जयाजीराव शिंदे व तुकोजीराव होळकर

ज्यांनी बाहुबले रणांत सगळे जिंकूनियां हो अरि
कीतींचे ध्वज आपुले उभविले या आर्यभूमीवरी,
त्यांचे पुत्र अम्हांस आज सहसा सोडूनिया चालतां.
खेदानें न रडे खरा कवण तो सांगा मराठा अतां?                १

राणोजी – परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
मल्हारी - परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
हा ! हा ! तत्कुलदीप हे विझुनियां गेले भले आज ना !
हा! हा! तत्कुलवृक्षगुच्छ बरवे कोमेजले आज ना!              २




कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
जुलै १८८६

२ टिप्पण्या: