वेड लागणार नाही तर काय?

देशी दारुचे दुकान आणि आध्यात्मिक साक्षात्कार

कुतुहल हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुतुहलच्या वाटेला गेलं की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं.....
नव्हत्याचं... मुळीच नव्हतं होतं.
ह्या कुतुहलाच्या नादात माणसाला पार बरबाद होताना पाहिलय. आजपर्यंत ह्या कुतुहलापायी मी कित्येकदा मार खाता खाता राहिलोय..... (........आणि कित्येकदा खाल्लायही !!)
लहानपणी ट्रॅफीक पोलीसाची शिट्टी वाजवल्यावर काय होतं... कसं वाटतं ? ह्याचं कुतुहल असायचं. मग एकदा हळुच त्याचं लक्ष नसताना वाजवुन पाहिली. प्यायच्या पाण्याच्या पिंपात सोडलेले मासे नळातुन बाहेर येतात का ते पाहिलं. (येतात... विशेषतः जर वडलांनी ग्लास धरला असेल तर... येतातच.) दिवसातले २८ तास अभ्यास करायला लावणा-या हेड्मास्तरांची मुलगी रविवारी काय करते हे तिला पत्रातुन विचारुन पाहिलं. (त्याचं उत्तर परिक्षेच्या पेपरवर मिळालं.) १२०-३०० तंबाखुचं पान खाउन गिळुन पाहिलं, एकच वेळेला बिडी, सिगारेट आणि सिगार ओढली तर काय होईल...(नको.. नको त्या आठवणी...) हे पाहिलं. भावांची माहिती न काढताच मुलींना त्यांची माहिती विचारुन पाहिली. सर्कशीसाठी आणुन ठेवलेल्या अस्वलाच्या पिंज-याचा दरवाजा...... असो....
.........पण ह्या प्रत्येक वेळेला मार खाता खाता राहिलो. (मार खाल्लेली कुतहलं इथे लिहणे इष्ट नाही, हे सुज्ञांना कळाले असेलच.) तेंव्हापासुन मनातलं कुतुहल दाबुन मी नाकासमोर चालत आलोय.... अगदी परवा परवा पर्यंत !
पण परवा मी पडलोच. परवा कुतुहलानी मला गाठलंच... मोह आड आलाच..... पाऊल वाकडं पडलंच.... माझ्या घरी येण्याच्या वाटेवर मला दोन अशी मोहाची दोन वळणं येतात. ज्या वळणांवर वळुन त्या वाटेवर हरवुन जावंसं वाटायचं...
एक म्हणजे....
रामदासस्वामींचा मठ ! (नाही... नाही.... हे ते रामदासस्वामी नाही... हे स्वामी म्हणजे रा. म. दासस्वामी. रामय्या मलिंगप्पा दासस्वामी. मागच्याच्या मागच्या जन्मी ते सुखाराम महाराजांच्या कोणाचेतरी कोणतरी होते म्हणे.... म्हणे म्हणजे तिथं गेल्यावर असे लोक म्हणाले. असो). ह्या मठात एकदा तरी नक्की काय होतं हे मला पाहायचंच होतं.
आणि दुसरं मोहाच वळण म्हणजे...
देशी दारुचे दुकान... दुकान म्हणजे फक्त देवाण नाही... घेवाण सुद्धा... म्हणजे देशी दारुचा गुत्ता !
तर मी काय सांगत होतो.... परवा माझं पाऊल वाकडं पडलंच....

त्या पहिल्या वळणावरच्या मठात घाबरत घाबरत मी आत गेलो. एकट्यानीच कुठे अनोळखी ठिकाणी जायला भिती वाटते हो.... आत गेलो आणि बघतो तर ही गर्दी... घाबरलोच. माझ्यासारखेच अनंत भक्तगण तिथे एकमेकांवर उच्छ्वास सोडत उभे होते. आत जाताच एका माणसानी मला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं.

तिकडे गायीच्या तोंडाचा एक दगडी नळ होता. मला वाटलं की गरम पाण्याचं जिवंत कुंड असेल. तिथं खाली तर ग्रीन मार्बल बघुन वाटलं की इथे बहुतेक शेवाळे महराजांनी जिवंत समाधी घेतली असेल. त्या संगमरवरावर पाय ठेवतो तर काय.... ज्ञानेश्वरांच्या भिंतीसारखं आपोआप, पाऊल न उचलता त्या नळापर्यंत पोहचलो. पण तिथं आपोआप न थांबता एकदम त्या नळावरच्या गायीच्या शिंगावर आपटलोच. कपाळावर टेंगुळ आलं. मग कळालं की ग्रीन मार्बल वगैरे काही नाही तिथे शेवाळं साठलय. मला टेंगुळाचा प्रसाद देणा-या त्या हलकट माणसाला मी शोधायला लागलो. पण तो केंव्हाच त्या अनंतात विलीन झाला होता. मग मी ही पुढच्या येणा-या माणसाला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं आणि प्रसाद पुढे वाटला. एका पायात ती हिरवी स्लीपर आणि दुस-या पायावर ती मेंदी घेऊन मी रांगेत उभं राहिलो.

"स्वामींना अस्वच्छेतेची खुप चीड ! " अशी बहुमुल्य माहिती मला एका भक्तानी पुरवली. भक्तांच्या पदकमलांनी तिथे हिरवे हिरवे गार गालीचे असे साठत असतील तर कुणालाही चीड येईल.
"हि जागृत वास्तु आहे आणि तुम्हाला इथे ओम सतत जाणवत राहतो." हि दुसरी माहिती मिळते न मिळते तोच एक माणुस गंध घेऊन आला. त्याच्या हातात ओमच्या आकाराचा एक आकडा होता, जो गंधात बुडवुन तो लोकांच्या कपाळावर लावत होता. ते गंध त्यानी इतक्या जोरात माझ्या कपाळावरच्या टेंगळावर लावलं की मला वाटतं ते मागुन पण दिसलं असेल. पण एक खरं झालं की तो ओम मला सतत जाणवत राहिला.
लोक मुर्ख असतात हो.... काय वाट्टेल ते करतात हो. कधी त्यांच अनुकरण करु नये. तिथं एका समाधीबाहेरची साखळी घेऊन लोक कपाळावर लावत होते, डोळ्यांना लावत होते, डोक्यावरुन फिरवत होते. मी पण एका सामाधीबाहेरची साखळी घेऊन कपाळावर लावली आणि सोडुन दिली. ती त्या समाधीवरच्या दरवाज्यावर आपटली. आणि तो दरवाजा च्क्क उघडला गेला. पाहातो तर काय...
चमत्कार !!

त्या जागृत समाधीतुन एक जिवंत बाई..... साध्वीच असणार कोणतरी ! "कोन पायजे ?" हे इतक्या भसाड्या आवाजात तिनी मला विचारलं की माझी तंद्री भंग पावली. मग तिथे मठाचा रखवालदार राहतो आणि ती त्याची बायको आहे ही अजुन एक बहुमुल्य माहिती मिळाली.
मिळेल तिथले अंगारे घेऊन लोक भरुन घेत होते, उदबत्त्या हुंगत होते, भंडारा उधळत होते, कुंकु कपाळावर लावत होते. मी पण तिथल्या एका भिंतीवरचं कुंकु कपाळावर लावलं.

लोकं काय असभ्य, बेशिस्त, असंस्कृत, बेजवाबदार, अशिक्षित, बेअक्क्ल आणि आर्वाच्य असतात हो. एक तर मठात येतानाही गुटखा वगैरे खाउन येतात आणि वर कुठही थुंकतात. ते कपाळावर लावलेलं थुंकु... माफ करा... कुंकु धुवायला मी पुन्हा शेवाळे महाराजांकडे गेलो. मग दुस-याही पायावर मेंदी काढुन घेऊन मी पुन्हा रांगेत आणि मग पुन्हा तो कपाळावर ओम कोरण्याचा कार्यक्रम झाला.
तिथं इतकी गर्दी होती की त्या रांगेत घामाघुम झालो. लोक एकमेकांना अगदी चिकटुन चिटकुन उभी होती. घाम आला म्हणुन रुमाल काढायला खिशात हात घातला तर हातात चुन्याची डबीच आली. कुणाच्या खिशात हात घातला होता कुणास ठाऊक ! मग पुन्हा तिथं ठेवायला गेलो तर तिथं आधिच एक डबी होती. मला काय समजायचं ते समजलं. मी गपचुप ती डबी खाली टाकली. ती तिस-याच भक्ताच्या पायावर पडली. त्याला वाटली त्याचीच.

(इथे सगळे भक्तांकडे जोरदार त्रिसुत्री होती. हातात फुलांचा हार, कपाळावर घामाची धार आणि तोंडात तंबाखुचा बार... )
तर त्याला वाटलं की त्याचीच डबी म्हणुन तो मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. त्या मागच्याला वाटलं की तो पहिला नमस्कारालाच वाकलाय. देवाचंच काहितरी म्हणुन तो ही त्याच्या मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. लोकं माकड असतात. कशाला कुणाचं अनुकरण करायच.. ! पण नाही.... मग त्या माणसाच्या मागचा वाकला, मग त्याच्या मागचा.... असं करत करत शेवटचा माणुस एकदम बाहेरच ढकलला गेला. मग तिथं छोटीशी झटापट झाली. त्या गोंधळाचा फायदा घेउन मी हळुच स्वामींच्या खोलीत शिरलो.
आत गेल्यावर रा. म. दासस्वामींचं दर्शन झालं. फॅन्सीड्रेस स्पर्धेत अफजलखानसारखं दिसणा-या कुणी जर सुखाराम महाराजांचा ड्रेस घातला तर कसं दिसेल तसे ते दिसत होते. डोळे मिटुन ते रामदासस्वामी (स्वतःच्याच) मनाचे श्लोक म्हणत होते. मध्ये त्यांनी डोळे उघडले आणि सुखाराममहाराजांचा अभंग वाचला....

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे
सुखा म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला
हा अभंग त्यांनी तिथं का म्हंटला ते काही कळालं नाही. त्यांना नमस्कार करुन बाहेर पडावं असा विचार करुन मी नतमस्तक होणारच होतो. पण त्याआधिच स्वामींच्या एका शिष्यानी माझं मुंडकं पकडुन त्यांच्या पायाशीच इतक्या जोरात आपटलं की तो कपाळावर कोरलेला ओमसुद्धा खाली पडला. आणि ओम पुन्हा त्या वास्तुतच राहिला.
नुसता ओम पडला असता तर काही वाटल नसतं, पण त्या ओम बरोबराच माझ्य खिशातुन शंभराची एक नोट पडली हो...! ती महाराजांनी उचलुन लगेच खिशात घातली आणि एकदम जोरात ओरडले, " विचार वत्सा, विचार एक प्रश्न "
" ती माझी पडलेली नोट परत मिळेल का ?" असं मला विचारायचं होतं पण त्या शिष्याचा हात अजुनही माझ्या मानेवरच होता. खाजगी प्रश्न त्या गर्दीत विचारणं शक्यच नव्हतं म्हणुन काहितरी विचारायच म्हणुन मी विचारलं की आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या अभंगाचा अर्थ कळेल का ? तर स्वामी म्हणाले की, " आत्मनंदात आत्मवंचना झालेल्या आत्म्याला आत्मचिंतीत आत्ममननाची जोड दिली तर आत्मपरिक्षणानंतर जन्मणा-या आत्मविवेचनातच आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार आत्म्याला होतो. "
मी त्या शंभर रुपायाच अखेरचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो ते पुन्हा कधी कुतुहलाच्या वाटेला जायचं नाही हे ठरवनुच.... !
पण अनुभवाच्या वळणावर सडकुन आपटुन शहाणा झाला तर तो माणुस कसला ! ते देशी दारुचं दुकान मला बोलावत राहिलं आणि एक दिवस मी दुस-या वळणावर वळालोच. आणि ज्या अभंगाचा अर्थ मला त्या मठात कळला नव्हता तो मला त्या गुत्त्यात कळाला.
त्याचं असं झालं............
मला नेहमी रस्त्यावरुन जाताना तो दारुचा गुत्ता दिसायचा. जाता जाता काही क्षणांसाठी त्या गुत्त्याच्या दरवाज्यावरचा पडदा हलायचा आणि आत दिसायचे सगळे तृप्त चेहरे... समाधानाने ओथंबलेले... सुखाने डोळे काठोकाठ भरलेले.... पराकोटीच्या आनंदात रममाण.... शांत, प्रसन्न, उत्साही जीव... ध्यानमग्न.... आत्मतल्लीन..... पुण्यात्मेच !!
का नाही वाटणार हेवा...? का नाही होणार मोह....? का नाही वळणार पाऊल तिकडं... ? वळालंच एकदा....
गाडी थोडी लांबच लावली आणि चालत चालत त्या ध्यानमंदीराकडे निघालो. कुणी ओळखु नये म्हणुन तोंडावर रुमाल बांधला. छातीत जाम धडधड होत होती पण कुतुहलही तितकच होतं. कच खाऊन मागे वळणार तितक्यात पुन्हा पडदा हलला आणि पुन्हा त्या चेह-यांच दर्शन... मग दारात जाऊन उभं राहिलो.
तुम्हाला खोटं वाटेल पण, दारात दोन बायका दोन बाजुला स्वागताला उभ्या होत्या. ते भरतनाट्यम का कथ्थकला नेसतात तश्या जरीच्या साड्या नेसुन... दोघींच्या लांबसडक वेण्या, अगदी कंबरेपर्यंत.... त्यावर वेगवेगळ्या फुलांच्या वेण्या, चमक्या, वेगवेगळ्या रंगांचे मणी आणि गजरे.... डोळ्यात नीळं काजळ आणि गालावर (आपल्याकडे शाळेत स्नेहसंमेलनात लावतात तसं) गुलाबी रुज का काय ते.... हातात ('त्या लमाणी आहेत काय' असा संशय यावा इतक्या) बांगड्या... पायात जाडजुड पैंजण (त्याला घुंगरु आहेत की घंटा हे मी बराच वेळ पाहत राहिलो पण कळालं नाही).... एकीच्या हातात आरतीची थाळी आणि दुसरी 'प्रभात चित्र'वाल्या बाईसारखी एक पाय मागे दुमडुन फुलं टाकयासाठी तयार....
पडद्यावर पण काय छान छान चित्र असतात ना....!

मग त्या स्वागतानं गहिवरुन गेलेलो मी आत गेलो. आणि आतलं वर्णन काय सांगु महाराजा... ? तिथं जनसागरच लोटला होता. प्रंचंड गर्दी पण गोंधळ अजिबात नाही. सगळ शिस्तबद्ध.... ४ माणसं रांगेत होती... ७ रांगत होती.... ६ वेगवेगळ्या दिशेला तोंड करुन, पायांचे एकमेकांशी विविध कोन करुन बसली होती (हि बसलेली माणसं कुणाशी तरे बोलत होती पण बहुतेकांच्या समोर दुस-याचे पाय, पाठ किंवा भिंत होती. केवढी मानसीक ताकद पहा... कुणी असो नसो फरक पडुन द्यायचा नाही. नाहीतर आपण...)

....आणि सुमारे ११ माणसं अस्ताव्यस्त पडलेली होती...(सुमारे असं म्हणण्याचं कारण की नीट मोजता नाही आली. कोण कुणाच्या वर आहे, कुणाचं अंग कुठलं आहे आणि डोकं कुठंलं आहे काही कळत नव्हतं. मग हात आणि पाय मोजुन पाहिले तर हात २३ भरले आणि पाय २१... म्हणुन सरासरी ११. अर्थात खुप खालची खालची माणसं नाही मोजली. कारण ती मोजताना वेळ जात होता आणि तोपर्यंत रांगत असलेली माणसं पडत असल्यामुळे घोळ व्हायला लागला.)

हसु नकात.... भल्याभल्यांना जमणार नाहीत अशी योगासनं करणारे हे योगी....., (हो मग... योगीच ते... नाहीतर जमिनीवर बसुन, एक पाय स्वतःच्याच गळ्यात, दुसरा पाय समोरच्या बाकड्यावर, त्या पायावर एक योगी-बंधु, मांडीवर एक योगी-बंधु, एका हाताने भिंतीचा आधार घेतलेला आणि दुसरा हात सापडत नाहीये...अशा अवस्थेत मान खाली खाली नेऊन तोंडानी जमिनीवरचा ग्लास उचलायचा... ह्यासाठी कमीतकमी १३८ योगासनं माहित हवीत.)
तर हे सगळे हटयोगी, दिसत असले जरी जमिनीवर, तरी होते सगळे तरंगत. इतक्यात एका महात्म्याने मला टेबल समजुन, (मी आहे थोडा बुटका, त्यात त्याची काय चुक) माझ्या डोक्यावर ठेवलेला ग्लास माझ्यावर अमृताचा वर्षाव करुन गेला आणि मी चिंब भिजलो. आनंदाच्या लाटांवर लाटा उसळत होत्या आणि त्या आनंद-डोहात सगळे चिंब भिजले होते. सगळय़ांच्याच अंगात आनंद इतकाच ओसंडत होता की तुझं अंग, माझं अंग असा फरकच राहिला नव्हता. ह्या वातावरणात मी गहिवरुन गेलो आणि नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले...
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
कुठे ते दासस्वामी, जे डझनभर शब्द घेऊन सुद्धा मला काहिच समजावु शकले नाहीत. आणि कुठे ही मंडळी, ज्यांनी न बोलताच मला पहिला श्लोक समजावुनही दिला.
माझ्याही नकळत मी रांगेत उभा राहिलो आणि कधी एकदा माझा नंबर येईल ह्याची वाट पाहायला लागलो. मी असं ऐकलं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर सुंदर गोष्टी घडतातच पण ब-याचदा खुप उशिरा. इथे नाही झालं असं... लगेच आला नंबर माझा...

काय आपण उगाच रडतो की महागाई... महागाई... ! इथे १ ग्लास ८ रुपायाला... ५ ग्लासवर २ ग्लास फ्री आणि ७ ग्लास घेतले तर तो ग्लास पण फ़्री... ! मंथली मेंबर्सना चकणा फ़्री... ! लाईफ मेंबर्सना पिक-अप आणि ड्रॉप फ्री... ! नुसता सेल लागला होता तिथं.
मी एक ग्लास घेतला आणि ओठापर्यंत आणला. जवळपास एखादा उंदीर मरुन पडला असणार नाहीतर एवढ्या सुंदर द्रवाचा वास असा येणंच शक्य नाही. मी तो ग्लास कसाबसा ओठाला लावला आणि नेमकं तेंव्हाच २-३ जणांच्या खाली गाडला गेलेला कोणतरी एक फिनीक्स पुन्हा भरारी घ्यायला उठला. मग त्याचा एक जोरदार धक्का मला आणि एका घोटात सगळं कुतुहल पोटात.
....उगाच त्या २६ व्या मजल्यावरुन खाली पडायला नको म्हणुन मी रांगत रांगत एका भिंतीच्या कडेला जाऊन बसलो. आणि मग भास व्हायला लागले किंवा.... किंवा भासही असतील.... नाहीतरी निघायचे भासच ! पण काही का असेना माझ्या कानातली ती भीकबाळी मला टोचायला लागली... डोक्यावरच्या त्या पगडीवरचे मोती कपाळावर आपटायला लागले... हातातलं गुलाबाचं फुल सापडेनाच... मस्तानी मात्र नाचता नाचता मध्येच तिरका डोळा का तिरकी मान असं काहीतरी करुन हसत होती.... मध्येच त्या पाणगेंड्याशी माझी कुस्ती झाली नसती तर मगरीला लोळावलाच असता मी... पण मला एक अजुन कळालं नाहीये की माझा रणगाडा कुणी चोरला....

हळुहळु जरा चढायला लागली आणि मग एकेक दुःख बाहेर पडायला लागली. आणि मी माझ्या बाबतीत आजपर्यंत जे काहिचियाबाही झाल होतं आणि मला आवड नसतानाही त्या अग्निपथावर मी कसा पुढे चालत राहिलो हे त्या भिंतीला सांगितलं. मग भिंत झाली म्हणुन काय झालं... भिंतीलाही कान असतात.
खुप हलकं वाटलं... मोकळं वाटलं... अगदी पिसासारखं... आणि मग मी पुढं पुढं जायला लागलो... अगदी आवडीनं... कसलाही आकस नाही, दुःख नाही... तक्रार नाही.... आता मला सुखाराममहराजांचा श्लोक उमजला.
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
जोपर्यंत आपल्या मनातुन आयुष्यात घडलेलं ते काहिचियाबाही आपण कुणाला सांगत नाही तोपर्यंत पुढे आवडीनं नाही चालता येत.
....आणि आपण मुर्ख लोक त्या दारु पिउन बडबडणा-या माणसांना हसतो, जे खर तर समाधानानी चालत असतात... आवडीनं चालत असतात.
आपण... (म्हणजे तुम्ही... स्वतःला शहाणे म्हणवणारे,) नसाल एकटचं बडबडत पण आयुष्याची पाऊलवाट रडत रडत, रखडत रखडत चालता हे लक्षात ठेवा....)
आयुष्याला सामोर जायची लोकांची ती जिद्द पाहिली आणि चेह-यावरचा तो रुमाल नावाचा मुखवटा गळुन पडला. आणि मी आपोआप आवडीने पुढे चालायला लागलो. सुरवातीला दोन पावलं टाकायला पण त्रास झाला मग दोन ग्लास टाकल्यावर हवं तिथं तरंगतच जायला लागलो. आणि मग सुख-दुःख, समाधान-तक्रार, वेडा-शहाणा, जमिन-आकाश, जन्म-मृत्यु असा काही फरकच राहिला नाही.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात तेच खरं....
तुम्ही काय आणलय जे हरवेल ? जे घेतलत इथुनच घेतलंत.... जे दिलंत इथेच दिलंत.... (ह्याचा अर्थ दारु इथेच पिऊन ती पुन्हा ओकुन इथेच देणे असा घेऊ नये. ह्यातला गर्भित अर्थ ग्लासमध्ये घ्यावा.)
खरं सांगायचं तर जीव जेंव्हा गर्भात असतो तेंव्हाच सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला काय हवय ते त्या गर्भाला बरोबर कळतं आणि ते शोधत तो इच्छित स्थळी पोहचतोही. शेवटी माता एक निमित्त आहे. एक माया आहे. डोहाळे हा एक भास आहे. खरा जिव्हाळा असतो त्या समाधीत... त्या मोक्षात.... आत्म्याच्या प्रतिबिंबात....
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे

.............आणि शेवटाच्या कड्व्याचं म्हणाल तर त्यात मुद्रणदोष आहे. त्या कडव्यातलं पहिल वाक्य ' सुखा म्हणे तैसा ओतलासे ठसा' असे नसुन, तो श्लोक ’सुखा म्हणे घसा ओतलासे ठर्रा' असा आहे. ठर्रा म्हणजे मदिरा. तर सुखाराम महाराज म्हणतात,
सुखा म्हणे घसा ओतलासे ठर्रा
अनुभव सरिसा मुखा आला
म्हणजे.... नुसत्या तोंडाला येणा-या वासावरुन दारुचा अनुभव नाही घेता येत, त्यासाठी दारु घश्यातच ओतावी लागते. एकदा का तुम्ही ठर्रा घशात ओतला की अनुभव तुमच्या मुखा आलाच म्हणुन समजा. काय मोठी गोष्ट सांगुन गेलेत पहा बुवा, की अनुभव घेतल्याशिवाय मजा नाही. मला सांगा, घरात बसुन मुसळधार पडणा-या पावसाचा आनंद खिडकीत बसुन मिळेल काय ? त्यासाठी बाहेर जाउन भिजायलाच हवं हो.... नुसतं गाण्याचे नोट्स वाचुन काय हरवुन जाता येईल काय ? त्यासाठी सुरांची नशाच अनुभवायला पाहिजे.
आणि साहेब... ठर्रा म्हणजे तर स्वर्गच की ! पाऊस पडुन जातो, सुर विरुन जातो... पण ठर्रा उरुन राहतो.
जे सगळ्यांना दिसतं ते दाखवतोच, पण जे कोणाला दिसणार नाही ते ही दाखवतो. त्या पडद्यावरच्या बायकांना मी स्वतः आरती ओवाळताना आणि माझ्यावर फुलं टाकताना मी पाहायलय. इथल्या काही योगी युगपुरषांनी तर त्यांचा नाचही पाहायलाय. एकदा याच तुम्ही अनुभव घ्यायला.
मी हल्ली ब-याचदा घेतो...
त्यामुळे हल्ली मला आनंदाचे झटके येतात... तरंगावंसं वाटतं.... स्वत:बद्दल प्रेम, करुणा आणि वात्सल्य दाटुन येतं.... कोणाचा राग येत नाही, हेवा नाही, मत्सर नाही... खरं सांगायचं तर अजुबाजुच्या जगाची जाणिवही नाही... फक्त समाधान आणि तुप्ती.... !
मला सांगा आध्यात्मात अजुन काय मिळतं.... आत्मसाक्षात्कार ह्याहुन काय वेगळा असतो हो...?
हल्ली मी असाच तल्लीन असतो. सगळी कुतुहलं आता शमवलीत पण हल्ली हल्ली ध्यानमंदीरात कुठल्या तरी बाईच्या तमाशाची जोरदार चर्चा असते. तमाशा वगैरेचा आपल्याला नाद नाय करायचा पण कुतुहल म्हणुन गेलोच तिथे तर सांगेनच तुम्हाला लवकर...
तोपर्यंत....
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे

धुंद रवी.

तेरवी

चार वर्षापासून, शेती पार बुडाली
अवंदाबी चिमणी, अभायात उडाली
दरवर्षी कर्ज, फेडता झाली घान
मिरचीच्या रोपाची लुली पडली मान
कोहळ्याच्या येलाले, दिसत न्हाई कयी
अतिरेक्यावानी पडली, पह्याटीवर अयी
जवारी तं पह्यले, उकरीनंच पाडली
उरली सुरली मुरयीनं, जमिनीत गाडली
मुंगावर चिकटा पडला, तुरीले मूयकिडा
कडू लागते आता मिठ्या पानाचा ईडा
पानीबी मंधातच, देऊन राह्यला झाकोले,
निसर्गबी वरून मारून राह्यला टोले
धुर्र्यावर नाही गवत, दिसत नाही चार
बैलं कुठं चारावं, कुठचा कापावं भारा
कर्जाची होयी अशी, धीरे धीरे पेटते
पेराले मांगतलं,तं सोंगतांनी भेटते
सरकार गुतलं, सत्ता खुर्चीच्या तालात,
वावटयच पुरी घुसली, त्याहिच्या पालात
म्हून म्हणतो पंजाब,भविष्य बरं नाही
तेरवीची सोय कर, बुढीचं खरं नाही
...........डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

शहीद

कृषीप्रधान शब्दापासून, व्हा आता सावधान
शेतीसाठी लवकरच, होणार हाये प्रावधान
शेतकऱ्यां साठी खूप, सवलती येनार हाय
मरासाठी विष, सरकार आनून देणार हाय
विहिरीत जीव द्याचा, इचार करा पक्का
सरकारच मांगून देईन, तुमाले धक्का
जळून मरासाठी, रॉकेल डब्बी सकट
गयफास घ्यासाठी, दोरी घरपोच फुकट
हासू नका, तोंड करू नका हेकडं
सरकारच देईन पाहा, जायासाठी लाकडं
पोस्टमार्टम कराची, झंझट राह्यनार नाही
प्रेताले तुमच्या कापून कोणी पाह्यनार नाही
जीव देनं तुमचं, हराममौत ठरनार नाही
थो कायचा शेतकरी जो आत्महत्या करणार नाही
अन्तयात्रेचा खर्च, सरकार करन सोता
तेरवीसाठी कुटुंबाले, तांदूय एक पोता
प्रेताले सलामी, मंत्री वाह्यतीन पुष्पचक्र
भाषणात सांगतीन, हाना दाबून वखरं
सोनं नानं इका, घर ठेवा गहान
शेती पिकवा बनवा, मेरा भारत महान
लेकराईले शिकवू नका, शेतीतच दाबा
देशाच्या भविष्यासाठी,राब राब राबा
जवानासारखी, किसानाची जय करा
वावरातल्या धुर्र्याचा, हिमालय करा
शेती नाही पिकली तं, आत्महत्या कराची
सैनिकासारखी संधी, देशासाठी मराची
शहीद झाले म्हनून, गौरव तुमचा करू
पुढं चाला गानं म्हनत, जगू कींवा मारू
-डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

पोशिंदा

अवघ्या सृष्टीचा भार
घेऊनिया खांद्यावरी
सदा पोसण्या तयार
सार्‍या जगाचा कैवारी...

कधी ओला कधी सुका
हसे कोरडा दुष्काळ
तुझ्या पाचविला सदा
रिते फ़सवे आभाळ...

काळ्या मातीतले सोने
पीक डोलते शिवारी
भाव मातीमोल येता
घाव बसतो जिव्हारी...

रात दिसाला राबून
सोसुनिया उनवारा
रान पिकवुनी आता
हाती उरला कासरा...

सार्‍या जगाचा पोशिंदा
जग तुझ्याविन खूज
धन्य धन्य आहे राजा
तुझं शेतकरी राज..!

- शिवाजी विसपुते
एक २४ वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याचे वडील train ने जात असतात. त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं
कपल बसलेल असतं.
तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर
बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल
वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण
आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...”
तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”
तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..
माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

(तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..)
जगात तिन प्रकारचे लोक असतात.
काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.
काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.
आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.

टेंपररी -पर्मनंट

एक शिपाई दुसऱ्याला : ‘काय रे, एवढा का चिडतोस?’

दुसरा शिपाई- ‘हा मंत्री फुकट दटावून गेला मला.’

पहिला शिपाई- ‘अरे, मग त्यात एवढा राग येण्याचे कारण काय?’

दुसरा शिपाई- ‘का नाही? एक टेंपररी माणूस एका सरकारी पर्मनंट माणसाला दटावतो म्हणजे काय?

आजचा जमाना

एका मुलाला १ चिराग मिळाला... खुश होऊन त्यानी तो घासला....
लगेचच धूर झाला... आणि थोड्याच वेळात..............
.
.
.
.
"धड्दम" असा स्फोट झाला.. ५ जागीस ठार !! आणि ७ जखमी....!!!!!
अल्लादिन चा जमाना गेला आता....

लावारिस वस्तूंना हात लाऊ नका.....

तिच्या लग्नाची पत्रिका

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
... नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,

दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,

एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,

'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,

काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,

'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,

सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,
आज घरी दिसली............!

करायला गेल तर ...........

तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत

चालायला गेलं तर
निखाऱ्यांही फूले होतात

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत

जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत

वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत

पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत
गमावलं मी पण होतं..
.
गमावलं तिने पण होतं..
.
फरक फक्त एवढा आहे..?
.
तिला मिळविण्या करीता मी सर्व
काही गमावलं..
.
अन्..?
.
तिने सर्व
काही मिळविण्या करीता मला गमावलं..

उपाशी रहा, मुर्ख व्हा

स्टीव्ह जॉब्जचे भाषण
उपाशी रहा, मुर्ख व्हा
उल्हास हरी जोशी

नुकतेच ऍपलचा संस्थापक स्टिव्ह जॉब्ज याचे निधन झाले. अमेरिकेचे प्रेसिडेन्ट बराक ओबामा पासुन आय.टी. इन्डस्ट्रीमधील बील गेट्स, मार्क झुकेरबर्ग, लॅरी ऍलीसन सारखे दिग्गज पण हळहळले. स्टिव्ह हा इतिहासात एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळखला जाईल असे अमेरिकेतील तद्यांचे मत आहे. एडीसन प्रामाणेच स्टिव्ह कडे पण इंजिनीअरींगची कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालिफिकेशन नव्हते. कॉलेजमधला ड्रॉप आऊट असलेला, वयाच्या 21 व्या वर्षी स्वतःची कंपनी काढणार्या्, वयाच्या 30 व्या वर्षी आपल्याच कंपनितुन हकालपट्टी झालेल्या, नंतर कंपनीत परत आल्यावर ऑपल ही जगातील एक दिग्ग्ज-आघाडिची कंपनी बनविणार्याु स्टिव्हला हे कसे जमले? 12 जुन 2005 सली त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटीत केलेले भाषण जगभर गाजले. या भाषणाचा हा स्वैर मराठी अनुवाद.
प्रिय मित्रांनो,
जगातील सर्वोकृष्ट युनिव्हर्सिटिमधील आजचा तुमचा पहिला दीवस आहे. या निमित्ताने तुम्ही मला भषण देण्यासाठी निमंत्रीत केलेत हा माझ्या दृष्टिने मोठा गौरव आहे. कारण मी स्वतः कॉलेज ग्रॅज्युएट नाही. खरे सांगायचे तर आजच्या या निमंत्रणाच्या निमित्ताने, पहिल्यांदाच, कॉलेज ग्रॅज्युएशनच्या जवळपास मी आलो आहे. आज मी माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तीनच गोष्टी ! फार काही नाही.
मझी पहिली गोष्ट आहे ती बींदु जोडण्याची, डॉट्स कनेक्ट करण्याची.
माझ्या जन्माच्या आधीपासुनच याची सुरवात झाली. माझी खरी आई कॉलेजमधे शीकणारी एक तरुण कुमारी माता होती. माझा जन्म झाला तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. माझा सांभाळ करणे तिला शक्य नव्हते म्हणुन तिने माझी रवानगी ऍडॉप्शनसाठी म्हणजे दत्तक देण्यासाठी म्हणुन केली. तिची इच्छा होती की कॉलेजमधुन ग्रॅज्युएट झालेल्या जोडप्याने मला दत्तक घ्यावे. त्याप्रमाणे एक वकील जोडपे मला दत्तक घ्यायला तयार पण झाले होते.पण ऐनवेळी कुठेतरी माशी शींकली. त्यांनी अचानक एक मुलगी दत्तक घ्यायचे ठरवले. त्यामुळे वेटींग लिस्टवर असलेल्या माझ्या आई वडिलांना मध्यरात्री फोन आला. ‘ अचानक एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध झाला आहे. तुम्हाला तो मुलगा हवा आहे का?’ त्यांना विचारण्यात आले. ‘अर्थातच आम्हाला हवा आहे.’ माझ्या आई वडिलांनी उत्तर दिले. नंतर माझ्या खर्यात आइला कळले की माझी दत्तक आई कॉलेज ग्रॅज्युएट नाही तर माझे दत्तक वडील शाळेचे सुध्धा ग्रॅज्युएट नाहीत. त्यामुळे दत्तकाच्या कागदांवर सही करायला माझी खरी आई तयार होत नव्हती. पण ज्यावेळी माझ्या दत्तक आईवडिलांनी माझ्या खर्याख आईला वचन दिले की ते मला कॉलेजमधे नक्की पाठवतील, त्यानंतर काही महिन्यांनी माझ्या खर्या आइने कागदावर सही केली.
त्यानंतर 17 वर्षांनी मी खरोखरच कॉलेजमधे जॉईन झालो. पण मी चुकुन स्टॅनफोर्डसारखेच महागडे कॉलेज निवडले. वर्कींग क्लासमधुन आलेल्या माझ्या दत्तक आई वडिलांनी पै पै जमवुन माझ्या शीक्षणासाठी पैसे जमा केले होते ते खर्च होऊ लागले. सहा महिन्यांनंतर माझ्या लक्षात आले की मी घेत असलेले शीक्षण त्या लायकिचे नाही. एक म्हणजे आपण आयुष्यात पुढे काय करायचे हे ठरले नव्हते आणि या साठी माझे कॉलेज मला काय मदत करु शकेल हे पण समजत नव्हते. मी उगीचच माझ्या दत्तक आईवडिलांनी मोठ्या कष्टाने जमवलेले पैसे वाया घालवत होतो. त्यामुळे मी ड्रॉप आऊट व्हायचे ठरवले. पण मी मनातुन थोडा घाबरलो होतो. पण मागे वळुन पहाता मला वाटते की तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. मी ड्रॉप आऊट झाल्यामुळे मला इंटरेस्ट नसेलेले क्लासेस अटेन्ड करण्यापासुन माझी सुटका झाली. पण त्याचवेळी मला आवडु शकेल अशा कोर्ससाठी मी ड्रप ईंन पण झालो.
पण ही गोष्ट वाटते तेव्हडी सोपी नव्हती. आता मी कॉलेजचा स्टुडंट नव्हतो. त्यामुळे मला मिळालेली खोली गेली होती. मित्राच्या खोलीवर जमिनीवर झोपावे लागत होते. खिषात पैसे नव्हते. त्यामुळे जुन्या कोकच्या बाटल्या 5 सेन्टस ला विकुन पैसे मीळवावे लागले. गावात एक हरेकृष्ण मंदीर होते. तेथे दर रविवारी संध्याकाळी पोटभर मोफत जेवण मिळे. त्यासाठी 7 मैलांची पायपीट करत जावे लागत होते. परंतु मला ते आवडले. त्यावेळी केवळ उत्सुकतेपोटी मी ज्या गोष्टी केल्या आणि माझ्या अंतर्मनाने ज्या गोष्टी मला करायला सांगितल्या त्या पुढे लाख मोलाच्या ठरल्या. याचे एकच उदाहरण मी तुम्हाला देतो.
त्यावेळी रीड कॉलेजमधे कॅलिग्राफीचे देशातील सर्वोत्तम शीक्षण मीळत असे. कॉलेजच्या कॉम्पसमधे प्रत्येक पोस्टर, प्रत्येक लेबल सुंदर पध्ध्दतिने हाताने कॅलिग्रा॑फ केलेले असायचे. मी ड्रॉप आऊट होतो. कुठलेच क्लासेस अटेन्ड करण्यावे बंधन माझ्यावर नव्हते. त्यामुळे मी कॅलिग्राफी क्लासमधे जाऊन बसु लागलो. त्या ठिकाणी माझी खर्यान अर्थाने अक्षरांशी अक्षराओळख झाली. तेथे मला सेरीफ आणि सॅन सेरीफ टाईप फेसेसचे ज्ञान मिळाले. अक्षरांमधल्या जागेचे महत्व कळले. ग्रेट टायफोग्राफी कशामुळे ग्रेट होते याची थोडीशी समज आली. ही गोष्ट सुरेख, ऐतिहासीक, कलापुर्ण अशी होती. ही अशी गोष्ट होती की ती सायन्स शीकवु शकत नाही. मला हे शीकताना खुप मजा आली.
मी हे सगळे छंद म्हणुन शीकत होतो. याचा मला आयुष्यात काहीच उपयोग होणार नाही असेच मी समजुन चाललो होतो. पण दहा वर्षांनंतर, जेव्हा आम्ही पहिला मॅसिनटोश(Macintosh) कॉम्युटर डिझाईन करत होतो, हे सगळे मला आठवले. आम्ही त्याचा मॅकमधे उपयोग केला. हा जगातील पहिला कॅम्युटर होता की ज्यामधे एक सुंदर अक्षरलिपी होती. जर मी रीड कॉलेजमधील हा कोर्स केला नसता तर आमच्या कॉम्युटरमधे ही सुरेख लिपी आलीच नसती. त्यानंतर विन्डोने हीच लिपी कॉपी केल्यामुळे सगळ्या पी.सी. ( पर्सनल कॉंम्युटर) वर याचा उपयोग सुरु झाला. मी जर कॉलेजमधुन ड्रॉप आऊट झालो नसतो आणि कॅलिग्राफी क्लासला ड्रॉप ईन झालो नसतो तर आज पर्सनल कॉम्पुटरमधे जी सुरेख अक्षरलिपी पहायला मीळते ती मिळाली नसती.
त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील बिंदु किंवा डॉट्स जोडण्यासाठी नेहमी पुढेच म्हणजे भविष्यकाळाकडेच बघायला हवे असे नही. उलट तुम्हाला मागे वळुन, म्हणजे भुतकाळाकडेच बघावे लागते. भूतकाळातील घटनाच भविष्यकाळातील डॉट्स जोडायला कारणिभुत असतात यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. तुम्ही कशावर तरी विश्वास ठेवायला हवा. मग ते तुमचे गट्स, डेस्टिनी, आयुष्य, कर्म- काहिही असेल. मझ्या या अप्रोचने मला कधिही खाली पहायला लावले नाही, तर त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रचंड परिवर्तन घडले.
कदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता.
तेथे एक कावळा आला....
मुलाला बापाने विचारले, ते काय आहे?
मुलगा म्हणाला कावळा.
पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे?
मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.
तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे?
मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा............
मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते?
मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का?
कावळा...... कावळा... कावळा.

पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते?
मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले,
का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून,
तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?
मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली.
त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.
परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता.
त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता,
आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.
त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता,
उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते.
तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.
फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट,
त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता.
उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले.
लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात?
आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील train ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात. त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय. तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...” तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”त ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?” वडील हसतात आणि म्हणतात..” आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..
कंजूस साहेब - हे तू ह्यावर्षी इमानदारिने काम केलेस त्याबद्दल तुला ५००० रुपयांचा बोनस धनादेश........

आणि

तू जर असाच काम करत राहिलास तर ह्यावारती पुढच्या वर्षी नक्कीच स्वाक्षरी करीन.....
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.

जेवताना मी तिचा हात हातात

घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;

तरीही ती शांतपणे जेवत होती,

सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,

मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.

समोरच ताट तिने भिरकावून दिलं.

लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,

हे तिल जाणून घ्यायचं होत;

पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:

पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.

तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि

या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.....

तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती

आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.

तिची आणखी एक अट होती.

लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.

त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.

त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने

बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.

आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस

नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;

आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला.

आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,

असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.

रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां

हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन

माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच

पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना

नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.

जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.

माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते.

माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.

मी वेगाने CAR चालवत घरी आलो.

माझ्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो,

तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.

मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.

माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता.

ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.

आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,

जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

"आपण किती जरी नाही म्हणालो तरी आपण प्रेमात आंधळे होतोच, तसे आंधळे राहू नका... सावध राहा..कधी काही हि घडू शकत ..!

ब्लँक कॉल

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते …(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
“तुझा” पुढे मी खोडलेला “मित्र” …(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून…(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू …(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय…(६)

माणूस आहेस “गलत” पण लिहितोस “सही”
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे…. काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही…(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ…(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात…(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो “नको… आता नाही”
फार नाही… चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन…(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन….

-संदीप खरे
कॉलेजच्या मुलांमध्ये आणि वाऱ्यामध्ये काय साम्य आहे ?
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
दोघेही पुस्तक न वाचता त्याची पाने पलटतात......
एक पुणेरी मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन आली आणि म्हणाली, तू बस इथे मी चहा घेऊन येते.. .. .. ...

... थोड्या वेळाने परत आली आणि म्हणाली,

.. चल निघू आता, मी घेतला चहा....
चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )
चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )
मम्मी : काय झाले? चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो.
मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )
बायको : अहो तुम्ही म्हणाला होतात ना की, मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून मग आता का पिताय????

नवरा : अग आता दिवाळी जवळ आली ना, मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ????
डॉक्टर : तुम्ही रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पीत जा.
पेशंट : कमाल आहे. मी तर ते रोजच पितो. फकत माझी बायको त्याला "चहा" म्हणते.

शेअर बाजार !!

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्यांना दहा रुपये देईल. गावकरी खुश झाले व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागले... माकडे पकडायला गावकर्यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा. ... काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत. काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केले कारण गावकर्यांना माकडे सापडेनात. आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला, "मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.."

माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल. गावकर्यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागले.

असा चालतो शेअर बाजार !!
एक कवी कविता ऐकवित होता. पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे त्याच्या तोंडातली कवळी बाहेर यायची. असं बराच वेळ चालत राहालं.
शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, '' ओ महाशय काही कविता सांगता की नुसती कॅसेटच बदलत राहाता''
एकदा एक अमेरिकन जोडपं भारतात फिरायला येत, त्यांना एक सरदार पर्यटन मार्गदर्शक म्हणून माहिती सांगत असतो-- सरदार:-" हा ताजमहाल याला बांधायला ४ वर्ष लागली."

अमे. जोडपं:-"ह्या $$ , अमेरिकेत तर हे १ वर्षात बांधल असतं"
सरदार:-"हा लाल किल्ला याला तर ३ वर्षात तयार केला"

अमे जोडपं:-"काहीतरीच, हे तर अमेरिकेत सहा महिन्यात तयार होईल "
सरदारला त्यांचं बोलणं ऐकून खूप राग येतो, थोडं पुढं गेल्यावर कुतुबमिनार येतो; अमे. जोडप्याला ते पाहून आश्चर्य वाटते..

अमे. जोडपं:- "हे काय आहे?"
सरदार:-"मला काय माहित?? काल तर इथे काहीच नव्हतं!!!!"
हॅल्लो….. !!
मुलगी - हॅल्लो…. हॅल्लो…
मम्मी - हां हॅल्लो…
मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, ‘करेन करेन‘ म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा…
मम्मी - अग कशी म्हणजे … मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना…… अ‍ॅसिडीटी झालीय.
मम्मी - अ‍ॅसिडीटी ?
मुलगी - हो ना…. त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला… डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो…
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू…
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल…. काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ?आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी…. अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें… मधुराच्या मम्मी..
चंदूच्या बायोकोचे मराठी थोडे कच्चे असते……..
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते काळात नसते……..
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ……
ते असे…….
” प्रिय प्राण नाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला.
काल मुलगा झाला आजीला.
दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.
दवाखान्यात अद्मित केले बकरीला.
हजार रुपयात विकले आत्याला.
भारतात सध्या ४ प्रमुख मोठ्या समस्या आहेत ...

१) लोकसंख्या

.
...
२) भ्रष्टाचार

.
३) महागाई

.

आणि सर्वात मोठी समस्या

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
४) तरुणांना प्रत्येक आठवड्यात होणारे अगदी खरे खरे... प्रेम....

चोर आणि मॅनेजर

1 ला कैदी : किती वर्षांची शिक्षा?

2 रा कैदी : पाच वर्षांची.

1 ला कैदी : कुठला गुन्हा?

2 रा कैदी : जनता बँक लुटली म्हणून. आणि तुला?

1 ला कैदी : दहा वर्षे.

2 रा कैदी : कुठला गुन्हा?

1 ला कैदी : मी जनता बँकेचा मॅनेजर होतो.

शंकराचा त्रिशूळ

शंकर(पार्वतीला) : माझा त्रिशूळ कोठे आहे?

पार्वती : गणेशाने घेतला आहे.

शंकर : कशासाठी घेतला?

पार्वती : मॅगी खायला
स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले होते. या भ्रमण काळात त्यांना अनेक संत महापुरुष भेटले. एका संतांने त्यांना पवहारी बाबांची गोष्ट सांगितली. ती कथा पुढीलप्रमाणे होती...

प्रसिद्ध योगी पवहारी बाबा यांचे गंगा किना-यावर निर्जन ठिकाणी वास्तव्य होते. एके दिवशी रात्री बाबांच्या कुटीत एक चोर घुसला. काही भांडी, कपडे आणि एक घोंगडी हीच काय ती बाबांची संपत्ती. भांडी बांधून चोर पळण्याच्या तयारीत होता. घाई गडबडीत तो कुटीच्या एका भिंतीवर आदळला. घाबरून पळताना चोरलेले साहित्य खाली पडले.

बाबा उठले आणि चोराच्या मागे धावू लागले. खूप दूर गेल्यानंतर का होईना बाबांनी चोराला पकडलेच. घाबरलेला चोर थरथरत होता. परंतु बाबा त्याच्या चरणावर कोसळले. रडू लागले. बाबा चोराला विनवणीच्या सुरात म्हणू लागले, 'प्रभू, तुम्ही आज चोराच्या रूपात माझ्या कुटीत आलात. चुकून काही वस्तू तुम्ही तिथेच टाकलीत. कृपया त्याही सोबत घेऊन जा.'

चोराला काय करावे समजेना. बाबांच्या प्रेमाच्या आग्रहापोटी त्याने ते साहित्य स्वीकारले. बाबांनी एका गुन्हेगारातही देव पाहिला होता.

कथा ऐकवून त्या साधू पुरुषाने स्वामी विवेकानंदांना विचारले, 'तुम्हाला माहिती आहे तो चोर कोण होता.' स्वामींनी अनभिज्ञता दर्शविली. त्यावर त्यांनी सांगितले, तो चोर मीच होतो.
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा ” स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.

"बाप"- उन्हामधलं सावली देणारं झाड

उन होऊन माथ्यावरती पाखरांचे तो करतो लाड
"बाप"असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

पाखरांचा चिवचिवाट कानी पडताच
वड आनंदाने बहरून येतो
पाखरं बांधतात घरटी. तेव्हा-
वड केवढा मोहरून जातो
फांदीच्या हातावर नि पानाच्या तळव्यावर
पाखरांचे तो करतो लाड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

मातीमध्ये मुळे त्याची -
खोल-खोल जातात. आणि-
खडकाच्याही पोटामधले
घेऊन येतात नारळपाणी
पाखरं उडून गेली तरी-
येत नाही त्यांच्या आड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणार वडाचं झाड

डोक्यावरती उन घेऊन
सर्वांना तो सावली देतो
उन्हाचा मुकुट पेलता पेलता
अचानक तो म्हातारा होतो
पारंब्याची काठी घेवून
तोल सावरतो जणू पहाड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

वड उन्मळून पडतो तेव्हा
सावली होते सैरभैर
बाप नाही जाणवल्यावर
पाखरांचाही तुटतो धीर
उपसला तरी आटत नाही त्याच्या आठवणींचा आड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं

एका वेड्याचं पत्र

एक वेडा पत्र लिहित होता.

डॉक्टरांनी त्याला विचारले, '' कुणाला पत्र लिहितोस ?''

वेडा , '' मला स्वत:ला ''

डॉक्टर, '' काय लिहिलं आहे पत्रात ?''

वेडा , '' काय माहित... अजुन मला पत्र मिळालंच कुठं? ''

११ नंबरच बटन

एक सरदार पाहूणा म्हणून अमेरिकेला आपल्या मित्राकडे गेला. मित्राने बाहेर कामावर जातांना सरदारजीला , '' समोरचं दार आतून बंद करुन घे, बाहेर जातांना दाराला कुलूप लावून जा, काही प्रॉब्लेम असल्यास 911 ला फोन कर '' वैगेरे वैगेरे सगळ्या सुचना दिल्या. कारण त्या भागात खुप चोऱ्या व्हायच्या.

सरदारजीचा मित्र संध्याकाळी कामावरुन घरी आला, पाहतो तर जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. घरात चोरी झाली होती. सरदारजीचा मित्र सरदारजीवर जाम भडकला -

'' तुला सांगितलं होतं ना मी बाहेर जातांना कुलूप लावून जा म्हणून''

'' मी बाहेर गेलोच नाही'' सरदारजी म्हणाला.

'' तुला सांगितलं होतं ना मी की दार आतून बंद करुन घे म्हणून"

'' हो मी दार आतून बंद केलं होतं.. पण चोर खिडकीतून आत आले''

'' म्हणजे तुला चोर आल्याचं माहित होतं?''

'' हो मी या खोलीत बसून त्यांची त्या खोलीत चाललेली सगळी खुडबुड ऎकत होतो''

'' मग तु त्यांना का नाही रोखलं'' त्याच्या मित्राने विचारले.

'' कारण ते चार होते आणि मी एकटा... आणि त्यांच्याजवळ बंदूका होत्या''

'' मी तुला सांगितलं होतं ना की काही गडबड झाल्यास 911 ला फोन कर म्हणून... फोन तर तुझ्या खोलीतच होता''

'' मी प्रयत्न केला ना ... तुझ्या फोनवर मला 9 नंबरचं बटण सापडलं पण 11 नंबरचं बटन किती शोधलं तरी सापडलंच नाही'' सरदारजी म्हणाला.

गुन्हेगाराचा शोध

एक सरदार आपल्या घरासमोर आपल्या कंपाऊंडमध्ये झाडांना पाणी देत होता. तेवढ्यात तिथे बाईकवर एक पोलीस आला. सरदारजीच्या घरासमोर गाडीवरुन उतरला. सरदारजीच्या घरापासून 40-50 फुट पळतच समोर गेला आणि थोड्या वेळाने सरदारजीच्या घरासमोर परत आला. नंतर तो दुसऱ्या बाजुला 30-40 फुट पळत गेला आणी थोड्या वेळाने पुन्हा परत आला. झाडांना पाणी देणारा सरदारजी हे सगळं पाहतच होता. सरदारजीच्या लक्षात आलेकी कदाचित पोलीस कुण्या गुन्हेगाराला शोधत असावा.

''काय साहेब ... कुणाला शोधताय?'' सरदारजीने विचारले.

पोलिस सरदारजीजवळ गेला. त्याने खिशातून एक फोटो काढला आणि सरदारजीला दाखवित म्हणाला,

'' हा एका अट्टल गुन्हेगाराचा फोटो आहे... मी त्यालाच शोधत आहे... तुम्ही याला एवढ्यात इथून जातांना बघितले तर नाही? '' पोलिसाने विचारले.

सरदारजीने फोटो हातात घेतला आणि निरखुन त्या फोटोकडे पाहाले. फोटो पोलिसाला परत करीत सरदारजी म्हणाला, '' नाही ... मी नाही बघितलं ''

पोलिस फोटो परत घेवून तिथून जावू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर सरदारजीने आवाज दिला, '' साहेब एक मिनिट''

पोलिस वळून पुन्हा सरदारजीजवळ आला.

'' जरा तो फोटो तर दाखवा ''

पोलिसाने पुन्हा तो फोटो सरदारजीकडे दिला.

सरदारजीने थोडा वेळ त्या फोटोकडे पुन्हा निरखून बघितले आणि म्हटले,

'' मला एक गोष्ट कळत नाही ... जर हा एवढा अट्टल गुन्हेगार होता तर त्याचा फोटो काढला तेव्हाच त्याला का पकडलं नाही ?''

सरदारजीची डायरी

बुधवार - एका शुजच्या दुकानदाराला मुर्ख बनविले. एका जोड्याच्या किमतीत दोन जोडे खरेदी केले. ( त्याने एकाच जोड्यावर किंमत लिहिली होती. दुसऱ्या जोड्यावर बहुधा तो किंमत लिहिण्याचे विसरला असावा )

गुरवार - औषधीच्या दुकानातून मालकाने कामावरुन काढून टाकले. त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते. पण काय करणार बॉटल प्रिंटरमधे जात नव्हती.

शुक्रवार - रात्री खुप हसलो, पांडेजीने बुधवारी सांगितलेला विनोद फार चांगला होता.

शनिवार - पाऊस आला आणि संध्याकाळी पावसात झाडांना पाणी द्यायचं काम पडलं.

रविवार - वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो. सगळं गाव पालथं घातलं पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही

आठवण

संता - अरे माहीत आहे मी लहानपणी दहाव्या मजल्यावरुन खाली पडलो होतो.

बंता - मग? ... मग काय झालं साल्या वाचला की मेला?

संता - आता आठवत नाही यार ... खुप जुनी गोष्ट आहे.

देव हरवला आहे

दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.

त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.

मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.

झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.

साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''

तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.

पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''

पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.

आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''

तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे''

'' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.

लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे''

सरदारजी आणि जिन

एकदा सरदारजीने आपल्या घरी अडगळीत पडलेला दिवा स्वच्छ करण्यासाठी घासला आणि काय आश्चर्य त्यातून एक जिन अवतरीत झाला.

'' सरदारजी माग तुला जे पाहिजे ते माग... पण लक्षात ठेव तू फक्त तिन गोष्टी मागू शकतोस... '' तो जिन म्हणाला.

सरदारजीने पहली गोष्ट मागीतली - '' मला खुप श्रीमंत व्हायचे आहे''

एका क्षणात सरदारजी गडगंज श्रीमंत झाला.

सरदारजीने दूसरी गोष्ट मागितली '' मला या सरदारजी नावाची फार चिड आहे मी अमेरीकन बनू इच्छीतो ''

एका क्षणात सरदारचा अमेरीकन झाला.

अमेरीकन झालेल्या सरदारजीने आता तिसरी आणि शेवटची गोष्ट मागितली, '' मी पुढेही असंच डोकं न लावता पैसे कमावू इच्छीतो''

एका झटक्यात अमेरीकनचा पुन्हा सरदारजी झाला.

सरदारजीच्या इथे चोरी.

एक रेल्वेत काम करणारा सरदारजी पोलिस स्टेशनला गेला.

" इन्सपेक्टर साहेब माझ्या इथे चोरी झालेली आहे... जरा रिपोर्ट तर लिहा'

इन्सपेक्टरने विचारले, "केव्हा झाली चोरी.?''

सरदारजीने उत्तर दिले "1945 ला'

इन्स्पेक्टरने त्याची टिंगल उडवित म्हटले , ' फार लवकर रिपोर्ट करता आहात महाशय '

' मग आपलं कामच फार फास्ट आहे... 1945 ला चोरी झाली आणि बघा आता 2030 झालेत ... 45 मिनटात इथे पोहोचलो''

सरदारजीचं गाढव

एकदा एका सरदारजीचं गाढव हरवलं. दिवसभर त्याने सगळं गाव गाढव शोधण्यासाठी पालथं घातलं पण त्याला काही त्याचं गाढव सापडलं नाही. संध्याकाळी थकून घरी आल्यावर त्याने देवाचे धन्यावाद देवून त्याचे आभार मानले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आश्चर्याने विचारले, '' इकडे आपलं गाढव हरवलं आणि तुम्ही देवाचे आभार का मानता आहात''

'' कारण, ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''

आयुष्य सुंदर वाटत...

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा ...
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.......
नशिबाची चाकरी करण्यापेक्षा ...
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव आयुष्य जास्त सुंदर बनत..........
भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा...
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.........
कायमच मागण्या करण्यापेक्षा...
कधीतरी काहीतरी देऊन पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत......
हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा...
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...........
चारचौघात एकट बसण्यापेक्षा...
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं आयुष्य जास्त सुंदर वाटत........
आपल्याला कोण हवंय यापेक्षा...
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत......
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत...
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.......

देवाची देणगी- पाकिस्तान

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.
थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."
काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"
ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली. त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."
ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."
देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

ट्रेनर

एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणार्‍या फोटोग्राफरला एकदा जंगलात लागलेल्या आगीचा चांगला फोटो काढायचा होता. त्याने बराच प्रयत्न केल्यावरही चांगला फोटो मिळेना, प्रत्येक फोटोत आग दिसण्या ऎवजी धुरच दिसायचा, तेंव्हा त्याने आपल्या संपादकांना फोनवरुन कळवले कि जंगलात आग लागली आहे व आगीचा फोटो विमानातुनच काढणे शक्य आहे तर लौकरात लौकर विमानाची व्यवस्था करा.
संपादक म्हणाले लगेच करतो तु विमानतळावर जा.
फोटोग्राफरला घाई झाल्याने त्याने विमानतळावर पोहोचल्यावर सोपस्कार पूर्ण केले व एका लहान विमानात जाऊन बसला व पायलटच्या जागेवर बसलेल्याला म्हणाला चल लगेच उडूया.
पायलटने विमान आकाशात नेल्यावर त्यांनी आगीच्या दिशेने ते वळवले.
फोटोग्राफर म्हणाल चल आता विमान जरा खाली घेऊन ३ ते ४ फेर्‍या मार.
पायलट म्हणाला," का ?"
फोटोग्राफर," मी फोटोग्राफर आहे, मला या आगीचे जवळून फोटो काढायचे आहेत."
"अरे बापरे, मला वाटले तुम्ही नविन ट्रेनर आहात व मला आज विमान कसे उतरवायचे हे शिकवणार आहात.",
पर्यटक म्युझियममध्ये फिरत असतात.

पर्यटक : हा कोणाचा सांगाड आहे?

गाइड : हा या भागातल्या राजाचा सांगाडा आहे.

पर्यटक : आणि हा लहान सांगाडा कोणाचा आहे?

गाइड : तो राजा लहान असतानाचा सांगाडा आहे!
पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का?

गंपू : हो!
मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!