कुणी जाल का

कुणी जाल का सांगाल का,
सुचवाल का त्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला तो श्वास साहून वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळीला.

सांभाळूनी माझ्या जीवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा ती झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली.


कवी     - अनिल
संगीत  - यशवंत देव
स्वर    - डॉ. वसंतराव देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा