मास्तर:- महिला आणि पुरुष या दोघांमध्ये तुम्हाला उत्तम कोण वाटतं ?
मन्या :- पुरुष…कारण मी आतापर्यंत कोणत्या महिलेचं नाव उत्तम ऐकलं नाही 🫣
*😁 खळखळून हसा - "व. पु. ...एक विनोदी कविता..."* 😁
लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗
मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.
आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃
त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे.. 😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.
लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो. 😜
ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही. 😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.
तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀
त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄
आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो 😃
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.
*-व. पु. काळे*
😃
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही!
एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??
नवरा-
आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस शिमल्याला हनिमूनला गेलो होतो.
तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन बायकोला खाली पाडली..🤨
ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली ;
"हे तुझ पहिल्यांदा झालं",
थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली "
हे तुझ दुस-यांदा झालं"
आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा
तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.🤨🐎
मी ओरडलो,
" ए बावळट, ! .....। तू घोड्याला मारलस ? पागल! "😡
तेव्हा ती मला रागात बोलली
"हे तुझ पहिल्यांदा झालं".🫣
आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ...
साधा वाद पण नाय केला कधी .. 😉
आम्ही अगदी आनंदी संसार करतो !!!🥰
🤣😂🤣😂😊
30-35 ठीक आहे हो,
40 पार झालं की कशातच मन लागत नाही...
कुठंही बाहेर पडावस वाटत नाही,
फिरायला वगैरे पण भीती वाटते..
तिशी च्या आत कसं, लगेच कुठं ही निघता यायचं...
थकवा नाही, कायम उत्साही वगैरे..!
20-25 तर अति स्वीट...
गोंडस गोंडस वगैरे...एकदम टवटवीत... आयुष्याची मज्जाच मज्जा वगैरे....
कसलीच भीती नाही..!
45 पार झाल्यावर तर काय होईल देव जाणो..!!
असो,
ह्या #तापमानात घरीच वामकुक्षी घेणंच योग्य.!!!🫣
काळजी घ्या उष्णता फारच वाढत आहे.!!! 😉
🤣😂🤣😂😊
तीन दरोडेखोर एका घरात शिरले. ते त्या बाईला म्हणाले, "आम्हाला तुमच्या घराची व्यवस्था बिघडवायची नाही आणि तुम्हाला इजा करायची नाही, म्हणून आम्ही इथे सोफ्यावर बसलो आहोत. तुमच्याकडे जे काही पैसे आणि दागिने आहेत ते घेऊन या."
त्या बाईने पैसे आणि दागिने आणले. दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या पतीने भेट म्हणून दिलेली हिऱ्याची अंगठी कुठे आहे?"
ती गप्प राहिली आणि अंगठी आणून त्यांना दिली.
"तुमच्या बहिणीने दुबईहून पाठवलेले घड्याळ घेऊन या." बहिणीने दिलेली भेटवस्तू देताना तिच्या डोळ्यात अश्रू होते.
"आता तुमच्या परवानगीने आम्ही 'नेस्कॅफे'ची इन्स्टंट कॉफी पिऊ."
कॉफी प्यायल्यानंतर दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "आता कालचा उरलेला अननसाचा केक घेऊन या."
जेव्हा दरोडेखोरांनी सर्व सामान नेले, तेव्हा ती बाई संकोचून म्हणाली, *"तुम्ही लोक खूप व्यावसायिक आणि नीतिमत्ता असलेले दरोडेखोर आहात. आमच्या घरातल्या वस्तूंबद्दल तुम्हाला कसे कळले?"*
*दरोडेखोरांच्या म्होरक्याने चेहऱ्यावर मास्क नीट करत म्हटले, मॅडम, आम्ही तुमचे 'फेसबुक फ्रेंड्स' आहोत.*
आम्ही तुमच्या पोस्ट्स नियमितपणे वाचतो. आम्ही तुमचा स्टेटससुद्धा तपासतो. 🫣
सोशल मीडियावर सर्व काही पोस्ट करणाऱ्या सर्वांना समर्पित
🤣😂🤣😂😊
रात्री बेडरुम मध्ये 2-3 मच्छर फिरतांना दिसले....
मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक मच्छर म्हणाला..
*"काका तुमची शपथ, चावणार नाही....* 🙏
*बस थोडा वेळ AC मध्ये बसु द्या"* 🫣
🤣😂🤣😂😊
कालू प्रवचनाला गेला आणि मार खाऊन परत आला. त्याच्या मित्राने विचारले, "अरे दादा, हे कसे झाले?"🤔
कालू म्हणाला, "माझी काहीच चूक नसताना मला मार बसला." 🥴
महाराज असा उपदेश करत होते की, पती-पत्नी एकाच सायकलच्या दोन चाकांसारखे असतात. 😇
मी उभा राहून विचारले, "जर आपण आपल्या शेजाऱ्यासोबत मिळून एक रिक्षा बनवली, तर तुमचा काही आक्षेप असेल का?"😉
मी काही चुकीचा प्रश्न विचारला तर नाही ना? 🫣
🤣😂🤣😂😊
जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे,
आपल्या हातात फ़क्त मोबाइल...
🤣😂🤣😂😊
आजकाल ची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दुसरा नवीन घेतात
आणि एक आम्ही होतो
फुगा फुटला तरी त्याची चमन गोटी करून डोक्यात फोडत बसायचो
🤣😂🤣😂😊
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत
मोबाईल वर स्क्रोल करुन
४-५ किमी तर अंगाठाच चालत असेल..
🤣😂🤣😂😊
साधेपणा तिचा काय सांगावा,
ती आज देखिल chatting करताना
डोक्यावर पदर घेते
🤣😂🤣😂😊
आमच्या लहानपणी 2G, 3G, 4G, असं काहिच नव्हत,
फक्त, *गुरू G होते.* एक काना खाली मारली की,
पोरं आपोआप रेंज मध्ये यायचे
🤣😂🤣😂😊
आजकाल 8 वी 9 वी ची पोरं पण सर्रास
सिगारेट ओढतात आणि आम्ही एक होतो
बोरं पण सांभाळून खायचो चुकून गिळल गेलं तर पोटात झाड येईल या भीतीने
🤣😂🤣😂😊
आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच नव्हती आली
जितकी या मोबाईल मुळे आलीये
🤣😂🤣😂😊
* आधुनिक संस्कार "
वडील श्रीखंड घेऊन येतात.
मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो...
इतक्यात आईचे लक्ष जाते. त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते,
"किती वेळा सांगितले.... आधी....
फोटो काढून *Whatsapp वर टाकायचा आणि
नंतरच खायच
🤣😂🤣😂😊
काय मज्जा आहे आजच्या शाळेतल्या पोरांची
त्यांना लवकर "प्रेम" करायला
मिळतय....
आणि आम्ही ९ वी १० वीत "प्रमेय" सोडवुन सोडवुन मेलो
🤣😂🤣😂😊
पहाटेच जाग आली
कोणी टकटक करीत होते,🤛🏼
दार उघडून पाहिले बाहेर
तर कुणीच उभे नव्हते...🤔
आवाजाच्या दिशेने बघताच
खिडकीवर दिसला एक पक्षी,🐥
चोचीने टकटक करीत तावदानावर
उमटवीत होता नक्षी...🐧
"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,
"भाड्याने मिळेल का एखादे झाड 🌳
घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो
पण जागा हवी
पिल्लांसाठी...🐣
तुमच्या भाऊबंदांनी लुटले
आमचे रान केले निर्वासित,🤯
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी
असतो आता फिरस्तित...
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
थोडे दाणे अन पाणी,🍲🫙
पण निवाऱ्याचे काय?
हे लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला हवेच, खातो ती भिक
अन नेतो थोडे घरी,🦜
खायला तर हवच,
जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...🐦
कधीकधी वाटते करावी आत्महत्या🦉
बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून
त्या उंच मोबाईल टाॅवरवर...🦇
जसे मग आत्महत्ये नंतर
सरकार काही देते शेतक-याला,🦩
तसेच मिळेल का एखादं झाड
माझ्या पिल्लांना तरी आस-याला"🕊️
ऐकून मी चक्रावलो, खरचं
एवढा विचार मी नव्हता केला,🦃
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा
विचार कुठेच नाही झाला...🦤
मी हात जोडून म्हटले,
"त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,🦢
पण आत्महत्या करू नको
खरचं मनापासुन सांगतो...🦚
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर
बांध वनरुम किचन खोपा,🐓
अडचण होईल पण आत्ता तरी
एवढाच उपाय आहे सोपा..."🦅
तो म्हणाला, "खुप उपकार होतील,
पण भाडे कसे देणार?",🦆
"रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
बाकी काही नाही मागणार..."🦜
तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात
पण बाकी नातलगांच काय?,🦋
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,
कुठे ठेवतील पाय...?"🐾
"अरे लावताहेत आता झाडे
अन जगवतात आता कुणी कुणी,🐸
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग
आत्महत्या करू नका कुणी..."🙈
ऐकुन तो पक्षी उडाला
काड्या जमवायला घरट्यासाठी,🌿
अन मी पण मोबाइल उचलला
तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...🙊
त्याची खिडकीवरची टकटक
माझ्या मनाचे उघडले कवाड,⛩️
वाचुन तुम्ही पण लावाल ना
कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...🌱
*निदान एक तरी झाड !*🌴
🌳🌳 🌳🌳🌳
👩एक बाई आपल्या आवडीचा रुमाल बँक कॅश काऊंटरवर विसरून जाते.
ज्याकुणाचा आहे तो घेऊन जाईल असा विचार करून कॅशिअर बाजूला ठेवून देतो पण गडबडीत कॅशिअर कडून त्यावर २-४ स्टँप मारले जातात.
काहीवेळानं ती बाई आपला रुमाल शोधत येते. कॅशिअर तिला रुमाल देतो, ती रुमालावर शिक्के बघते, रागाने हे काय माझा रुमाल खराब केलात?
कॅशिअर पण चिडतो कोणी सांगितलं तुम्हाला इथं विसरून जायला ?
वादावादी वाढते आणि
बाई चिडून तणतणत मॅनेजरच्या केबिन मध्ये जाऊन त्याला सगळं सांगते.
मॅनेजर तिच्या कडून रुमाल मागून घेतो आणि त्यावर "All stamps are cancelled" चा शिक्का मारून त्यावर आपली सही करून त्या बाईला रुमाल परत करत सांगतो "हे घ्या मॅडम आता रुमालावरचे सगळे स्टॅम्प कॅन्सल झालेत" 🫣
*स्टेट बँक ऑफ....*
*..पुणे मेन ब्रँच*
🤣😂🤣😂😊
मध्यंतरानंतर, अंधारात आपल्या जागेवर परत येत असताना, एक स्त्री कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकाला म्हणाली,"दादा, बाहेर जाताना मी तुमच्या पायावर पाय दिला का?🤔
प्रेक्षक (रागाने): हो, तुम्ही माझा पाय चिरडलात , आता माफी मागता का?🤨
स्त्री: माफी नाही दादा, याचा अर्थ माझी जागा याच रांगेत आहे हे माहिती करून घ्यायचे होते 🫣
🤣😂🤣😂😊
आपल्याकडे जावईबापूंचे पाच प्रकार सांगितले जातात. ते पुढीलप्रमाणे -
*१) साखऱ्या जावई*
साधारणत: २% जावई या प्रकारात मोडतात. हे जावई १०० कि.मी.पेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्यामुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जात-येत असतात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून त्यांचा मानपान होत असतो. चांगलीच बडदास्त असते यांची, कुठे बसवू अन् कुठे उठवू ? अशी अवस्था सासरच्या मंडळींची होत असते, म्हणून यांना *'साखऱ्या जावई'* असं म्हटलं जातं. जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...
*२) भाकऱ्या जावई*
या प्रकारात ९५% जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर/वारंवार जात-येत असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई-बाबांची आठवण आली तर तिच्या सोबत सुध्दा जावे लागते. यांचे जाणे-येणे नेहमीचे असते, त्यामुळे या जावयांना जेवणासाठी जो घरात स्वयंपाक केलेला असतो, तोच वाढला जातो. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हे नेहमीचेच आहेत, *'नित उठे, अन् कपाळ बसे.'* या म्हणीतल्या उक्तीप्रमाणे, म्हणून यांना काही खास मानपान नसतो, म्हणून यांना *'भाकऱ्या जावई'* असं म्हटलं जातं.
*३) ढोकऱ्या जावई*
या प्रकारात २% जावई मोडतात. हे *'घरजावई'* असतात. या जावयांना घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दूध अशा वस्तू सुध्दा आणून द्याव्या लागतात. झाडलोटीची कामे पण करावी लागतात. घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी यांचा अपमान नक्कीच केला जातो. म्हणून यांना *'ढोकऱ्या जावई'* असं म्हटलं जातंय्.
*४) दयावान जावई*
हे जावई सासरच्या लोकांना कायम मदत करीत असतात. बायकोचं ऐकतात, शालकाला उसने पैसे देतात. सासरची मंडळी त्यांना कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हे एक-दोन वर्षातून सासरी येत-जात असतात, त्यावेळी त्यांच्याकडे आजूबाजूचे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात म्हणून यांना *'दयावान जावई'* असं म्हटलं जातंय्.
*५) बेरकी जावई*
हे दूर असोत किंवा जवळ ते सासुरवाडीला जातच नाहीत अन् गेलेच तर त्यांना हवं तेच जेवायला करावं लागतं, तेवढं करूनही ते गोड काही बोलत नाही, तुसडेपणाने वागतात, म्हणून यांना *'बेरकी जावई'* असं म्हटलं जातंय्.
शेवटी आपल्या पूर्वजांनी अर्थात आपल्या माता-भगिनींनी *'जात्यावरच्या ओवीत'* म्हटलंच आहे, की
*१) जावाई, जावाई नको करू तू मायबाई,*
*जिन्ही वं दिधा जन्म, तिना तिले झाया नही.*
*२) जावयाची जात फार बेईमान सांगती,*
*'लक्ष' गं केलं दान, तरी माझ्या 'ताई' ला गांजती.*
शेवटी जावयाच्या महिमेचं कौतुक करतांना सासुबाई म्हणतात,
*"शंभर ब्राह्मण, एक जेवाले जावाई,*
*म्हणून 'दादासले' पुण्य काशीतून सवाई."*
आपल्या पत्नीला दुःखी पाहून पतीने विचारले,"तू इतकी उदास, विचारात गढलेली का दिसत आहेस… काय विचार करत आहेस? काय झालं?🤔"
पत्नी म्हणाली, "नाही, त्यात काही विशेष नाही."😉
गेल्या काही दिवसांपासून विचार करतेय , माझ्या 'प्रयत्नां'मध्ये काय कमी आहे याबद्दल मला काळजी वाटत आहे की लग्नाला इतकी वर्षे होऊनही तुम्ही अजूनही हसत आहात .🫣
चंदुला सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळताच कार्यालयात हजर झाला...
सर्व कागदपत्रे तपासून पाहिल्यावर....
हेडक्लार्क :- बाकी सर्व ठिक आहे. परंतु तुम्ही सोबत सोडा, बर्फ आणि खारे दाणे का आणले आहेत ???
चंदु :- सर, नोकरीच्या नियुक्तीपत्रात असे नमुद केले आहे की, तुम्हाला क्वॉर्टर देण्यात येईल.
हेडक्लार्क तेव्हापासून सुट्टीवरच गेला आहे.
ही चंद्र- उदयिनी वेळा घननीळ कांठ मेघांचे भरतीच्या क्षितिजावरुनी
घर दूर जसें सजणाचें....
तूं उभी अधोमुख येथें निद्रेचा उधळुन जोग गर्भात धरित्रीच्याही
ये जशी फुलांना जाग....
बहरांत दुःख अनवाणी
कीं पैलथडीची रात.... माझाच स्पर्श सर्पाचा अमृतमय माझे हात....
अंधार कडे घेऊन हें कोण रडाया आलें ?
दृष्टींत अरण्यामधलें मातीचें चंदन ओलें....
तरि तुझ्या कुशीचा रंग शरिरावर माझ्या उमटे
कीं चित्र अभंगामधला भगवंत स्मृतीवर दाटे....
चांफ्याच्या झाडापाशीं
अंधार जसा गांधार निनादत येतो. माहेर निळें कोणाचें....
चोळींत दुधाचा थेंब जसा तळमळतो.
माहेर तुला नसतांना
ओटींत तुझ्या मी कसा भरावा वारा
दुःखाचा जन्म घरा ये
आभाळ सोडतां घुंगुर बनतो तारा....
वैराण दिशांचा जोग
चांदणें नदीच्या पाण्यावर निजलेलें
तव हात उडोनी जाती
जे ओल फुटाया तूंच स्तनांवर धरले....
शिल्पान्त खंड स्मरणाचा
निःसंग जोडिशी क्षितिज कशाला भगवें हें जरी मिटे प्राणानें
सान्तांतुन अवघें अस्त घेऊनी उगवे ....
एक जण पुण्यात हिंडताना जाम वैतागला होता.
त्याला एकाने विचारले "काय झालं?"
तर म्हणतो
"पुण्यातल्या लोकांचं एक काही धड नसतं"...
टिळक कर्वे रोडवर राहतात
कर्वे फडके रस्त्यावर राहतात
फडके लेले आळीत राहतात
लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात
बापट दांडेकर पुलाजवळ राहतात
दांडेकर गोखले नगरला राहतात
गोखले भांडारकर रोड वर राहतात
भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात
रानडे केळकर रस्त्यावर राहतात
आणि केळकर टिळक रस्त्यावर राहतात.
अरे, आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी..!
नवाबी तहजीब विरुद्ध कानपुरी स्वभाव
एक नवाब साहेब आपल्या भाच्याच्या लग्नासाठी लखनौहून कानपूरला आले.
गेल्या दोन दिवसांपासून नवाब साहेबांच्या लक्षात येत होते की रोज मेजवानीत त्यांना खायला फक्त अंडीच दिली जात होती… म्हणून तिसऱ्या दिवशी त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी आपल्या मेहुण्याला विचारले –
.. साहेब, ही अंडी त्यांच्या जागी ठीक आहेत, पण त्यांचे आई-वडील कुठे आहेत…?! … कृपया त्यांचीही ओळख करून द्या…!! ही लखनवी संस्कृती आहे.
मेहुणासुद्धा खरा कानपुरी होता. तो म्हणाला, "साहेब... तो अनाथ आहे."
एका सुंदर मुलीचं आणि गुप्ताजींचं अफेअर होतं…!
गोष्टी लग्नाच्या दिशेने जात होत्या, पण त्याआधी…???
एके दिवशी, ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते… 🤣🤣🤣
मुलीने विचारलं:
तुमच्याकडे मारुती कार आहे का? 🤣🤣🤣
गुप्ताजी म्हणाले: नाही.
मुलगी: तुमच्याकडे फ्लॅट आहे का? 🤣🤣😃
गुप्ताजी: नाही…!
मुलगी: तुमच्याकडे नोकरी आहे का? 🤣🤣🤣
गुप्ताजी: नाही…!
_आणि मग…_
*ब्रेकअप…!!*
या काळात, गर्लफ्रेंड निघून गेल्यामुळे गुप्ताजी दुःखी झाले.
आणि मग ते विचार करू लागले…
माझ्याकडे BMW असताना… मला मारुतीची काय गरज आहे?
जेव्हा माझ्याकडे एवढा मोठा बंगला आहे, तेव्हा मला फ्लॅटची काय गरज आहे?
आणि…
जेव्हा माझा स्वतःचा ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे आणि ४०० लोक माझ्यासाठी काम करतात,
तेव्हा मला नोकरीची काय गरज आहे?
मग माझ्या गर्लफ्रेंडने मला का सोडले?
कधी कधी एखाद्या पुस्तकातलं एखादं वाक्य आपलं लक्ष वेधून घेतं. वाक्य तसं साधंच असतं पण विचार केला तर त्यात खूप अर्थ भरलेला जाणवतो. असंच एक वाक्य परवा माझ्या वाचनात आलं आणि त्या वाक्यापाशी मी थांबलो. बऱ्याच वेळा आपण वाचून पुढे पुढे जात असतो. परंतु कधी कधी एखाद्या वाक्यापाशी थांबावं आणि त्यावर विचार करावा असं ते वाक्य असतं. पुढचं काही वाचलं नाही तरी चालू शकतं.
ते वाक्य होतं टी हार्व एकर या अमेरिकन विचारवंताचं. तो म्हणतो,"Successful people have fear, doubt and worry too. They just don't let it stop them." यशस्वी लोकांना सुद्धा भीती, शंका आणि चिंता असतात. फक्त ते या भावनांना स्वतःच्या मार्गात अडथळा बनवू देत नाहीत.
मला हे वाक्य फार आवडलं. यशस्वी माणसांचं जीवन पाहिलं की आपल्याला वाटतं की किती भाग्यवान आहेत ही मंडळी ! यांना सगळं कसं भरभरून मिळालं आहे ! आणि मग अशावेळी आपण नकळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू पाहतो. मग आपल्याला आपण किती दुर्दैवी आहोत असे वाटते. आपण म्हणतो की मला माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, माझ्याच वाट्याला संकटे आणि अडचणी येतात. कोणतीही गोष्ट माझ्यासाठी सहजपणे होतच नाही. अगदी हातातोंडाशी आलेले यश मला नेहमी हुलकावणी देते.
दूरवरून दिसणारे पर्वत आपल्याला खूप सुंदर वाटतात. पण जवळ जाऊन पाहिलं म्हणजे लक्षात येतं की अरे, दुरून हा डोंगर दिसत होता तेवढा सुंदर खचितच नाही ! दगडधोंडे, दऱ्या, तीव्र चढ-उतार या सगळ्या गोष्टी तिथे आहेतच. फक्त आपल्याला त्या लांबून दिसल्या नव्हत्या.
असंच यशस्वी माणसांचंही असतं त्यांच्या जवळ जाऊन पाहिल्याशिवाय त्यांच्या यशाचं मर्म लक्षात येत नाही. ही माणसं सुद्धा अनेकदा अपयशाचे धनी झालेले आढळतात. त्यांच्या जीवनातही संकटे येतात. ते देखील कधी कधी निराश होतात. कारण ती देखील तुमच्या आमच्यासारखी माणसंच आहेत. या मातीतूनच त्यांचा देखील जन्म झाला आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का ? होय, नक्कीच ! या ठिकाणी पुन्हा मला एक सुंदर वाक्य आठवतं आहे. "Great men don't do different things. They do things differently." ( महान माणसे वेगळं काम करत नाही फक्त ते आपली कामं वेगळ्या पद्धतीने करतात.)
आपण मात्र संकटे आली, अडचणी आल्या की गांगरतो आणि ती गोष्ट तशीच सोडून देतो. कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांसोबतच चिकाटीची सुद्धा आवश्यकता असते. संयम आणि धैर्य या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. संकटे आपली एक प्रकारची परीक्षाच घेतात. आपण जे पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतो, त्या शिक्षणातून खरंतर हे गुण आपल्या अंगी यायला हवेत. परंतु तसं होताना फार कमी आढळतं.
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. एका तरुण आयटी इंजिनिअरने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. कारणही तसेच होते. त्याची अचानक नोकरी गेली. त्याच्या लॅपटॉप वर सकाळी सकाळी एक ई-मेल आला. त्यात कंपनीने म्हटले होते, " कंपनीत आता तुमच्या सेवेची आवश्यकता नसल्यामुळे तुमची नोकरी उद्यापासून संपुष्टात आली आहे. आता तुमची गरज नाही." त्या एका वाक्याने त्या तरुणाच्या डोळ्यासमोर सारा अंधार पसरला. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. घरासाठी गाडीसाठी त्याने बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. आता काय होणार ? कर्जाचे हप्ते कसे भरणार? घर कसे चालणार ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... या प्रश्नांची काजळी त्याच्या मनावर एवढी दाटून आली की त्याला आपले जीवन संपवावे एवढा एकच मार्ग दिसला. गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले आणि आपल्या पत्नीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. ती बिचारी सुद्धा हा धक्का सहन करू शकली नाही आणि तिने गच्चीवरून उडी मारून स्वतःला संपवले. ही घटना वाचून कोणालाही हळहळ वाटणे सहाजिकच आहे.
कोणी एखाद्या परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या करतो तर कोणी प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारतो.
नंतर मनात एकच विचार आला की खरंच असं काही झालं म्हणजे सगळंच संपलं असे समजायचे का ? नाही. कधीही नाही. नोकरी जाणं म्हणजे एक दरवाजा बंद होणं. पण बंद दरवाजासमोर उभे राहून आत डोकावत राहणे म्हणजे मागे उघड्या असलेल्या खिडक्या न पाहणे. नोकरी गेलेल्या त्या तरुणाकडे कौशल्य होते, बुद्धी होती, अनुभव होता. त्याला फ्रीलान्सिंग करता आले असते. स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता आला असता. सरकारी योजनांचा आधार घेता आला असता. कुटुंबाने, मित्रांनी साथ दिली असती. समाजातून मदतीचे अनेक हात पुढे आले असते. पण... या सगळ्या शक्यतांचे दरवाजे त्याने स्वतःच बंद करून टाकले. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे गृहीत धरून चालायला हवे की आपली नोकरी म्हणजे अळवावरचे पाणी आहे. ती कधीही जाऊ शकते. यासाठी प्लॅन बी तयार असायला हवा.
त्या तरुणावर आलेले हे संकट खरोखरीच अवघड होते त्यातून पार पडणे सोपे नाही, हेही मान्य. संकट आले की धीर सुटतो, हेही खरे. पण खरंच अशा प्रसंगी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे का ? अशावेळी थोडे शांत राहून विचार केला तर नक्कीच मार्ग सापडतो.
"'आली जरी कष्ट दशा किती अपार। धैर्य न टाकीती तथापि थोर।
केला जरि पोत बळेचि खाले। ज्वाळा तरी ते वरती उफाळे।।"
थोरांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकायला मिळते. आजूबाजूचा निसर्गही आपल्याला शिकवत असतो. पानगळ होते परंतु झाडाला नवीन पालवी फुटते. झाडाच्या फांद्या छाटल्या जातात पण त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते. प्राणी, पक्षी देखील विपरीत परिस्थितीला तोंड देतात आणि प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतात. आपण तर माणूस आहोत. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे. आपण संकटांनी असे हाताश होऊन कसे चालेल ?
" घन तमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी..."असं एक सुंदर गाणं आहे. सर्वत्र अंधार पसरलेला असताना हा शुक्रतारा आपल्या प्रकाशाने आजूबाजूच परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो असं म्हणत नाही की माझ्या एकट्याने काय होणार आहे ? स्वतःच्या जीवनाचा दीप विझवून अंधार करण्यापेक्षा इतरांसाठी प्रकाश देणारा दीप बना. जीवन असे सुखासुखी नष्ट करू नका. आज रात्र आहे पण उद्या पहाट होणारच आहे हे निश्चित ! हे जीवन म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे हे लक्षात ठेवून वागा.
- विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
CA ची पत्नी : काय हो?
महागाई दर म्हणजे काय असतं हो?
CA : पहिलं तुझं वय 21 वर्षे होतं,
कंबर 28 होती, आणि वजन 50 किलो होतं.
आता तुझं वय 36 वर्षे, कंबर 38
आणि वजन 80 किलो आहे !!
आता तुझ्याकडे पहिल्यापेक्षा सगळं जास्त आहे, *पण तुझी व्हॅल्यू पहिल्यापेक्षा कमी आहे... यालाच महागाई दर म्हणतात!!
Moral of The Story :
अर्थशास्त्र तेवढं कठीण नाही, पण योग्य उदाहरण देऊन समजून सांगायला पाहिजे.
_हा अर्थतज्ज्ञ नंतर महिनाभर उपाशी होता. त्याची कंबर 20 आणि वजन 45 किलो झालं!
मग त्याची बायको त्याला म्हणाली :
तुमचं पुस्तकी ज्ञान कामाचं नाही.
महागाई अशी आटोक्यात आणायला हवी!!!
सकाळीच एक इसम फक्त “बीपी तपासावं” म्हणून ओपिडीत आला,”बीपीचं मशिन केवढ्याला मिळतं?” त्यानं अचानक विचारलं..
“८००ते ३००० पण हे यंत्र नाही उपकरण आहे” मी हे उत्तर देतो न देतो तोच “शूगर तपासायची का?” सिस्टरनं त्याला विचारलं..
“नको..माझ्याकडं शूगर मशिन आहे” त्यानं माहिती दिली.
“अहो ते ही उपकरण आहे यंत्र नाही” मी स्पष्टिकरण दिलं आणि “तेच ते” म्हणत इसम बाहेर पडला..
आपल्याकडं हे असं ढोबळ-पसरट बोललं जातं..
आमच्याकडं एक इंटरकॅाम आहे-एक लॅंडलाईन आहे. “कुठला फोन आणायचा?” हे स्टाफला शंभरदा सांगूनही इंटरकॅाम सांगितलं की लॅंडलाईन घेऊन येतात आणि लॅंडलाईन सांगितलं की इंटरकॅाम..
बरं वर यावर उपाय म्हणून शॅार्टकटमध्ये “काळा फोन आणू की पांढरा?” असंही विचारतात पण त्यांची कामं आणि त्यासाठी त्यांना दिली गेलेली नावं काही समजावून घेत नाहीत..
माझा एक मित्र प्रत्येक सरदारजीचा उल्लेख “तो नाही का तो हरभजन?” असा करतो किंवा कुठल्याही आफ्रिकन माणसाला ‘रिचर्ड’ म्हणतो,सगळे हसण्यावारी सोडून देतात पण खरं तर हे खटकायला हवं..
अर्थात ढोबळ संबोधन देणारे किंवा पसरट बोलणारे वेडे आहेत असं माझं बिल्कूल म्हणणं नाही पण ते मेंदूचा अत्यंत सामान्य अन् कधीकधी चुकीचा वापर करत आहेत असा माझा ठाम दावा आहे..
मेंदूला जग समजण्यासाठी गोष्टी गटात टाकायला आवडतात उदा. फोन म्हणजे फोनच मग तो इंटरकॉम असो मोबाईल असो की लँडलाईन..
प्रत्येक गोष्ट तपशीलात समजून घेणं हे मेंदूसाठी खर्चिक काम आहे म्हणून तो “सोपं नाव=सोपी ओळख” हा मार्ग निवडतो यालाच Heuristics अर्थात शॅार्टकट विचार असं म्हणतात..
मेख इथंच आहे-गोष्ट थोडी नाजूक होते.सगळे उत्तर भारतीय भैय्ये सगळे दाक्षिणात्य अण्णा हे फक्त शॉर्टकट नाही तर सामाजिक स्टीरिओटाईप आहे..
एक अनुभव सगळ्यांवर लागू होतो आणि गोष्टींचं अतिसामान्यीकरण सुरू होतं,हे लोक ठराविक संबोधनं विसरत नाही तर ते लक्ष्यात ठेवण्याची मेहनत टाळतात..
यात मानसशास्रीय दृष्टिकोनातून तीन गोष्टी दिसतात कॉग्निटिव्ह रिजिडिटी अर्थात विचारांची लवचिकता कमी असणं-नवीन माहिती स्वीकारण्याची अनिच्छा आणि लोकांविषयी अनाहूत स्टीरिओटायपिंग..
हा मानसिक विकार अजिबात नाही पण तो सवयीची विचारशैली (habitual cognition)-सामाजिक अज्ञान किंवा कमी संवेदनशीलतेचा आणि क्वचित प्रसंगी सौम्य obsessive traits किंवा rigid thinkingचा भाग असू शकतो..
तुम्ही म्हणाल हा भाऊ आता प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीला आजार म्हणू लागलाय पण तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर एक ‘प्रयोग’ करा..
“आजपासून प्रत्येक नवीन व्यक्तीचं खरं नाव दोनदा उच्चारायचं,आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूचं नाव तिच्या मुळ स्वरुपात लिहायचं जसं लाईटचा बोर्ड ऐवजी एक्स्टेन्शन बॅाक्स-चार्जिंगचा गट्टू ऐवजी अडाप्टर वगैरे वगैरे..
पहिल्या काही दिवसांत अडखळाल-चुकाल पण हळूहळू जाणवेल नाव बदललं की नातं बदलतं-दैनंदिन कामात परफेक्शन येतं;फोन म्हणणं सोपं होतं पण ‘लँडलाईन’ म्हणणं अचूक होतं,आपल्याला मुंबईत कुणी ‘घाटी’ म्हटलं की राग येतो का नाही? कन्नडीगा म्हटलं तर कानडी माणसाला बरं वाटेल..
वस्तूंना किंवा व्यक्तींना ढोबळ नाव देणं हे हे कुठल्या आजाराचं वा वेडेपणाचं लक्षण अजिब्बात नाही पण मेंदूच्या आळशीपणाचं सूचक असू शकतं आणि जेव्हा ते लोकांच्या ओळखीवर परिणाम करतं तेव्हा ते फक्त ‘चूक’ नसतं तर संवेदनशीलतेचा अभाव बनतं..
आपला मेंदू आपल्याला शॉर्टकट देतो पण माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्या शॉर्टकटच्या पलीकडं जाऊन अचूकता आणि आदर यांची निवड करावी !
डॉ प्रज्ञावंत देवळेकर
बायको, ऐका , आज ऑफिसमधून लवकर परत या , आपण सिनेमा बघायला जाऊ.🥰
नवरा: मी आलो नाही तर!!!😉
पत्नी: तुम्ही वेळेवर आलात तर मी भाजपच्या निवडणूक चिन्हाने तुमचं स्वागत करेन.🪷
तुम्ही आणखी उशीर केल्यास, मग काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासह...!👋
तुम्ही आणखी उशीर केल्यास... केजरीवाल यांचे निवडणूक चिन्ह 🧹 दारामागे ठेवले आहे... सावध रहा.
तेव्हापासून नवरा सारखं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चिन्ह पहातोय ⌚
रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने शेजारच्या प्रवाशाला म्हणाले, ''मला कमी ऐकू येतं एवढं मला ठाऊक होतं, परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगापासुन बोलत आहात त्यातील एक अक्षरही मला ऐकू आले नाही''.
.
.
.
सहप्रवासी गणपतराव म्हणाले, ''आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!''
बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?
नरू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ?
नरू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.
एक धर्मगुरू आणि पाद्री रस्त्याच्या कडेला उभे आहेत. त्यांच्या हातात एक फलक आहे, ज्यावर लिहिले आहे, "शेवट जवळ आला आहे! खूप उशीर होण्यापूर्वी आताच मागे फिरा!"
एक जाणारा ड्रायव्हर ओरडतो, "तुम्ही लोक वेडे आहात!" आणि त्यांना मागे टाकून वेगाने निघून जातो. वळणाच्या पलीकडून त्यांना टायरच्या कर्कश आवाजासह, मग गाडी पडल्याचा मोठा आवाज ऐकू येतो.
धर्मगुरू पाद्रीकडे वळून म्हणतो, "आपण त्याऐवजी 'पूल बंद आहे' अशी पाटी लावली तर कसं राहील?"
एकदा, बायकोबरोबर घ्यायला गेलो भाजी ! पिशव्या उचलून उचलून, जिरली होती माझी !
पिशव्या उचलणे म्हणजे, समजू नका थट्टा ! इकडे, चालू होता बायकोच्या तोंडाचा पट्टा !
इतक्यात मैत्रीण, छानश्या बाळाला आली हो घेऊन ! अले वा, खेळवू लागलो, त्याच्या गालावर हात ठेऊन !
हे घ्या तुमचे बाळ, मैत्रीण ओरडू लागली रागात ! तुमच्याशिवाय, कोण आहे आम्हाला या जगात !
ओरडलो, कोणाचं बाळ, तुझ डोकं बिकं फिरलंय का? बायको त्वेषाने, तरी वाटलंच, पाणी कुठं मुरलंय का?
बायको लाल झाली रागाने, जाऊ लागला तिचा तोल ! मैत्रिणीला म्हणालो, अगं ये बाई, आता तरी खरं बोल !
मैत्रीण हसतच, सॉरी सॉरी हे माझंच आहे मुल ! मला या वेड्याला, करायचं होतं हो एप्रिल फुल !
मैत्रिणीचं झालं एप्रिल फुल, पण माझी जाम टरकली ! बायकोकडे बघताना, पायाखालची वाळूच सरकली !
कवी - उमेश शां. श. ओवाळ
एका माणसाने वर्तमानपत्रात जाहिरात दिली की त्याला नोकर हवा आहे. तुम्हाला कोणताही पगार मिळणार नाही, फक्त जेवण मिळेल.
नशिबाने साथ दिलेला एक गरीब माणूस आला आणि त्याने विचारले,"साहेब, मला काय काम करायचं आहे?"
तो काहीच बोलला नाही, फक्त दोन लोकांसाठी रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण जवळच्या गुरुद्वाराच्या लंगरमधून आणावे लागते.
एक तुझं, एक माझं..!!!
*आई ही आई* असते...
● *आयझॅक-न्यूटनची आई* : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??
● *आर्किमिडीजची आई* : गाढवा! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
● *एडिसनची आई* : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं!
● *जेम्स वॅटची आई* : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!
● *ग्रॅहम बेलची आई* : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
● *मोनालीसाची आई* : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!
● *गॅलेलियोची आई* : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??
● *कोलंबसची आई* : कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
● *मायकल अँजेलोची आई* : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!
● *बिल गेट्सची आई* : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते!
● *फॅरेनहाइटची आई* : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!
आणि शेवटी..
● *अलबर्ट आईनस्टाइनची आई* : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!
😊😝
गोड बोलणा आमका
कोकणातल्या मातीनच
दिला गे बाय ..
मगे तिळगुळ घेऊन गोड
बोलायची गरजच काय ?
वरसून फणसासारखो
काटेरी दिसलो तरी
भुतुर गोड सोन्यासारखो
आसता गे बाय ..
मगे तिळगुळ घेऊन
गोड बोलाची गरजच काय ?
अडल्या पडलेल्यांच्या
हाकेक हाक देता ..
कधी बोलावलास तरी
आसात तसो धावान जाता..
देवासारखो पाठी उभो
रवता गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
एखाद्याक जीव लावल्यानं
तर काळीज काढून देता ..
वरवर नाय, मनापासून
सगळा करता ..
बघून डोळ्यात पाणी
भरता गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
गरम मसाल्यासारखो
वरवर तिखट दिसलो तरी ..
काळीज रसरशीत हापूस पायरी ..
सगळ्यांनी त्येचो अनुभव
घेतल्यानी गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
मालवणी माणसा बद्दल
बोलशीत तितक्या थोडा
कसो घडलो ह्या सगळ्यांका
पडला कोडा ..
नारळातल्या पाण्याचा
साक्षात अमृत गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
मालवणी माणसा बरोबर
दोस्ती केलास काय होतला
सगळ्यांचा भला ..
तुम्ही पण शिकतलास गोड
बोलण्याची कला ..
मी सांगतयता विश्वातला
सत्य आसा गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ??🥰