एका गावात एक शेतकरी आणि एक व्यापारी राहात होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला दर आठवड्याला पाच किलो गहू जायचा आणि शेतकऱ्याकडून दर आठवड्याला पाच किलो ज्वारी किंवा बाजरी व्यापाऱ्याकडे जायची. हा त्यांचा वर्षानुवर्षांचा व्यवहार होता.


दोघांमध्ये एकदा कडाक्याचं भांडण झालं. दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाकलं. पण, दोघांमधला व्यवहार सुरू राहिला.🤝


एक दिवस व्यापाऱ्याला शंका आली की शेतकऱ्याकडून आलेली ज्वारी पाच किलो नसावी. त्याने त्याच्याकडच्या काट्यावर तोलून पाहिली. ती साडेचार किलो भरली. पुढच्या वेळी चार किलोच ज्वारी आली. तो खूप संतापला. त्याने शेतकऱ्याला धडा शिकवायचा निर्धार केला. पंचायतीत तक्रार केली.😡


पंचायतीत जाहीर सुनावणी झाली. पंचांनी शेतकऱ्याला विचारलं, तू व्यापाऱ्याला का फसवतोस?🤨


शेतकरी म्हणाला, भांडण झालं म्हणून मी मापात पाप करीन हे शक्यच नाही.😊


व्यापारी भडकून म्हणाला, आता निदान खोटं तरी बोलू नकोस. माझ्याकडच्या काट्यावर तोलून पाहिलीये मी ज्वारी. पाच किलोच्या जागी कधी चार किलो, कधी साडेचार किलो.🤨


शेतकरी तरीही मानायला तयार नव्हता. तेव्हा पंच वैतागून म्हणाले, तुझ्याकडच्या वजनांमध्ये काही गडबड आहे का?🤔


शेतकरी म्हणाला, मी काय व्यापारी आहे का वजनं ठेवायला? माझ्याकडे वजनं नाहीत.


पंच म्हणाले, मग तू व्यापाऱ्याला पाच किलो ज्वारी कशी तोलून देतोस?⚖️


शेतकरी म्हणाला, त्याच्याकडून दर आठवड्याला जो पाच किलो गहू येतो, तीच पिशवी मी तागडीत एका बाजूला टाकतो आणि तेवढीच ज्वारी मापून पाठवतो. 🫣

संपूर्ण जगात भारतच असा देश आहे,😊*


जिथे,तुम्ही रेल्वे स्टेशन वर विचारू शकता🤔


9 वाजताची ट्रेन किती वाजता येणार आहे...🫣

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃

 उद्यापासून सुरु होणाऱ्या 10 वीच्या (S.S.C.)परीक्षेसाठी सर्व लेकरांना खूप खूप शुभेच्छा.. 

आणि 

सर्वात महत्त्वाचे.. अजिबात घाबरु नका.. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.. 😊


अतिशय सोप्पे असतात हे पेपर.. 👍

.

.

.

मी स्वतः 5-6 वेळा दिले आहेत.. 🫣

 दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात ४०० प्रवासी होते आणि विमानात फक्त २०० जणांच्या जेवणाची व्यवस्था होती.


आता ही चूक कशी दुरुस्त करायची?


सर्व एअरलाइन कर्मचारी विचारात पडले.


मग, एका हुशार फ्लाइट अटेंडंटला वेगळाच विचार सुचला!


फ्लाइटमध्ये सुमारे ३० मिनिटांनी, तिने घाबरत घाबरत एक घोषणा केली, "नमस्कार, हे कसे घडले हे मला माहित नाही, पण आज विमानात ४०० प्रवासी आहेत आणि आमच्याकडे फक्त २०० जेवणे आहेत! जो कोणी दुसऱ्यासाठी जेवण सोडण्यास तयार असेल त्याला संपूर्ण प्रवास कालावधीसाठी मोफत अमर्यादित दारू मिळेल!"


एका तासाच्या आत, त्यांची पुढची घोषणा होती...


"नमस्कार, जर कोणाला त्यांचा विचार बदलायचा असेल, तर आमच्याकडे अजूनही १८० जेवणे उपलब्ध आहेत!"


बोध : "दारू पिणारे फार दयाळू आणि इतरांचा विचार प्रथम करणारे असतात. कृपया त्यांचा आदर करा...!,,, 🍻🍻

 एका माणसाने व्हाईट हाऊसला फोन केला आणि म्हटले: मला अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती व्हायचे आहे...😇


ऑपरेटर: तू वेडा आहेस का?🤔


माणूस: हे अनिवार्य आहे का?🫣

बुवाबाजी जादू

1. जादू कुंकू काळे करण्याची...


शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे अर्धा लहान चमचाभर कुंकूवात निरमा पावडर घ्या निरमा पावडरात अल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात.


2. जादू हळदीचे कुंकू करण्याची.,..


बाबा लोक हळदीमध्ये थोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्या भाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात.


_३_ वस्तू गोड करणे...


सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते  बाबा लोक ज्या ही वस्तूला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबा लोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात.


_४_  लिबांतून रक्त काढणे,..


साहित्य--एक लिबूं  चाकू मिथील ऑरेंज च द्रावण चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंजच द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो ही कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करू दाखवू शकतात व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता


_५_ ताब्यांचे भांडे वर उचलणे....


ताब्यांचे लोटी घ्या.(भरणे)  ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाईल.


_६_ रसाने भरलेल्या लिंबूतून अग्नीच्या ज्वाळा निघणे......


चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.

यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.


_७_ पाण्याने दिवा कसा पेटू शकतो....


एका दिव्यात पाणी घ्या. त्यात कॅल्शिअम कार्बाईडचे छोटे खडे टाका आणि पेटवा. दिवा आपोआप पेटेल. हे कसे झाले?

जेव्हा आपण पाण्यात कॅल्शिअम कार्बाईडचे खडे टाकतो तेव्हा त्यांची पाण्यावर अभिक्रिया होऊन 'अॅसिटिलीन' वायू तयार होतो जो ऑक्सीजनच्या सानिध्यात जळतो व पांढरी शुभ्र ज्योत तयार होते. आणि लोकांना वाटतं दिवा पाण्याने पेटला. तुम्हीसुद्धा करून पहा हे खडे तुम्हाला एखाद्या वेल्डरकडे सहज उपलब्ध होतील. मग कधी पेटवणार 'पाण्याने' दिवा..?


_८_ आपोआप त्या मेणबत्त्या पेटणे....


मित्रांनो चमत्कार सोपा आहे पण खूप काळजी घ्यावी लागेल.

तुम्हाला पिवळा फॉस्फरस व कार्बनडाय सल्फाईडचं द्रावण वापरायचं आहे. पिवळ्या फॉस्फरसचा ज्वलनांक केवळ ३४॰ से. असल्याने तो सामान्य तापमानातही लगेच पेट घेतो हे आपण दहावीत शिकलोय. तर या फॉस्फरसला कार्बनडाय सल्फाईडमध्ये विरघळवा. आणि तयार झालेल्या द्रावणात मेणबत्तीची वात भिजवा. कार्बनडाय सल्फाईड बाष्पनशील असल्याने तो हवेत उडून जातो व वातीवर फक्त पिवळा फॉस्फरस रहातो.. त्याच्या कणांना हवा लागली कि तो लगेच पेट घेतो पर्यायाने वातसुद्धा सहज पेट घेते आणि तुम्ही चमत्कारी बाबा ठरता.


_९_ लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू  लागणे....


एक चाकू घ्या. चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.

यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.


_१०_ *अग्नीशिवाय यज्ञ पेटवणे...


या चमत्कारात मांत्रिक बाबा यज्ञाची सर्व सामग्री यज्ञकुंडात टाकतो पण आपल्या नकळत त्यासोबत नारळाची बुरी आणि कागदाचे तुकडेही टाकतो. मंत्राचा जाप करत तो त्यावर यज्ञात टाकावयाची विभूती व गायीचे तुप सोडतो आणि काय चमत्कार यज्ञ आगपेटीशिवाय आपोआप पेटतो आणि आपण धन्य होऊन बाबाला शरण जातो.

पण मित्रांनो खरी गंमत इथेच आहे मंत्र म्हणताना बाबा जी विभूती त्या न पेटलेल्या यज्ञावर टाकतो ती Potassium Permanganate (KMno4) ची बारीक पावडर असते व ती दिसायला काळी असल्याने कुणाला संशयही येत नाही. आणि गायीचे शुद्ध तुप हे ग्लिसरीनचे काम करते. ज्यावेळेस बाबा हे तुप त्या बुक्कीवर सोडतो तेव्हा Potassium permanganate वर ग्लिसरीनची प्रक्रिया होऊन निळसर धूर निघतो आणि यज्ञ पेट घेतो. 

तर मित्रहो, आहे कि नाही जादू..!!

काल वडिलांना मी फॉरेक्स ट्रेडिंग व क्रिप्टो करन्सी बद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगितली..😇

.

.

.

आज वडिलांनी माझ्या नावावर असलेले 5 एकर शेत आपल्या नावावर करून घेतली..🫣