बाताराम आणि त्याचे दोन मित्र जंगलामध्ये भटकत असता हिंडत हिंडत ते मनुष्यवस्तीपासून अतिशय दूर गेले आणि रस्ता चुकले. परत कसे यावे हे काही त्यांना कळेना. अशा परिस्थितीत त्यांनी त्या जंगलात तीन दिवस आणि तीन रात्री घालविल्या. चौथ्या दिवशी त्यांना त्या जंगलात एक झोपडी आढळली‚ पण त्या झोपडीत कोणीच राहत नव्हते. हिंडून हिंडून ते अतिशय दमलेले होते. तेव्हा त्यांनी झोपडीत मुक्काम करायचे ठरविले. थंडी-वाऱ्यापासून आणि श्वापदांपासून रक्षण करून घेण्यासाठी जंगलातील निवारा म्हणून त्यांना त्या झोपडीचा उत्तम उपयोग झाला. तथापि अन्न नाही‚ पाणी नाही. अशा स्थितीत आणखी एक-दोन दिवस त्यांनी त्या झोपडीत कसेबसे काढले. मग मात्र त्यांची क्षुधा अनावर झाली. आता जर आपल्याला खायला काही मिळाले नाही तर आपण जगणे शक्य नाही‚ असे त्यांना वाटले. तेव्हा बाताराम आपल्या दोन मित्रांना म्हणाला‚ ‘‘मित्रहो‚ तुम्ही स्वस्थ या झोपडीमध्ये बसा. मी जंगलातले एखादे तरी जनावर मारून तुमच्यासाठी खायला घेऊन येतो. मग वाघ जरी मारायची मला पाळी आली तरी बेहत्तर आहे! पण काहीतरी तुम्हाला घेऊन आल्यावाचून राहणार नाही.’’ असे म्हणून भक्ष्याच्या शोधार्थ तावातावाने बाताराम झोपडीतून बाहेर पडला. तो जंगलात जायला आणि तिकडून भुकेने वखवखलेला एक भयंकर वाघ यायला एकच गाठ पडली. बाताराम दृष्टीस पडताच वाघाने एकदम डरकाळी फोडली आणि जबडा वासून तो बातारामच्या अंगावर धावून आला. तेव्हा बाताराम जीव घेऊन झोपडीकडे पळत सुटला. बाताराम पुढे पळतोय आणि वाघ मागून धावतोय! कसाबसा बाताराम झोपडीच्या दाराशी पोहोचला‚ पण उंबरठ्यावर ठेच लागून तो सपशेल पालथा पडला. वाघाने मागून जी एकदम झेप घेतली तो बाताराम खाली पडल्यामुळे त्याच्या अंगावर न पडता तो दारातून थेट झोपडीत जाऊन आदळला. त्याबरोबर बातारामने टणकन् उडी मारून झोपडीचे दार लावून घेतले आणि आत असलेल्या आपल्या दोन मित्रांना तो ओरडून म्हणाला‚ ‘‘दोस्तहो! या वाघाचे कातडे सोलून त्याला तुम्ही नीट कापून ठेवा‚ तोपर्यंत मी दुसरा वाघ घेऊन आलोच!’’ असे म्हणून बातारामने मागल्या पावली जो सुंबाल्या ठोकला तो पुन्हा काही तेथे परत आलाच नाही!
जिराफाची मान
भूगोलाचे मास्तर वर्गात आफ्रिकेचा भूगोल शिकवत असता‚ आफ्रिकेत आढळणाऱ्या निरनिराळ्या प्राण्यांची आणि पशूंची चित्रे मुलांना दाखवित होते. दाखविता दाखविता त्यांनी जिराफाचे चित्र वर्गासमोर धरले आणि हसून म्हणाले‚ ‘‘मुलांनो‚ पाहिलात हा प्राणी? किती लांब आणि उंच आहे. बघा याची मान! असा विचित्र प्राणी दुसऱ्या कोठल्याही खंडात आढळून येणार नाही!’’
जिराफाचे ते चित्र पाहून सारी मुलं आश्चर्यचकित झाली. कारण इतक्या लांब मानेचा चमत्कारिक प्राणी त्यांनी कधीच पाहिला नव्हता. चिमुकल्या चिंतूच्या मनावर त्या चित्राचा फारच परिणाम झाला‚ आपल्या जागेवरून तो उठून उभा राहिला आणि गंभीर चेहरा करून त्याने मास्तरांना विचारले‚ ‘‘पण मास्तर मला हे कळत नाही. या जिराफाची मान इतकी लांब काय म्हणून?’’ तेव्हा मास्तर हसून ताबडतोब म्हणाले‚ ‘‘हात् वेड्या इतकी साधी गोष्ट तुला का कळत नाही? अरे या जिराफाचे डोके त्याच्या शरीरापासून अतिशय लांब असल्याकारणाने परमेश्वराला त्याची मान लांब करणे भागच पडले. न करून करतो काय तो! कळले आता?’’ वर्गातल्या साऱ्या मुलांनी ताबडतोब माना डोलावल्या. चिंतू डोके खाजवित खाली बसला
एकदा काही कवी मंडळींबरोबर गडकरी सिंहगड पाहायला गेले. तेथे डोणागिरीच्या कड्यावर उभे असताना पुष्कळशा कवींना काव्य रचण्याची स्फूर्ती आली आणि जो तो ‘उद्धवा शांतवन कर जा’ या चालीवर ऐतिहासिक कविता लिहू लागला. गडकरी शांतपणे उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यांना विचारले की‚ ‘‘काय हो गडकरी‚ डोणागिरीचा कडा पाहून तुम्हाला एखादी कल्पना कशी सुचत नाही?’’ त्यावर गडकरी म्हणाले‚ ‘‘हा कडा बघून एक उत्तम कविकल्पना या क्षणी माझ्या मनात आली आहे की‚ साऱ्या कवींना एका पोत्यात घालून खाली ढकलून देण्यासाठी डोणागिरीसारखा दुसरा सोईस्कर कडा नसेल या महाराष्ट्रात!’’
राज्यकर्त्यांना अंदाजपत्रकाची जुळवणी करताना कर लादण्यासाठी नवी नवी क्षेत्रे शोधावी लागतात. विवाहित जोडपी ही विविध खर्चाखाली भरडली गेलेली असतात. ‘एकटा जीव सदाशिव’ अशा ब्रह्मचाऱ्यांना त्या मानाने खर्च कमी असतो. हा विचार जर्मनीमध्ये केलेला आढळतो. महायुद्धाच्या काळात नव्या कराच्या यादीत ‘ब्रह्मचाऱ्यावर कर’ लादण्याची कल्पना पुढे आली.
त्याबाबत खुलासा मागताना हिटलरने विचारले‚ ‘जनतेला हा कर झेपेल का?’
त्यावर एका अविवाहित नागरिकाने विनंती केली‚
‘तंगीच्या काळात कच्च्या मालावर जकात बसवू नये.’
तिघे कोण
एका तरुणीने आपला हात वेगवेगळ्या वेळी तीन पुरुषांच्या हातात दिला. एकदा तिचा चेहरा हसरा दिसला. दुसऱ्या वेळी काळजीयुक्त दिसला‚ तर तिसऱ्या वेळी रडवेला झाला.
तर हे तिघे कोण असावेत?
उत्तर - अनुक्रमे नवरा‚ डॉक्टर व कासार
तीन जणांनी तरुणीची चुंबने घेतली. त्या वेळी कधी कधी ती रडे‚ तर कधी रागवे‚ कधी कधी लाजेही!
तर या चुंबन घेणाऱ्या व्यक्ती कोण असाव्यात?
उत्तर - अनुक्रमे आई‚ मैत्रीण आणि नवरा
*😁 खळखळून हसा - "व. पु. ...एक विनोदी कविता..."* 😁
लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही. 🤗
मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो.. 😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.
आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃
त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे.. 😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.
लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो. 😜
ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही. 😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.
तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀
त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄
आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो 😃
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.
*-व. पु. काळे*
😃
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही!
एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??
नवरा-
आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस शिमल्याला हनिमूनला गेलो होतो.
तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन बायकोला खाली पाडली..🤨
ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली ;
"हे तुझ पहिल्यांदा झालं",
थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली "
हे तुझ दुस-यांदा झालं"
आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा
तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.🤨🐎
मी ओरडलो,
" ए बावळट, ! .....। तू घोड्याला मारलस ? पागल! "😡
तेव्हा ती मला रागात बोलली
"हे तुझ पहिल्यांदा झालं".🫣
आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ...
साधा वाद पण नाय केला कधी .. 😉
आम्ही अगदी आनंदी संसार करतो !!!🥰
🤣😂🤣😂😊
30-35 ठीक आहे हो,
40 पार झालं की कशातच मन लागत नाही...
कुठंही बाहेर पडावस वाटत नाही,
फिरायला वगैरे पण भीती वाटते..
तिशी च्या आत कसं, लगेच कुठं ही निघता यायचं...
थकवा नाही, कायम उत्साही वगैरे..!
20-25 तर अति स्वीट...
गोंडस गोंडस वगैरे...एकदम टवटवीत... आयुष्याची मज्जाच मज्जा वगैरे....
कसलीच भीती नाही..!
45 पार झाल्यावर तर काय होईल देव जाणो..!!
असो,
ह्या #तापमानात घरीच वामकुक्षी घेणंच योग्य.!!!🫣
काळजी घ्या उष्णता फारच वाढत आहे.!!! 😉
🤣😂🤣😂😊
तीन दरोडेखोर एका घरात शिरले. ते त्या बाईला म्हणाले, "आम्हाला तुमच्या घराची व्यवस्था बिघडवायची नाही आणि तुम्हाला इजा करायची नाही, म्हणून आम्ही इथे सोफ्यावर बसलो आहोत. तुमच्याकडे जे काही पैसे आणि दागिने आहेत ते घेऊन या."
त्या बाईने पैसे आणि दागिने आणले. दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या पतीने भेट म्हणून दिलेली हिऱ्याची अंगठी कुठे आहे?"
ती गप्प राहिली आणि अंगठी आणून त्यांना दिली.
"तुमच्या बहिणीने दुबईहून पाठवलेले घड्याळ घेऊन या." बहिणीने दिलेली भेटवस्तू देताना तिच्या डोळ्यात अश्रू होते.
"आता तुमच्या परवानगीने आम्ही 'नेस्कॅफे'ची इन्स्टंट कॉफी पिऊ."
कॉफी प्यायल्यानंतर दरोडेखोरांचा म्होरक्या म्हणाला, "आता कालचा उरलेला अननसाचा केक घेऊन या."
जेव्हा दरोडेखोरांनी सर्व सामान नेले, तेव्हा ती बाई संकोचून म्हणाली, *"तुम्ही लोक खूप व्यावसायिक आणि नीतिमत्ता असलेले दरोडेखोर आहात. आमच्या घरातल्या वस्तूंबद्दल तुम्हाला कसे कळले?"*
*दरोडेखोरांच्या म्होरक्याने चेहऱ्यावर मास्क नीट करत म्हटले, मॅडम, आम्ही तुमचे 'फेसबुक फ्रेंड्स' आहोत.*
आम्ही तुमच्या पोस्ट्स नियमितपणे वाचतो. आम्ही तुमचा स्टेटससुद्धा तपासतो. 🫣
सोशल मीडियावर सर्व काही पोस्ट करणाऱ्या सर्वांना समर्पित
🤣😂🤣😂😊
गर्मीचा कहर
रात्री बेडरुम मध्ये 2-3 मच्छर फिरतांना दिसले....
मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक मच्छर म्हणाला..
*"काका तुमची शपथ, चावणार नाही....* 🙏
*बस थोडा वेळ AC मध्ये बसु द्या"* 🫣
🤣😂🤣😂😊