नवरात्रीतले_नऊ_रंग_धार्मिक_नाहीत, #हा_तर_होता_मार्केटिंग_फंडा!

नवरात्र आली की सगळीकडे नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.


पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट, ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही.


महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात. अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. पण असं कां केल्या गेलं? २००३ साली मटाचे संपादक असलेल्या भरतकुमार राऊतांचं या प्रश्नाचं उत्तर जाम खडबडायला लावणारं होतं. ते म्हणतात, यात धार्मिकता वगैरे काही नाही, तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्‍या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले. ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. प्रत्येक दिवस एका देवीचा असे नऊ देव्यांमध्ये नऊ दिवस वाटून टाकले. आणि मग प्रत्येक देवीला एक रंग दिला. म्हणजे असं पाहा, दुर्गेची दुर्गाष्टमी, म्हणून तिचा एक रंग.  असा रंगोत्सवाला मस्त धार्मिकतेचा रंग चढत गेला. मग काय, महिलांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज, छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं....पसरले नवरंग मुंबईवर. 


२००३च्या सुमारास  महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बॅंका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणीची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं. 


२००३-०४ साली फक्त जाहिरातींतूनच नाही, तर अशा फोटोजमधूनही बातम्या हुडकून हुडकून वाचाव्या लागत होत्या. बघा, केवढं दिव्य होतं ते!!


ही त्यांची ट्रिक मात्र कमालीची यशस्वी ठरली. आजच्या घडीला ऑफिसमध्ये जाणार्‍या मध्यमवयीन बायकाच काय, घरी येणारी कामवाली आणि कॉलेजला जाणारी मुलं-मुली देखील हे कलर कोड्स पाळतात. सहज म्हणून सुचलेला हा मार्केटिंगचा उपाय आज १७ वर्षांनंतरही तितक्याच यशस्वीपणे चालू राहिलाय. 


आता तर हे लोण इतके पसरले की, मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे लोण पसरलं. 


मार्केटिंग गिमिक असो का काही असो, रंगीत शहरं बघायला छान वाटतात हे नक्की.


.....आणि हो रूढी व परंपरा सांगिवांगी कशा निर्माण होतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण. काही वर्षांनी ही परंपरा संपूर्ण भारतात बघायला मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. नंतर नंतर तर ही परंपरा कधी व कशी सुरू झाली हे सुद्धा कुणाला कळणार नाही.


https://www.maayboli.com/node/63962


https://www.bobhata.com/lifestyle/secret-behind-navratri-colors-551?amp

हिशोब काय ठेवायचा

काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहा मध्ये..

आपल्या थोड्या वर्षांचा..

हिशोब काय ठेवायचा ..


आयुष्याने भर भरून दिले असताना..

जे नाही मिळाले त्याचा..

हिशोब काय ठेवायचा..! !


मित्रांनी दिले आहे,

अलोट प्रेम ईथे...

तर शत्रूंच्या बोलण्याचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


येणारा प्रत्येक दिवस,

आहे प्रकाशमान ईथे..

तर रात्रीच्या अंधाराचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


आनंदाचे दोन क्षण ही,

पुरेसे आहेत जगण्याला..

तर मग उदासिनतेच्या,

क्षणांचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


मधुर आठवणींचे क्षण,

ईतके आहेत आयुष्यात..

तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


मिळाली आहेत फुले इथे,

कित्येक सहृदा कडुन..

मग काट्यांच्या टोचणीचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


चंद्राचा प्रकाश आहे,

जर ईतका आल्हाददायक..

तर त्या वर डाग आहे,

ह्याचा हिशोब काय ठेवायचा..!!


जर आठवणीनेच होत असेल,

मन प्रफुल्लित ..

तर भेटण्या न भेटण्याचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


काही तरी नक्कीच..खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..

मग थोड्याशा वाईट पणाचा,

हिशोब काय ठेवायचा..!!

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..

सुरकुतलेला चेहरा माझा  

पिकलेली असेल दाढी,

ओढून ताढून बांधलेली 

पैजाम्याची ढिल्ली होईल नाडी.. 


सांग कौतुक करून मनापासून   

तेव्हाही हँडसम म्हणशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..


सैल झालेला झंपर 

अंगावर नावाला असेल साडी,

तुझाच नसेल भरवसा तुला 

आधाराला हाती येईल छडी...


लाजत मुरडत माझ्यासमोर 

ठुमकत ठुमकत तरी चालशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


थकलेल्या खांद्यावरती माझ्या  

आयुष्य लादेल जेव्हा ओझं,

जिद्द वगैरे नावापुरतं  

जगणं होईल पुरतं खूज..


समाधान द्यायला माझ्या मनाला 

तेव्हाही मदत मागशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


गोळ्या शोधत धडपडत असतील 

थरथरणारे तुझे हात,

आजोबा पडले पाय घसरून 

निरोप आणेल जेव्हा नात...


आधार शोधत भिंतीचा मग  

याच त्वेषाने उठशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


तरुणपणाची सावली सरेल  

छळेल वार्धक्याचं ऊन,

केविलवाण्या चेहऱ्याने

पाहत राहील मुलगा सून...


गालात हसून आतासारखं

तेव्हाही सोबत चालशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना ?......💖

 एकदा एका बायकोने नवऱ्याला मेसेज केला :-


Yetana mazyasathi 5 gajare aanaa


नवरा 5 गाजरे घेऊन घरी गेला


बिचारा रात्रभर उपाशी राहिला😳😳, कारण बायकोला *गजरे* हवे होते, *गाजरे* नको होती


म्हणून मराठीतच टाइप करा😄😄

पढत मूर्ख

आठ वर्षांचा घेलाराम कच्छमधून बापाचे बोट धरून पुण्यात आला. बापाने किराणामालाच्या दुकानात नोकरी केली. हळूहळू घेलारामच्या बापाने स्वतःचे दुकान टाकले. दुकानाच्या मागेच राहायला लागले. दुकान बंद करताना गिऱ्हाईक आले तर पुन्हा दार उघडून त्याला माल देत. पुण्याच्या प्रसिद्ध पेठामधल्या पाट्या त्याच्या दुकानावर नव्हत्या. तसेच एक पैसा नफ्यावर ते धंदा करत. घेलाराम लहान वयातच दुकानावर बसायला लागला. कोणती गोष्ट केवढ्याला विकायची हे सांगून बाप माल आणायला, येणी वसूल करायला जायचा. पाढे पाठ करायला घेलारामला शाळेत जावे लागले नाही. दुकानाचा जम बसला. घेलारामच्या बापाने त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने करून दिली. घेलारामचेही लग्न कच्छमधील मुलगी पाहून करून दिले.


घेलारामच्या बरोबरीने त्याची नवपरिणित पत्नीही दुकानात पुड्या बांधू लागली. ही गोष्ट आहे 1955 सालामधली. घेलारामने दुकान आणखी वाढविले. दुकानामागची राहण्याची जागाही वाढवली. पैसा मिळाला आणि वाढला तरी त्याच्या गाठी मारलेले धोतर नवीन धोतरात बदलले नाही. घेलाराम घेलाशेठ झाला. दुकान उघडायची व बंद व्हायची वेळ कधीही बदलली नाही. तुफान पाऊस असो, कडाक्‍याची थंडी असो, सकाळी सात वाजता त्याचे दुकान उघडत असे. इतर लोक गाजावाजा करून जंक फूडचे स्टॉल टाकतात. सुरुवातीचा हुरूप संपल्यानंतर दुकानाच्या वेळा आकुंचन पावतात. खूप पाऊस असेल तर गिऱ्हाईक येणारच नाही अशा ठाम समजुतीने दुकान उघडले जात नाही. थंडीत दुकान लवकर बंद होते. असे होत होत दुकान दुसऱ्या कुणालातरी चालवायला दिले जाते.


वर्षांमागून वर्षे गेली. आसपासचा परिसर बदलला. घेलाशेठच्या दुकानाच्या आजूबाजूला त्याच्याच धंद्यातील इतर दुकाने आली. घेलाशेठ मजेत. माल कुठून, कसा स्वस्त मिळवायचा, त्याची प्रतवारी कशी करायची व तो कसा विकायचा हे ज्ञान घेलाशेठच्या मुठीत बंद होते.

घेलाशेठने त्याच्या मुलाला शाळेत घातले. मुलगा मॅट्रीकपर्यंत पोचला. नंतर दुकानावर आला. घेलाशेठचे समोर एकाने किराणामालाचे दुकान टाकले. घेलाशेठचा मुख्य धंदा तेल विक्रीचा होता; वाणसामान जोडधंदा. समोरच्याने दुकानाची भरपूर जाहिरात केली. दुकानाच्या ओपनिंगला घेलाशेठला बोलावले. ते आवर्जून गेले.


“”आओ, जी घेलाशेठ आओ” “”जय गोपाल हरिराम” “”मारो डिकरा बिझनेस मॅनेजमेंट की शिक्षा पुरी करके आयो” हरिरामचं पॉश कपड्यातलं शिक्षित पोरगं घेलाशेठकडे बेरकी नजरेनं पाहत होतं. हरिरामचे दुकान सुरू झाले आणि त्याच्या मुलाने दहा दिवसांत “प्राइस वॉर’ सुरू केले. घेलाशेठच्या दुकानात तेलाच्या भावाची पाटी होती “साठ रुपये किलो’. समोरच्या दुकानात पाटी लागली 58 रुपये. गिऱ्हाईकाला किमतीशी सोयसुतक असतं. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 58 रुपयांची पाटी लागली. जुने गिऱ्हाईक परत आले. काही दिवस गेले. समोरच्या दुकानात 55 रुपयांची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठचे दुकानातही 55 रुपयांची पाटी. लक्षण ठीक दिसत नव्हते. ही व्यापारी पद्धत नसते. हरिरामच्या दुकानात पन्नासची पाटी लागली. आठ दिवसांनी घेलाशेठच्या दुकानात 48 रुपयांची पाटी. घेलाशेठचं पोरगं गडबडलं.


“”बापू अपना धंदा बंद हो जायेगा” घेलाशेठने त्याला गप्प राहायला सांगितले. आता हरिरामची पाटी 45 वर आली. घेलाशेठने 40 ची पाटी लावली. पुन्हा हरिरामने 35 ची पाटी लावली. घेलाशेठचे गिऱ्हाईक तुटले. घेलाशेठ निवांत. पोरगं गडबडलेलं. हरिरामचे दुकान पंचक्रोशीत स्वस्त म्हणून रांगा लागल्या. चार महिन्यानंतर हरिरामच्या दुकानाचे दिवाळे निघाले. घेलारामने पुन्हा 60 रुपयांची पाटी लावली. हरिरामने त्याच्या बिझिनेस मॅनेजमेंटवाल्या मुलाला चांगलेच धारेवर धरले. बिनशिकलेल्या घेलाशेठने कोणाचा सल्ला घेतला हा विचार हरिरामला छळू लागला.


एक दिवस हरिराम घेलाशेठच्या दुकानावर आले. “”आओ, आओ भाई” व्यापारी चहा झाला. हरिरामने हळूच विषयाला हात घातला. “”थारो कन्सलटंट कौन छे, तू तो पढा लिखा नही” घेलाशेठ मिश्‍कील हसले. “”अरे हरिराम आपल्या धंद्यात आपला कन्सलटंट आपले जीवन असते.”

“”मी समजलो नाय.” “”अरे, तुझ्या पोराने आपल्या व्यापारी वर्गातल्या रितीला सोडून धंदा केला. तू भाव पाडले आणि वस्तू मूळ खरेदी किमतीपेक्षा कमी भावाने विकलेस मी फक्‍त पाटीवरचे भाव बदलले. पण…” “”पण काय शेठ?” हरिराम अधिर झाला. “”मी फक्‍त पाट्या कमी भावाच्या लावल्या. वस्तू विकलीच नाही. गिऱ्हाईक आले की, माझ्याकड नाही सांगून तुझ्याकडे पाठवले” हरिरामचं पोरगं अजूनही पुस्तक चाळतच बसलंय.

😊

 *पुणेरी डोके* 😊😄 

कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला विचारले *महाभारत* आणि *रामायण* मध्ये काय फरक आहे?

वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..

*महाभारत* मध्ये जमिनी बद्दल वाद होता ( सिव्हील केस) तर *रामायण* मध्ये अपहरणची ( क्रिमिनल ) केस होती.

🤣😂

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला,

तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..

*हरणा* चं *वस्त्र* बनवण्या वरून झाले ते *रामायण*

आणि

*वस्त्रा* चं *हरण* करण्या वरुन झालें ते *महाभारत*


😂🤣😂😂😂😂😂😃😃

 मी जेव्हा नववीत होतो तेव्हा ती आठवीत होती...


आता ती नवविवाहित आहे आणि मी तिला आठवीत आहे !!!

😁😁😁मराठी भाषा