तहान आणि भूक आरंभी नव्हतीं

(अभंग)

तहान आणि भूक आरंभी नव्हतीं,
अन्नमुखें होतीं एक्या ठायीं;
कामाचा विषय नव्हता तो दूरी,
होतीं नरनारी एक्या देहीं;
तेधवां नव्हतें हात आणि पाय,
करायाचें काय त्यांही होतें ?
स्वर्ग आणि पृथ्वी जुळूनियां होतीं,
नव्हतीच खंती तेणेंयोगें.


कवी - केशवसुत
- 'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ. १२७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा