*नागरीक मी भारत देशाचा*

*हातात सगळं आयतं पाहिजे !* 


वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे !

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे !


तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे !

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे !


कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे !

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे !


धर्माच्या नावाने भले काहीही करीन

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे ! 

मतदान करताना जात पाहीन

म्हणेल, जातीयता बंद झाली पाहिजे !


कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात पाहिजे !

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा