*😁 खळखळून हसा - "व. पु. ...एक विनोदी कविता..."* 😁


लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस

लग्नानंतर मात्र राहत नाही,

एकदा लग्न लावून दिलं की

देवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗


मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,

तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉

आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा

प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.


आपला नवरा बैल आहे,

असं प्रत्येक बाईला वाटत असतं..

त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख

तिच्या मनात दाटत असतं 🙃


त्याचा तो गबाळा अवतार..

तिला नीट्नेटकं राहयचं असतं.

तिला चार दिवस सासूचे.. 😊

तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.


लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ

पळत कसला, रांगत असतो,

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो. 😜


ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,

असं प्रत्यक्षात घडत नाही. 😃

त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,

ती त्याच्या आकाशात उडत नाही.


तो गच्चीत तिला घेऊन जातो,

इंद्रधनुष्यावर चालायला..

ती सोबत पापड कुरड़या घेते,

गच्चीत वाळत घालायला.😀


त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची

लखलखती शुक्राची चांदणी असते,

हिच्या डोक्यात गोडा मसाला

आणि वर्षभराची भाजणी असते.😄


आपली बायको म्हैस आहे,

असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो 😃


कोण म्हणतो लग्नाच्या गाठी

देव स्वर्गात बांधत असतो.


*-व. पु. काळे*


😃

 माझ्या घरात सहा बल्ब आणि आठ ट्यूबलाईट आहेत. 😇


तरी पण बायको म्हणते तुम्ही आजपर्यंत मला अंधारात ठेवलंय .. 😉


असं कुठं असतं व्हय, आता बहुतेक हॅलोजन लावावा लागेल 🫣


🤣😂🤣😂😊

 एक जोडपं  २५ वर्षात कधीच भांडलं नाही!


एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??


नवरा-

आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस शिमल्याला हनिमूनला गेलो होतो. 


तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको

 ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने

 उडी मारुन बायकोला खाली पाडली..🤨


ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली ;


 "हे तुझ पहिल्यांदा झालं", 


थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " 


हे तुझ दुस-यांदा  झालं"


आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा 

तिने सरळ  त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.🤨🐎


मी ओरडलो, 

" ए बावळट, !  .....। तू घोड्याला मारलस ? पागल! "😡


तेव्हा ती मला रागात बोलली  


"हे तुझ पहिल्यांदा झालं".🫣


आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ... 

साधा वाद पण नाय केला कधी .. 😉


आम्ही अगदी आनंदी संसार करतो !!!🥰


🤣😂🤣😂😊

 30-35 ठीक आहे हो,

40 पार झालं की कशातच मन लागत नाही...

कुठंही बाहेर पडावस वाटत नाही, 

फिरायला वगैरे पण भीती वाटते..


तिशी च्या आत कसं, लगेच कुठं ही निघता यायचं...

थकवा नाही, कायम उत्साही वगैरे..!

20-25 तर अति स्वीट...

गोंडस गोंडस वगैरे...एकदम टवटवीत... आयुष्याची मज्जाच मज्जा वगैरे....

कसलीच भीती नाही..!


45 पार झाल्यावर तर काय होईल देव जाणो..!!


असो,


ह्या #तापमानात घरीच वामकुक्षी घेणंच योग्य.!!!🫣


काळजी घ्या उष्णता फारच वाढत आहे.!!! 😉


🤣😂🤣😂😊

 तीन दरोडेखोर एका घरात शिरले. ते त्या बाईला म्हणाले, "आम्हाला तुमच्या घराची व्यवस्था बिघडवायची नाही आणि तुम्हाला इजा करायची नाही, म्हणून आम्ही इथे सोफ्यावर बसलो आहोत. तुमच्याकडे जे काही पैसे आणि दागिने आहेत ते घेऊन या."


त्या बाईने पैसे आणि दागिने आणले. दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या पतीने भेट म्हणून दिलेली हिऱ्याची अंगठी कुठे आहे?"


ती गप्प राहिली आणि अंगठी आणून त्यांना दिली.


"तुमच्या बहिणीने दुबईहून पाठवलेले घड्याळ घेऊन या." बहिणीने दिलेली भेटवस्तू देताना तिच्या डोळ्यात अश्रू होते.


"आता तुमच्या परवानगीने आम्ही 'नेस्कॅफे'ची इन्स्टंट कॉफी पिऊ."


कॉफी प्यायल्यानंतर दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "आता कालचा उरलेला अननसाचा केक घेऊन या."


 जेव्हा दरोडेखोरांनी सर्व सामान नेले, तेव्हा ती बाई संकोचून म्हणाली, *"तुम्ही लोक खूप व्यावसायिक आणि नीतिमत्ता असलेले दरोडेखोर आहात. आमच्या घरातल्या वस्तूंबद्दल तुम्हाला कसे कळले?"*


*दरोडेखोरांच्या म्होरक्याने चेहऱ्यावर मास्क नीट करत म्हटले, मॅडम, आम्ही तुमचे 'फेसबुक फ्रेंड्स' आहोत.*


आम्ही तुमच्या पोस्ट्स नियमितपणे वाचतो. आम्ही तुमचा स्टेटससुद्धा तपासतो. 🫣


सोशल मीडियावर सर्व काही पोस्ट करणाऱ्या सर्वांना समर्पित


🤣😂🤣😂😊

 पत्नी नवऱ्याकडे वळून म्हणाली: "मी तुमच्याशी बोलत होते आणि तुम्ही सहा वेळा जांभई दिली, मी तुम्हाला कंटाळा आणतेय का?" 😡


नवरा म्हणाला: "त्या जांभया नव्हत्या. ते बोलण्याचे सहा अयशस्वी प्रयत्न होते." 🫣


🤣😂🤣😂😊

गर्मीचा कहर

रात्री बेडरुम मध्ये 2-3 मच्छर फिरतांना दिसले....


मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक मच्छर म्हणाला..


*"काका तुमची शपथ, चावणार नाही....* 🙏

*बस थोडा वेळ AC मध्ये बसु द्या"* 🫣


🤣😂🤣😂😊

 माझ्या शेजारणीचा नवरा आठवड्याभरापूर्वी कामानिमित्त दुबईला गेला आहे...🛩️


काल त्याची पत्नी त्यांची बेडरूम साफ करत असताना तिला त्याचा पासपोर्ट सापडला...🫣


🤣😂🤣😂😊

 *समोरच्याला कधीही कमी समजू नका.*😇


*कदाचित  ते* 😉


*तुमच्यापेक्षाही जास्त येडं असेल.*🫣


🤣😂🤣😂😊

 कालू प्रवचनाला गेला आणि मार खाऊन परत आला. त्याच्या मित्राने विचारले, "अरे दादा, हे कसे झाले?"🤔


कालू म्हणाला, "माझी काहीच चूक नसताना मला मार बसला." 🥴


महाराज असा उपदेश करत होते की, पती-पत्नी एकाच सायकलच्या दोन चाकांसारखे असतात. 😇


मी उभा राहून विचारले, "जर आपण आपल्या शेजाऱ्यासोबत मिळून एक रिक्षा बनवली, तर तुमचा काही आक्षेप असेल का?"😉


मी  काही चुकीचा प्रश्न विचारला तर नाही ना? 🫣


🤣😂🤣😂😊

 शाळेतील पहिल्या दिवसाचा किस्सा😇

.

शिक्षक मुलांची ओळख करून घेताना एका मुलाला विचारतात, "बाळा, तुझे वडील काय काम करतात?"🤔

.

.

.

मुलगा सांगतो, "आई सांगेल ते"!!🫣


🤣😂🤣😂😊

 रात्री सहज नवरा बायकोला म्हणाला..


नवरा :-


पुन्हा जावे शाळेत

पुन्हा ती दिसावी

भले लागू दे शिकाया

लासावी मासावी


बायकोचे उत्स्फूर्त उत्तर:-


बनून आता गोसावी

जी आहे ती सोसावी

विसरून आता लसावी, मसावी आठवणीने उद्या भांडी घासावी जमलचं तर फरशी पण पुसावी..🫣


🤣😂🤣😂😊

 जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे,


आपल्या हातात फ़क्त मोबाइल...


🤣😂🤣😂😊


आजकाल ची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दुसरा नवीन घेतात


आणि एक आम्ही होतो


फुगा फुटला तरी त्याची चमन गोटी करून डोक्यात फोडत बसायचो


🤣😂🤣😂😊


सकाळपासून रात्री झोपेपर्यंत


मोबाईल वर स्क्रोल करुन


४-५ किमी तर अंगाठाच चालत असेल..


🤣😂🤣😂😊


साधेपणा तिचा काय सांगावा,


ती आज देखिल chatting करताना


डोक्यावर पदर घेते


🤣😂🤣😂😊


आमच्या लहानपणी 2G, 3G, 4G, असं काहिच नव्हत,


फक्त, *गुरू G होते.* एक काना खाली मारली की,


पोरं आपोआप रेंज मध्ये यायचे


🤣😂🤣😂😊


आजकाल 8 वी 9 वी ची पोरं पण सर्रास


सिगारेट ओढतात आणि आम्ही एक होतो


बोरं पण सांभाळून खायचो चुकून गिळल गेलं तर पोटात झाड येईल या भीतीने


🤣😂🤣😂😊


आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच नव्हती आली


जितकी या मोबाईल मुळे आलीये


🤣😂🤣😂😊


* आधुनिक संस्कार "


वडील श्रीखंड घेऊन येतात.


मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो...


इतक्यात आईचे लक्ष जाते. त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते,


"किती वेळा सांगितले.... आधी....


फोटो काढून *Whatsapp वर टाकायचा आणि


नंतरच खायच


🤣😂🤣😂😊


काय मज्जा आहे आजच्या शाळेतल्या पोरांची


त्यांना लवकर "प्रेम" करायला


मिळतय....


आणि आम्ही ९ वी १० वीत "प्रमेय" सोडवुन सोडवुन मेलो


🤣😂🤣😂😊

 पहाटेच जाग आली 

कोणी टकटक करीत होते,🤛🏼

दार उघडून पाहिले बाहेर 

तर कुणीच उभे नव्हते...🤔


आवाजाच्या दिशेने बघताच 

खिडकीवर दिसला एक पक्षी,🐥

चोचीने टकटक करीत तावदानावर 

उमटवीत होता नक्षी...🐧


"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,

"भाड्याने मिळेल का एखादे झाड 🌳

घरटे बांधण्यासाठी?,

एकटा कुठेही कसाही राहिलो असतो 

पण जागा हवी 

पिल्लांसाठी...🐣


 

तुमच्या भाऊबंदांनी लुटले 

आमचे रान केले निर्वासित,🤯

बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी 

असतो आता फिरस्तित...


वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत 

थोडे दाणे अन पाणी,🍲🫙

पण निवाऱ्याचे काय? 

हे लक्षात घेतच नाही कुणी...


पोटाला हवेच, खातो ती भिक 

अन नेतो थोडे घरी,🦜

खायला तर हवच, 

जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...🐦


कधीकधी वाटते  करावी आत्महत्या🦉

बसुन विजेच्या तारेवर,

किंवा द्यावा जीव लोटून 

त्या उंच मोबाईल टाॅवरवर...🦇


 

जसे मग आत्महत्ये नंतर 

सरकार काही देते शेतक-याला,🦩

तसेच मिळेल का एखादं झाड 

माझ्या पिल्लांना तरी आस-याला"🕊️


ऐकून मी चक्रावलो, खरचं 

एवढा विचार मी नव्हता केला,🦃

जंगलतोडीत त्यांच्या घरांचा 

विचार कुठेच नाही झाला...🦤


मी हात जोडून म्हटले, 

"त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,🦢

पण आत्महत्या करू नको 

खरचं मनापासुन सांगतो...🦚


तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर 

बांध वनरुम किचन खोपा,🐓

अडचण होईल पण आत्ता तरी 

एवढाच उपाय आहे सोपा..."🦅


तो म्हणाला, "खुप उपकार होतील, 

पण भाडे कसे देणार?",🦆

"रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव, 

बाकी काही नाही मागणार..."🦜


तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात 

पण बाकी नातलगांच काय?,🦋

त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, 

कुठे ठेवतील पाय...?"🐾


"अरे लावताहेत आता झाडे 

अन जगवतात आता कुणी कुणी,🐸

बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग 

आत्महत्या करू नका कुणी..."🙈


ऐकुन तो पक्षी उडाला 

काड्या जमवायला घरट्यासाठी,🌿

अन मी पण मोबाइल उचलला 

तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...🙊


त्याची खिडकीवरची टकटक 

माझ्या मनाचे उघडले कवाड,⛩️

वाचुन तुम्ही पण लावाल ना 

कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...🌱


*निदान एक तरी झाड !*🌴


  🌳🌳 🌳🌳🌳

 लहानपणी झोपेत हसलो की आई बोलायची सटवाई हसवतेय..😉


आणि आता झोपेत हसलो की बायको बोलते कोणती सटवी हसवते.🫣


🤣😂🤣😂😊

 👩एक बाई आपल्या आवडीचा रुमाल बँक कॅश काऊंटरवर विसरून जाते. 

ज्याकुणाचा आहे तो घेऊन जाईल असा विचार करून कॅशिअर बाजूला ठेवून देतो पण गडबडीत कॅशिअर कडून त्यावर २-४ स्टँप मारले जातात.


काहीवेळानं ती बाई आपला रुमाल शोधत येते. कॅशिअर तिला रुमाल देतो, ती रुमालावर शिक्के बघते, रागाने हे काय माझा रुमाल खराब केलात?

कॅशिअर पण चिडतो कोणी सांगितलं तुम्हाला इथं विसरून जायला ?

वादावादी वाढते आणि 

बाई चिडून तणतणत मॅनेजरच्या केबिन मध्ये जाऊन त्याला सगळं सांगते. 

मॅनेजर तिच्या कडून रुमाल मागून घेतो आणि त्यावर "All stamps are cancelled" चा शिक्का मारून त्यावर आपली सही करून त्या बाईला रुमाल परत करत सांगतो  "हे घ्या मॅडम आता रुमालावरचे सगळे स्टॅम्प कॅन्सल झालेत" 🫣


*स्टेट बँक ऑफ....*        


*..पुणे मेन ब्रँच* 


🤣😂🤣😂😊

 टिना : तुमचे पती कोणत्या क्षेत्रात काम करतात? 🤔


मिना: तेल आणि वायू. 😉


टिना: व्वा!, त्यांची पोस्टिंग कुठे आहे?🤔


मिना: स्वयंपाकघरात. 🫣


🤣😂🤣😂😊

 *जोशी: मी असं ऐकलं की तुमचा फोन कुणीतरी चोरला.*


*बापट: हो !*


*जोशी : मग त्याचा चार्जर मला द्याल का ?*🫣


🤣😂🤣😂😊

 वेळ आणि साबण वगळता, जर कोणती गोष्ट तुमच्या हातून निसटत असेल, तर ती म्हणजे...😉


साध्यस्थितीत आंब्याची कोय ....🫣


🤣😂🤣😂😊

 पत्नी: तुम्ही त्या बाईकडे एवढा वेळ का बघत आहात? 🤔

.

.

.

हुशार नवरा: - ही 'बनारसी साडी' तुझ्यावर किती छान दिसेल याचाच मी विचार करत आहे.......!!! 🫣


🤣😂🤣😂😊

 *कडक उन्हात घरातून बाहेर पडू नका,*

*नाही तर _हत्तीच्या पायाखाली_ देण्यात येईल ....*


अशी जरी सरकारने घोषणा केली तरी सुद्धा  लोक घरा बाहेर पडणारच....

.

.

.

*हत्ती केवढा आहे ते बघायला* 🫣


🤣😂🤣😂😊

 पत्रकार :-


झुकेरबर्ग सर. . .  फेसबुक पेज ला 'भिंत' (wall)  म्हणावं हे तुम्हाला कसं सुचलं ?🤔


झुकेरबर्ग :- 


माझी आजी एकदा सहली साठी भारतात कोकणात आली होती तिथे तिने एक म्हण ऐकली - 'रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी'.😉 


त्यावरून मला हे सुचलं. 🫣


🤣😂🤣😂😊

 बायको- अहो कार्यक्रमाला जायला एक पण चांगली साडी नाही...😒


नवरा-मला माहीत होतं म्हणून मी तुझ्यासाठी साडी आणलीय...😊


बायको-अय्या खरच किती छान कुठून आणली माझ्याकडे अशी साडी नव्हती...🥹 


*नवरा-आपल्याच कपाटातून...🫣*


🤣😂🤣😂😊

 जर तुमच्याकडे पाहून 


कोणी तुम्हाला वेडा म्हणत असेल तर


त्याच्यावर रागावू नका 😉


फक्त एकांतात जा 😇


आणि विचार करा 🤔


हि माहिती फुटली कशी ? 🫣


🤣😂🤣😂😊

 बायको :


बोलता बोलता आपल्या लग्नाला 30 वर्षे झाली. 😉


नवरा - 


मग एवढं बोलायचं कशाला? 🫣


🤣😂🤣😂😊

 🪷


जे टाळणे अशक्य ।

दे शक्ती ते सहाया ॥

जे शक्यसाध्य आहे ।

निर्धार दे कराया ॥

मज काय शक्य आहे ।

आहे अशक्य काय ॥

माझे मला कळाया ।

दे बुद्धी देवराया ॥


- *डॉ. आनंद नाडकर्णी*


😊

 *माझ्या मित्राने गेल्या महिन्यात 1 कोटी कमावले.*💵💰💲🪙


तो 26 वर्षांचा आहे👦

आयआयटी नाही. आयआयएम नाही.📜 

अभियांत्रिकी शिक्षण अर्धवट सोडले.🚂

पहिला पगार: 24 हजार. 🥴

गेल्या महिन्यात: 1 कोटी. 🤑

काय बदलले? 🤔

त्याने नोकरी शोधणे थांबवले. 😉

.

.

.

आणि *वडिलांची जमीन विकायला सुरुवात केली*. 🫣


🤣😂🤣😂😊

 दुसऱ्याला व्हॉटस्‌ॲप मध्ये वाट पहायला लावून ...🤨


तेवढ्या वेळात आपण फेसबुकला फिरून येणे ...😉


याला *इ-पाप* म्हणतात ...🫣


🤣😂🤣😂😊

 मध्यंतरानंतर, अंधारात आपल्या जागेवर परत येत असताना, एक स्त्री कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकाला म्हणाली,"दादा, बाहेर जाताना मी तुमच्या पायावर पाय दिला का?🤔


प्रेक्षक (रागाने): हो, तुम्ही माझा पाय चिरडलात , आता माफी मागता का?🤨


स्त्री: माफी नाही दादा, याचा अर्थ माझी जागा याच रांगेत आहे हे माहिती करून घ्यायचे होते 🫣


🤣😂🤣😂😊

 जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला हे ऐकल्यापासून मी सर्वांना आवडेल असं काम करणे बंद केलेले आहे.😉


उगाचच रिस्क नको...🫣


🤣😂🤣😂😊

जावईबापूंचे प्रकार

आपल्याकडे जावईबापूंचे पाच प्रकार सांगितले जातात. ते पुढीलप्रमाणे -

*१) साखऱ्या जावई* 

साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० कि.मी.पेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्यामुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जात-येत असतात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून त्यांचा मानपान होत असतो. चांगलीच बडदास्त असते यांची, कुठे बसवू अन् कुठे उठवू ? अशी अवस्था सासरच्या मंडळींची होत असते, म्हणून यांना *'साखऱ्या जावई'* असं म्हटलं जातं. जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे... 


*२) भाकऱ्या जावई* 

या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर/वारंवार जात-येत असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई-बाबांची  आठवण आली तर तिच्या सोबत सुध्दा जावे लागते. यांचे जाणे-येणे नेहमीचे असते, त्यामुळे या जावयांना जेवणासाठी जो घरात स्वयंपाक केलेला असतो, तोच वाढला जातो. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हे नेहमीचेच आहेत, *'नित उठे, अन् कपाळ बसे.'* या म्हणीतल्या उक्तीप्रमाणे, म्हणून यांना काही खास मानपान नसतो, म्हणून यांना *'भाकऱ्या जावई'* असं म्हटलं जातं.


*३) ढोकऱ्या जावई* 

या प्रकारात २% जावई मोडतात. हे *'घरजावई'* असतात. या जावयांना घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दूध अशा वस्तू सुध्दा आणून द्याव्या लागतात. झाडलोटीची कामे पण करावी लागतात. घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी यांचा अपमान नक्कीच केला जातो. म्हणून यांना *'ढोकऱ्या जावई'* असं म्हटलं जातंय्.


*४) दयावान जावई* 

हे जावई सासरच्या लोकांना कायम मदत करीत असतात. बायकोचं ऐकतात, शालकाला उसने पैसे देतात. सासरची मंडळी त्यांना कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हे एक-दोन वर्षातून सासरी येत-जात असतात, त्यावेळी त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात म्हणून यांना *'दयावान जावई'* असं म्हटलं जातंय्.


*५) बेरकी जावई*   

हे दूर असोत किंवा जवळ ते सासुरवाडीला जातच नाहीत अन् गेलेच तर त्यांना हवं तेच जेवायला करावं लागतं, तेवढं करूनही ते गोड काही बोलत नाही, तुसडेपणाने वागतात, म्हणून यांना *'बेरकी जावई'* असं म्हटलं जातंय्.


शेवटी आपल्या पूर्वजांनी अर्थात आपल्या माता-भगिनींनी *'जात्यावरच्या ओवीत'* म्हटलंच आहे, की

*१) जावाई, जावाई नको करू तू मायबाई,*

*जिन्ही वं दिधा जन्म, तिना तिले झाया नही.*


*२) जावयाची जात फार बेईमान सांगती,*

*'लक्ष' गं केलं दान, तरी माझ्या 'ताई' ला गांजती.*


शेवटी जावयाच्या महिमेचं कौतुक करतांना सासुबाई म्हणतात,

*"शंभर ब्राह्मण, एक जेवाले जावाई,*

*म्हणून 'दादासले' पुण्य काशीतून सवाई."*

 आपल्या पत्नीला दुःखी पाहून पतीने विचारले,"तू इतकी उदास, विचारात गढलेली का दिसत आहेस… काय विचार करत आहेस? काय झालं?🤔"


पत्नी म्हणाली, "नाही, त्यात काही विशेष नाही."😉


गेल्या काही दिवसांपासून विचार करतेय , माझ्या 'प्रयत्नां'मध्ये काय कमी आहे याबद्दल मला काळजी वाटत आहे की लग्नाला इतकी वर्षे होऊनही तुम्ही अजूनही हसत आहात .🫣

 बायकोने पार्लर मध्ये जाण्यासाठी दोन हजार मागितले.🤔


नवऱ्याने मोठ्या मनाने पाच हजार देत म्हणाला, दोन हजारात काही होणार नाही. 😇


बायकोने नवऱ्याला का तुडवले समजले नाही. 🫣

 *डॉक्टर* - बाळा आ कर आ,

आई - त्याला फक्तं इंग्लिश कळतं !😇


*डॉक्टर* - बरं, बाळा, "ओपन योर माऊथ".. 🤔


*आई* - थांबा, मी सांगते. "बाळा,

डू आ, डू आ.... "सेमी इंग्लिश" आहे तो...🫣


डॉक्टर आ वासून पहात राहिले 🥴

 *मराठी भाषेची किमया*


तो नववीत होता 

तेव्हा 

ती आठवीत होती...

.

.

.

.

आता

ती नवविवाहित आहे...

आणि तो तिला आठवीत आहे!

चंदुला सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळताच कार्यालयात हजर झाला...


सर्व कागदपत्रे तपासून पाहिल्यावर....


हेडक्लार्क :- बाकी सर्व ठिक आहे. परंतु तुम्ही सोबत सोडा, बर्फ आणि खारे दाणे का आणले आहेत ???


चंदु :- सर, नोकरीच्या नियुक्तीपत्रात असे नमुद केले आहे की, तुम्हाला क्वॉर्टर देण्यात येईल.


हेडक्लार्क तेव्हापासून सुट्टीवरच गेला आहे.

जेव्हा तुमच्या आयुष्यात संकट सुरू होते, तेव्हा तुमचे सर्व मित्र आणि नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील...!


जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर...


तुमचा लग्नाचा अल्बम पहा...!!!

बर्फाच्या कविता

एका अमरत्वाच्या संथपणानें ओघळणारा बर्फाचा पाऊस चिरनिद्रेतील माझ्या प्राक्तनाचे रंग बांधणारा बर्फाचा 
पाऊस. व्योमव्याकुळ अंधारातुन भुरभुरणारा बर्फाचा 
नाद; गात्रागात्रांच्या हांकेवर जमलेले बर्फ-शिल्पाचे मंद अविनाशी स्तूप....
अंधाराच्या प्राणगन सुगंधावर कोसळणारी बर्फाच्या 
थडग्यांची आरास. त्वचेच्या मेण्यांतून उतरणाऱ्या 
चरणांवर वितळणारीं हिमवर्ण शिशिराचीं फुलें.... 
तुझ्या कुशींतील अक्षम्य स्तनांवरून वाहणारे 
चंद्र-वाऱ्यांतील बर्फाचे पराग....
बर्फाच्या मरणकालीन समाधीवरून उजळणारे 
शब्दभांगाराचें दीप ; जशी माझ्या इंद्रियांच्या पार 
वसलेली अर्थसगुणाची नगरी....
अंधाराच्या नशिबांतून सरकणारी बर्फ-उत्सवाची 
यात्रा, जसे तुझ्या पाठीवर ओळीने रचलेले 
प्रकाशाचे मणी....


वाऱ्यालाही जागा मिळू नये अशी बंद खोली. 
बाहेर हिमाचीं वादळें घोंगावूं लागलीं आहेत. 
माझ्या रक्तांतील हाडांचें पाणी होऊन मस्तकाच्या 
दिशेनें वाहतें, असें हें दुःखाचें प्रगाढ चिंतन किंवा


अंधाराच्या पृष्ठभागावर उमटणाऱ्या बर्फाच्या सकंप रेषा
डोळ्यांच्या मागील अंधारांतून येणारें हें वादळ; 
एखाद्या महायात्रेसारखें झाडांना झोंबूं पाहतें, 
जसें या निषिद्ध रात्रीं माझ्या दाराशीं कोणी 
टांगा घेऊन आलें आहे......
वारा येऊंच शकणार नाही या खोलीच्या बंद दाराशीं. पायाखालची फरशी किती थंडगार ! जसें मीच बसून 
असावें माझ्या प्रेताशीं.... या बेवारशी डोळ्यांना 
असेंच सोडून जावें या पुस्तकांच्या सांगातीं; तसें यांचें 
पुढें कोण आहे ? मी जसा बर्फातून आलों तसाच 
बर्फातून जाईन ; रात्रीच्या शेवटच्या प्रहरांतील 
रहदारीसारखा.


दाराच्या एका विदग्ध फेरींत मी अडकलों. 
मावळत्या सूर्याच्या उदासीन किरणांत वितळणाऱ्या 
कुंतीच्या अपरंपार श्वासांसारखी माझ्या पाठीशीं 
येऊन उभी राहिलीस.
बाहेर बर्फाचा पाऊस पडतो आहे. रक्तांतून जाणारे 
अश्रू आणि शिशिरांतील अनिकेत पांखरें 
तुझ्या अस्थींना बिलगतात; मेघांच्या संधिप्रकाशांतील डोळे आणि पर्वतांच्या कांठाशीं थांबलेली रक्तवर्ण 
सायंकाळ....
बर्फाचा पाऊस पडतो आहे; जशी नियतीच्या शब्दांतून 
गळणारी अर्थाची धूळ.... मंत्रांनी भारलेल्या या
खोलीच्या दिशा आणि पाण्याच्या तळांत निजलेले 
घाटांचे ध्वनी.

अंधाराच्या साह्यानें मी जातो आहे : स्मरणांतून 
उमलणाऱ्या आठवणींसारखा. बर्फाचा पाऊस 
पडतो आहे; जसें माझेंच दुःख सचित्र झालेलें..... 
या कोसळल्या दीपमाळेला टेकून तूं तसेंच उभे 
असावेंस, निदान चंद्रमासांतील स्तनांचीं फुलं होईस्तों....

ऊर्मिले च्या कविता

डोळ्यांमधला एक आरसा स्पर्शनि घे आकाश 
मंद जांभळ्या तारेवरती झंकृत हो अवकाश 
सागरवेळा सांज-मठांची सनई ऐकुन घेती 
मुक्या तिरावर पाण्यामधली रंगित पडते रेती.... 
दृष्टीपासुन सजूं लागती मावळतीचीं किरणें
दुःख आपुल्या मिठींत हंसतें जशीं उन्हांचीं वळणे. 
झाडांवरचा मोहर गळतो देह उधळला गेला 
स्मरणयुगांच्या पुढे राहिली दुःखसावळी मिथिला. 
उरीं भरावी किती सघनता जळांत गळती तारे 
कुठून येती इतके हलके तरंग भरले वारे....


या हातानें स्तन गोंदुन घे लाव मंदिरीं दिवा 
फूल होउनी अंधाराचे गळुन पडे काजवा .... 
तूं मरणावर मग रेखावें प्राक्तनगंधी मोती 
कीं डोहांवर किणकिणते गे शतजन्मांची भीती.... 
असुन तुझा मी तुझी दूरता.... तुला झाकितो काल 
सांग ऊर्मिले, कुणी बांधिले नयनीं चंद्रमहाल ? 
रंग उदा की उभा उदासिन महामेघ क्षितिजांत 
पायाखाली वाळवंट मग उगवत ये निमिषांत.... 
लाव मंदिरीं दिवा परंतु सोड स्तनांची माया 
मरणावांचुन आज सजविली मीच आपुली काया....

प्रिस्टस्

तुझ्या पायांतून खेडींच्या खेडी ओस पडावी
तसे हे प्रिस्टस्
एका संध्याकाळी बाहेर जमले पठारावर 
मोकळ्या आकाशांत एखादा तारा उगवेल 
म्हणून पाहण्यासाठीं.
ह्यांच्या डोळ्यांना नाहीत खांचा कीं 
कुठल्याही पाण्याचे अज्ञात तळ..... 
घरटें चुकलेल्या पाखरासारखे उन्मळून 
येतात वेळी अवेळी.
ह्यांच्या शरीराच्या छिद्रांतून
आरपार शिरत असतात घटांचे 
त्रिस्तव्याकुळ नाद.
तेव्हां चपापून पाहूं लागतात है, चौफेर, 
महाशून्यांत....
कुठें दिसतें का म्हणून देवाने घडविलेले 
एखादें हृदय, कर्मानें बांधलेले एखादें घर, 
नाहीतर रक्तमांसाच्या संभोगाला उगवणारें 
शिल्पउदास व्याकुळतेचें एखादें फूल....

वार्ड नं. ६ : आर्थोपिडिक्स

 

गीता रॉयच्या आवाजांतील चाकूचें रेशमी 
झळझळतें पातें ;
असंख्य हाकांच्या आर्तपणाचें अंतःकरणावर 
भुरभुरणारें जावळ
या विझत्या डोळ्यासमोर प्रतिबिंबांना 
तोलून धरणारी केरळी नर्स
तिच्या डोळ्यांत एका क्षणांत दिसतात 
कन्याकुमारीच्या रंगीत सूर्याचे उदयास्त.... 
आमच्या उजव्या पायाची दोन हाडें 
मोडली आहेत.

निव्वळ शारीरिक दुःखाच्या अप्रतिम कळा 
दुष्मनांच्या वाट्याला जाऊं नयेत
म्हणून आम्ही घेतल्या
द्यावेंसें वाटतें या यातनांच्या वैकुंठांत
केरळीं माडांना आलिंगन
कळांचा सर्वस्पर्शी ऑर्केस्ट्रा मेंदूच्या कांचेवर
इन्ग्रिड बर्गमनची आसवांत वाहणारी
प्रतिमा रचून जातो;
उजव्या पायाची दोन हाडे मोडली आहेत आणि
खोलीच्या दाराशीं बावीस सप्टेंबरच्या विसराळू 
संध्येचें बोट धरून केरळी नर्स
तिच्या स्तनांचें मीनाक्षी मंदिर रक्तांतून 
चकाकणारें....
राSSमS-S-S राम-S-S

यह वही दर है जहां आबरू नही जाती....
घोड्यांचा प्रचंड कळप अंधारावर धावून
गेला....
तशा सरकल्या सर्व इमारती.
असा पाऊस कधीं पडला नहता....
दुःखवादी तुझी अभिजात आठवण अंगावर ओव्हरकोट 
घालून स्मशानाकडे जाणारी....

सांज

सांज घराला आली
विश्वाची हलवित काया
मांडीवर मी निजलेला
वर तुझी उदासिन माया.

सांज घराला आली 
रत्नांची गळती नगरें 
कौलांवर चढतिल आतां 
घनदाट तमाचीं शिखरें.

सांज घराला आली 
चरणांची जुळवित वेल 
तूं दीप उजळिले जेव्हां 
प्राणांत उगवलें फूल....

सांज घराला आली 
कुरणांतुन फिरल्या गायी
नक्षत्र मिसळले पाणी 
कंठांतच गोठुन जाई....

रंगास्त

कलंडत्या सूर्याचीं रंगदर्शनें नाहींत
समुद्र नाहींत आणि लाटांचे 
आवाजहि नाहींत.
नारायणीचा विदेही मृत्यू :
त्या रात्रीं झाडांना सोडून जाणाऱ्या
अविनाशी फुलांची झड .... 
झडीच्या विलापांत थडीला
लागलेलीं शिवालयें ....
कित्येक वर्षांपूर्वीच्या श्रावणानें तिच्या
गळ्यांत गोंदलेल्या तुलसी रामायणाच्या
प्रतिमा....
दृष्टीला अतीव कारुण्यानें आंधळे
करणारें धुके पसरत असावें
गाभाऱ्यांत ....
अशा दिशा हरवतात आणि अशा
दिशा उगवतात.
मनाचे सर्व आभास, दुखाच्या एवढ्या
समर्थ वैभवांतही असतात
पराधीन, पोरके आणि सर्वस्वी
अनाथ.

स्मृतिगंध

तूं उदास मी उदास मेघही उदासले 
स्मृतींतले विदग्ध नाद पैंजणांत सांडले

तुझ्या तनूंत चंद्रशिल्प सांजली निळीं जळें 
जसा समुद्र आंधळा नि सूर्य दूर मावळे....

मंद मंद वाहते दिव्यांतली अनंतता 
तुझ्या सुखांस गंधवीत लोचनीं निजे कथा....

अंगणांत ये सजून मृत्यु रोज एकला 
पावसाळिं ये जसा नदीस पूर सावळा....

कुठें धुक्यांत चाललीस गर्दलें नभावरी 
विश्वमंदल्या दिठींत रात्र थांबली जरी....

आसवांत पापणी

सावल्या विसावल्या नि 
विश्वतेज मावळे
आरतींत नादतील
सजल सांध्य देउळें

सांद्र रंग, सूर संथ
क्षितिज स्फुंदतें अबोल
मूक वर्तुळांत शब्द-
शून्य हा विराट गोल !

गगन हें कुठें सरे नि
रंग हा कसा निळा
दूर पाहतो उदास
संथ भास एकला

मी इथें व्यथालयांत
दुःख सांगतों तुला
घे मला कुशींत आज
पावलांत श्रृंखला !

संपणार ना कधींहि
रात्र घोर पापिणी
ओंजळींत हीं फुलें नि
आसवांत पापणी!

फूल

हिममंद कणांचा खांब 
जसें प्रतिबिंब 
जडावें नयनीं,
मेघांवरचा रंग मालवुन 
दूर निघाले कोणी....

दूर निघाले कोणी, अवघें—
- दुःखच नेत्रीं जडलें 
अंबर वरती विरलें
सांज - विसरल्या रात्रींपाशी
प्राणच मदिरा प्याले....

प्राणच मदिरा प्याले, नुरला -
दूर नदीचा पूल
भूलच सगळी भूल
धुळित हरवला चंद्र कुणाचा
धूळच झाली फूल....

ऊर्मिला

त्या दाट लांब केसांचा 
वाऱ्यावर उडतो साज
दुःखांत अंबरें झुलती
कीं अंग झाकते लाज....

तरि हळू हळू येते ही
संध्येची चाहुल देवा
लांबती उदासिन क्षितिजें
पाण्यांत थांबल्या नावा....

देहास आठवे स्पर्श 
तूं दिला कोणत्या प्रहरीं 
कीं धुकें दाटलें होतें
या दग्ध पुरातन शहरी ....

सुख असें कळींतुन फुलतें 
व्यापतो वृक्ष आभाळ 
छायाच कशा दिसती मग 
आपुल्यापरी खडकाळ

आटले सरोवर जेथें
का मोर लागतो नाचूं ? 
तूं सोड ऊर्मिले आतां
डोळ्यांत बांधिला राघू....

चिमणी

मावळत्या संधिप्रकाशांत मी शून्यपणें 
बसून आहें.
मागचें आणि पलीकडचें मला 
कांहीच दिसत नाहीं,
शेवटच्या कांही क्षणांसारखे स्मृतीचे 
दिवे अंधुक झाले आहेत.
उंदरांनी कुरतडलेल्या कवितांचे कागद 
माझ्या उशाखाली आहेत.
माझी एकच इच्छा आहे आतां ; 
तुझ्या विटलेल्या पदराच्या ओबडधोबड 
धाग्यांनी एक चित्र विणावें
आणि रंगीत तावदानांच्या कांचांना फोडून 
येणाऱ्या चिमणीच्या धक्क्यानें, गर्द शाईचा 
निळा सागर त्यावर कलंडून जावा....

वार्ता

झाडांच्या अंगव्याकुळ डोहांतील वार्ता. 
वार्ता माझ्या पापाची.
जसें माझ्या आयुष्यांतून उठून गेलें
कुण्या मुग्ध मायाळू देहाचें मरण...
ऊर्मिले, माझ्यापुरतें आणि ईश्वरासाठीं तुझें हंसगीत.
उध्वस्त फुलांच्या परागांतून यावेत
सोनेरी पावसाचे
अनोळखी संदेश....
जसे जीविताच्या व्यामोहांत समुद्र आणि
त्याचें दीर्घदुःखी पाणी.
डोळ्यांच्या पाताळांत चंद्रदुःखानें पसरावें 
काजळ ; तशी ही सायंकाळ.
सांपडत नाहीं मन माझें, उभ्या शरीराला 
साद घालीत अंधार पुढे येतो आहे 
जशी पाण्यावर तरंगणारी निःशब्द 
एकाकी कमळें ...

वाट

तूं येशील म्हणून मी वाट पाहतों आहे 
तीही अशा कातरवेळीं,  
उदाच्या नादलहरीसारख्या 
संधिप्रकाशांत....

माझी सर्व कंपनें इवल्याशा ओंजळींत 
जमा होतात.
अशा वेळीं वाटेकडे पाहणें,
सर्व आयुष्य पाठीशीं बांधून एका सूक्ष्म 
लकेरींत तरंगत जाणें;
जसें काळोखांतहि ऐकूं यावें दूरच्या 
झऱ्याचें वाहणें....
मी पाहतों झाडांकडे, पहाडांकडे, 
तूं येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती 
एक नसलेली पणती लावून देतों....

आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे 
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतों 
नदीच्या प्रवाहांत....

घोडे

मेणबत्तीच्या एकाकी प्रकाशांत तुटलेलीं 
ॲनी फ्रँकच्या डायरींतील अक्षरें. 
मरणाशीं समांतर आकाश कीं पुरांत 
बुडालेलें कॉन्व्हेंट
घोडे येतात तेव्हां आवाज नाहीं, 
जातात तेव्हां साज नाहीं
आतां ग्रंथसंभाराचें घर. कांहीं दिशा शून्य 
कांहीं सामान्य. मध्यरात्रींचा अंधार,
मधें एखादी आठवण, तसा वारा.
इन्ग्रिड बर्गमनचा पुतळा सर्व पाहतो आहे
माझें उरलेले आयुष्य....
घोडे येतात तेव्हां आवाज नाहीं,
जातात तेव्हां साज नाहीं.
प्रदीर्घ आजारानंतर कुठल्याशा प्रदेशांतून तूं येतेस
वाटेंत संगमरवरें तुटलेली, फुलें गळाली, झाडें
अभागी झाली.
माझ्या संमतीशिवाय कोण टाकून जातो झोळींत
त्यांना दिलासा देणारें दुःख
प्रारब्धवादी हिंवाळ्याच्या अंतराळांतून घोडे येतात तेव्हां 
साज नाहीं, जातात तेव्हां आवाज नाहीं.

घर

दुरून दिसतात अदृश्य सीमेसारख्या 
टेकड्यांच्या ओळी.
क्षितिजाच्या सहवासामुळे त्यांचाहि
रंग निळाच भासतो.
मधोमध लांबच लांब मैदान पसरलें 
आहे, मोकळे.
दक्षिणेकडील टोकावर बंगल्यांची आरास,
तिथून जरासें दूर, पायवाटेला, 
चर्चमधील सायंघंटेच्या अंतरावर 
तुझें घर उभे आहे;
मालकंसाच्या अवरोहांत उतरणाऱ्या
गांधारासारखें....
तुझ्या मुद्रेवरील संवेदनांच्या उदास
ओळी माझ्यापर्यंत येऊ लागतात,
तेव्हां डोळ्यांतील बाहुल्यांच्या ज्योतींसाठीं
मीहि क्षणभर स्थिरावतों
मावळता दिवस आणि सावल्यांचे प्रदेश 
सांधणाऱ्या संधिप्रकाशासारखा....

माणूस

घरांनीं आपलीं दारें बंद केलेलीं असतात, 
डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या 
रांगाही निवून जातात.

वैराण आणि एकाकी आकाशाच्या 
पार्श्वभूमीवर संथपणानें हा जात असतो.... 
त्याच्या चेहऱ्यावर कदाचित् कमळांचीं 
सरोवरें उगवली असतील....

परंतु इतक्या लांबून तीं दिसत नाहींत. 
त्याच्या पावलागणिक माझ्या गीतांचीं 
शक्लें होऊन रस्तोरस्तीं सुरांचीं

कारंजी उडतात, आणि तुझ्या-माझ्यापासून 
निघालेला हा दुःखाचा काळोख, केवळ 
त्याच्या निसटत्या स्पर्शानंहि पैंजणासारखा 
रुणझुणत वाहूं लागतो....

इन्ग्रिड बर्गमन्

आषाढांतील भर्जरी मेघांसारखे पूर्ण ऐहिक डोळे 
घेऊन तूं आलीस; नेस्तनाबूत झालेल्या या साथीच्या गांवांत.
विश्वरचनेंतील बर्फाचा शुभ्र पहाडी अहंकार 
या गांवांत आणून सोडलेला....
जशा अनेक बाबी किंवा अरण्यांतील निर्मनुष्यतेच्या
पारावर पडलेलीं हजारों फुलें...
हजारों फुलें तशीं हजारों घरें या अनामिकांच्या प्रदेशांत 
तुझा घोडा तूं मोकळा सोडलास
शिशिराच्या निर्विघ्न कुरणांत....
तो मध्येच दिपून पाहतो, एका नसलेल्या ध्रुवाच्या
दिशेत झिजणाऱ्या तुझ्या देहास.
तुला वाटतात तितके सोपे नसतात तुझे अश्रू
पाण्याच्या सलील संभ्रमांत हलतात जखमी 
ख्रिस्ताच्या घंटा रात्रंदिवस....
गांवावर सांचलेल्या बर्फातून अज्ञात निनादांची 
महापर्वणी जाऊं लागते.
तसें माझ्या झोळींत कांही नाही; जाण्यायेण्याच्या
चित्रलिपित झाडांचा एखादा संगमरवरी सांगाडा, 
तोही चांदण्यांनी शोषून घेतलेला....
फक्त एवढेंच : निःशब्द भासांच्या कांठाला लटकलेलें 
हें स्टेशन आणि संवेदनांच्या आवर्तना झुगारून 
कोण्या मावळत्या संताला तूं दिलेलें
एकाकी आलिंगन.

अंगाईपण

मी अशांत सावलीनें चालणारा
भावसंमोहन जळत आहे माझें 
मावळतीच्या निवान्त क्षितिजावर....
दुःखाचें अभिजात शिल्प उभारशील का
पारदर्शक मरणांत....

सायंकाळ येते तुझ्या उदास
दुःखासारखी
दोन देहांचा एक आकार घेऊन आपण 
चालूं लागतों.... भयाण इमारतींच्या 
भावगर्भांत....

उगीचच वाटत असते तुलाहि आणि मलाहि, 
पाय ठेवूं तेवढी भूमि घसरून पडेल.... 
तरीहि वाट हात जोडून उभी असते. 
हवी असते वाऱ्यालाहि इतक्यांत अंगाई
म्हणून मांडतों मीही ; कमळांच्या पानांवर 
टिंबांचा खेळ....
तुला निजविण्यासाठीं सांगितलेली एक कथा....

गांव

आभाळ जिथें घन 
गर्जे तें गांव मनाशीं निजलें 
अंधार भिजे धारांनी
घर एक शिवेवर पडलें....

अन् पाणवठ्याच्या पाशीं 
खचलेला एकट वाडा 
मोकाट कुणाचा तेथें
कधिं हिंडत असतो घोडा....

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो
पारावर पडला साधू 
हलकेच कुशीवर वळतो....

गावांतिल लोक शहाणे 
कौलांवर जीव पसरती 
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळीनें मळती....

चांदणें

दिशांनी मला आज रंगांध केलें 
कुण्या मंद तंद्रीत रे साजणा 
फिरे हात मेघांवरी सारखा अन् 
तुटे शुभ्र संवेदनेचा कणा...

निळ्या अंतराळांतुनी खोल येतात 
संज्ञेत वाळूतलीं अक्षरें
जशीं दूरचा खंड सोडून आलीं 
इथें दाट शोकांतलीं पाखरें.....

कुशीला फुटाव्या कधीं चंद्रवेली 
पुढें पृथ्विबिंबांतले आरसे 
तुझ्या स्पर्शगांधार शैलींतलें शिल्प 
स्वप्नांत माझ्या हंसावें जसें .....

पायांतल्या शुष्क पानांतुनी 
जीर्ण पारावरी शब्द एकांतले 
घरे बांधण्याला कुठें झाड नाही 
तसे पक्षि सोडूनिया चालले....

घुमावी मुक्की हांक यावी पुन्हा 
भव्य घुमटांत अंधारलीं स्पंदनें 
तुटे एक तारा तसा अस्त माझा 
सुखाला तुझ्या ने कुठें चांदणें....

आठवण

या व्याकुळ संध्यासमयीं 
शब्दांचा जीव वितळतो 
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें.... 
मी अपुले हात उजळतों.

तूं आठवणींतून माझ्या 
कधिं रंगित वाट पसरशी 
अंधार - व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं....

पदराला बांधुन स्वप्ने 
एकट संध्यासमयीं 
तुकयाच्या हातांमधला 
मी अभंग उचलुन घेईं...

तूं मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या कांठीं
वळिवाचा पाऊस यावा.....

स्वप्न

शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न 
लपवून ठेवण्याचा.
पांडुरंगाच्या चरणाला प्रक्षाळण करणारी 
चंद्रभागा मी पाहिली नाहीं, आत्मसंवादाची
हीच प्रचीति आली माऊलीच्या उरावर 
पाय ठेवतांना.
शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
प्राणांचें मोल देऊन मुक्ति विकत घेत
असतों मी ; देहूच्या बाजारांत अभंग 
विकणाऱ्या तुकारामाप्रमाणें - शापच आहे 
मला संगमरवरांत स्वप्न लपवून ठेवण्याचा. 
चाहुलवेड्या वाटुलीच्या प्रतीक्षेत चरणगंधाच्या 
स्मृतीचें फूल उमलतांना पाहिलें नाहीं मी, 
वाचली नाहीं सांद्र तमगारांत काजव्यानें
रचलेली प्रकाशगाथा ; पण फुटलेल्या
डोळ्यांच्या नीरांजनांत तुला ओवाळणारी शिळा
पाहिली आहे रे....
शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.

छंद

निर्वाण पिणारी रात
नदीचे घाट
पुरातन झिजले
वटवृक्ष भूमिची
कूस घेउनी निजले.

पायांत अडकले पाय
जशी की माय
गर्भगांधारी
रोखिला कुणीं गे
छंद असा लयकारी.

फाटतो तिळानें पाश
घनिल आकाश
तुला वरकरणी
मातीची घागर
फुटतां जैसें पाणी....

हांक

धुकें अतुट दाटले नसुन आसवांचा लळा 
उरीं फुटुन पेटते गहन गारव्याची झळा 
दिशा धरुन वांकले सगुण वृक्ष दुःखांतले 
दिसे इथुन दूरचा क्षितिज - दीप मंदावला. 
नदी वळत चालली व्यथित पावलांच्या परी 
कधीं मधुन उष्णशी लहर उन्मळे बावरी 
नको नयन पाजळूं सजल हांक देऊं नको 
मला प्रहर लागला ढळुनि चंद्र मेघांतला. 
कुठे कळस ठेवुं मी, हळद-वेंचलीं हीं उन्हें ? 
पडे दगड आडवा अधिक आंधळी लोचनें 
अशा भरुन ओंजळी कुठुन सांडती हीं फुलें ? 
घुमे मरणगंध हा हृदयपूर्ण देहांतला !

शिल्प

फुलें मावळून गेलीं आहेत 
जसे सूर्य मावळतात.....
मरणगंधांतून वाहणारी सतारीच्या 
चाकाची देवळें....
आणि या विलक्षण नादाचा एक प्रारंभ, 
एक युग, जशी चांदण्यांत सरकणारी 
स्तनांच्या कोटींतील शिल्पे...... 
डोळे भरून वाहणारा काळोख, जसे 
सूर्य मावळतात.
पुढें, पुढें हलूं लागतात पाऱ्याच्या 
अर्कांतील बदामी डोळे आणि मीच
सामावूं लागतों माझ्या
मनांतील अंधारांत, खोल वितळणाऱ्या 
गुहेसारखा.....

शिलालेख

विराट उग्र गंधांनीं माखलेले
फुलांचे जंगली प्रदेश.
सुगंधानें निर्गुण झालेला जिथून
उतरतो शेवटचा संधिप्रकाश.... 
धुक्यानें विसरलेल्या दिशांत ; क्षितिजाच्या 
एका अतूट दिशेला विश्व-मंदाराची झाडें.... 
बकुळीसारख्या सूक्ष्म नक्षींचा मेणा ; 
माझ्यांतील अंधाराला कापीत जातो आहे, 
जेथे बांधिले आहेत ईश्वरानें माझ्या 
सर्वांगांचे स्पर्श-काहूर शिलालेख.

संभ्रम

ग्रीक पुराणांतील एकांतवासी श्रद्धांसारखी, 
मस्तकाच्या धुळींत रथाची चाकें रुतलीं आहेत. 
शिशिरांतील विझत्या वाऱ्याच्या प्रतिमा,
अंतःकरणावर धूर उजळत आहेत ; भूतकाळाच्या 
तंद्रीत विसावलेल्या एखाद्या प्राचीन शहरासारख्या.... 
शेवटच्या बहरांत पारिजाताला यावीत 
अर्धनग्न संभाराचीं कांहीं फुलें...तसेंच एखादें 
झाड डुलतां-डुलतां करुणेच्या दिगंतपार लयींत 
विलीन व्हावें ! माझ्या हातांना तळवे नाहींत आणि 
तुझ्या पायांना वाटा नाहीत...
क्षितिजाच्या कडेकडेनें उगवणारा एकेक तारा 
अंधाराच्या संभ्रमांत गळून पडतो; वैकुंठाच्या
दाराशीं निजलेल्या कैवल्यपूर्ण अस्तित्वांच्या
रांगाच जशा...

विश्व गळतां

विश्व गळतां या तिराला वृक्ष झाल्या बाभळी 
श्रावणांतिल वासनांची गर्द प्रतिमा जांभळी. 

चंदनाचा धूप जळतो देह झाली मंदिरें 
अर्थ प्राशुन शब्द माझा आज तुजला आवळी. 

पाय सोडुन तूं मिटावीं या जळाची कंपनें 
दूर क्षितिजाला जडावी ही तुझी काया गव्हाळी. 

श्वास शिंपुन उत्सवाला चाललीं ही लोचनें 
मी पुढें अन् त्या पुढें तूं अमृताच्या राउळीं.

साजण

तुझा आला गे साजण 
नको त्याच्यापुढें जाऊं 
त्यानें यात्रत भेटल्या 
कोण्या पोरीच्या देहाला 
दिले आभाळाचे बाहू....

त्याला हात नाहीं वेडे 
उभा अंधारीं साजण 
तिनें जीव दिला तरी
यानें वाहत्या पाण्याचे
इथें आणिले पैंजण....

प्रार्थना

या इथें, झाडांना उदासीन करणाऱ्या संधिप्रकाशांत 
मी जेव्हां ईश्वरी करुणांचीं स्तोत्रे म्हणूं लागतों 
मावळतीला, शेवटच्या किरणांची फुलें समुद्राच्या 
दिशाहीन पाण्यांत बुडून जातात...कुठे जातात ? 
क्षितिजाच्या अमूर्त बनांत पारिजाताचे वणवे 
उत्कर्षानं पेटूं लागतात....

या इथें, शिल्प-गांधाराच्या शून्य नगरींत
मी जेव्हां अंतिम वासनांच्या प्रार्थना म्हणूं लागतों, 
आत्मलीन पाचोळ्याच्या साक्षीनें;
-तेव्हां तुझ्या लोचनांतील अतर्क्य दुःखांतून, 
चंद्रकालीन शिवालयांचीं बर्फाच्छादित शिखरें 
प्रार्थनांच्या अंधारांत शिरत असतात.

सावली

समुद्र-जळ फोडतां तुटुन लाट ये जांभळी 
तिच्या अमित बिंदूंच्या कितिक बांधिल्या ओंजळी 
उभे पिउन शिल्प हे ढळत नेत्र माझे पुढें 
उदास वर माड, तूं खिळुन झावळ्यांच्या तळीं ....

मला मरण येउं दे फिटत जाउं दे वर्तुळें 
जशा मिटत पापण्या फुलत आसवांचे मळे 
उभा अढळ मुक्तिचा प्रलयगंध प्राणांवरी 
तुझे चरण मेंदिचे गगन जान्हवीच्या जळीं ....

असा कधिं न पाहिला प्रहर भव्य स्पर्शातला 
जसा मिठित वांकला सजल मेघ स्वातींतला 
उभी व्यथित मग्न ही अचल पर्वतांची सभा 
तुझी स्मरुन नग्नता क्षितिज पांघरे सावली....

वाराणसी

कथेंत निजल्यापरी चढत रात्र आली कशी 
सकंप शरिरांतली प्रहरवेल की स्निग्धशी 
तुझ्या हृदयशक्तिची मिठित मृण्मयी धूळ ही 
तमांत शिरल्यावरी दुरुन हाक येते जशी ..... 
उदास मन येइना थकुनि झोपलेले झरे 
अनाम असल्यापरी तुजसि जन्म गेला स्मरे.... 
किती तरल सूक्ष्म ही तम-समर्पणाची तऱ्हा
नदीत बुडली जणूं लहर चांदण्यांची अशी.... 
तमास कुणीही नसे मरण अमृताचें जसें 
तशांत तुज स्वमिंचें अटळ लागलेलें पिसें 
सजून मन भाविनी दिसशी हंसगीतापरी 
विराट तननिर्मळा बघत आर्त वाराणसी....

शाप

संधिप्रकाशांतिल रेषेवर स्तब्ध थांबली गुरें 
घाटापासुन घाट तुटे की अरण्य हृदयी भरे.... 
गांवगांव रस्त्यांत ढळे अन् तशा तन्मयी वाटा 
एकाकी प्राणांच्या उठती लाटांवरती लाटा.... 
या दुःखाचा कलश सावरे तुझ्या कटीची आण 
कीं हातानें हळु स्पर्शावे मीच आपुले प्राण.... 
उभ्या घनांच्या शिखरांमध्ये तुटे जशी चांदणी 
मळवट भरल्या केसांवरचें फूल तसें साजणी 
संध्याकाळी मुका उभा मी मला सतीचा शाप 
कुठें पाहतो ? अस्थावरती सरसर चढती साप....

गाणें

सांज हंबरे पिशी तुझीं धुळींत पैंजणें 
धुळीस पाय लागतां धुळींत गोंदलें जिणें. 
गोंदणें कसें निनाद कोरल्या धुक्यांवरी 
कलंडल्या दिशा तमांत वांसरें उभीं घरीं.... 
तुझ्या मिठींत मी ढळें तशींच वांसरें मला 
वनांत गाय शोधतां कसा सुगंध लागला.... 
सुदीर्घ दूर सावल्या तसें क्षितीज भासलें 
कुण्या फुलांस पांघरूं तरूंस मेघ लागले.... 
सशिल्प दुःख मंदिरीं धुळींत रेखतां तुला 
उभ्या निजेंत जागणें दिसे न गांव आपुला.

भूल

प्रकाश गळतो हळू हळू की चंद्र जसा उगवे 
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे.... 
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका 
दुःख- सुरांचा क्षितिजांपाशी मेघ दिसे परका.... 
हिमनगरांतिल बर्फ-धुळींचे उत्सव भरले नवे 
धुक्यांत तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचेहि थवे .... 
मंदिर-मंदिर पाणी.... पाणी शिल्प कुठें वितळे 
दुःखाच्या तंद्रींतुन जैसें अमृत ठिबकत निळें..... 
माझ्या हातुन मुठभर माती अवकाशावर पडे 
घरांघरांना मरणफुलांची गंधित भूल जडे....

नाद

वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा 
या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळा 
पावलें अशीं सलील नादती कुठून नाद ? 
मी क्षितीज वाहतों तरी जुळे न शब्द, गीत. 
दुःख एक पांगळे जशी तरूंत सावली 
या उरांत पेटलीस, कां उन्हास काहिली ? 
असें कसें सुनें सुनें मला उदास वाटतें 
जशीं उडून पांखरें नभांत चाललीं कुठें.

मरण

अंधारांतुन जात कुणीतरी गात पुढें क्षितिजाला 
मातीमधला पाऊस घेऊन सुगंध इथवर आला. 

सुन्न निरामय चिरनिद्रेपरि नभ माथ्यावर गढलें. 
प्रारब्धांतिल विश्व कुणाचें जसें तमावर निजलें.... 

अंधारांतुन सरकत जाती झाडांचे जड पुतळे 
कुणीं मांडिले ? कशास माझे लोचन भरुनी आले....

ध्वनिबंधावर तूंच उभी कीं युगे निळावत गेलीं 
आभासांतिल हिमशिखरांची रांगच घसरत आली...

उभे धराया मला पुरांतुन सूर समाधी ल्याले 
हृदयांमधलें अमृत प्याया मरण कोठवर आलें....

हळदीचे हात

रंगाच्या रसनेंत सूर्य बुडाला अंधारलें सागरीं 
बेटांचें जळबिंब फक्त हलतें माझ्याच प्राणांवरी 
घोड्यांचे पथ दक्षिणेंत मिटले गेले सखेसोबती 
एकाकी नभ प्राक्तनांत शिरतां रक्तांत येते भिती....

अज्ञेयाहुन गूढ गूढ दिसती झाडांतलीं वर्तुळें 
तूं पाठीवर रंग आज विणले कीं द्राक्ष-वेलींतले 
यात्रेच्या अपुऱ्या अभंगसमयीं पाठींत कैशा विजा 
अश्रूही सरल्यावरी उमलसी तूं एकटी स्वमजा......

माझ्यानें उठवे न दार उघडे वारा मला आवळे 
लाटांच्या ध्वनिबंधनांत अडलें चैतन्य की आंधळे.... 
अस्थींचीं उडती पिसें सजुनिया अंधार घाली कडें 
हळ्दीचे कुणि हात हे पसरले माझ्या सुखाच्या पुढें....

माडांच्या परिघांत मी विझविल्या स्वप्नात चंद्रावळी 
डोळ्यांची बुबुळे तुझीं उलटता झाली धरित्री निळी.... 
तृष्णेच्या पहिल्या फुलास गिळतो माकंद ओठांतला 
कर्णाच्या घनतेंत की वितळतो संभोग कुंतींतला....

संयोगिनी

विराट घुमटांतुनी गळत सावल्यांची घरें 
उजाड शिशिरांतलीं गहन सावळीं मंदिरें 
हिमांत जडली कुठें तरल स्वप्नभूमी निळी 
तसेच घन मंद हे, हृदयिं लागलेले झरे....

तुझ्यांत नभवाहिनी कुठुन रक्त गंधावलें 
अनाथ तुटल्या तिरीं विझत सूर्य कीं मावळे 
शरीर विणले कुणी अतुट फाटली वासना 
तुझ्यांत भिनल्यावरी फिरुन चंद्र अर्धा उरे....

पहाड इथले मुके दिवस आंधळा कीं जसा 
अभंग तिमिरांतला तडत चालला आरसा 
तसा सहज नाचतों कधिं न बांधिली पैंजणें 
जशा धुळिंतल्या दिशा भुलुन गाय जी हंबरे....

भेट

 जियें थांबावें तूं तिथुन झरते सांद्र करुणा 
कुणाच्या श्वासांची नितळ पडली भूल सजणा 
इथें दुःखाचा हा बहर पिकला सांज गहिरा 
तुझ्या केसांचा कीं धुळिंत पडला खिन्न गजरा....

मला झाडांपाशी कुणि न दिसले शिल्पभरले 
निळ्या वस्त्रांच्या कीं कुशिंत सजुनी अंग हरलें 
जुन्या तृष्णेनें ही सहज ढळती मुक्त शिखरें 
कुणाला सांगावें बहर इथला दूर बहरे....

उभीं रानें त्यांचा विकल विहगें ताल धरिती 
जशीं नक्षत्रांचीं फिकट किरणें दूर हलती 
तुझ्या डोळ्यांचा मी सदय गिळला अश्रु पहिला 
तरी माझ्या देहीं कुठुनि तव हा देह उरला....

जळा सोडी मासा म्हणुनि तुकया संत बनतो 
कुठें कल्पान्ताला प्रलय- भरला कंठ फुटतो 
पुन्हा भेटीसाठीं सघन तम ये आज जवळी 
फुलें सर्वांगाचीं टपटप गळावीत सगळी....

नदीच्या कांठीं

नदीच्या कांटानें दिवस मळला सांज ढळली 
जशी वृक्षांना ये शिशिर - भिजली हांक पिवळी 
कुणाचे हे देवा अशुभ हिरवे सूर उडती 
तुझ्या रक्ताखालीं कितिक सजलें चंद्र ढळती.

नदीच्या कांठानें मरण-मिटलीं मंद चरणें 
जशी झाडांखालीं हळुच गळती चंद्रकिरणें 
नदीच्या पाण्यानें हृदय करुणा नेत्र भरलें 
जसे प्रारब्धाच्या कुशिंत थकुनी शब्द निजले....

- पुढें स्वप्नांधांच्या धुळिंत कसला गंध मिसळे 
जशी गांधारीचीं नदिंत गळती नेत्रकमळें 
नदीच्या तीरांना क्षितिज अपुले प्राण भिडवे 
दिशांना मेघांचे मधुन जडती रंग भगवे ....

दुपार

विवर्त नभ एकटें सतत तापलेली हवा 
उन्हांत जणुं मैथिली तुजसि शोधिते राघवा.... 
विवस्त्र मृगतंद्रिनें क्षितिज वाहतें कीं पुढें 
तृषार्त बिलगे मला सभय चातकांचा थवा.

तुझे तटचि पांगळे तरिहि विश्व यावें गळीं 
सुवर्णवन पेटलें तुझिं न आसवें मोकळीं.... 
प्रशांत नगरांत या घरचि सांपडे ना मला 
जिथें अधर गोंदिला पिळुनी वासनेचा दिवा.

विराण नुपुरापरी नभचि तीक्ष्ण झालें निळे 
उन्हांत जणुं दीप्तिचें फुटूनि सांडतें की तळे 
विदग्ध प्रतिमेपरी सगुण ऊन झेलूं नको
तुझें अमल दुःख दे मजसि तेवढा जोगवा.....

बहार

पान पान सोडती सहिष्णु वृक्ष येथले 
चक्र ओंजळीतलेंच वर्तुळांत नादलें 
ऐकतों कुठेतरी तमांत झांकलीं घरें 
दिशादिशांत गात हा फकीर एकटा फिरे 
पहाड शब्द वेढती तसा सतंद्र गारवा 
नि रक्तवाहिन्यांतुनी उडे सुसाट पारवा.... 
तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी 
वेदनेंतली फुले नि चांदण्यांतल्या सरी.... 
तुझेंच अंग चंदनांत अंतराळ ओढते 
पुरांत आणखी असें सजून ओल मागतें.... 
दुःख लागतां मला सभोंवतीं जसें जसें
या होउनी तसें क्षितीज दृष्टिला दिसे....

दुपारचें ऊन.....

दुपारचें सचित्र ऊन मृगजळांस लांबवी 
अनंत इंद्रियांतले स्वतंत्र शोक जागवी.... 
जिथें उभारलीं घरें तिथें अपार शून्यता 
दुपारच्या उन्हांतली विचित्र एकसंधता.... 
समुद्र आटतील का ? अतर्क्य सूर्य वाहतो 
अशी अवेळ साधुनी मनांत कोण हिंडतो.... 
तहान ही मला गिळे नि कंठ हो तुझा निळा 
उन्हांत पाय वाजती कुणांत जीव गुंतला....

प्रारंभ

इंद्रियांच्या प्रारंभांत क्षितिज, 
संवादीपणानें.
नाद माझे हळुवार, पैंजणी रात्रींना
दुःख अभिजात, स्पर्शमय वर्तुळांत 
क्षणाक्षणानें.
अवकाश-रेषा निसरड्या, सप्तरंगी
आकाशगामी डोळियांच्या गुंफांत....
जाऊ नकोस, हांकेवर थांब, ते अमृताचे
भयाण डोह आहेत
अमर होशील....

तहान

कुठल्याही क्षणीं यावेसें वाटतें. 
हुतात्म्याच्या समाधीवरील फुलांसारखे 
मंद मधुर दिवस...
मृत्यूच्या पार्श्वभूमीवर गळणारें तुझें लावण्य 
कुठल्याही क्षणीं प्यावेंसें वाटतें....

निनाद

तुझी भीति वाटावी तसें पारिजाताचें झाड
निनादानें फुलें सोडून जाणारें. 
मनाच्या भिंतीआडून कुणीतरी गाणारें 
जवळ येऊ नये म्हणून रात्रीचा प्रपंच... 
झोपाळ्यावर झोके घ्यावे म्हणजे 
नीजही येऊ लागते
पण मोडत नाही बुबुळांच्या शुभ्रतेंत 
रुतलेला चंद्र....

कावळ्यांचा रंग

कुणी आपुलें म्हणेना 
कुणी बिलगेना गळां
कंठ दाटतांना झाला
रंग कावळ्यांचा काळा.

नसानसांतून वाहे
फणा उगारून साप. 
दूर सावल्यांचा घोळ 
माझें नाचवितो पाप.

रात्र आंधळ्या कौलांची 
कुणी आढ्याला बांधली
चंद्र पडला मरून 
इथें पहाडाच्या खालीं.

दुःख घराला आलें

अंधार असा घनभारी 
चंद्रांतुन चंद्र बुडाले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणुं दुःख घराला आलें.

दाराशीं मी बसलेला 
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसें धरणीला
श्वासांनी धरतें उचलुन...

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणुं हृदयामागुन माझ्या 
झाडांची पाने गळती....

नाहींच कुणी अपुलें रे 
प्राणांवर नभ धरणारें
दिक्काल धुक्याच्या वेळीं
हृदयाला स्पंदविणारें....

कलश


सांज-घनांच्या मिटल्या ओळी 
मिटले माझे नयन निळे 
शिरिष फुलांच्या शय्येवरतीं 
क्षितिजावरचें रान जळे

तळ्यांची ही फुटकी ओंजळ 
जोग असा का हा विटका ? 
उंच उडाली धूळ म्हणोनी 
क्षणांत झालों मी बुटका...

दुःखाचें बन उधळित सुटला 
मातीवरचा घन वारा
घरांत माझ्या ओघळल्या मग
अधरविणेच्या मधुधारा

इथें बांधिले घरकुल कोणी 
अंधाराला भ्रांत पडे
तीरावरच्या रेतीपाशीं
समुद्र हळवा आज रडे.

प्राक्तन ओढुन निजल्या गायी 
प्राण तुझे मग हंबरले 
इथें दिठीवर उमले पाणी 
कलश दुधाचे कुणीं भरले ?

चुड़ा

तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं 
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथें दाट छायांतुनी रंग गळतात 
या वृक्षमाळेंतले सावळे

तुझीं पावलें गे धुक्याच्या महालांत 
ना वाजलीं ना कधीं नादलीं 
निळागर्द भासे नभाचा किनारा 
न माझी मला अन् तुला सावली....

धराया विनाशास संदर्भ माझे 
जशा संगीतानें दिशा पेटल्या
तुझ्या सांद्र ओढाळ देहांत तुजला 
नदीच्या कळा कोणत्या भेटल्या.

मनावेगळी लाट व्यापे मनाला 
जसा डोंगरी चंद्र हा मावळे 
पुढें कां उभी तूं तुझें दुःख झरतें 
जसे संचिताचे ऋतू कोवळे...

अशी ओल जातां तुझ्या स्पंदनांतून 
आकांत माझ्या उरीं केवढा ! 
तमांतूनही मंद ताऱ्याप्रमाणें
दिसे कीं तुझ्या बिल्वरांचा चुडा....

संग

अंगोअंगीं पाजळले 
केशरांचे दिवे 
अंधारांत दिसे गांव 
तृष्णेकाठीं नवें.

पाय- मेंदीपाशीं गेले 
चांदण्यांचें बळ 
कुठें कुठें दुखूं लागे 
कस्तुरीची कळ.

देह ओवूं जाता जडे 
अंबराचा मणी
अजाणाचा संग माझा 
पांडुरंग धनी.

अर्थ

वाळूचीं घरकुलें मोडलेल्या शापांचें शैशव ; 
विस्मयाच्या उत्कंठेचें वरदान घेऊन
उभें असतें तुझ्या डोळ्यांच्या 
किनाऱ्यावर.
दुथडी भरून वाहत असतें तुझें मातीचें घर 
कसल्याशा आवेंशाच्या उन्मेषपूर्ण 
उल्हासांत.
काठाकाठानें चालावें तरीही पाय भिजतात.... 
विखुरलेल्या शब्दांचे अर्थ मी गोळा करून 
आणले असतात....

इराणी संगीताच्या प्रतिमा

आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी 
संगीताच्या प्रतिमा....
मला आलिंगनांत मरण तसा रात्रीचा शृंगार, 
तुझें चांदरातीचें अर्थनिळें मन....
कुठें याच्याही पलीकडे, कुठे त्याच्याही पलीकडे संपूर्ण अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकू येईल 
अशी सारंगीची पिपासा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा....
वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादांत ? 
कुणाच्या शोधांत ?
स्वरसिद्ध तिचे अनंत कण; रेषाबद्ध उंटांच्या 
मानेंत जसें चंद्रबन....
कुणी दिसत नाही ; नाही दिसत एवढ्या प्रचंड 
टापूतं मला, कुण्या युगांत येथें झाडें उगवलीं 
असतील त्या डोळ्यांचा निरंगी नश्वर सुरमा 
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा.... 
मज्जेच्याखालीं तळमळणारे फुलांचे दैवी घोस.... 
कीं कुण्या वैदेहीची पंथविराम गुणगुण ? 
शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून .... 
नभ एवढें विराट, माझें नाही तसें तुझेंही नाही या 
वाळूच्या सप्तरंगी कणांचें अज्ञातपण 
फक्त दुःखाच्या देखाव्यांना दिशाबद्ध 
करणारे पिरॅमिडांचें अधांतर ;
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा....

वैरी

वाऱ्याने हलतें रान
तुझें सुनसान
हृदय गहिवरलें
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईतले....

डोळ्यांत शीण 
हातांत वीण
देहांत फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणुन 
निघे वैरागी......

चाळूत पाय 
सजतेस काय ? 
लाटांध समुद्राकाठी
चरणांत हरवला गंध
तुझ्या की ओठीं....

शून्यांत गर्गरे झाड 
तशी ओढाळ 
दिव्यांची नगरी
वक्षांत तिथीचा चांद 
तुझा कीं वैरी ?

वर्षाव

उन्हें उतरली 
एक सावली
पुढें दिठीवर थेंब नवा 
या वळणाशीं
दुःख उराशीं 
सूर वितळतो जणुं भगवा.

स्वप्ने अपुलीं 
कुणी सजविलीं ?
रंग तिरावर व्याकुळसा
नाद उगाळुन 
सांज-बनांतुन 
कळप गुरांचा निघे जसा.

माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा
देह अनावर 
निज मातीवर
हिम वर्षावत ये वारा....

जन्म

ऊन वेचतां मनांत
स्पर्श लाघवी जळे,
सांज-रंग पांघरून
गगन जन्मलें निळें.

स्तब्ध मी उभी तुझ्यांत
ढळत गहनता अशी ;
वळत वळत पावलांत 
वाट गुंतली पिशी.

वृक्ष-ओळ दूर....दूर ; 
तरल बावरे जिणें ;
चांदण्यांत लोचनें नि
लोचनांत चांदणें.

चांदणी उबेंत पंख, 
झोपलींत पांखरें ;
शब्द... शब्द जळत देह, 
मुक्त गान मोहरे.

रिक्त या कवेंत मी नि
शून्य ध्यान एकलें ;
रात्र घेउनी उशास 
क्षितिज गाढ झोपलें

श्रावण

हा श्रावण गळतो दूर
नदीला पूर 
तरूवर पक्षी 
घन ओलें त्यांतुन 
चंद्र दिव्यांची नक्षी....

हा श्रावण वाजवि धून
निळें अस्मान 
स्तनांवर गळलें
मन सगुण फुलांच्या
मंद क्षितीजीं जडलें....

हा श्रावण रडतो दूर
तमाला सूर
मधाची वाट
झाडांचीं चरणें
त्यांवर एक ललाट....

डोळे

एक सांज अशी
तिचा रंग जरा लाल 
माझ्या कपाळाला
तुझ्या धुळीचा गुलाल

....एक रात्र अशी 
तुझे सीतेपरी डोळे 
रूप पाहतांना
नभीं अंधार पाजळे.....

पाऊस

पाऊस कधीचा पडतो 
झाडांची हलती पानें 
हलकेच जाग मज आली 
दुःखाच्या मंद सुरानें. 

डोळ्यांत उतरले पाणी 
पाण्यावर डोळे फिरती 
रक्ताचा उडला पारा.... 
या नितळ उतरणीवरती. 

पेटून कशी उजळेना 
ही शुभ्र फुलांची ज्वाला 
ताऱ्यांच्या प्रहरापाशी 
पाऊस असा कोसळला. 

संदिग्ध घरांच्या ओळी 
आकाश ढवळतो वारा 
माझ्याच किनाऱ्यावरती 
लाटांचा आज पहारा.

भगवंत

ही चंद्र- उदयिनी वेळा घननीळ कांठ मेघांचे भरतीच्या क्षितिजावरुनी

घर दूर जसें सजणाचें....

तूं उभी अधोमुख येथें निद्रेचा उधळुन जोग गर्भात धरित्रीच्याही

ये जशी फुलांना जाग....

बहरांत दुःख अनवाणी

कीं पैलथडीची रात.... माझाच स्पर्श सर्पाचा अमृतमय माझे हात....

अंधार कडे घेऊन हें कोण रडाया आलें ?

दृष्टींत अरण्यामधलें मातीचें चंदन ओलें....

तरि तुझ्या कुशीचा रंग शरिरावर माझ्या उमटे

कीं चित्र अभंगामधला भगवंत स्मृतीवर दाटे....

माहेर

 चांफ्याच्या झाडापाशीं

अंधार जसा गांधार निनादत येतो. माहेर निळें कोणाचें....

चोळींत दुधाचा थेंब जसा तळमळतो.

माहेर तुला नसतांना

ओटींत तुझ्या मी कसा भरावा वारा

दुःखाचा जन्म घरा ये

आभाळ सोडतां घुंगुर बनतो तारा....

वैराण दिशांचा जोग

चांदणें नदीच्या पाण्यावर निजलेलें

तव हात उडोनी जाती

जे ओल फुटाया तूंच स्तनांवर धरले....

शिल्पान्त खंड स्मरणाचा

निःसंग जोडिशी क्षितिज कशाला भगवें हें जरी मिटे प्राणानें

सान्तांतुन अवघें अस्त घेऊनी उगवे ....

कांच

 डोळ्यांतुन रंगित सांज परतली आज
भटकल्या गायी....
व्याकूळ अनावर धूळ पसरली बाई.
खिडकीला टेकुनि पाठ कशी वहिवाट बावरे न्यारी अंगात रुते कीं कांच तुझ्या दुखणारी... ओलेच उदविले केस
तुझ्या स्मरणास दिसे पडशाळा बगळ्यांची झुलती मंद फुलांची माळा.
झाडांत संपती दूर
मंदिरें चूर बिलगती जैसीं घर तुला खुणावे
तूंच अशी वनवासी.
डोळ्यांत गुंफुनी थेंब जराशी थांब ; देह राख हलणारा
हिमकंपित इथला
भणभण फिरतो वारा....

पार्श्वभूमि

 भुरभुरत्या संधिप्रकाशांत भिजलेलें
कार्तिकांतील धुकें
डोळ्यांच्या बाहुल्यांना चिकटलेले
मायेचे क्षण.
सरकणाऱ्या क्षितिजावर ओळख
हरवून बसलेली छायावेळ.
अथांगपणांत बुडालेलें माझें 
स्वप्नगंध.
एक हलकासा तरंग घेऊन मीहि
ढवळून काढावा आसमंत.... 
हीं शिखरें मोडावीत....
हीं झाडें सारावींत....
– हा पूल जोडावा....
आणि नसलेल्या सुरूंच्या झाडांना
द्यावी एखाद्या प्राचीन शिल्पाची 
पार्श्वभूमि.

पाउलें

 पलीकडच्या पातळ अंधारांतून 
पाहिलेंस मला.
उन्मन होऊन रेषांच्या तसूतसूंत
वितळलें होतें मी....
. शिल्पध्यान... मायकेलेंजेलोचें.
— अचानक निघून गेलास न थांबतांच, 
भाद्रपदांतील शेवटच्या लहरी मेघाप्रमाणें 
तेव्हांपासून सांभाळीत आलें आहें, 
कस्तुरीच्या मातीवर उमटलेलीं
राजहंसाचीं पाउलें.
नंतरचे आशीर्वाद प्रस्तरांत पुरलेस 
वाचतां येऊं नये म्हणून मलाच माझ्या 
नियतीची भाषा.... संज्ञाहीन. 
तरीहि जातात कधीकधीं
माझ्याच मनाच्या कांठाकांठानें,
स्मरणाच्या मुक्तीचा ऊद् जांळीत
अबोल रानाला साद घालणाऱ्या 
सुतार पक्ष्याचे पडसाद.

आकाश

गुंतवितां मिठी 
गर्द झाले श्वास, 
सुजलें आकाश 
पाठीवरी.

अशा रंगापाशीं 
मातीचें चांदणें, 
पल्याडचें जिणें 
जन्माआधीं.

ओळख

 मालविल्या सांज - दिव्यांची
तम-मार्गावरतीं खंत,
वृद्धेच्या ओवींमधला
उरिं दाटुन
ये भगवंत.

पानांच्या जाळींमधलें
वाऱ्याचें कुंडल डुलतें,
ओठांची मिथिला ल्याया
पदरांतुन नभ व्याकुळतें.

तुटलेली ओळख विणतां
प्राणांची फुटते वाणी,
पायांतुन माझ्या फिरतो
अवकाश निळा अनवाणी.

राघववेळ

 नभाला धरबंद नाहीं
तळहातावरील वळीव स्पर्शाचा.
उशालगतच्या गंधगार रात्रींत
गुरफटलेले क्षितिज दूर ढकललेंस
आणि बुडून गेलास...
विमुक्त, तरल, उदविलेल्या, श्यामल
टेकड्यांच्या ढगाळांत.
उरलेल्या स्पर्शाच्या ओळींत सजतांना
थिटीं पडलींत माझ्या प्रारब्धांतील अक्षरें !
अनाहूत अशा विलक्षण विश्वासानें,
तडकलींत माझीं घरकुलें,
शेंदरी देठांचे प्राजक्ती स्मशान
ओंजळींतून गळतांना !
तुझ्याच आघातानें कां टळून जात नाहीं
सुरंगी गात्रांना कुरतडणाऱ्या
राघववेळेचा प्रहर ?

सोन्याच्या मोहरा

सोन्याच्या मोहरा
गेलें उकरून घर,
नाहीं भिंतींना ओलावा ;
भर ओंजळीं चांदणें,
करूं पांचूचा गिलावा.

आण लिंबोणी सावल्या,
नाहीं आढ्याला छप्पर ;
वळचणीच्या धारांना
लावूं चंद्राची झालर.

पाय ओढत्या वाळूची
आण तेव्हांची टोपली;
कधीं खेळेल अंगणीं
तुझी - माझीच सावली ?

गेलें उकरून घर
जाऊं धुक्यांत माघारा,
कधीं पुरून ठेवल्या
आणूं सोन्याच्या मोहरा.

 *अति महत्वाच्या डायटिंग टिप्स-*


अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्यामुळे तुम्ही जाड दिसता..🫣


*१. वजन काटा*


*२. आरसा*


*३.जुने फोटो*


आणि..


*४.हडकुळे मित्र..*

 एक जण पुण्यात हिंडताना जाम वैतागला होता.


त्याला एकाने विचारले "काय झालं?" 


तर म्हणतो 


"पुण्यातल्या लोकांचं एक काही धड नसतं"...


टिळक कर्वे रोडवर राहतात


कर्वे फडके रस्त्यावर राहतात


फडके लेले आळीत राहतात 


लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात


बापट दांडेकर पुलाजवळ राहतात


दांडेकर गोखले नगरला राहतात 


गोखले भांडारकर रोड वर राहतात


भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात


रानडे केळकर रस्त्यावर राहतात


आणि केळकर टिळक रस्त्यावर राहतात.


अरे, आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी..!

 नवाबी तहजीब विरुद्ध कानपुरी स्वभाव 


एक नवाब साहेब आपल्या भाच्याच्या लग्नासाठी लखनौहून कानपूरला आले.


गेल्या दोन दिवसांपासून नवाब साहेबांच्या लक्षात येत होते की रोज मेजवानीत त्यांना खायला फक्त अंडीच दिली जात होती… म्हणून तिसऱ्या दिवशी त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी आपल्या मेहुण्याला विचारले –


.. साहेब, ही अंडी  त्यांच्या जागी ठीक आहेत, पण त्यांचे आई-वडील कुठे आहेत…?! … कृपया त्यांचीही ओळख करून द्या…!! ही लखनवी संस्कृती आहे.


मेहुणासुद्धा खरा कानपुरी होता. तो म्हणाला, "साहेब... तो अनाथ आहे."

 एक मुलगा आणि मुलगी बीएमडब्ल्यू गाडीतून डेटवर गेले...!


मुलगा - मी आजपर्यंत तुझ्यापासून एक गोष्ट लपवत आले आहे.


मुलगी - काय?


मुलगा - मी विवाहित आहे 


मुलगी, तू मला घाबरवलेस.मला वाटलं ही बीएमडब्ल्यू गाडी तुझी नाहीये...!!! 

 एका सुंदर मुलीचं आणि गुप्ताजींचं अफेअर होतं…!


गोष्टी लग्नाच्या दिशेने जात होत्या, पण त्याआधी…???


एके दिवशी, ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते… 🤣🤣🤣


मुलीने विचारलं:


तुमच्याकडे मारुती कार आहे का? 🤣🤣🤣


गुप्ताजी म्हणाले: नाही.


मुलगी: तुमच्याकडे फ्लॅट आहे का? 🤣🤣😃


गुप्ताजी: नाही…!


मुलगी: तुमच्याकडे नोकरी आहे का? 🤣🤣🤣


गुप्ताजी: नाही…!


_आणि मग…_


*ब्रेकअप…!!*


या काळात, गर्लफ्रेंड निघून गेल्यामुळे गुप्ताजी दुःखी झाले.


आणि मग ते विचार करू लागले…


माझ्याकडे BMW असताना… मला मारुतीची काय गरज आहे?


 जेव्हा माझ्याकडे एवढा मोठा बंगला आहे, तेव्हा मला फ्लॅटची काय गरज आहे?


आणि…


जेव्हा माझा स्वतःचा ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे आणि ४०० लोक माझ्यासाठी काम करतात,


तेव्हा मला नोकरीची काय गरज आहे?


मग माझ्या गर्लफ्रेंडने मला का सोडले?

 डॉक्टर : उत्तम स्वास्थ्यासाठी रोज व्यायाम करत जा. 

तेव्हाच तू फिट राहशील. 

मन्या : मी रोज क्रिकेट आणि फूटबॉल खेळतो. 

डॉक्टर : किती वेळ खेळतोस? 

मन्या : जोपर्यंत मोबाइलची बॅटरी संपत नाही. 

अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

कधी कधी एखाद्या पुस्तकातलं एखादं वाक्य आपलं लक्ष वेधून घेतं. वाक्य तसं साधंच असतं पण विचार केला तर त्यात खूप अर्थ भरलेला जाणवतो. असंच एक वाक्य परवा माझ्या वाचनात आलं आणि त्या वाक्यापाशी मी थांबलो. बऱ्याच वेळा आपण वाचून पुढे पुढे जात असतो. परंतु कधी कधी एखाद्या वाक्यापाशी थांबावं आणि त्यावर विचार करावा असं ते वाक्य असतं. पुढचं काही वाचलं नाही तरी चालू शकतं.


ते वाक्य होतं टी हार्व एकर या अमेरिकन विचारवंताचं. तो म्हणतो,"Successful people have fear, doubt and worry too. They just don't let it stop them." यशस्वी लोकांना सुद्धा भीती, शंका आणि चिंता असतात. फक्त ते या भावनांना स्वतःच्या मार्गात अडथळा बनवू देत नाहीत. 


मला हे वाक्य फार आवडलं. यशस्वी माणसांचं जीवन पाहिलं की आपल्याला वाटतं की किती भाग्यवान आहेत ही मंडळी ! यांना सगळं कसं भरभरून मिळालं आहे ! आणि मग अशावेळी आपण नकळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू पाहतो. मग आपल्याला आपण किती दुर्दैवी आहोत असे वाटते. आपण म्हणतो की मला माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, माझ्याच वाट्याला संकटे आणि अडचणी येतात. कोणतीही गोष्ट माझ्यासाठी सहजपणे होतच नाही. अगदी हातातोंडाशी आलेले यश मला नेहमी हुलकावणी देते. 


दूरवरून दिसणारे पर्वत आपल्याला खूप सुंदर वाटतात. पण जवळ जाऊन पाहिलं म्हणजे लक्षात येतं की अरे, दुरून हा डोंगर दिसत होता तेवढा सुंदर खचितच नाही ! दगडधोंडे, दऱ्या, तीव्र चढ-उतार या सगळ्या गोष्टी तिथे आहेतच. फक्त आपल्याला त्या लांबून दिसल्या नव्हत्या.


असंच यशस्वी माणसांचंही असतं त्यांच्या जवळ जाऊन पाहिल्याशिवाय त्यांच्या यशाचं मर्म लक्षात येत नाही. ही माणसं सुद्धा अनेकदा अपयशाचे धनी झालेले आढळतात. त्यांच्या जीवनातही संकटे येतात. ते देखील कधी कधी निराश होतात. कारण ती देखील तुमच्या आमच्यासारखी माणसंच आहेत. या मातीतूनच त्यांचा देखील जन्म झाला आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का ? होय, नक्कीच ! या ठिकाणी पुन्हा मला एक सुंदर वाक्य आठवतं आहे. "Great men don't do different things. They do things differently." ( महान माणसे वेगळं काम करत नाही फक्त ते आपली कामं वेगळ्या पद्धतीने करतात.)


आपण मात्र संकटे आली, अडचणी आल्या की गांगरतो आणि ती गोष्ट तशीच सोडून देतो. कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांसोबतच चिकाटीची सुद्धा आवश्यकता असते. संयम आणि धैर्य या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. संकटे आपली एक प्रकारची परीक्षाच घेतात. आपण जे पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतो, त्या शिक्षणातून खरंतर हे गुण आपल्या अंगी यायला हवेत. परंतु तसं होताना फार कमी आढळतं.


काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. एका तरुण आयटी इंजिनिअरने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. कारणही तसेच होते. त्याची अचानक नोकरी गेली. त्याच्या लॅपटॉप वर सकाळी सकाळी एक ई-मेल आला. त्यात कंपनीने म्हटले होते, " कंपनीत आता तुमच्या सेवेची आवश्यकता नसल्यामुळे तुमची नोकरी उद्यापासून संपुष्टात आली आहे. आता तुमची गरज नाही." त्या एका वाक्याने त्या तरुणाच्या डोळ्यासमोर सारा अंधार पसरला. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. घरासाठी गाडीसाठी त्याने बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. आता काय होणार ? कर्जाचे हप्ते कसे भरणार? घर कसे चालणार ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... या प्रश्नांची काजळी त्याच्या मनावर एवढी दाटून आली की त्याला आपले जीवन संपवावे एवढा एकच मार्ग दिसला. गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले आणि आपल्या पत्नीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. ती बिचारी सुद्धा हा धक्का सहन करू शकली नाही आणि तिने गच्चीवरून उडी मारून स्वतःला संपवले. ही घटना वाचून कोणालाही हळहळ वाटणे सहाजिकच आहे. 


कोणी एखाद्या परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या करतो तर कोणी प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारतो.


नंतर मनात एकच विचार आला की खरंच असं काही झालं म्हणजे सगळंच संपलं असे समजायचे का ? नाही. कधीही नाही. नोकरी जाणं म्हणजे एक दरवाजा बंद होणं. पण बंद दरवाजासमोर उभे राहून आत डोकावत राहणे म्हणजे मागे उघड्या असलेल्या खिडक्या न पाहणे. नोकरी गेलेल्या त्या तरुणाकडे कौशल्य होते, बुद्धी होती, अनुभव होता. त्याला फ्रीलान्सिंग करता आले असते. स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता आला असता. सरकारी योजनांचा आधार घेता आला असता. कुटुंबाने, मित्रांनी साथ दिली असती. समाजातून मदतीचे अनेक हात पुढे आले असते. पण... या सगळ्या शक्यतांचे दरवाजे त्याने स्वतःच बंद करून टाकले. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे गृहीत धरून चालायला हवे की आपली नोकरी म्हणजे अळवावरचे पाणी आहे. ती कधीही जाऊ शकते. यासाठी प्लॅन बी तयार असायला हवा.


त्या तरुणावर आलेले हे संकट खरोखरीच अवघड होते त्यातून पार पडणे सोपे नाही, हेही मान्य. संकट आले की धीर सुटतो, हेही खरे. पण खरंच अशा प्रसंगी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे का ? अशावेळी थोडे शांत राहून विचार केला तर नक्कीच मार्ग सापडतो. 


"'आली जरी कष्ट दशा किती अपार। धैर्य न टाकीती तथापि थोर।

केला जरि पोत बळेचि खाले। ज्वाळा तरी ते वरती उफाळे।।"


थोरांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकायला मिळते. आजूबाजूचा निसर्गही आपल्याला शिकवत असतो. पानगळ होते परंतु झाडाला नवीन पालवी फुटते. झाडाच्या फांद्या छाटल्या जातात पण त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते. प्राणी, पक्षी देखील विपरीत परिस्थितीला तोंड देतात आणि प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतात. आपण तर माणूस आहोत. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे. आपण संकटांनी असे हाताश होऊन कसे चालेल ?


" घन तमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी..."असं एक सुंदर गाणं आहे. सर्वत्र अंधार पसरलेला असताना हा शुक्रतारा आपल्या प्रकाशाने आजूबाजूच परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो असं म्हणत नाही की माझ्या एकट्याने काय होणार आहे ? स्वतःच्या जीवनाचा दीप विझवून अंधार करण्यापेक्षा इतरांसाठी प्रकाश देणारा दीप बना. जीवन असे सुखासुखी नष्ट करू नका. आज रात्र आहे पण उद्या पहाट होणारच आहे हे निश्चित ! हे जीवन म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे हे लक्षात ठेवून वागा.


- विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

 बायको पोराची धुलाई करत होती....

पण मध्ये मध्ये.

.

.

.

माझ्याकडे बघायची काही गरज होती का?

CA ची पत्नी : काय हो?

महागाई दर म्हणजे काय असतं हो?


CA : पहिलं तुझं वय 21 वर्षे होतं,

कंबर 28 होती, आणि वजन 50 किलो होतं.


आता तुझं वय 36 वर्षे, कंबर 38

आणि वजन 80 किलो आहे !!


आता तुझ्याकडे पहिल्यापेक्षा सगळं जास्त आहे, *पण तुझी व्हॅल्यू पहिल्यापेक्षा कमी आहे... यालाच महागाई दर म्हणतात!!


Moral of The Story :


अर्थशास्त्र तेवढं कठीण नाही, पण योग्य उदाहरण देऊन समजून सांगायला पाहिजे.


_हा अर्थतज्ज्ञ नंतर महिनाभर उपाशी होता. त्याची कंबर 20 आणि वजन 45 किलो झालं!


मग त्याची बायको त्याला म्हणाली :

तुमचं पुस्तकी ज्ञान कामाचं नाही.

महागाई अशी आटोक्यात आणायला हवी!!!

सकाळीच एक इसम फक्त “बीपी तपासावं” म्हणून ओपिडीत आला,”बीपीचं मशिन केवढ्याला मिळतं?” त्यानं  अचानक विचारलं.. 


“८००ते ३००० पण हे यंत्र नाही उपकरण आहे” मी हे उत्तर देतो न देतो तोच “शूगर तपासायची का?” सिस्टरनं त्याला विचारलं..


“नको..माझ्याकडं शूगर मशिन आहे” त्यानं माहिती दिली. 

“अहो ते ही उपकरण आहे यंत्र नाही” मी स्पष्टिकरण दिलं आणि “तेच ते” म्हणत इसम बाहेर पडला..


आपल्याकडं हे असं ढोबळ-पसरट बोललं जातं..


आमच्याकडं एक इंटरकॅाम आहे-एक लॅंडलाईन आहे. “कुठला फोन आणायचा?” हे स्टाफला शंभरदा सांगूनही इंटरकॅाम सांगितलं की लॅंडलाईन घेऊन येतात आणि लॅंडलाईन सांगितलं की इंटरकॅाम..


बरं वर यावर उपाय म्हणून शॅार्टकटमध्ये “काळा फोन आणू की पांढरा?” असंही विचारतात पण त्यांची कामं आणि त्यासाठी त्यांना दिली गेलेली नावं काही समजावून घेत नाहीत..


माझा एक मित्र प्रत्येक सरदारजीचा उल्लेख “तो नाही का तो हरभजन?” असा करतो किंवा कुठल्याही आफ्रिकन माणसाला ‘रिचर्ड’ म्हणतो,सगळे हसण्यावारी सोडून देतात पण खरं तर हे खटकायला हवं..


अर्थात ढोबळ संबोधन देणारे किंवा पसरट बोलणारे वेडे आहेत असं माझं बिल्कूल म्हणणं नाही पण ते मेंदूचा अत्यंत सामान्य अन् कधीकधी चुकीचा वापर करत आहेत असा माझा ठाम दावा आहे..


मेंदूला जग समजण्यासाठी गोष्टी गटात टाकायला आवडतात उदा. फोन म्हणजे फोनच मग तो इंटरकॉम असो मोबाईल असो की लँडलाईन..


प्रत्येक गोष्ट तपशीलात समजून घेणं हे मेंदूसाठी खर्चिक काम आहे म्हणून तो “सोपं नाव=सोपी ओळख” हा मार्ग निवडतो यालाच Heuristics अर्थात शॅार्टकट विचार असं म्हणतात..


मेख इथंच आहे-गोष्ट थोडी नाजूक होते.सगळे उत्तर भारतीय भैय्ये सगळे दाक्षिणात्य अण्णा हे फक्त शॉर्टकट नाही तर सामाजिक स्टीरिओटाईप आहे..


एक अनुभव सगळ्यांवर लागू होतो आणि गोष्टींचं अतिसामान्यीकरण सुरू होतं,हे लोक ठराविक संबोधनं विसरत नाही तर ते लक्ष्यात ठेवण्याची मेहनत टाळतात..


यात मानसशास्रीय दृष्टिकोनातून तीन गोष्टी दिसतात कॉग्निटिव्ह रिजिडिटी अर्थात विचारांची लवचिकता कमी असणं-नवीन माहिती स्वीकारण्याची अनिच्छा आणि लोकांविषयी अनाहूत स्टीरिओटायपिंग..


हा मानसिक विकार अजिबात नाही पण तो सवयीची विचारशैली (habitual cognition)-सामाजिक अज्ञान किंवा कमी संवेदनशीलतेचा आणि क्वचित प्रसंगी सौम्य obsessive traits किंवा rigid thinkingचा भाग असू शकतो..


तुम्ही म्हणाल हा भाऊ आता प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीला आजार म्हणू लागलाय पण तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर एक ‘प्रयोग’ करा..


“आजपासून प्रत्येक नवीन व्यक्तीचं खरं नाव दोनदा उच्चारायचं,आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूचं नाव तिच्या मुळ स्वरुपात लिहायचं जसं लाईटचा बोर्ड ऐवजी एक्स्टेन्शन बॅाक्स-चार्जिंगचा गट्टू ऐवजी अडाप्टर वगैरे वगैरे..


पहिल्या काही दिवसांत अडखळाल-चुकाल पण हळूहळू जाणवेल नाव बदललं की नातं बदलतं-दैनंदिन कामात परफेक्शन येतं;फोन म्हणणं सोपं होतं पण ‘लँडलाईन’ म्हणणं अचूक होतं,आपल्याला मुंबईत कुणी ‘घाटी’ म्हटलं की राग येतो का नाही? कन्नडीगा म्हटलं तर कानडी माणसाला बरं वाटेल..


वस्तूंना किंवा व्यक्तींना ढोबळ नाव देणं हे हे कुठल्या आजाराचं वा वेडेपणाचं लक्षण अजिब्बात नाही पण मेंदूच्या आळशीपणाचं सूचक असू शकतं आणि जेव्हा ते लोकांच्या ओळखीवर परिणाम करतं तेव्हा ते फक्त ‘चूक’ नसतं तर संवेदनशीलतेचा अभाव बनतं..


आपला मेंदू आपल्याला शॉर्टकट देतो पण माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्या शॉर्टकटच्या पलीकडं जाऊन अचूकता आणि आदर यांची निवड करावी ! 


डॉ प्रज्ञावंत देवळेकर 

 मालकिण:मूर्ख माणूस! एक काम धड करत नाहीस कधीच, बावळट कुठचा 


नोकर: मॅडम जरा नीट बोलत जा, मी तुमचा नोकर आहे, नवरा नाही...

 बायको, ऐका , आज ऑफिसमधून लवकर परत या , आपण सिनेमा बघायला जाऊ.🥰


नवरा: मी आलो नाही तर!!!😉


पत्नी: तुम्ही वेळेवर आलात तर मी भाजपच्या निवडणूक चिन्हाने तुमचं स्वागत करेन.🪷


तुम्ही आणखी उशीर केल्यास, मग काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासह...!👋


तुम्ही आणखी उशीर केल्यास... केजरीवाल यांचे निवडणूक चिन्ह 🧹 दारामागे ठेवले आहे... सावध रहा. 


तेव्हापासून नवरा सारखं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चिन्ह पहातोय ⌚

 रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने शेजारच्या प्रवाशाला म्हणाले, ''मला कमी ऐकू येतं एवढं मला ठाऊक होतं, परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगापासुन बोलत आहात त्यातील एक अक्षरही मला ऐकू आले नाही''. 

.

.

.

सहप्रवासी गणपतराव म्हणाले, ''आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!'' 

 फक्त बोलून समोरच्याला गार करणारी माणसं असतील तर पाठवा इकडे

.

.

.

लय उकडत आहे. 

 "कसला कार्यक्रम आहे इथे..!?"🤔


"सुप्रसिद्ध बासरी वादक *श्रीहरी* यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम आहे....."


"मग अजून सुरू का झाला नाही...?.."

.

.

.

*"पहिलीच फर्माईश - _*नको वाजवू श्रीहरी मुरली*_  अशी आली आहे...!!!??.."


स्थळ : अर्थातच......!😀

 मन्या : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.


आंबेवाला : खराब ?


मन्या : हो! हो! खराब, नासके आणि सडके.


आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या!


मन्या : हं! ठेवा बाजूला! आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या.

प्रामाणिकपणा

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?


नरू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.


बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ? 


नरू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच  समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.

इतके सोपे असते तर मग हसलो नसतो का ?

रोज सुखाच्या पारावरती दिसलो नसतो का ?


सात पिढ्या श्रीमंतच होत्या आठवी पिढी मी

नाहीतर मग नोटा मोजत बसलो नसतो का ? 


वैभव जोशी

 सूर्य नेहमी पूर्वेकडून उगवतो.


पण चंद्रावर विश्वास ठेवता येत नाही.


कोण कोणत्या 'ब्युटी पार्लर'मधून केव्हा बाहेर येईल काय सांगता येत नाही? 

 युद्ध नाही प्रेम करा 


आणि जर तुम्हाला दोन्ही करायचे असेल, 

.

.

.

तर लग्न करा.

एक धर्मगुरू आणि पाद्री रस्त्याच्या कडेला उभे आहेत. त्यांच्या हातात एक फलक आहे, ज्यावर लिहिले आहे, "शेवट जवळ आला आहे! खूप उशीर होण्यापूर्वी आताच मागे फिरा!"

एक जाणारा ड्रायव्हर ओरडतो, "तुम्ही लोक वेडे आहात!"  आणि त्यांना मागे टाकून वेगाने निघून जातो. वळणाच्या पलीकडून त्यांना टायरच्या कर्कश आवाजासह, मग गाडी पडल्याचा मोठा आवाज ऐकू येतो.

धर्मगुरू पाद्रीकडे वळून म्हणतो, "आपण त्याऐवजी 'पूल बंद आहे' अशी पाटी लावली तर कसं राहील?" 

पायाखालची वाळू सरकली

एकदा, बायकोबरोबर घ्यायला गेलो भाजी ! पिशव्या उचलून उचलून, जिरली होती माझी !

पिशव्या उचलणे म्हणजे, समजू नका थट्टा ! इकडे, चालू होता बायकोच्या तोंडाचा पट्टा !

इतक्यात मैत्रीण, छानश्या बाळाला आली हो घेऊन ! अले वा, खेळवू लागलो, त्याच्या गालावर हात ठेऊन !

हे घ्या तुमचे बाळ, मैत्रीण ओरडू लागली रागात ! तुमच्याशिवाय, कोण आहे आम्हाला या जगात !

ओरडलो, कोणाचं बाळ, तुझ डोकं बिकं फिरलंय का? बायको त्वेषाने, तरी वाटलंच, पाणी कुठं मुरलंय का?

बायको लाल झाली रागाने, जाऊ लागला तिचा तोल ! मैत्रिणीला म्हणालो, अगं ये बाई, आता तरी खरं बोल !

मैत्रीण हसतच, सॉरी सॉरी हे माझंच आहे मुल ! मला या वेड्याला, करायचं होतं हो एप्रिल फुल !

मैत्रिणीचं झालं एप्रिल फुल, पण माझी जाम टरकली ! बायकोकडे बघताना, पायाखालची वाळूच सरकली !


कवी - उमेश शां. श. ओवाळ

एका माणसाने वर्तमानपत्रात जाहिरात दिली की त्याला नोकर हवा आहे. तुम्हाला कोणताही पगार मिळणार नाही, फक्त जेवण मिळेल.

नशिबाने साथ दिलेला एक गरीब माणूस आला आणि त्याने विचारले,"साहेब, मला काय काम करायचं आहे?" 

तो काहीच बोलला नाही, फक्त दोन लोकांसाठी रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण जवळच्या गुरुद्वाराच्या लंगरमधून आणावे लागते.


एक तुझं, एक माझं..!!! 

 *आई ही आई* असते...

● *आयझॅक-न्यूटनची आई* : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??


● *आर्किमिडीजची आई* : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?


● *एडिसनची आई* : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!


● *जेम्स वॅटची आई* : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!


● *ग्रॅहम बेलची आई* : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!


● *मोनालीसाची आई* : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!


● *गॅलेलियोची आई* : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??


● *कोलंबसची आई* : कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!


● *मायकल अँजेलोची आई* : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!


● *बिल गेट्सची आई* : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!


● *फॅरेनहाइटची आई* : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!


आणि शेवटी..


● *अलबर्ट आईनस्टाइनची आई* : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!


😊😝

गण्याच्या डायनिंग रुम मधील छत गळायला लागले म्हणून प्लंबरला बोलावले.

 

प्लंबर : कधीपासून गळतयं. कधी कळलं...?


गण्या : काल रात्री माझं सूप ३ तास पीत होतो..तरी संपेना...तेंव्हा कळलं.!!

 गोड बोलणा आमका

कोकणातल्या मातीनच

दिला गे बाय ..

मगे तिळगुळ घेऊन गोड

बोलायची गरजच काय ?


वरसून फणसासारखो

काटेरी दिसलो तरी

भुतुर गोड सोन्यासारखो

आसता गे बाय ..

मगे तिळगुळ घेऊन

गोड बोलाची गरजच काय ?


अडल्या पडलेल्यांच्या

हाकेक हाक देता ..

कधी बोलावलास तरी

आसात तसो धावान जाता..

देवासारखो पाठी उभो

रवता गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ?


एखाद्याक जीव लावल्यानं

तर काळीज काढून देता ..

वरवर नाय, मनापासून

सगळा करता ..

बघून डोळ्यात पाणी

भरता गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ?


गरम मसाल्यासारखो

वरवर तिखट दिसलो तरी ..

काळीज रसरशीत हापूस पायरी ..

सगळ्यांनी त्येचो अनुभव

घेतल्यानी गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ?


मालवणी माणसा बद्दल

बोलशीत तितक्या थोडा

कसो घडलो ह्या सगळ्यांका

पडला कोडा ..

नारळातल्या पाण्याचा

साक्षात अमृत गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ? 


मालवणी माणसा बरोबर

दोस्ती केलास काय होतला

सगळ्यांचा भला ..

तुम्ही पण शिकतलास गोड

बोलण्याची कला ..

मी सांगतयता विश्वातला

सत्य आसा गे बाय ..

मगे तिळगुळ घेवन गोड

बोलाची गरजच काय ??🥰

चार संप्रेरके जी माणसाला‌ आनंदी ठेवतात

श्रीकांत लेले यांच्या वॉलवरून घेतलेला हा लेख...

बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेलो.. मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो.थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की,"ती आयुष्यात आनंदी नाही आहे." माझा विश्वास बसेना कारण लौकिकदृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले,"असे का वाटते तुला?"


"मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की, माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे."


आता मी स्वतःला विचारू लागलो की,"खरच मी स्वतः आनंदी आहे का?"


काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला,"नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते."


माझ्यासाठी हा एक धक्का होता.मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे?


आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले.काही लेख वाचले,तज्ञ व्यक्तींशी बोललो. पण काहीच मेळ बसत नव्हता.शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.


त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.


तो म्हणाला आपल्या शरीरात 'चार संप्रेरके' असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी,प्रसन्न वाटत राहते-

१. एंडॉर्फिन्स

२. डोपामाईन

३. सेरोटोनिन

४. ऑक्सिटोसिन


आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.


*एंडॉर्फिन्स-*

आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.

हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते.

       मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण एंडाॅर्फिन्स आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.

      हसणे हा एंडाॅर्फिन्स निर्मितीसाठी आणखी एक चांगला मार्ग आहे.

      आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे एंडाॅर्फिन्स निर्मितीसाठी मदत करू शकते.


*डोपामाईन-*

आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.

       जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.

   यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.आपण जेव्हा काम करतो,पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते.आता आपल्याला समजले का खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?


*सेरोटोनिन-*

जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते.

     जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी,समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते.एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते.

      हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.


*ऑक्सिटोसिन-*

हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो,आपलेपणाने वागतो.

      जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते.

      मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.

      तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.


तर मित्रांनो,खूपच सोपे आहे. दररोज व्यायाम करून एंडॉर्फिंन्स मिळवा.


छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा.


इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा.


आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा ! 


अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात की, तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाल.


आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते. 


आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी...

१. कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा. *-एंडॉर्फिन्स* 


२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा.कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका. *-डोपामाइन*


३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा. *-सेरोटोनिन*


४. जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका.यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो. *-ऑक्सिटोसिन*


*आनंदी राहा,मस्त जगा !*

💐🌹🙏🏻🌹💐