पाणीच पाणी

तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी


कवी - बा. भ. बोरकर

पिपांत मेले ओल्या उंदिर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या गंगेमधि गगन वितळले

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा

विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन् चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप

सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी

अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती

इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन् जरा 'अहम्'ता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा


कवी - बा.सी.मर्ढेकर

झोपली गं खुळी बाळे

झोपली गं खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी ह्या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी

शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणें
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे

चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला
आणि कोठेतरी दूर
खुजा तारा काळा झाला

आता भ्यांवे कोणी कोणा
भले होवो होणाऱ्याचे
तिरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे

चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती
चाळणीत चाळणी अन
विचारांत तरी माती

चैत्रबाप्पा उद्या या हो
घेऊनीया वैशाखाला
आंबोणीच्या मागे का गं
तुझा माझा चंद्र गेला?

आंबोणीच्या मागे का गं
अवेळी का चंद्र गेला?


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या दु:खाच्या कढईची गा

ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.


कवी  - बा.सी.मर्ढेकर

रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!

ओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें
ओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें
पापांतून पापाकडे , जाई पाप्याचा विचार
आणि पुण्याचीं किरणें, लोळतात भुईवर
माथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें
तुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे
गढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने
कैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने
घडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला
रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!



कवी  - बा.सी.मर्ढेकर

दवांत आलीस भल्या पहाटे

दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.


कवी - बा सी मर्ढेकर

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे 'कार्पण्य' 'मी' चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी


कवी - बा.सी.मर्ढेकर

पोरसवदा होतीस

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
होता पायातही वारा
काल-परवापावेतो.

आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी.

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायांचे घेतो.


कवी - बा.सी.मर्ढेकर

जशि धोब्याची मऊ इस्तरी

जशि धोब्याची मऊ इस्तरी
तलम फिरावी सुतावरूनी
फाल्गुनातली चन्द्रकोर तशि
मलिन मनाच्या धाग्यांवरुनी

शिणेल धोबी यदाकदाचित,
पडेल खाली चन्द्रकोर अन्
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना
पुनश्च कोठे भट्टी भगवन्


कवी - बा.सी.मर्ढेकर

पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा


कवी - बा. सी. मर्ढेकर

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भूवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!


कवी - बा. सी. मर्ढेकर

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


कवी - बा. सी. मर्ढेकर

बा. सी. मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर (जन्म-डिसेंबर १, १९०९ मृत्यू- मार्च २०, १९५६) हे युगप्रवर्तक कवी; त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. 

त्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्ढेकर हे आडनाव रूढ झाले. मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले.

बा.सी. मर्ढेकरांचे मूळ नाव ‘रमेश’ होते. घरी त्यांना ‘बाळ’ या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच ‘रमेश-बाळ’ या टोपणनावाने लेखन केले.

बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

‘शिशिरागम’ हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कांही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत.


मर्ढेकरांच्या ‘कांही कविता’ या संग्रहातील नवकवितांवर अश्‍लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.

मर्ढेकर यांना १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार "सौंदर्य आणि साहित्य" साठी प्रदान करण्यात आला.

मर्ढेकरांचे प्रकाशित साहित्य असे : 
कवितासंग्रह −शिशिरागम(१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१) 
कांदबऱ्‍या− रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८) 
नाटक−नटश्रेष्ठ (१९४४) 
संगीतिका−कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७) 
समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय−आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन ॲन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्या आणि साहित्य (१९५५). 

जन्म

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,
बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,
कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,
कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर
अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,
जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम
आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

तरी मग रोकडा सवाल । कोरिसी हाडांचा महाल,
ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,
घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?


कवी - बा. सी. मर्ढेकर

अस्थाई

अस्थाईवर स्थायिक झालों,
चुकून गेला पहा अंतरा
ओरडून का अता लागणे
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेत झुकला निशापती अन्
अस्मानाच्या कलल्या तारा;
अंधारावर विझून गेला
रात्रीचा या वीज-पिसारा

क्लिन्न मनोगत मोटारींचें
कुशींत शिरले काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

शांत जगाच्या घामावरला
उडून काळा गेला वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
जराच हलला श्वासोच्छ्वास.

अस्थाईवर पुन्हा परतलों,
चुकून गेला पहा अंतरा;
ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणें
अता खालचा परंतु हसरा.


कवी - बा.सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुणाच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||


कवी - बा. सी. मर्ढेकर.

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

माझं आपलं असं प्रेम !!!!

चंद्र सुर्य आणून देईन,
पदरात घालीन लक्ष तारे !
बांधून ठेवीन तुझ्या दारी,
तुझ्या केसांशी खेळते वारे !!!

असं मी मुळीसुद्धा म्हणणार नाही
उगाचं भाव खाण्यासाठी मी खोटं बोलणार नाही...

माझं आपलं सरळसोट सांगण
"माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
अगदीच 'हीर - रांझा' नसलं तरी
थोडं थोडसं सेम आहे !!!

पेट्रोल जाळत फ़िरणं तुझ्यापाठी
मला अजिबात जमणार नाही,
शायनिंगसाठी पैसा उधळणं
मला अजिबात झेपणार नाही.

तरीसुध्दा मार हाक मनापासुन कधी !
उभा असेन तुझ्यासमोर तुझ्यासुद्धा आधी !!!
कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे !
हां ! 'जॉन - बिपाशा' सारखं नाही
माझं आपलं माझ्यासारखं प्रेम आहे !!!!

आणखी एक खरं सांगतो,
तुझं माझ्यावर आणि
माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी !
'केवळ' सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी
बघत राहीन इतर पोरी !!

पण हे अगदी नक्की त्या कितीही सुंदर असल्या
आणि कितीही मोहक हसल्या तरी,
तुझ्याचं खळीवर पागल होतो,
तुझ्याचं बटांवर पागल आहे आणि
तुझ्याचं डोळ्यात आकाश बघेन !!

कधीच नाही म्हटंल की...

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
माझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
भोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
आपल्या ह्रदयाच्या रेशीमगाठी कधी जुळल्याच नाहीत म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कारण मनातल्या भावना कधी ओठांपर्यंत पोहचल्याच नाहीत म्हणुन

पण आता मी बोलणार आहे
ह्रदयाचे सर्व बंध उलघडणार आहे
कारण मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन...

तिला कळतच नाही...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण ते शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुलं तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणंच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहीसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याचीच भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

शोधतोय

आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,

वाहणारे अश्रु येतात जिथुन
मी तो पाट शोधतोय..

मला व्यापलं आहे जीवनाने
अन,मी माझी जागा शोधतोय,

नात्यांच्या या रेशिम बंधातुन
मी माझा धागा शोधतोय...

मनात जे भरुन आहेत कधीचे
मी त्या श्वासांना शोधतोय,

जगण्याची जे उर्मी देतात
मी त्या ध्यासांना शोधतोय....

खरं सांगायचं तर मी
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.......

जाता जाता एवढं कर

नवं पाखरू

स्क्रीनवरच्या नजरा आधी गर्रकन फिरतात...
टवकारले जातात कान... आणि भलेभलेही हरतात...

इश्यूत घुसलेल्या विश्वामित्रांचीही तपश्चर्या होते भंग...
पांढर्‍या केसांवर चढतो गुपचुप गोदरेज हेअर डायचा काळा रंग..

विवाहित टीम लीडलाही हलकेच स्वतःच्या बायकोचा पडतो विसर..
छप्पर उडालेल्या मॅनेजर्सवरही तिच्याच यौवनाचा असर..

टीममधल्या सगळ्यांशीच मग हळूहळू तिची ओळख होते..
"च्यायला कसली भारीय" म्हणत चर्चा भलतंच वळण घेते..

एके दिवशी इनबॉक्समध्ये फाटकन् मेल येऊन पडतो..
लग्नपत्रिका पाहून तिची ओठांपाशीच घास अडतो..

प्रोजेक्टमधलं नवं पाखरू भर्रकन कधीच उडून जातं..
छप्पर उडालेलं बावळट ध्यान मग गुपचुप घरचा डबा खातं..

द्रांक्षांना मग आंबट म्हणत शोधली जाते नवी शिकार..
नवं पाखरू यायचा अवकाश.. प्रोजेक्टमध्ये पारधी आहेत चिक्कार..


कवी - संदेश कुडतरकर
रामभाऊ मेडिकलच्या दुकानात जातो.
रामभाऊ (दुकानदाराला) : एक विषाची बाटली द्या...
दुकानदार - प्रिस्क्रिप्शनशिवाय विष देता येत नाही.
रामभाऊ :( दुकानदाराला लग्नाची पत्रिका दाखवत) हे घ्या.
दुकानदार : बास कर मित्रा.....रडवशील का!
 
बाटली मोठी देऊ का छोटी???
"हा शर्ट किमती दिसतोय?"
"तो माझा नाही !"

"पॅन्ट पण छान आहे ..!"
"तीही माझी नाही ..!!"

"मग तुझे काय आहे..?"



.
.
.
.
.
.
.
.
.
"लौन्ड्री ...!!!"

इम्पोटेड अतिरेकी

गंपू ला त्याची आई एकदा खूप मारते, खूप म्हणजे खूप...
.
नंतर गंपू बाबांकडे जातो आणि विचारतो...
.
गंपू : बाबा, तुम्ही पाकिस्तानात गेला आहात का कधी ?
.
बाबा : नाही, रे.... पण का काय झाल????
.
.
गंपू : मग तुम्ही हा अतिरेकी कसा आणला...

देवाचा मोबाईल

किती करू मी तुझा धावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा
नाही माणस कलीयुगी खरी
येता जाता चालती कुरबुरी
मुखी राम बगल मे छुरी
नाही कळत त्यांचा कावा||१||

अवतरलास तू द्वापारी
खूण होती तुझी बासरी
पण जमाना आला नवा
आता नाही चालणार तुझा पावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा||२||

चारी युगात तुझा बोलबाला
फार नाही मागायचं मला
घाई गर्दीत शोधू कुठे तुला
आहे एकच उपाय ठावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा|||३||


कवियत्री - प्रभा मुळे

वीज येते आणिक जाते


वीज येते आणिक जाते ..!!
येताना सर्व वास्तू उजळिते,
आणि जाताना मिट्ट काळोख करते !
गावागावांना ती अशी छळते,
आणि काही शहरांच्या कुशीत शिरते !

कोणाच्या राजकारणाने ती झळाळते?
येणे जाणे कधी न सरणे,
विद्यार्थ्यांच्या ऐन परीक्षेत गुल होणे,
पिकाला पाणी देताना ती नसणे,
कारखाने व गिरण्यांची गोची करणे,

रात्री रस्त्यावरून चालताना तिचे जाणे,
तरुणांचे उगीचच तरुणींपाशी अडखळणे !
येताना ती कसली रीत,
गुणगुणते ती जाण्याचे गीत !
जाते कधीमधी आणि फिरून ये,

येण्यासाठीच दुरु नये !
तिच्या असण्याने तिची उधपट्टी करणे,
ती नसल्याने डोळ्यात असावे येणे !
प्रेमात येते तर कधी निघून जाते,
आणि जाण्याने तिच्या सबुरी संपवीते !
विज येते आणिक जाते......!!!


कवी - जगदीश पटवर्धन

ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते


कवी /गीतकार : आरती प्रभू
गायक : महेंद्र कपूर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना


गीतकार - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 
गायक - आशा भोसले
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर

आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

                     मराठी साहित्यविश्वाला `नक्षत्रांचे देणे' देणारे प्रतिभासंपन्न कवी!


वेंगुर्ला तालुक्यातील ‘बागलांची राई’ या ठिकाणी चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. एस.एस.सी. पर्यंतच शिक्षण होऊ शकले. ते बुद्धीने अत्यंत तल्लख पण थोड्या विक्षिप्त स्वभावाचे होते. कोकणात नित्यनेमाने चवीने चघळल्या जाणार्‍या भुताखेतांच्या कथा, एकूणच कोकणातील निसर्ग, गूढरम्यता, माणसांच्या मनाचा कसून शोध यांकडे त्यांचे लिखाण जास्त झुके.
साधारणपणे १९५० मध्ये त्यांनी लेखनास सुरुवात केली. सत्यकथेच्या १९५४ च्या फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘शून्य शृंगारते’ या कवितेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर विंदा करंदीकर व पाडगावकरांच्या ओळखीने मुंबईला १९५९ साली ते आले. आकाशवाणीवर र्स्टों आर्टिस्ट म्हणून ते नोकरीस लागले. पण काही कारणांमुळे १९६१ मध्ये त्यांना नोकरी सोडावी लागली.

खानोलकर हे अतिशय प्रतिभासंपन्न लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होते. त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा होता. त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा काळ लक्षात घेतला, तर त्यांच्या लेखनाचा वेग किती प्रचंड होता हे सहज लक्षात येईल. तरीही त्यांच्या लेखनातील वेधकता व गुणवत्ता वादातीत आहे.

घरचे दारिद्रय, आप्तस्वकीयांचा मृत्यू, उपेक्षा, त्यांच्या स्वभावामुळे होत जाणारे गैरसमज, घरची -दारची आजारपणे, नियतीने कधी कधी केलेली कुतरओढ या सगळ्या पसार्‍यात अडकूनही खानोलकरांच्या लिखाणात कधी खंड पडला नाही. त्यांच्या सगळ्याच यशस्वी लेखनाला एक प्रकारचा पारलौकिकाचा संजीवक स्पर्श झालेला आढळतो.

काही लेखन करायचे असले की, खानोलकर जणू कसल्यातरी भावसमाधीत जात आणि एका विलक्षण अवस्थेत देहभान विसरून लिहीत राहत, झपाटल्यासारखे... आणि ती भावसमाधी उतरली, की त्यांचे लेखन थांबे. मग त्या अवस्थेत जे काही लेखन होई, ते स्वयंभू, स्वयंपूर्ण अशी अनुभूती देणारे असे.

त्यांच्या कवितेने सौंदर्यवादी जाणिवेकडून अस्तित्ववादी जाणिवेकडे केलेली प्रगल्भ वाटचाल, त्यांच्या कथांमधून प्रकट झालेले जीवनाच्या शोकात्मतेचे विविधरूपी आकार, माणूस व विश्व यांच्यातील अनेकविध ताण, काम, प्रेम, द्वेष, हिंसा, सूड, निष्ठा, मत्सर इ. वृत्तीप्रवृत्तींनी भरलेले त्यांच्या कादंबरीमधले गुंतागुंतीचे जग - या सार्‍यांमुळे खानोलकरांचे लेखन वाचकांना व समीक्षकांना गूढ आव्हान देत राहते. विश्वाच्या अफाट पसार्‍यात आणि नियतीच्या निर्विकार दृष्टीसमोर माणूस अगदी नगण्य, शून्य आहे, हा बोध त्यांच्या सर्वच लेखनातून येतो.

अनाकलनीय, अतर्क्य दैवी शक्ती, पापपुण्याच्या संकल्पना, धार्मिक श्रद्धा, माणसाला कोणत्याही पातळीवर नेऊ शकणारी काम प्रेरणा, निसर्गाचे कोमल तसेच उग्रकठोर रूप, वासनांचे विखारी फुत्कार ही सूत्रे खानोलकरांच्या आशयबंधातून फिरून फिरून वेगवेगळे आकार घेताना दिसतात. या आशय सूत्रांची सामर्थ्याने व सहज अभिव्यक्ती करू शकणारी प्रतिमांकित भाषाशैली हे त्यांना लाभलेले वरदानच होते.

त्यांचा ‘जोगवा’ हा पहिला काव्यसंग्रह १९५९ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९६२ मध्ये ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दोन्ही काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या व्याकूळ, दु:खविव्हल अवस्थेतल्या कविता जास्त आढळतात. स्मृतिजन्य व्याकुळता हा त्यांच्या पूर्वार्धातील निर्मितीचा ठळकपणे जाणवणारा विशेष वाटतो. इतर समकालीन कवींप्रमाणे तपशीलवार प्रेयसी चित्रण त्यांच्या कवितेत येत नाही. प्रेयसीचे वर्णन करता करताच त्यांना दु:खाची जाणीव इतक्या तीव्रतेने होते, की पुढची कविता त्या अनामिक दु:खाचा अविष्कार होते.

जराच फिरली किनखाबीची सुई, जुईचा उसवित शेला,
आणि ठणकला गतस्मृतीचा , काळोखाने कापूर पेला -

अशी त्यांची वेदना अधिकाधिक तीव्र होत जाते.

त्यामानाने १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहात ते जास्त प्रसन्न वाटतात. आपल्या वेदनाकोशातून बाहेर आल्यासारखे वाटतात. यातील कविता संवादात्मक व नाट्यनिष्ठ आहेत. यातली एक नितांत सुंदर कविता-‘आड येते रीत’.
    ‘नाही कशी म्हणू तुला पहाटमाणगी,  परि घालायचे आहे तुळशीस पाणी
    नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परि सारे हलक्याने आड येते रीत...

या कवितेमधे पती-पत्नीमधील सूचक शृंगार हळुवारपणे व्यक्त झालेला आहे. यातील शृंगारभाव उत्कट असला तरी त्यातील कलात्मक संयम त्यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देतो.

आरती प्रभूंच्या संपूर्ण कवितेला सतत निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेली आढळते. नेमके आणि नीटस शब्द हे त्यांच्या निसर्गकवितेचे वैशिष्ट्य.
    हिरव्याशा गवतात हळदिवी फुले, हलकेच केसरात दूध भरु आले,
    उभ्या उभ्या शेतांमधे सर कोसळली, केवड्याची सोनकडा गंधे ओथंबली ..
अशा सुंदर रंग-गंध भरल्या शब्दांनी, प्रतिमांनी त्यांची निसर्गकविता नटलेली आहे.

कोणताही लेखक हा कवितेमधे आत्मप्रकटीकरण करतो. कादंबरीमधे मात्र लेखक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने आत्मप्रकटीकरण करण्याची संधी घेतो. म्हणून तर त्यांना गद्यलेखनाकडे वळावे लागले. माणसामधील व समाजामधील विकृतीचे चित्रण जे कवितेला कदाचित पेलले नसते, ते त्यांनी कादंबरी, नाटक व कथांमधून मांडले. त्यांनी उसवलेल्या माणसांचे विश्र्व आणि त्यांच्या आदिम वासना, प्रेरणांचा शोध आपल्या जाज्वल्य लेखणीद्वारे घेतला.

१९६६ मधे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक रंगभूमीवर आले. झाडे नग्न झाली, पाठमोरी या कथांमुळे ते लेखक म्हणूनही प्रतिष्ठित झाले. त्यांच्या चानी, कोंडूरा या कादंबरींवर चित्रपटही निघाले.

नियतीने त्यांना पुरे जीवन जगू दिले नाही. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षीच त्यांची प्राणज्योत मालवली, अन्यथा मराठी साहित्यात आणखी काही मोलाची भर त्यांनी निश्चितपणे घातली असती.

खानोलकरांची प्रतिमांकित भाषा ही मराठी वाङ्‌मयाला मिळालेली एक अमोल देणगी आहे. अशा प्रकारची गद्य काव्यसदृश भाषा मराठी कादंबरी, नाटकांमधून दुर्मीळ होत चालली आहे. त्यांच्या यशस्वीतेचे रहस्य आणि लौकिक अपयशाची कारणे पुन: पुन्हा शोधावी असे आव्हान ज्यांच्या कलाकृतींनी वारंवार समीक्षकांपुढे ठेवले अशा अनोख्या प्रवृत्तीचा कलावंत म्हणून खानोलकर वेगळे व महत्त्वाचे ठरतात.

केशवसुत-कृष्णाजी केशव दामले

मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!
आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून केशवसुतांचे नाव घेतले जाते. त्यापूर्वी अध्यात्मात अडकून पडलेल्या, पौराणिक कथा -आख्यानांत रंगून जाणार्‍या मराठी कवितेला त्यांनीच प्रथम सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. चाकोरीबद्ध कवितेला स्वच्छंद, मुक्त रूप दिले. सर्वसामान्य माणसांची सु्खदु:खे, भावभावना, वासना-विकार यांना कवितेत मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान दिले; कवितेला वास्तवतेचे भान दिले.

इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.

त्यांच्या एकूण फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यातून त्यांनी तोपर्यंत मराठीत कधीही न हाताळले गेलेले विषय- व्यक्तिगत स्नेहसंबंध, स्त्रीपुरुषांमधील प्रेमभावना, कवी व कवित्व, सामाजिक बंडखोरी, उदारमतवाद, मानवतावाद, राष्ट्रीय भावना, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, निसर्ग हे विषय- हाताळलेले दिसतात.  ही स्वच्छंदतावादी मनोवृत्ती काव्यातून प्रथमत:च व्यक्त होत असल्याने त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या, तरीही क्रांतिकारक व प्रवर्तक ठरल्या. आज (वर उल्लेख केलेल्या) अनेक विषयांशी संबंधित कवितांचे प्रवाह मराठी साहित्यात दिसतात. या सर्व प्रवाहांचा मूळ स्रोत म्हणजे केशवसुतांची कविता होय.

आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. त्यातही   त्यांची तुतारी ही कविता क्रांतिकारक ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा तुतारी मंडळ स्थापन झाले होते. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे नावाजलेले कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.

त्यांच्या कवितांमधून सामाजिक दु:ख, अन्याय, विषमता, अंधश्रद्धा हे विषय जसे आले, तसेच त्यांच्या कवितांमध्ये प्रेमभावनेचा प्रांजळ व नितळ अविष्कारही आलेला दिसतो. उदा. आपल्या पतीचे कुशल विचारणार्‍या पत्नीला ते म्हणतात ;

करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून
प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.   

किंवा

आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते, प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे, डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

काव्यविषयक दृष्टीकोन, कवितेचा आशय, तिचा अविष्कार या सार्‍याच बाबतीत क्रांती घडवणार्‍या , कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्‍या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

त्या काळात राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक; सामाजिक क्षेत्रात आगरकर ज्या तर्‍हेने भूमिका पार पाडत होते, तशीच भूमिका मराठी कवितेच्या क्षेत्रात केशवसुत यांनी यशस्वीपणे पार पाडली, असे निश्चितपणे म्हणता येईल.

शंभुराजे

फसवलंय तुम्हाला शंभुराजे याचा लागलाय सुगावा
औरंग्याच्या डोळ्यात पाणी दुसरा कशाला हो पुरावा ॥धृ॥

श्‌ऊशी नव्हतीच लढाई तुम्ही परंपरेशी लढलात
भीम पराक्रमाने तुमच्या सगळा गनिमही झुरावा ॥१॥

लढाया जिंकल्या तुम्ही पण कागदावर हरलात
भटाळलेल्या लेखण्या बदलून सांधावा लागेल दुरावा ॥२॥

सांगा कसं म्हणू तुम्हाला आता धर्मवीर आम्ही
धर्मानेच केला घात, कपटाने काढला कुरावा ॥३॥

आनंदासरु आले त्यांना जेव्हा काढले डोळे तुमचे
शिरच्छेद तुमचा व्हावा, धर्माचा कोंबडा आरावा ॥४॥

देवाची खाऊनी भाड हिजड्यांनी केला कावा
नामर्दाचा अंश अजून इथल्या मातीत उरावा ॥५॥

अती शहाणा त्याचा ....

पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.

ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यात खूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली.

मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडू लागला. डब्यातले सगळे लोक भीतीने खाली उतरले.
हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्या एका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.

जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली. तसा तो उठला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या माणसाला त्याने विचारलं,
"कोणतं स्टेशन आलं हो ?"

माणूस म्हणाला, "पुणे स्टेशन."

"काय? पुणे स्टेशन?",
तो तरुण गोधळून म्हणाला.

"होय, या डब्यात साप होता, म्हणून गाडी हा डबा इथेच सोडून सोलापूरला गेली,"
. . . .
तात्पर्य : अती शहाणा त्याचा बैल रिकामा...

ऐक क्वार्टर कमी पडते !!!

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...

पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो

स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...

पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते

आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते...
पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम 'पारो की दारु '
याचा मला अजून संशय आहे

प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात

प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते

जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते
आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही

पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते
पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...
परंतु दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते !!!

चड्डीला भोक

झम्प्या त्याचा मित्राला गण्याला विचारतो :- काय रे भूस्नाळ्या तुझा चड्डीला दोन भोक हायेत काय रे ???
.
.
.
गण्या :- नाय रे रतळ्या …. पण का रे …….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या :- फुकनीच्या मग पाय कशातून घालतोस रं..........

मंगलाष्टक

अंबा अष्टभुजा त्रिलोकजननी देवी कुलस्वामिनी आली लग्नघरा निवास करण्या आवाहना ऐकुनी आता
तीच उभी मुठीत मिटल्या घेऊनिया अक्षता माते, हो वरदायिनि वधुवरा, "कुर्यात सदा मंगलम"

तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली

पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा

याला कुंपण घालशील किती ?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भिती
अर्ध्या रात्री घालतील घाला

तुला पदरचे सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
साऱ्या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन्‌ गेला


गीतकार - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
गायिका - सुलोचना चव्हाण
देव :- काय पाहिजे?
.
दिनू :- पैशांनी भरलेली ब्याग, नोकरी आणि एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
.
देव :- तथास्तु !!!
.
.
.
.
आज दिनू मुलींच्या कॉलेजमध्ये बसकंडक्टर आहे !!!
संता - आज तुझ्या परीक्षेचा निकाल कळणार होता, काय निकाल लागला ?
पप्पू - मुख्याध्यापकांचा मुलगा नापास झाला...
संता - तुझे काय झाले ?
पप्पू - मेजर साहेबांचा मुलगा नापास झाला.
संता - अरे, पण तुझा निकाल काय आहे?
पप्पू - डॉक्टर साहेबांचा मुलगाही नापास झाला.
संता - अरे गाढवा, पण तुझ्या निकालाचे काय झाले? ते सांग...
पप्पू - तुम्ही काय 'पंतप्रधान' लागून गेले, जो तुमचा मुलगा पास होईल... !

आंधळ प्रेम

एक गर्लफ्रेंड तिच्या आंधळ्या बॉय फ्रेंड ला : तुझे डोळे असते तरतू पहिलं असतं मी किती सुंदर आहे:D
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेंड : खरच जर सुंदर असती तर डोळे असणार्‍यांनी तुला माझ्यासाठी सोडलच नसतं......
.
.
.
आंधळा आहे.....वेडा नाही मी..

पावसाळा जुना होत नाही..!

काय सांगु तुला सांग बाई..
पावसाळा जुना होत नाही !

रात आली उशिरा तरीही..
या पहाटेस नसणार घाई !

जीवनाला असे खोल खोदू ..
पूर यावा सदा बारमाही !

या विहिरी तशा ठीक..ओके..
बेडकांची किती सरबराई ?

भूतकाळा तुला माफ केले..
वर्तमानातला मी शिपाई !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

तिळ

तिथ गालाच्या बाजूला, नाकाच्या थोडं खाली..
ओठांच्या काठावर भेट 'तिळा'सवे झाली !

तिळ मनात भरला, तिळ डोळ्यात कोरला..
माझ्या ओठांनीही ध्यास सखे तिळाचा धरला !

भेट घेण्याला तिळाची जीव तिळ तिळ तुटे..
तिळ लपतो कुठेही त्याला शोधू कुठे कुठे ?

सांग शोधू कुठे कुठे आता तिळाला साजणी..
लपुनिया ओठामागे तिळ मिळाला साजणी !

नागिणीची धाव जशी तिच्या बिळावरी जाते..
माझी नजर साजणी तुझ्या तिळावरी जाते !

तिळ खुणावितो मला त्याच्या जवळ जावू दे..
माझ्या ओठांची साजणी भेट तिळाशी होवू दे !

माझ्यासाठी त्या तिळान असं कितीदा झुरावं ?
तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव !


गीत : ज्ञानेश वाकुडकर
गायक/संगीत : मिलिंद इंगळे
अल्बम : 'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव'
कविता संग्रह :  'सखे साजणी'

नको स्पर्श चोरू

नको स्पर्श चोरू..नको अंग चोरू..
सखे पाकळ्यांचे नको रंग चोरू !

तुझ्या पैजणांचा असा नाद येतो..
प्रीतीचा ध्वनिलाही उन्माद येतो..
नको ताल चोरू, नको छंद चोरू..
नको पावलांची गती धुंद चोरू..!!

असा कैफ यावा, असा वेग यावा..
मिठीला नवा धुंद आवेग यावा..
नको प्रीत चोरू, नको राग चोरू..
गुलाबी गुलाबी नको अग चोरू..!!

खुलू दे, फुलू दे तुझी गौर काया..
पुरे दाह झाला..नको और व्हाया..
नको गाल चोरू, नको ओठ चोरू..
पिवू दे.. नशेचे नको घोट चोरू..!!


कवी - ज्ञानेश वाकुडकर
शिक्षक : आज तु बोर्ड कडे पाहुन लक्ष देत आहेस... रोज लेक्चर मध्ये तर खाली पाहुन ऐकत असतोस.... आज काय झाला ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विद्यार्थि : सर माझा नेेेट पँक संपलाय.........

बिचारा संता

संता एकदा आग लागलेल्या इमारतीत घुसतो आणि आतून पाच जणांना बाहेर घेऊन येतो...

पण जमलेले लोक मात्र संतालाच बेदम मारतात

कारण ज्या लोकांना संता बाहेर आणतो ते अग्निशमन दलाचे कर्मचारी असतात.
एक वेडा पत्र लिहित असतो.

डॉक्टर विचारतात कोणाला पत्र लिहित आहेस

वेडा - स्वतःला

डॉक्टर - काय लिहिले आहे?

वेडा - मला काय माहित! अजून मला पत्र मिळाले नाही
हत्ती मुंगीला लग्नासाठी प्रपोज करतो.

मुंगी - मीसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते.

हत्ती - मग, लग्नाला नाही का म्हणतेस?

मुंगी - मी तुला किती वेळेस सांगितले, माझ्या घरच्यांचा इंटरकास्ट लग्नाला विरोध नाही परंतु इंटरसाईझला आहे.

गोलकीपर

खेळाचे एक शिक्षक नव्याने रुजू झाले व ग्राउंडवर गेले. ग्राउंडवर मुले फुटबॉल खेळत होती व एक मुलगा एकटाच उभा होता.

गुरुजी : तू त्यांच्यासोबत खेळत का नाहीस? काही अडचण?

मुलगा : नाही मी येथेच बरा आहे.

गुरुजी : अरे पण का एकटाच उभा आहेस?

मुलगा : (चिडून) कारण मी गोलकीपर आहे.