुला : नको रे वाघोबा. त्याचं काय ऐकतोस ? तू आपला मला खा हो.

वाघ : बहुले; इतका उशीर का झाला ? मी म्हटलं; तू येतेस की नाही ? न येण्याचं ठरवीत होतीस ना ?

बहुला : नाही रे वाघोबा. हा डुबा ऐकेना. रोज सांगितलेलं ऐकतो. इवलासुद्धा हट्ट धरून बसत नाही; परंतु आज ऐकेना. म्हणे; 'मलाच जाउ दे. त्याची समजूत घालण्यात वेळ गेला. शेवटी तो आलाच बरोबर. रागावू नकोस काही. फसवण्याचं स्वप्नातसुद्धा माझ्या मनात आलं नाही. ही मी तयार आहे. तुझी वाघीण; तुझी पिलं भुकेली असतील. त्यांना लौकर माझा ताजाताजा घास नेऊन दे.'

डुबा : वाघोबा; नको रे आईला खाऊ. माझं अंग बघ कसं लोण्यासारखं मऊमऊ आहे माझं अंग तुला आवडेल; तुझ्या पिलांना आवडेल.

बहुला : त्याला खाऊन सार्‍यांची भूक कशी शमणार ? वाघोबा; तू मलाच खा. मी हाडापेरानं मोठी आहे; तुम्हा सर्वांचं पोट भरेल.

वाघ : मी तुम्हाला दोघांना मारून टाकतो. तुम्हा दोघांना आमच्या पोटात ठेवतो. गोठयात एके ठिकाणी असता; आता पोटात एके ठिकाणी राहा. डुब्याचं मांस - कोवळं कोवळं - माझ्या पिलांना फारच आवडेल. तुझं वाघिणीला आवडेल. चला; तयार व्हा. आता उशीर नको. बहुला; डुबा; माना खाली घालून तिथं बसा. देवाचं स्मरण करा.

मायलेकरे खाली माना घालून बसली; परंतु डुबा पुन्हा उठून म्हणाला; 'वाघोबा; खायचंच तर मला आधी खा. आईला फाडलेलं माझ्यानं पाहावणार नाही; परंतु आई मोठी आहे. धीराची आहे. तिच्या सत्वाला सीमा नाही. मला फाडलेलं पाहाण्याचं धैर्य तिच्याजवळ आहे.'

द्यघ : गप्प बस. बालणं पुरे. मरायची वेळ आली तरी चुरूचुरू बोलतच आहे.

डुबा : मला मरणाची भीती थोडीच आहे.

बहुला : बाळ; आता पुरे. कृष्णदेवाचं स्मरण कर. आता बोलू नको. मरणाच्या वेळेस गर्व नको. फुशारकी नको.

मायलेकरे तयार झाली. मरणाची वाट पाहू लागली. वाघाचे भयंकर पंजे आधी कुणाच्या अंगावर पडतात; त्याचे तीक्ष्ण दात आधी कोणाला फाडतात; ह्याची वाट पाहू लागली; परंतु छे:; ह्या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. कृष्णदेवाचे ध्यान करण्यात ती दोघे रंगली होती. वाघबीघ विसरून गेली होती. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. बहुला व डुबा ह्यांच्या अंगावर वाघाची उडी पडण्याएवजी फुले पडली. मायलेकरे चपापली. ती वर पाहू लागली; तो फुलांचा वर्षाव होत होता. वाघाला ती पाहू लागली. वाघ कोठेच दिसेना. बहुला व डुबा उभी राहिली; तो त्यांना समोर कोण दिसले ?

पालनवाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
मोरमुकुट तो माथ्यावरती
मंजुळ मुरली धरली ओठी
गळयात डोले सु-वैजयंती
प्रभुवर आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
रक्षण भक्तांचे करणारा
भक्षण असुरांचे करणारा
श्यामसावळा गिरी धरणारा
धावत आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
उभा राहिला देव येउनी
हृदयी गेला उचंबळोनी
बहुलेच्या सत्वास पाहुनी
अतिशय धाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |


कृष्ण परमात्म्यास समोर पाहून बहुलेने आपले मस्तक त्याच्या चरणांवर ठेवले. डुब्यानेही तसेच केले. कृष्णदेवाने आपल्या अमृतस्पर्शी हस्ताने दुब्याला थोपटले. देव म्हणाला; 'बहुले; बाई कष्टी होउ नकोस. तू माझ्या परीक्षेत उतरलीस. आता मी कायमचा तुझा सेवक आहे आणि डुब्या तूही आईला शोभेसा आहेस. आईची परंपरा पुढे चालवशील. बहुले तुला जे मागावयाचं असेल ते माग. मी प्रसन्न झालो आहे.' बहुला म्हणाली; देवा; हिरवं हिरवं गवत पाहून तुझ्याजवळुन दूर जाण्याचा मोह मला कधीही न होवो. नेहमी तुझ्याजवळ राहाण्याचीच इच्छा आम्हा मायलेकरांस होवो. दुसरं काय मागू ?'

मैडम आई समान

पिंटू :- बाबा , या मैडम किती सुंदर दिसतात
ना....?

बाबा :- बेटा,असे बोलू नये,मैडम आई समान असते.
.
...
.
.
पिंटू :- जिथे तिथे तुम्हीच सेटिंग लावा...!

डोळ्यातील पाणी

सहवास संपल्यावर
उरतात त्या फक्त आठवणी
अखेर, साक्षीला उरते
केवळ, डोळ्यातील पाणी !!
तो- काय खाऊ या?

ती- काहीही चालेल.

तो- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?

ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स
येतात.

तो- मग काहीतरी नॉन्-व्हेज?

ती- कालच खाल्लंय ना?

तो- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच?

ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू

मला चहा-ब्रेड देणार?
तो- मग तूच सांग काय खायचं?

ती- काहीही चालेल..!!

तो- मग आता आपण काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव.

तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?

ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!

तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.

ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..

तो- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या.

ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.

तो- मग तुच सांग, काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव..!! ..

तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.

ती- काहीही. तुच ठरव.

तो- बसनं जाऊ या?

ती- शी केवढी गर्दी. अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये.

तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग.

ती- पैसे जास्त झालेत का?
एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?

तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.

ती- किती दुष्ट तु?
रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?

तो- ठीक. मग आधी जेवू या?

ती- व्हाटेव्हर!

तो- काय खाऊ या?

ती- तुच ठरव.
(या मुली पण ना खरच @!#$@#!)

श्री गजाननगौरवाष्टकम्‌



गजानन-महाराज ! भक्तवास्तल्य-वारिद्ये
त्वदंघ्रि-कमल-द्वन्द्र पराग: पातु न: सदा ॥१॥

दयाघन, प्रेममूर्ते! कल्पद्रुम्‌, महत्तम
विव्रुणोषि विपन्नाय मार्ग मुक्तिकरं मुदा ॥२॥

त्वं साक्षात्‌ देवतात्मा वै लोकोद्वाराय वर्तते
सामान्यजनवेषात्‌ तु गूढ-भावो न बुध्यते ॥३॥

अभीप्सिताथ्र-लाभाय प्राप्तस्य तव सन्निधो
साध्ययित्वऽपि तत्कांय्र प्रभु:कर्तेति भाषसे॥४॥
ब्रम्हचर्य-व्रतग्राही भक्तसंसारपालक:
निरपेक्षो निजानन्दो ध्यान-चिन्तनलालसा: ||५॥

गणेशो हनुमान्‌ देवी, यस्मे यदभिरोचते
तद्रूपेण महाराज पुरतर्स्त्व हिभाससे ॥६॥

देवस्थानानि पूज्यानि तीर्थानि विविधानिच
नित्यं ब्रजसि मुक्तात्मन्‌ लोक-शिक्षण-हेतुना ॥७॥

साधावो गणकाश्चैव, मार्गदर्शन हेतव:
प्रत्यक्षं सिध्दिदं नाम दर्शयन्तं नमाम्यहम्‌ ॥८॥
गजाननाष्टकं पुण्यं सर्वकार्यफलप्रदम्‌
आवर्तन-प्रभावेण सत्वरं सिध्दिदायकम्‌ ॥

माणूस पाण्यात विरघळतो

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.
कुठलीही गोष्ट घडली की त्यातून
काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.
.
.
... .
एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवरफिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते.
.
.
.
एक व्यक्ती पाण्यात उडी मारतो, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.
.
.
यावरून संता असा निष्कर्ष काढतो की, .
.
.
.
.
"माणूस पाण्यात विरघळतो."

गजानन महाराज आरती



जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

सहस्त्रदलांचे सूर्यकमल ते आत्मतेज ते उधळीत येता
गुरुमायेला न्हाऊ घालता भाव भक्तिने उटी चर्चिता प्राण फुले वाहिली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

अष्टसिद्धि जमल्या भवती पंचत्वाचि पंचारतीही
घेऊनी हाती आदिशक्ति जय जय गर्जत गात आरती ओवाळीत राहिली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

रामप्रभु तो पंचवटीचा हाक मारता धावत येतो
गुरुमायेचा शब्द झेलतो भक्ताच्या त्या भालावरची विधीलिखिते पुसली
जय जय सद्‍गुरु श्रीमाउली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥

प्रेम चांदणे सदैव फुलते गुरुमायेचे घडता दर्शन
भक्तावरती अमृत सिंचन याच देहि याच नयनी मायप्रभु पाहिली
जय जय सद्‍गुरु श्री माउली
अविरत धरते आमुच्यावरती करुणाघन साऊली
जय जय सद्‍गुरु श्रीमाऊली ॥
एकदा एका रात्री सूर्यकांत दारूच्या नशेत जातहोता. त्याचे एक पाऊल फूटपाथवर
तर एक रस्त्यावर पडत होते. पाठीमागून येणाऱ्या हवालदाराने सूर्यकांतला काठीने
मारत विचारले- ‘‘काय रे, इतकी प्यायला कुणी सांगितली.’’

सूर्यकांत स्वत:लासावरत म्हणाला,‘‘आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद,
गेला एक
तासभर मी लंगडत का चालतो आहे.. याचाच विचार करत होतो.