बाप

(बाप म्हणतो, “आपणात भांडणे किती धर्मही बुडत चालला. महारांना म्हणतात शिवा. आचार उरला नाही तर कसे होणार?”)

काय सांगाल लोकांस लोकांमध्ये नसे बळ
ऐक्य नाही धर्म नाही कोठे दाबाल रे कळ।।

स्पृश्यास्पृश्य तसे अन्य वाद माजून राहिले
भ्रष्टता माजली सारी हलकल्लोळ माजले।।

ब्राह्मणब्राह्मन्यांची खडाजंगी असे सदा
जागा न उरली कोठे बाळा टाकावया पदा।।

हिंदू आणि मुसलमान पाण्यात बघती जसे
विश्वास लव ना उरला बाळ होईल रे कसे।।

धर्मास लागतो डाग धर्म श्रेष्ठ सनातन
आचारा बुडवितात माझे हे करपे मन।।

धर्म हा प्राण जीवाचा धर्मार्थ सर्व पाहिजे
त्याच धर्मास टाकोनी बाळा चित्तांत लाजिजे।।”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा