बायको पोराची धुलाई करत होती....
पण मध्ये मध्ये.
.
.
.
माझ्याकडे बघायची काही गरज होती का?
CA ची पत्नी : काय हो?
महागाई दर म्हणजे काय असतं हो?
CA : पहिलं तुझं वय 21 वर्षे होतं,
कंबर 28 होती, आणि वजन 50 किलो होतं.
आता तुझं वय 36 वर्षे, कंबर 38
आणि वजन 80 किलो आहे !!
आता तुझ्याकडे पहिल्यापेक्षा सगळं जास्त आहे, *पण तुझी व्हॅल्यू पहिल्यापेक्षा कमी आहे... यालाच महागाई दर म्हणतात!!
Moral of The Story :
अर्थशास्त्र तेवढं कठीण नाही, पण योग्य उदाहरण देऊन समजून सांगायला पाहिजे.
_हा अर्थतज्ज्ञ नंतर महिनाभर उपाशी होता. त्याची कंबर 20 आणि वजन 45 किलो झालं!
मग त्याची बायको त्याला म्हणाली :
तुमचं पुस्तकी ज्ञान कामाचं नाही.
महागाई अशी आटोक्यात आणायला हवी!!!
सकाळीच एक इसम फक्त “बीपी तपासावं” म्हणून ओपिडीत आला,”बीपीचं मशिन केवढ्याला मिळतं?” त्यानं अचानक विचारलं..
“८००ते ३००० पण हे यंत्र नाही उपकरण आहे” मी हे उत्तर देतो न देतो तोच “शूगर तपासायची का?” सिस्टरनं त्याला विचारलं..
“नको..माझ्याकडं शूगर मशिन आहे” त्यानं माहिती दिली.
“अहो ते ही उपकरण आहे यंत्र नाही” मी स्पष्टिकरण दिलं आणि “तेच ते” म्हणत इसम बाहेर पडला..
आपल्याकडं हे असं ढोबळ-पसरट बोललं जातं..
आमच्याकडं एक इंटरकॅाम आहे-एक लॅंडलाईन आहे. “कुठला फोन आणायचा?” हे स्टाफला शंभरदा सांगूनही इंटरकॅाम सांगितलं की लॅंडलाईन घेऊन येतात आणि लॅंडलाईन सांगितलं की इंटरकॅाम..
बरं वर यावर उपाय म्हणून शॅार्टकटमध्ये “काळा फोन आणू की पांढरा?” असंही विचारतात पण त्यांची कामं आणि त्यासाठी त्यांना दिली गेलेली नावं काही समजावून घेत नाहीत..
माझा एक मित्र प्रत्येक सरदारजीचा उल्लेख “तो नाही का तो हरभजन?” असा करतो किंवा कुठल्याही आफ्रिकन माणसाला ‘रिचर्ड’ म्हणतो,सगळे हसण्यावारी सोडून देतात पण खरं तर हे खटकायला हवं..
अर्थात ढोबळ संबोधन देणारे किंवा पसरट बोलणारे वेडे आहेत असं माझं बिल्कूल म्हणणं नाही पण ते मेंदूचा अत्यंत सामान्य अन् कधीकधी चुकीचा वापर करत आहेत असा माझा ठाम दावा आहे..
मेंदूला जग समजण्यासाठी गोष्टी गटात टाकायला आवडतात उदा. फोन म्हणजे फोनच मग तो इंटरकॉम असो मोबाईल असो की लँडलाईन..
प्रत्येक गोष्ट तपशीलात समजून घेणं हे मेंदूसाठी खर्चिक काम आहे म्हणून तो “सोपं नाव=सोपी ओळख” हा मार्ग निवडतो यालाच Heuristics अर्थात शॅार्टकट विचार असं म्हणतात..
मेख इथंच आहे-गोष्ट थोडी नाजूक होते.सगळे उत्तर भारतीय भैय्ये सगळे दाक्षिणात्य अण्णा हे फक्त शॉर्टकट नाही तर सामाजिक स्टीरिओटाईप आहे..
एक अनुभव सगळ्यांवर लागू होतो आणि गोष्टींचं अतिसामान्यीकरण सुरू होतं,हे लोक ठराविक संबोधनं विसरत नाही तर ते लक्ष्यात ठेवण्याची मेहनत टाळतात..
यात मानसशास्रीय दृष्टिकोनातून तीन गोष्टी दिसतात कॉग्निटिव्ह रिजिडिटी अर्थात विचारांची लवचिकता कमी असणं-नवीन माहिती स्वीकारण्याची अनिच्छा आणि लोकांविषयी अनाहूत स्टीरिओटायपिंग..
हा मानसिक विकार अजिबात नाही पण तो सवयीची विचारशैली (habitual cognition)-सामाजिक अज्ञान किंवा कमी संवेदनशीलतेचा आणि क्वचित प्रसंगी सौम्य obsessive traits किंवा rigid thinkingचा भाग असू शकतो..
तुम्ही म्हणाल हा भाऊ आता प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीला आजार म्हणू लागलाय पण तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर एक ‘प्रयोग’ करा..
“आजपासून प्रत्येक नवीन व्यक्तीचं खरं नाव दोनदा उच्चारायचं,आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूचं नाव तिच्या मुळ स्वरुपात लिहायचं जसं लाईटचा बोर्ड ऐवजी एक्स्टेन्शन बॅाक्स-चार्जिंगचा गट्टू ऐवजी अडाप्टर वगैरे वगैरे..
पहिल्या काही दिवसांत अडखळाल-चुकाल पण हळूहळू जाणवेल नाव बदललं की नातं बदलतं-दैनंदिन कामात परफेक्शन येतं;फोन म्हणणं सोपं होतं पण ‘लँडलाईन’ म्हणणं अचूक होतं,आपल्याला मुंबईत कुणी ‘घाटी’ म्हटलं की राग येतो का नाही? कन्नडीगा म्हटलं तर कानडी माणसाला बरं वाटेल..
वस्तूंना किंवा व्यक्तींना ढोबळ नाव देणं हे हे कुठल्या आजाराचं वा वेडेपणाचं लक्षण अजिब्बात नाही पण मेंदूच्या आळशीपणाचं सूचक असू शकतं आणि जेव्हा ते लोकांच्या ओळखीवर परिणाम करतं तेव्हा ते फक्त ‘चूक’ नसतं तर संवेदनशीलतेचा अभाव बनतं..
आपला मेंदू आपल्याला शॉर्टकट देतो पण माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्या शॉर्टकटच्या पलीकडं जाऊन अचूकता आणि आदर यांची निवड करावी !
डॉ प्रज्ञावंत देवळेकर
बायको, ऐका , आज ऑफिसमधून लवकर परत या , आपण सिनेमा बघायला जाऊ.🥰
नवरा: मी आलो नाही तर!!!😉
पत्नी: तुम्ही वेळेवर आलात तर मी भाजपच्या निवडणूक चिन्हाने तुमचं स्वागत करेन.🪷
तुम्ही आणखी उशीर केल्यास, मग काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासह...!👋
तुम्ही आणखी उशीर केल्यास... केजरीवाल यांचे निवडणूक चिन्ह 🧹 दारामागे ठेवले आहे... सावध रहा.
तेव्हापासून नवरा सारखं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चिन्ह पहातोय ⌚
रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने शेजारच्या प्रवाशाला म्हणाले, ''मला कमी ऐकू येतं एवढं मला ठाऊक होतं, परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगापासुन बोलत आहात त्यातील एक अक्षरही मला ऐकू आले नाही''.
.
.
.
सहप्रवासी गणपतराव म्हणाले, ''आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!''