अमेरिकन प्रेसिडेंट रुझवेल्टच्या बापाबद्दल बोलताना एका लेखकाने लिहिले आहे- ‘‘हा रुझवेल्टचा बाप मोठेपणासाठी फार हापापलेला होता. प्रत्येक ठिकाणी आपण महत्त्वाच्या ठिकाणी असावं, केंद्रस्थानी असावं असं त्याला वाटायचं. उद्या एखादी प्रेतयात्रा निघाली तरी त्यातलं प्रेत आपणच असावं, असं याला वाटलं."

 एका थापाड्याने कडी केली. एकदा तो लोकांना म्हणाला, ‘‘अरे, कुत्री-मांजरं काय पाळता? माणसानं काहीतरी निराळं करण्यात गंमत.’’ एकाने विचारले ‘‘असं? तुम्ही काय पाळलं आहे?’’

‘‘मी एक मासा पाळला होता-’’ तो फुशारकीने बोलला, ‘‘त्या माशाला मी चांगला मोठा केला. पाण्याशिवाय राहायला त्याला शिकवलं. मी कुठंही निघालो की तो मासा टुणटुण उड्या मारीत माझ्या पाठीमागून चालत यायचा!’’

‘‘असं?’’ सर्वांना आश्चर्य वाटलं. कुणीतरी पृच्छा केली.

‘‘मग तो मासा अलीकडं दिसला नाही तुमच्या मागून येताना?’’

अत्यंत दु:खी चेहरा करून ते सद्गृहस्थ बोलले, ‘‘दुर्दैव माझं. दुसरं काय?’’

‘‘काय झालं?’’

‘‘परवा मी एका नदीच्या पुलावरून चाललो होतो. तो मासाही टुणटुण करीत माझ्या मागून उड्या मारीत येत होता. पावसाळ्याचे दिवस. एकदम त्याचा पाय घसरला अन् तो खाली नदीत पडला आणि बुडून मेला!...’

आयरिश आणि स्कॉटिश माणसं अत्यंत चिक्कू आणि बिनडोक म्हणून प्रसिद्ध आहेत. एकदा एक स्कॉटिश तरुण एका ओळखीच्या माणसाला अचानक स्वित्झर्लंडमध्ये भेटला. ते गृहस्थ आश्चर्याने त्या तरुणाला म्हणाले, ‘‘अरे, तू इकडं स्वित्झर्लंडमध्ये कसा?’’

‘‘म्हणजे काय?’’ तो तरुण त्यांच्या अज्ञानाची कीव करीत म्हणाला, ‘‘माझे परवाच लग्न नाही का झालं? हनीमूनसाठी म्हणून स्वित्झर्लंडमध्ये आलोय.’’

‘‘हनीमूनसाठी?’’ त्या ओळखीच्या गृहस्थाने इकडेतिकडे शोधक दृष्टीने पाहिले-‘‘पण तुझी बायको तर कुठं दिसत नाही मला!’’

‘‘तिनं स्वित्झर्लंड पूर्वी पाहिलंय-’’ तो स्कॉटिश तरुण म्हणाला, ‘‘मग पुन्हा खर्च कशाला? म्हणून मी एकटाच हनीमूनसाठी इथं आलो!’’

आपण दुःखी का होतो.....?

एकदा शिक्षिकेंनी तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो शाळेमध्ये आणावयास सांगितले. प्रत्येक टोमॅटोवर त्या मुलांनी,ते ज्या व्यक्तीचा द्वेष करत असतील त्याचे नांव लिहून आणावयाचे होते.अशा रीतीने जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टोमॅटो त्यांनी आणावयाचे होते.

ठरलेल्या दिवशी सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टोमॅटो आणले.काहींनी दोन, काहींनी तीन,काहींनी पाच तर काहींनी वीस टोमॅटो,ते द्वेष करीत असलेल्या संख्येबरहुकूम आणले.

शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की,त्यांना ते टोमॅटो ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत.

जसजसे दिवस उलटू लागले,तसतसे मुले टोमॅटोंच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले.ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टोमॅटो होते त्यांनी तक्रार केली की त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारचं सुटलेला आहे.

आठवड्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला,"तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले?"

मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टोमॅटोंच्या जडपणाबद्दल तक्रारी केल्या.विशेषत: ज्यांनी अनेक टोमॅटो आणले होते.

शिक्षिका म्हणाल्या,"हे अगदी तुम्ही,आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे."

 द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता.जर तुम्ही टोमॅटोंचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल तर कल्पना करा,तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्या अंत:करणावर किती परिणाम होत असेल."


आपल्या दुःखाचे कारण हेचं आहे...

नको त्या वाईट गोष्टी मनात साठवून ठेवतो.अंत:करण ही एक सुंदर बाग आहे.अनावश्यक तण काढून टाकून त्याची नियमीत मशागत करण्याची गरज असते.तुम्हाला क्रोध दिलेल्यांना क्षमा करा. त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंत:करणात जागा तयार होईल.

 माणूस फळं सोडून वडापाव,सामोसे खातो.


मग आजारी पडून दवाखान्यात जातो. 


दवाखान्यात त्याला त्याचे नातेवाईक सफरचंद,संत्री,द्राक्ष खायला देतात.


आणि त्याचे नातेवाईक दवाखान्याच्या बाहेर बसून वडापाव,सामोसे खातात.


हे जीवनचक्र आहे

पाण्याबद्दल एक माहितीचा लेख.

डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे

1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. एक मृत साठ्याचे पाणी, दुसरे जिवंत साठ्याचे पाणी*


       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्यासाठी दहा वर्ष लागतात. 

4)  एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे.

5) एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 

           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगरावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.  

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या. याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. झाडं माणसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

 दादा एकदा बार मध्ये जातात ...


 दादा : ( वेटरला ओरडुन ) मला half chikan तंदुरी🍗 आणि बारमध्ये बसलेल्या सगळ्यांना बिर्याणी पाठव.. 

कारण जेव्हा मी खातो त्यावेळेस सगळ्यांना चारतो....

 

( बार मध्ये बसलेले सर्वजण टाळ्या वाजवून धन्यवाद करतात )


तंदुरी चिकन खाल्ल्या नंतर दादा पुन्हा ओरडले


दादा : वेटर मला एक रेड लेबल आणि बार मध्ये बसलेल्या सगळ्यांना एक एक बिअर पाठव...

कारण ज्यावेळेस मी पिती तेव्हा सगळ्यांना पाजतो.. 


( सगळे दादांवर खूप खुश होऊन पुन्हा टाळ्या वाजवतात आणि पुढच्या ऑर्डरची वाट बघतात ) 


तिक्यात दादा पुन्हा ओरडले....


दादा : वेटर... bill please... आणि सर्वांना ज्यांच्या-त्यांच्या टेबलवर बिल पाठव...कारण 😂😂

जेव्हा मी bill भरतो तेव्हा सगळ्यांना भरायला लावतो..