पेशंट -   डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय

डॉक्टर -    वयानुसार असं होणारच

पेशंट -    पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे

स्थळ- अर्थात पुणे.
आधार कार्ड काढून मिळेल".

असा बोर्ड वाचून गण्या हापिसात शिरला..

"सायेब...आधार कार्ड काढून पायजेलाय."

"हं...बसा."

"चला की सायेब."

"आं........

कुटं चला ?"

गटारीत पडलया आधार कारड..

काढून द्या की चला..
डाॅक्टरः तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे. मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पत्नी: किती वेळा देऊ.

डाॅक्टरः देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात.
स्थळ :- अर्थातच पुणे
पण पाहूणा  सोलापूरचा


नवरा :- अगं, ऐकलस का?
घरी पाहुणे आलेत ना, त्यांना
जेवणाचे विचार जरा...


बायको :- भावजी, तुम्ही घरून
जेवून आलात की घरी गेल्यावर
जेवणार??

सोलापूरचा पाहुणा : - न्हाई मी हितचं जेवणार 😅

बायको: डबा घेऊनच आलाय काय?😆😆🤦‍♂

सोलापूरचा पाहुणा : - व्हय... भरून पण न्हेणार हाय...
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली व अधिकतर आई बाप आपल्या लहान मुलांना / मुलींना स्किल डेव्हलपमेंट / पुढील वर्षांचे ट्युशन क्लास वगैरे मधे घेऊन जाताना बघितल्यावर...

कार्बाईड चा वापर करून हिरवे आंबे लवकरात लवकर पिकवणारा व्यापारी डोळ्या समोर आला.

🤣🤣🤣 घोर अपमान 🤣🤣🤣

नवरा: (कौतुकाने सांगतोय) लहानपणी आषाढीला शाळेत मला नेहमी विठोबा चा रोल देत असत...

👩बायको: बाकी सर्व मूलं गोरी असतील ना ...
एकदा एक व्यक्ति मेल्यानंतर नरकात पोहोचला.

त्याने पाहिले की प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही देशाच्या नरकात जाण्याची मुभा आहे.

 त्याने विचार केला ....

 चला अमेरिकन लोकांच्या नरकात  जावून पाहू,

जेव्हा तो तिथे पोहचला तेव्हा त्याने दरवाज्यावरील पहारेकऱ्याला विचारले:

काय भाऊ ,अमेरिकन नरकात काय काय चालतं ?

 पहारेकारी म्हणाला : काही ख़ास नाही,

सर्वात आधी आपल्याला एका विद्युत् खुर्चीवर एक तास बसवून शॉक दिला  जाईल,

 मग आपल्याला एका खिळयांच्या खाटेवर  एक तास झोपवले जाईल,  त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके मारेल ..... !

हे ऐकून तो व्यक्ति खुप घाबरला आणि रशियन नरकाकडे गेला, आणि तेथील पहारेकऱ्याला तेच विचारले .

 राशियन नरकाच्या  पहारेकऱ्याने सुद्धा तीच वाक्ये ऐकवीली जी अमेरिकन नरकाच्या पहारेकऱ्या कडून ऐकून आला होता.

 मग तो व्यक्ति एक एक करत सर्व  देशांच्या नरकाच्या दरवाज्यावर जावून आला,सर्व ठिकाणी त्याला भयानक किस्से ऐकायला मिळाले.

शेवटी जेव्हा तो एका ठिकाणी पोहचला, 

 तेथे पहातो तर दरवाज्यावर लिहिले होते  "भारतीय नरक" 

आणि त्या दरवाज्या बाहेर
त्या नरकात जाण्यासाठी मोठी रांग लागली होती,लोक भारतीय नरकात जाण्यासाठी उतावीळ होत होते, 

त्याने विचार केला की येथे नक्की कमी शिक्षा मिळत असावी ...... ताबडतोब  त्याने पहारेकऱ्याला विचारले की शिक्षा काय आहे ?

पहारेकारी म्हणाला : काही विशेष नाही

सर्वात आधी आपल्याला विद्युत् खुर्चीवर एक तास बसवले जाईल व इलेक्ट्रिक शॉक दिला जाईल.

मग एका खिळयांच्या खाटेवर एक तास झोपवले जाईल,

त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके घालेल ...!

चक्रावून त्या व्यक्तिने त्याला विचारले :
 हे तर बाकीच्या देशांच्या नरकात पण होत आहे.मग इथेच गर्दी का??

पहारेकरी म्हणाला; विद्युत खुर्ची तिच आहे पण भारनियमन आहे विज नाही.

खिळ्यांच्या खाटेवरील खिळे कुणीतरी काढून नेले आहेत.

आणि फटके मारणारा राक्षस ??

तो जि.प.चा कर्मचारी आहे.
येतो सहि करतो चहा नाश्त्याला निघुन जातो.

आणि चुकून आलाचं तर एक दोन फटके मारतो. अनं पंन्नास लीहीतो.
मध्यरात्री एका घरात चोर घुसला.🚶

चोराने बेडरूममध्ये दोरीनं पुरुषाला बांधून ठेवलं. आणि बाईला चाकू दाखवत, सगळे दागिने काढ म्हणाला.. 😎

बाई विनवणी करत रडत म्हणाली,
हे पाच लाखाचे दागीने घे.... तिजोरीतले रोख दोन लाख घे ... वाटले तर मला बांधून ठेव मी आरडाओरड ही करणार नाही... पण दादा तुझ्या पाया पडते फक्त याला सोड...
चोराच्या डोळ्यात पाणी आले चोराने का म्हणून विचारले..बाई म्हणाली,तो शेजारणी चा नवरा आहे. 😂
माझा आता एवढ्यात ड्यूटीवरून येईल.

भन्नाट प्रपोजल :

मुलगा-
“तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील,
की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील..??”

मुलगी-
“तुटलेल्या चपलेने मार खाशील,
की चप्पल तुटेपर्यत मार खाशील..??”
गुरुजी = गण्या, ५२ गावांची नावे सांग
गण्या = चाळीस गाव ,आणि बारामती

गुरुंजी राजिनामा देऊन वनवासाला निघुन गेले
मुलगा :-  तुला एकूण भाऊ किती ?



 मुलगी :- तुला धरून तीन
(खेळ खल्लास)

आणि भारत सज्ज झाला.....

१४ महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन ,
आपल्या ५ वर्षांच्या मुलीला हाताने ओढत,
७ वर्षाच्या मुलीच्या कडेवर बसलेल्या
३ वर्षाच्या मुलीला बिस्किटाचा घास भरवत,
ती ६ महिन्यांची पोटुशी माऊली,
अनवाणी पायाने, 'यावेळी मुलगाच होऊ दे!',असा नवस बोलण्यासाठी मंदिरात आली..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

गळ्यात ताईत आणि मनगटाला गंडा बांधला,
नाकात दोन दोन थेंब टाकून, परातीतल्या पाण्यात हात बुडवून, कावीळ उतरवली,
आणि सापाचे विष उतरवण्यासाठी मांत्रिक गाठला!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

मुलीच्या लग्नात १० तोळे सोने आणि लाख भर हुंडा शेत विकून दिला, शिवाय तिचं बाळंतपण सुद्धा केलं!
बाळाच्या जावळाला बोकड कापून जेवणावळी घातल्या!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

बाई कमावते, नवरा दारूत उडवतो, रात्री पायाखाली तुडवतो.
तरीही वंशाचा दिवा हवा म्हणून सासू रुसून बसली!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नापिकीला कंटाळून बाप हवालदिल झालाय! तंगड्या वर करून बसलेल्या मुलाच्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय! हळदीला डीजे नाही आणला तर लग्न नाही करणार म्हणते धाकटी मुलगी!
नांदवायचं नाही म्हणताहेत सासरचे, म्हणून घरी आली मोठी मुलगी..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

नव्या गाडीच्या नंबर प्लेटला  लिंबू मिरची बांधली,
राहत्या घरातले स्वयंपाकघर पूर्वेचं पाडून पश्चिमेला बांधलं,
नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्सट्रा लेटरही जोडून घेतलं
आता कुठे पोरगा बिनपगारी मास्तर म्हणून नॉन ग्रांट च्या शाळेत लागला

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!
भारताची लोकसंख्या आता एकाच गोष्टीने रोखली जात आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

शाळेची फी
मुलांना वाया जाऊ द्यायचे नाहीये ? मग दोन मिनिटे वेळ काढून वाचा

शेजारशेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत.

हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.

एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.

त्या आजोबांचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे होते !!

आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत.”

Note : आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.. जितके जास्त जपाल तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) म्हणजेच भरोशावर जगणार नाही !
हेच खरे पालकत्व आहे !!!!
- अच्युत गोडबोले (मानसोपचार विशेषक)
पिऊन आलेला नवरा : तू जाडी, काळी, रताळी...,,..!!!

बायको चिडून : तू दारुड्या, बेवड्या, नशेडी...😡😡😡

नवरा जोराजोरात हसुन : माझं काय... मी तर सकाळी ठीक होईल... ।

पण तू तर अशीच राहणार!!!  😎😂

 एका लहान मुलाला विचारले
'कोणत्या शाळेत जातोस?'









तो म्हणाला 'मी जात नाही!....मला पाठवतात...😏
सूचना...

जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक ;
व्हाट्सप वर टाकू नये...!

त्यामुळे...

जे कधी कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडणं होतात...!!

मिसळ - एक रसग्रहण एक अमृतानुभव ( आणि काही उपयोगी टीप्स )

मिसळ खाणे हा एक आनंद सोहळा असतो.

मिसळ हा खरं तर गरीबापासून श्रीमंतांपर्यन्तचा राजमान्य राजश्री बेत. अश्या या मिसळीचा स्वाद घेण्याचे एक शास्त्र आहे.

म्हणजे बघा, उत्तमात-उत्तम मिसळ कुठे मिळेल याची आधी माहिती काढावी. मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ हादडली याला काहीच अर्थ नाही.

मिसळ खायला जाण्याच्या आधी त्या मिसळीचा इतिहास, बनवण्याचं  तंत्र, मिसळीतले घटक पदार्थ, यांचा अभ्यास करावा.

उगाच चिचूंद्रया वाटीत, पातळ बेचव रस्सा देणाऱ्या मिसळीच्या दुकानात पाऊलही ठेवू नये.

अश्या निवडलेल्या मिसळीच्या ठिकाणी शक्यतो कमी गर्दीच्या वेळी पोहोचावे.

चांगली उजेडाची आणि हवेशीर जागा बघुन आपली बैठक मारावी आणि मिसळ ऑर्डर करावी.

काही ठिकाणी मिसळ ऑर्डर केली की आधी कांदा आणि लिंबू याची प्लेट आणून देतात.

काही मुर्ख लगेच त्यातील कांदा तोंडात टाकतात, लिंबु चाखुन बघतात. असं कधीही करु नये.

हे म्हणजे वाग्दत पत्नीला भेटण्यासाठी गेलेलं असतांना, तिच्याच धाकट्या बहिणीवर नजर टाकण्याइतकं आचरटपणाचं आहे.

हे असले पदार्थ मिसळ खाण्याआधी तोंडात टाकून तुम्ही जिभेचा स्वाद ही बिघडवून टाकता.

तर, मिसळ समोर येवु द्यावी. मिसळ शक्यतो आडव्या मोठ्या डिश मध्ये असावी. उगाच छटाकभर गोलाकार डिश मध्ये अजिबात असू नये.

समोर उजव्या बाजूला कमीत कमी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा असावा. त्यात कोथिंबीर असणं क्रमप्राप्त आहे. नसेल, तर सरळ निषेध नोंदवा. कांद्या बरोबर लिंबाच्या फोडी असाव्यात.

डाव्या बाजूला गरमागरम, चमचमित रश्याचं भांडं असावं.

त्यातील लाल-पिवळा, काळसर तर्रीबाज रश्याचा वास नाकाच्या रंध्रा रंध्रात सामावून घेत जीभेला आवाहन करावे. नुसत्या त्या वासाने जिभेत उत्साह सळसळला पाहिजे.

सर्व मांडामांडी झाली की लगेच भसकन मिसळ खायला सुरुवात करू नये.

प्रथम मिसळी मध्ये काय काय आहे याचा अंदाज घ्यावा. ती व्यवस्थित मिसळून घ्यावी. मस्त मिसळून झाली कि त्यातील रस्सा शेव, पापडी, शेंगदाणे इत्यादी पदार्थात शोषला जातो. मिसळ थोडी घट्टही होते.

मग रस्सा चमच्याने व्यवस्थित घुसळून त्यातील उसळीचा भाग या मिश्रणावर नीट पसरवावा. मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे.

त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी.

सर्वात शेवटी, चवी पुरते लिंबू पिळावे. उगाच समोर आहे म्हणून भरमसाठ लिंबू पिळून मिसळीचा स्वाद बिघडू नये.

आता पाव. तो मऊ, लुसलूशित ताजातवाना असावा. कडक झालेला, सुरकुतलेला, काळे ठिपके असलेला पाव लगेच धुत्कारुन लावावा.

पावाची डिश डाव्या बाजूला ठेवावी. आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी.

पावचा छोटा टुकड़ा तोडून तो मिसळ मध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा जिभेवर अभिषेक करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात!

हळूहळू, स्वाद घेत घेत खावे. मधुनच कच्चा कांदा चवी पुरता खावा.

खातांना घाई करु नये. तसंच खात असतांना ऑफिसचं काम, साहेबाचा विक्षिप्त स्वभाव, राजकारण असल्या क्षुद्र गोष्टींची चर्चाही करु नये.

मिसळ खाणं हे एक योगसाधन आहे.

प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. तो मिसळीचा विनयभंग असतो.

पावामुळे डिश मधले रस्स्याचे प्रमाण कमी होते. मग थोडे खाणे थांबवावे. पुन्हा रस्साचे भांडे समोर आणावे. ते गरम नसेल तर दूसरे आणायला सांगावे. मग पुन्हा तो गरमागरम रस्सा आपल्या मिसळीत टाकून, मिसळून घ्यावा.

हा रस्सा भांडयातून मिसळीवर टाकतांना त्याचे दोन चार थेंब तुमच्या कपड्यावर उडालेच पाहिजेत. नाहीतर तुम्ही मिसळीशी एकरूप झालाच नाही असा अर्थ होतो.

पुन्हा कांदा, लिंबू याचे सोपस्कर करावे. आणि पुन्हा खायला सुरुवात करावी.

आणि असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

जास्तीत जास्त दोन पावात मिसळ खावी. आपला उद्देश मिसळ खाणे हा आहे, पाव खाणे नाही. त्यामुळे पाव कमी, मिसळ जास्त असू द्यावी. तरच मिसळीचा मान राखला जातो.

नुसतंच पोट भरेपर्यंत खाऊ नये. आत्मा संतुष्ट होईपर्यंत खावं.

खातांना डाएटींग, ब्लड शुगर, कोलेसटेरॉल असले चिंताजनक विचार डोक्यात आणू नयेत.

खाऊन झालं कि रिकाम्या डिश मध्ये एक मोठा चमचाभर रस्सा ओतून घ्यावा. चमच्या चमच्याने तो रस्सा ग्रहण करावा.

तुमच्या नाकातून, डोळ्यातून पाणी आलं आणि कपाळावर घामाचे दवबिंदु जमले कि मिसळ सुखरूप पोहोचली हे ओळखावं!

आता तुम्ही हात धुवायला मोकळे!

ज्या कोणा अन्नपुर्णेने ही मिसळ बनवली तिचे आभार मानावे, तिला दीर्घायुष्य चिंतावं.

समोरचा चहा घेण्याआधी जरा हाताचा वास घ्यावा.

मिसळ अजूनही आपल्या बोटांवर रेंगाळत असते, पुन्हा येण्याचं वचन मागत असते!

भयसापळा, मोहसापळा

पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो.
याला भयसापळा असे म्हणता येईल.

जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही..!

माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.

आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं,
हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

                                                    🐚☀🐚
बालपण कुठे मिळाले तर पाठवा
पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत

झोप कुठे मिळाली तर पाठवा
पुष्कळशी स्वप्ने अपुरी राहिली आहेत

आराम कुठे मिळाला तर पाठवा
खुपशी सुखे उपभोगायची आहेत

नाती कुठे मिळाली तर पाठवा
माणसुकीला शोधायचे राहिले आहे

"मी" कुठे मिळालो तर मला पाठवा
माझ्या"मी" पणांत मीच हरवलो आहे.
एका ७५ वर्षीय वृद्ध गृहस्थाला एका आर्थिक गुंतवणूक तज्ञाने सांगितलं कि, काका, तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा 7 वर्षानंतर भाव दुप्पट होणार आहे.

ते गृहस्थ म्हणाले, ' मुला, मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहे की, जिथे मी केळीसुद्धा कच्ची विकत घेत नाही.
एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे

कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार
होते
तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला
म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला
त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद
झाला
लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले
अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे
निश्चित होते
त्या माणसाला काही सुचेनासं झालं

पण तासा भरात एक चमत्कार झाला
आणि कोणी तरी दरवाजा उघडला
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता

त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला
प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले
की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय

सुरक्षा रक्षक म्हणाला
या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे
आहात की
जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता
आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण
संध्याकाळी गेला नाहीत
म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो

त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे
एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे
एक दिवस त्याचा जिव वाचवेल

म्हणून नेहमी लक्षात ठेवा

जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.

माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल...
म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा...🙏💐🙏👏
नातू : आजोबा.. तुम्ही लाईफ इन्शुरन्स का नाही केलं ?

पुणेरी आजोबा : मी गेल्यावर.. तुम्हाला खरोखरचं दुःख व्हावं म्हणुन !!
पुण्याचा प्रसिद्ध वाडा आहे शनिवार वाडा .

एक दिवस सायंकाळी 5 वाजता वाड्याच्या आजूबाजूला बऱ्याच प्रेक्षकांची गर्दी झाली होती. ह्याच गर्दीत एक जोडपं एकमेकांशी भांडण्यात व्यस्त होतं. साधारण पणे 200 लोकं त्यांच्या ह्या तमाशाची मजा घेत होते. काही लोकं याचा वीडियोही बनवत होते. 

भांडणाचं कारण हे होतं की बायको नवऱ्याजवळ हट्ट करत होती . "आज तुम्ही कार खरेदीच करा. मी थकलेय तुमच्या मोटर सायकल वर बसून बसून." 

नवरा बोलला ये वेडे उगीच जगासमोर तमाशा करू नकोस. गपगुपान मला चावी दे.

बायको बोलली नाही देणार . तुमच्याकडे एवढा पैसा आहे त्यामुळे तुम्ही आज कार घेतली तरच घरी येईल.

नवरा बोलला "अगं बाई तुझ्या पाया पडतो. बरं घेवूयात कार आता तरी चावी दे " 

बायको:  नाही देणार.

नवरा:  "बरं नको देवूस मी आता गाडीचं लॉकच तोडतो."

बायको ओरडली "जा तोडा पण ना चावी देणार ना तुमच्या सोबत येणार."

नवरा:  "असं असेल तर हे घे मी कुलुप तोडतोय.  जा तुझी मर्जी आता माझ्या घरी येवू नकोस. "

बायको: जा जा नाही यायचं मला तुमच्यासारख्या कंजुष माणसासोबत.

नवऱ्याने लोकांच्या मदतीने मोटरसायकलचे लॉक उघडले त्यावर बसला व बायकोला म्हणाला "तू येणारेस की जाऊ मी ?"

तिथं उभ्या असलेल्या लोकांनी त्याच्या बायकोला समजावलं " अगं जा बाई , एवढ्याशा गोष्टीमुळे कशाला स्वतःच्या संसाराचं वाटोळं करतेस?"

मग बायकोने नवऱ्याकडनं वचन घेतलं की "तो ही बाईक विकून लवकरच कार घेईल" दोघांचा समेट झाला व दोघं तिथनं निघून गेले.

मस्त आहे ना गोष्ट? 

पण अजून संपली नाही बरंका .

तर मित्रांनो,

बरोबर आर्ध्या तासाने परत त्या ठिकाणी गर्दी झाली.

एक माणूस जोरजोरात व डोक्यावरचे केस ओढून ओढून बोंबलत होता की "कोणी तरी माझी मोटरसायकल दिवसा ढवळ्या चोरून नेली. "

त्यानंतर संपूर्ण वाड्याच्या आजूबाजूला शांतता पसरली .

😂😂
एक मतदार EVM समोर बराचवेळ उभा असतो ...
मतदान अधिकारी विचारतो, काय झाले तुम्ही इतक्या वेळ का लावत आहात ..?


मतदार म्हणतो :

"तसं न्हव ...,
ते रात्री कुणी पाजली त्याचं नावचं आठवत नाही ...!"
शिक्षक : सांग गाढवाला  इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

दिण्या : ड़ोंकी ..

शिक्षक : खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना..

दिण्या :- नाही सर देवा शपथ… मी तुमच्याकडे बघून बोललो…!
पंगतीमधे मिठ वाढणारा
पुन्हा मिठ वाढायला येत नाही.
तसेच आयुष्यात काही लोकं
असेचं मिठासारखे असतात.
प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने
कदाचित काही फरक पडणार नाही
पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.
त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणार्या लोकांना जपा
कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. ||       
मास्तरांनी प्रयोगशाळेत मुलांना प्रयोग दाखवताना आपल्या खिशातून १० रू चं नाणं काढलं आणि ते Acid मध्ये टाकलं व विचारलं "आता सांगा हे नाणं ह्यात विरघळणार की नाही विरघळणार ?"
.
अंकुश: "सर, नाय विरघळणार."
.
मास्तर: "शाब्बास. तू कसं ओळखलंस?"
.
अंकुश: "सर Acid मध्ये नाणं टाकून ते विरघळणार असतं तर
ते तुम्ही आमच्याकडून मागून
घेतलं असतं. तुमच्या खिशातून टाकलं नसतं."

😂😜😂😜😂😜 

पोरगं पुढे RBI चं Governor झालं.
काल माझ्या डॉक्टरांशी गप्पा मारत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप  इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी  वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :  ' डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???'
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
तुझा पगारच कमी आहे ... 
बायको आपल्यावर खुपच प्रेम करते असे वाटत असेल तर,

जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा...

तुमचा सगळा गैरसमज दूर होईल...!!
बायको आशावादी आहे कि निराशावादी हे पाहण्यासाठी मी अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला तर ती उचकटून म्हणाली....

"पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेवा !"

ना आशावादी ना निराशावादी, फक्त वादावादी...
लग्न झालेल्या मंडळींचं आयुष्य काश्मीर सारखं झालंय....

सुंदर आहे
पण
दहशत खूप जास्त आहे...  
तुमचा कुत्रा चावतो का?

नाही.

मग खातो कसा?

-एक अतिचिकित्सक पुणेरी

W

W

दारूचा उपवास

एक महाशय वारले, आणी डायरेक्ट स्वर्गात गेले,
त्यांना आश्चर्य वाटले कि, मी जीवनात सर्व खोटी कामे केलीत, आणि आयुष्यभर दारू पिऊन झोपून राहिलो, तरी मला स्वर्गात जागा कशी ?

2-3 दिवसांनंतर त्यांनी थेट  यमराजालाच विचारले, प्रभू.. मी आयुष्यभर एकही चांगले काम केले नाही, तरी मला स्वर्ग, आणि इतर भल्या माणसांना नर्क, असे का ?

यमराजांनी हसून उत्तर दिले...

बाळा, त्याचे असे आहे कि, तु बहूतेकवेळा दारू 🍻🥂🥃🍺पितांना शेंगदाणे खायचा,पिल्यानंतर न जेवता झोपायचा, आणि हे सर्व उपवासात मोजले जाते.... म्हणून तुला स्वर्ग 
कपाटातून सापडली लहानपणाची खेळणी, माझ्या डोळ्यातील उदासी पाहून मला बोलली...




"खुप हौस होती ना मोठे होण्याची..."
पूर्वीच्या बायका मुली सकाळी सकाळी ठिपके जोडून रांगोळ्या काढायच्या ,
आणि आता  सकाळीच  ठिपके जोडून मोबाईल चा पॅटर्न लॉक उघडतात ....

"क्रांती" यालाच म्हणतात बहुतेक
मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही...
किती वेळ लागतो...
बोअरिंग काम... 
इंग्रजित कसं पटापट
टाईप होतं...
तुमचं मराठी म्हणजे......"

मी त्याला सांगितलं,
"अरे बाबा श्रीमंत आणि
गरिबामध्ये तेवढा फरक असणारच".

तो खुश होऊन म्हणाला
"चला म्हणजे मराठी गरीब
हे तू मान्य केलंस तर"??

मी म्हटलं 
"मित्रा चुकतोयस तू.. 

इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?"

तो म्हणाला २६..

मी म्हटलं 

"मराठीत याच्या दुप्पट

५२ आहेत..

इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता
आहे आमची..

आता सांग,
कोण गरीब आणि
कोण श्रीमंत?

केवळ जीन्स घालून बाहेर
पडणारी स्त्री पटकन
तयार होऊ शकते..

पण भरजरी कपडे घालून
सर्व दागदागिने धालून
बाहेर पडणारी स्त्री
जास्त वेळ घेणारच..

आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..

म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही,
तिचं सौंदर्य बघून सर्व धन्य होतात."
गण्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला....
.
.
.
गण्या -  माझ्या वरच्या दातात कीडा होता मग तुम्ही खालचा दात का काढला ????
.
.
डॉक्टर -  तो कीडा खालच्या दातावर उभा राहून वरचा दात कोरत होता,
.
.
आता बघू कुठे उभा राहतो
एके दिवशी वेदनांनी बेजार झालेला बंड्या डॉक्टरांच्याकडे कसाबसा गेला ....


बंड्या  : डॉक्टर.... साहेब.. ..आह ..पोटात ...... अग आई ग...खूप... दुखतय...आह ....

डॉ : अच्छा !! हे सांग शेवटचे जेवण कधी आणी काय जेवला होतास..?

बंड्या  : जेवण नेहेमीचेच हो.. रोजच्या सारखे ....

डॉ : अच्छा अच्छा!! (२ बोटांची खूण करत ) इकडे शेवटचं कधी गेला होतास ...?

बंड्या : रोजच प्रयत्न करतो पण....पण.... होतच असे नाही... गेले तीन दिवस......


डॉ समजले याला ... constipation आहे...


डॉक्टर आत गेले आतून एक औषधाची बाटली ...आणि सोबत एक कँल्क्युलेटर  पण घेऊन आले ...


बंड्याला विचारले - घर किती दूर आहे तुझे ?

बंड्या  : 1 km

डॉक्टरांनी कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व चार चमचे औषध काढून एका वाटीत ओतलं.

डॉ : वाहनाने आलास की चालत ?

बंड्या  : चालत ..

डॉ : हं... जाताना धावत जा...


डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : घर कितव्या मजल्यावर आहे ?

बंड्या : तिसऱ्या मजल्यावर.

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : लिफ्ट आहे की जिना चढून जाणार ?

बंड्या  : जिन्याने ...

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे...

घराच्या मुख्य दरवाज्यापासून टॉयलेट किती दूर आहे ?

बंड्या : जवळजवळ २० फुट..

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले........

व म्हणाले

आता माझी फी आधी दे..मग औषधाचा हा डोस घे...मग कुठेही न थांबता फटाफट घर गाठ...नंतर मला फोन कर....!

बंड्या ने तसंच केलं.......

अर्ध्या तासाने डॉक्टरांना बंड्याचा फोन आला ...

एकदम बारीक थकलेल्याआवाजात.........

डॉक्टर साहेब औषध तर उत्तम, जालिम होत हो तुमचं. पण तो कँल्क्युलेटर ठीक करुन घ्या हो...

.

.

.

फक्त 10 फुटांनी हारलो ना मी......
*दोन बायकांचा ऑफिस मधील संवाद :*

पहिली : अगं, माझी कालची संध्याकाळ मस्तच गेली, तुझी कशी गेली?

दुसरी : एकदम नकोशी. काल माझा नवरा घरी आला 3 मिनिटात जेवला आणि दोन मिनिटात झोपला. तुझं?
पहिली : एकदम मजेत. माझा नवरा घरी आला आणि मस्त जेवायला बाहेर घेऊन गेला. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत तासभर चालत घरी आलो. घरी आल्यावर त्याने घरभर पणत्या लावल्या. खरोखर एखाद्या परिकथेसारखंच वाटलं मला.

*त्याचवेळी कामावर नवर्यांचा संवाद*

पहिला : कशी गेली कालची संध्याकाळ?
दुसरा: उत्तम. घरी आलो जेवण तयारच होतं, मी जेवलो आणि पटकन झोपलो. तुझं?

पहिला : अरे एकदम भयानक. घरी आलो, जेवण तयार नव्हते, वीजबिल न भरल्यामुळे घरात वीज नव्हती; म्हणून बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेलो ते इतके महाग होते की रिक्षाने यायला पैसेच उरले नाही. मग पायीच घरी चालत आलो, घरी वीज नसल्याने घरभर पणत्या लावल्या.

**तात्पर्य *: तुम्ही जगाला कसं भासवता हे महत्वाचे.... मग वस्तुस्थिती काही का असेना? .....*

*चाणक्य म्हणतो,*
*जर तुम्हाला नवऱ्याबरोबर आनंदात राहायचे असेल तर त्याच्यावर प्रेम कमी केलं तरी चालेल पण त्याला पूर्ण समजून घ्या.*
*आणि*
*जर तुम्हाला बायकोबरोबर आनंदात राहायचे असेल तर तिच्यावर मनापासून भरपूर प्रेम करा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करू नका.*

*सर्व विवाहित दाम्पत्यांना समर्पित**
निळू फुले बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला
डोळा मारतात  .

बाई : अहो. .
मि तसली बाई नाही आहे.

निळू फुले : बाई ऽ ऽ ऽ
ते ठिक आहे पण
चेक करणे आमचं काम आहे.
शिक्षक: चालढकल ह्याचा अर्थ सांग
बंड्या: सर,उद्या सांगितला तर चालेल??
सर्वात कमी दिवस काम करून वर्षभरचे पैसे कमावण्याचे कर्तुत्व भारतात फक्त दोनच गोष्टींकडे आहे:




फाल्गुनी पाठक
आणि
मोती साबण ...
मुलगी : 'देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे. मला हवं असलेलं सगळं मिळविण्याची माझ्यात ताकद आहे. मी जगातल्या सगळ्या गोष्टीत यशस्वी होऊ शकते.

पण, माझे आई-बाबा म्हणताहेत की लग्न कर. देवा मला नवरा नकोय.'

देव : 'मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस. यापुढेही तुला यश मिळतच राहील.

पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते, तुझा पराभव होऊ शकतो, तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते.

अशा वेळी तू कोणाला दोष देशील? कुणावर खापर फोडशील?'
*...त्यासाठी तुला 'नवरा' असलाच पाहिजे.*
😜😜😀😀😀😂😂😂

🎉 मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉

🙏🏻 कुसुमाग्रजांना वंदन करुन संत तुकारामांच्या चरणी केलेली ही आगरी विनवणी 🙏🏻

तुका तुला परत
वैखुंटानशी यवाला लागल...
गीता नाय त कविता तरी
परत ऐकवाला लागंल...

मायबोलीला नाय राला
आया कयाच र स्थान
मराठीचा पुन झेत चाल्यान
आपलीच लोखा प्रान
अमृताशी पैजा जिकाला
तुला पुष्पक इमान काराला लागंल....

तुका तुला परत यवाला लागल...

बायेरचे देशान तुझं अभंग
बेस्ट सेलर मनुन इकतान
सांग पन आपले घरान
कवरी जना वाचतान
अाता खारीन नय बावरीन तरी
तूझं अभंग तराला पायजे

तुका तुला परत येवाला लागल...

आपलेच भाषेला बोलताव आपण
गावरान ना गावठी
सांग कशी टिकल म
आपली र मराठी
धवलारीनला पुन हालदीन आता
इंग्लीश धवला गावला लागंल....

तुका तुला परत येवाला लागल...

चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... अनेक दिवस उलटली.... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'
- का यावा?
- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -
- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
- म्हणजे ?
- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो.... !!
- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.
बायको : आज मला कसंतरी होतय
नवरा : अग आजच्या दिवस  सहन कर
संक्रांतिचं गोड गोड बोलण्यामुळे होत असेल.

उद्यापासून वाटेल बरं
पप्पु - उद्या पासनं मी शालेत  जाणार नाई .।।

मम्मी - कावून ?

पप्पु - ती बाई स्वतः ले का समजुन राईली का
           माईत नाई  ??

मम्मी - काय झालं ??

पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिव्हल
          " महाभारत " .

आणि मले विचारले सांग म्हने महाभारत कोणी लिहिले ??

मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिव्हल .।।

तिने मले लई मारल...खरं बोलाचा जमानाच नाई रायला आता तर........ ।।
अमेरिकेत एका शहरात नवरे विकत मिळण्याचे दुकान होते.… दुकान म्हणजे चक्क पाच माळ्यांची अलिशान बिल्डींग!! जसजसे एकेक माळा वर चढू तसतसे नवऱ्यांची क्वालिटी वाढत होती.!!

तर त्याचे झाले काय…

आपली चिंगी सहज फिरत फिरत अमेरिकेत जाते... आणि तिला हे दुकान दिसते... अरे वा!! "आमच्या इथे नवरा विकत मिळेल" अशी पाटी पाहून जाम खुश झाली.!! इथून मस्तपैकी एक झक्कास नवरा घेऊन जावा असा विचार करून आत शिरली...

पहिल्या माळ्यावर पाहिले तर तिथे सूचना होती... "इथल्या सर्व पुरुषांकडे जॉब आहे."
चिंगी खुश झाली.!!
पण वरच्या माळ्यावर जाउन आणखी चांगल्या क्वालिटी चा नवरा घ्यावा असा विचार केला…

दुसऱ्या माळ्यावर बोर्ड होता: "येथील सर्व पुरुषांकडे जॉब आहे आणि स्वतः चे घर आहे.!!" चिंगी जाम खुश झाली. "च्यामारी लैइ भारी" असे म्हणली. पण हावरटपणा नसेल तर ती चिंगी कसली.?

आपल्याला आणखी चांगला नवरा पायजेल असे म्हणत तिसऱ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब व घर आहे. तसेच ते घर कामात सुद्धा मदत करतात.!!"
आता मात्र चिंगी उड्या मारू लागली.

आता हिथून ह्यापेक्षा भारीवाला नवरा घेऊनच जाणार असा विचार करून चौथ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब , घर आहे. तसेच ते घरकामात मदत करतात आणि तुमचे पाय सुद्धा चेपून देतात."

"अहाहा कित्ती मस्त.!!" पण आणखी वरच्या माळ्यावर जाउन ह्यापेक्षा भारी नवरा मिळवावा असा विचार केला.!!

पाचव्या माळ्यावर गेली.... पण तिथे एकही पुरुष नव्हता!! एक इलेकट्रोनिक नोटीस बोर्ड होता…
"या माळ्यावर येणाऱ्या तुम्ही १५०३४७५८९ व्या स्त्री आहात.!! तुम्हाला हवा असलेला नवरा आमच्याकडेच काय पण इतर कुठेच मिळणार नाही!!
कुणीतरी खरे म्हंटले आहे… स्त्रियांना कितीही चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्यांचे समाधान होत नसते!! "

=================

आणखी वाचा…

आपला चिंटू सुद्धा अमेरिकेला गेलेला असतो. याच दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दुकान असते. बोर्ड असते "आमच्या येथे बायको विकत मिळेल"!!
सेम टू सेम बिल्डींग... ५ माळ्यांची... आणि प्रत्येक मजल्या गणिक बायकांची क्वालिटी वाढवणारी.!!

चिंटू पहिल्या माळ्यावर जातो… नोटीस बोर्ड वाचतो : "येथील स्त्रिया आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकतात आणि उगाचच वायफळ बडबड करीत नाहीत.!!"

चिंटू जाम खुश होतो. एक चिकणी बायको निवडतो आणि लग्न करून  घेऊन येतो!!
=================
जाता जाता...

आत्ताच आलेल्या अहवालानुसार... बायको मिळण्याच्या त्या दुकानाच्या २ ऱ्या ते ५ व्या माळ्यांना आजपर्यंत एकाही पुरुषाने भेट दिलेली नाहीय!! !